Monday 2 June 2014

रेल्वे डायरी

दिल्ली observations

दिल्ली गुरगाव हाय वे वर टोल नाका होता. कसला भीषण प्रकार होता तो. सगळ्यांसाठीच, commuter साठी आणि ते टोल गोळा करणारे. ते तर रोबो झाले होते. लोकांनी लिगल लढा दिला आणि टोल बंद झाला. त्या लढ्याबद्दल लिंक्स आहेत. वाचा. जर valid reason असेल तर शासन नमतेच. कारण शासक ही माणसंच आहेत.

मला या दिल्लीकरांचे फार कौतुक वाटते. बर्याच मंडळींना अलिशान कारचा शौक नाही. म्हणजे wagon r किंवा alto सुळसुळ पळताना दिसतात. आणि ४२-४३° सेंटिग्रेड (सकाळी ८:३० वाजता चटके बसत होते) मधे सुद्धा AC वापरत नाही, पण या अशा गाड्यांवर नोकरीवरचा ड्रायव्हर मात्र आवर्जून दिसतो. अंतरं अशी मरणाची आहेत की ड्रायव्हर ठेवावाच लागतो. मग ८००० रूपयाचा ड्रा़यव्हर ठेवण्यासाठी बाकी cost saving.

दिल्ली पोलीसचा नियम आहे pan card हॉटेलमधे ओळखपत्र म्हणून चालत नाही.

पुणे-बंगलोर किंवा चेन्नईचं airfare बर्याचदा affordable असतं, पण दिल्ली म्हणजे लूट. आतासुद्धा ११५०० ते १२००० तिकीट होतं विमानाचं वन वे. नाही परवडत. मग जाता येता ट्रेन. वेळ जातो पण ही कसरत करावी लागते. लिहायचं कारण हे की जेव्हा जेव्हा ट्रेन नी प्रवास करतो, माझं रेल्वेबद्दल प्रेम आणि आदर वाढत जातो. टॉयलेट आणि स्टेशनची स्वच्छता या दोन गोष्टी जर सुधरवल्या ना तर साला रेल्वेला पर्याय नाही. २ रू प्रति किमी मधे AC, बेडरोल, जेवण, नाश्ता. घर बनतं हो २० तासाचं.

शुभरात्री.


स्थळ : भुसावळ स्टेशन. मी प्लॅटफाॅर्मवर ते गाडीच्या दरवाजात.

ते: भैया, लेट है क्या?
मी: लग तो ऐसा ही है, देड घंटा
ते: कहा लेट हुई, भोपाल आते
मी: पता नहीं, शायद (त्यांच्या डोळ्यात आश्चर्य)
ते: दौंड कब पहुँचेगी
मी: शायद दो बजें
ते: शायद. हमम (डोळ्यात महदाश्चर्य)
मी: आप दिल्लीसे
ते: नहीं, सोलापूरसे. दौंड से सोलापूर जाएँगे by car.
मी: महाराष्ट्र के हो, मराठी
त्यांनी होकारार्थी मान डोलावल्यावर सुटलोच मी. इंजिनियरिंग इंडस्ट्रीचे. मग काय पाच मिनीटात दोस्ती आणि अर्धा तास गप्पा. बिझीनेस कार्ड exchange. पुढच्या आठवड्याभरात सोलापूर visit फ़िक्स
मी: तुमच्या हिंदीवरून वाटलं नाही हो तुम्ही मराठी असाल म्हणून. फसलोच मी
ते: (हसत) काय सांगायचं तुम्हाला. तुमचा निळा शर्ट. कोच अटेंडट चा पण तोच रंग. मला वाटलं तुम्हीसुद्धा........................

 


मगाशी दिसलेलं डोळ्यातील आश्चर्य आता शब्दातून लाजत टपकत होतं.

फेसबुकचं कालपासून निवांत चर्वण करत होतो. समोरचा माणूस काय बोलतो आणि कसा दिसतो यावरून त्याचा अंदाज बांधू नये हेच खरं.

तिरस्करणीय विरोध आणि वैचारिक विरोध, आंधळं समर्थन आणि वैचारिक समर्थन यांच्यात thin line वैगेरे काही नाही चांगला भरपूर फरक आहे. जाणवतंच अगदी.

अनुकरण केलेले लिखाण आणि स्वत:चे विचार. थोडं अवघड जातं कारण बेमालूम असतं, पण कळतंच. भोकरकरांच्या लिखाणात शिव्या बसतात चपखल मेकॅनो सारख्या. तुमच्या नाही. वाघमारे सरांच्या लिखाणातील जळजळ आतून आलेली असते. तुम्ही ओढून ताणून आणलेली असते. उगाच आपलं वर गेलेल्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याने टाळ्या मिळतीलही कदाचित, पण हाताला आलेल्या मुंग्या जायच्या आधी तुमचे विचार विस्मरणात जातात.

मनमाड आलं. कित्येक वर्षांनी. १९७९-८०. पंचवटी एक्सप्रेस नी उतरून ब्राॅडगेजवरून मीटर गेज ची अजंता एक्सप्रेस. रात्री अकराची वेळ. आईच्या कडेवर लहान भाऊ. एका हातात बॅग. छोट्या पावलांने धावणारा मी आणि मागे धोतराचा सोगा आणि पिशवी सांभाळत रूळ सांभाळत चालणारे आजोबा.
डोळे भरून पुन्हा बघत डोळे मिटले.

फ़्रूटी मिळाली, नाहीतरी आवंढ्याबरोबर काहीतरी गिळायला हवंच होतं.

Bye

No comments:

Post a Comment