Saturday, 27 December 2025

Namaste,

I know that at a CEF Meet, I am expected to speak in English.
But today, I will take the liberty of using Marathi sentences whenever the moment demands it—because some emotions refuse to be translated.

Let me take you back to August 1992.

Ajay and I were both working at SKF, on the second shift. It was a Wednesday. Ajay was in assembly; I was in grinding. Like every other day, we went together for dinner. That evening, something felt different.

For the first time, Ajay asked me if I could help serve his food. He said he was feeling unusually weak. I still remember him saying that he had swum heavily that morning and thought that might be the reason.

I happily served him dinner.

I waited to say goodbye to him at the end of the shift—but later I learned that he had left early. At the time, it seemed normal. In hindsight, it was anything but.

Thursday was a holiday.
On Friday morning, when I reached the plant, I heard something that stopped me cold—Ajay had been admitted to Jahangir Hospital with a serious illness. None of us knew what it was. We only knew one thing: it was serious.

After finishing my first shift, I rushed to the hospital.

Ajay was lying on the bed.

He is one of the very few people who calls me “Raja.”
Before I could ask a single question, he looked at me and said—

"अरे, राजा ये. माझ्या हातातील आणि पायातील पूर्ण शक्ती गेली आहे. पण काळजी करू नको दोन अवयव माझे अजूनही शाबूत आहेत ज्याचा मी प्रत्येक मिनिटाला वापर करतो, म्हणजे माझं तोंड आणि मेंदू"

—and he laughed.

We both did.
Him—effortlessly.
Me—forcefully.

Because beside him sat Meenal, his wife, silently holding her worry.

The diagnosis was Guillain-Barré Syndrome—rare, almost unheard of in those days, with frighteningly low survival rates. None of us fully grasped the medical complexity, but we all understood one thing: this was a fight for life.

As we were speaking softly, a nurse walked in and said—

"चला, तुम्हाला शॉक द्यायचे आहेत."

Ajay kept smiling.

Slightly irritated, the nurse asked—

"तुला शॉक ऐकून टेन्शन येत नाही का?"

And Ajay replied—

"सकाळपासून ३५००० चे चार इंजेक्शन देऊन तुम्ही मला इतके मोठे शॉक दिले आहेत की ४१५ व्हॉल्ट्स च्या शॉकचं काही टेन्शन येत नाही."

That was Ajay—
humour intact, spirit unbroken.

Against all odds, Ajay defeated GBS. I still remember Dr. Divte saying that while medicines mattered, it was Ajay’s positive attitude that made the real difference.

And from that moment on, his life gathered momentum.

His career at SKF didn’t just progress—it accelerated.

After shouldering multiple responsibilities, a turning point came when Ajay was assigned SKF Ahmedabad—a unit fighting for survival. Losses, legal battles, local challenges—it was a perfect storm.

Ajay didn’t just stabilize the unit.
He transformed it.

That transformation caught the attention of SKF’s global leadership.

He was selected for the Global Leadership Program, and then came a moment that surprised everyone—Ajay was handpicked to lead SKF Sweden.

The first non-Swedish person to lead the global headquarters.

I’m sure Ajay has many stories and accolades from his time in Sweden, which he will share himself. But let me tell you about one moment that gave me goosebumps.

I once watched a video of Ajay addressing a jam-packed football stadium—over 35,000 people—during a tournament sponsored by SKF. I can say with confidence that none of my friends has ever addressed a stadium of that scale.

SKF was my first job.
It was Ajay’s first job too.

Today, many of my SKF colleagues are also my business partners. Ajay chose to stay with SKF, yet our friendship continued to grow. Whenever I was in the Chinchwad area, I made it a point to stop by SKF. We met several times in Ahmedabad as well.

Ajay has that rare magnetic quality—you don’t just know him, you connect with him. That’s why, when it came to connecting two beautiful journeys—MG–RG with Ajay and Meenal—I stepped in without hesitation.

Despite his global responsibilities, Ajay always finds time during his India visits to reconnect—often over a quiet drink and warm conversation.

So today, it gives me immense pride to present to you—

A man who began as a trainee engineer
Who rose to become Managing Director of the parent company
Who holds no formal management degree, yet leads a workforce of over 50,000 people
A leader with courage
A friend with warmth
A wit that disarms
And a spirit that inspires

Ladies and gentlemen, please join me in welcoming Mr. Ajay Naik.

Thursday, 25 December 2025

इंद्रा नूयी

"तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुमच्या एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान असतील" असं लहानपणी इंद्रा कृष्णमूर्ती हिला सांगितलं असतं तर तिने हे म्हणणाऱ्याला एकतर वेडं म्हंटलं असतं किंवा ते बोलणं हसण्यावारी नेलं असतं. पण हे घडलं. २००९ साली पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना अमेरिकन उच्च पदस्थांची ओळख करून देताना अध्यक्ष बराक ओबामा एका स्त्री जवळ थांबले आणि मनमोहन सिंग यांना म्हणाले "या इंद्रा नूयी, पेप्सीको च्या सी इ ओ" तेव्हा श्री सिंग म्हणाले "पण या तर आमच्या आहेत". तेव्हा ओबामा हसत म्हणाले "त्या आता आमच्या सुद्धा आहेत." 

हे ऐकत असताना इंद्रा नूयी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंद्रा कृष्णमूर्ती या स्मितहास्य करत जगातल्या दोन नेत्यांशी हस्तांदोलन करत होत्या. त्या हास्यामागे त्यांची अमेरिकेतील ३० वर्षाची कडी मेहनत होती आणि त्याबरोबर त्यांच्या अंगभूत हुशारीची उभरत्या वयात झालेली जडणघडण. 

