Monday 28 April 2014

नील चं पहिलं स्फुट

इंडिया हे किती घाण आहे हे असं मी लिहीतो आहे. डस्टबीनच्या ऐवजी रोड वर जास्त कचरा दिसतो. एक चांगली टेम्पो जाते वाटतं की काही तरी चांगलं काम असेल. पण मग दिसतात २-३ गरीब बसलेले तिकडे. रोडच्या बाजूला दुकानं आणि घरांच्या ऐवजी एक झोपड्याचं गाव दिसतं. तिकडे ग़रीब बसलेले असतात़ आणि चांगले चांगले माणसं़ त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत. आणि ते बिचारे उपाशी मरून जातात. एक चांगलं टेम्पल असतं, खूप लोकं जातात तिकडे. मग त्याच्या साईडला एक लाईन लागलेली असते गरीबांची आणि श्रीमंत माणसं़ फक्त त्यांच्या स्वत:साठी प्रेयर करतात. आता हे सगळं आहेच तर त्यांचं इकडे जगून काय तरी फ़ायदा आहे ते म्हणतात. आपण इकडे जगतो हे बरं आहे पण गरीबांसाठी इंडिया सर्वात चुकीची जागा आहे. कारण जिथे त्यांच्यासाठी काहीच पर्वा नाही तिकडे, तिथे राहून  काहीच फायदा नाही. 

No comments:

Post a Comment