इंद्राचा जन्म मद्रास मध्ये, आजचे चेन्नई, एका अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात झाला. एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या या घरात लोकांचा गोतावळा मोठा. अनेक भाऊ बहिणींच्या मांदियाळीत इंद्रा चं बालपण हसत खेळत गेलं. 

तिचे आजोबा श्री नारायण सर्मा हे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांच्यामुळे घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होतं. त्यामुळे इंद्रा, चंद्रिका आणि नंदू या तिघांनाही वाचनाची आवड सुरुवातीपासून होती. एकुणात इंद्राच्या आयुष्यावर तिच्या आजोबांचा, ताथा म्हणायचे त्यांना, विलक्षण प्रभाव होता. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी आपल्या नात नातवांची जडणघडण केली होती. १९७५ साली जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा २० वर्षाची इंद्रा कोलमडून गेली होती. 

इंद्राचे आईवडील हे एकमेकांना पूरक दाम्पत्य होतं. घरातील सर्व काम आई, म्हणजे शांथा, करायच्या तर गणितात पोस्ट ग्रॅज्युएट असणारे वडील, श्री कृष्णमूर्ती, हे बँकेत अधिकारी होते. लौकिकार्थाने कुटुंब श्रीमंत नव्हतं पण संपन्न होतं. या सर्व वडीलकीच्या संस्काराबरोबर जगण्यातील सर्व गोष्टींचा म्हणजे संगीत, नाट्य, नृत्य, खेळ याचा आस्वाद घेत इंद्राचं बालपण फुलत होतं. घरामध्ये आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती (जे त्या काळात फारसं प्रचलित नव्हतं). 

इंद्रा ही हुशार आणि आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करणारी मुलगी होती. लहानपणापासूनच तिचं दिसणं हे टॉम बॉय प्रमाणे असायचं. "तुला नवरा कोण देणार?" असं म्हणत नातेवाईक चिडवायचे सुद्धा. होली एंजल्स या कॉन्व्हेंट शाळेत इंद्रा शिक्षणाबरोबर खेळ आणि वक्तृत्वस्पर्धा यात हिरीरीने सहभागी व्हायची. आठवीत असतानाच इंद्रा दिल्लीला युनायटेड स्कुल्स ऑर्गनायझेशन आयोजित एका कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. दहावीत असताना इंद्रा घरच्यांच्या मनाविरुद्ध गिटार शिकली आणि त्या काळात आपल्या तीन मैत्रिणीसह, मेरी, ज्योती, हेमा, ऑल गर्ल्स बँड काढला, ज्याची त्या काळात मद्रास मध्ये खूप चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं लॉगरिदम. त्याचे तीन वर्षे प्रयोग पण झाले. 

पुढे इंद्रा मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मध्ये गेली. तिथे रसायनशास्त्र मुख्य विषय घेत पदवी साठी शिक्षण चालू झाले. एम सी सी मध्ये तिने महिला क्रिकेट टीम उभी केली आणि इतकंच नव्हे तर चार कॉलेजेस ला अशी टीम उभी करण्यास प्रवृत्त करून मद्रास मध्ये पहिली महिला क्रिकेट स्पर्धा भरवली. 

मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मधून पास आउट झाल्यावर इंद्रा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आय आय एम मध्ये दाखल झाल्या. फरक एकच होता, मोठी बहीण आय आय एम अहमदाबाद तर इंद्रा कोलकता मध्ये. त्या एम बी ए प्रोग्रॅम मध्ये इंद्रा आणि इतर ५ मुली होत्या. बाकी १९५ मुलं. साल होतं १९७४. 

एम सी सी आणि आय आय एम कोलकाता मधून इंद्रा अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमात झळकत राहिली. त्यातही चर्चात्मक वक्तृत्व स्पर्धेत इंद्राचा हिरीरीने सहभाग असायचा. कदाचित हेच गुण पुढे जेव्हा त्या द इंद्रा नूयी बनल्या आणि अनेक लीडर शिप रोल त्यांनी निभावले, त्याकामी उपयोगात आले. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की तरुण वयात इंद्रा पंतप्रधान इंदिरा गांधी किंवा विख्यात अर्थतज्ञ नानी पालखीवला यांच्याशी संवाद साधू शकल्या. बालपणी झालेल्या संस्कारातून आणि नंतरच्या अभ्यासामुळे तरुण इंद्रा राष्ट्रीय प्रश्नावर मतं मांडू शकतील इतक्या प्रगल्भ आणि बुद्धिमान झाल्या होत्या. 

आय आय एम च्या पहिल्या वर्षानंतर मुंबईच्या बी ए आर सी मध्ये इंटर्नशिप केल्यावर इंद्रा ने मार्केटिंग हा मेजर विषय घेत मास्टर्स डिग्री मिळवली आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्यांची निवड झाली ती मद्रासस्थित मेत्तुर बर्डसेल या कंपनीत. व्यवसाय होता टेक्स्टाईल इंडस्ट्री साठी धागे पुरवणे. आणि इथेच तिची ओळख झाली ब्रिटिश नॉर्मन वेड, जे कंपनीचे सर्वेसर्वा होते. श्री वेड यांनी पहिल्यांदा इंद्रा ला अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याबद्दल सांगितलं.मेत्तुर बर्डसेल मध्ये त्यांना स्वतःच्या स्किल्स ची जाणीव झाली आणि दिलेलं काम त्या यशस्वी पणे पूर्ण करू शकतात हा आत्मविश्वास दिला. 

१९७७ साली दक्षिण भारतात टेक्स्टाईल इंडस्ट्री मध्ये संप झाला. आणि मेत्तुर बर्डसेल मध्ये काही काम उरलं नाही. त्यावेळेस इंद्रा मुंबईत जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये हेल्द केअर प्रॉडक्टस, स्टे फ्री आणि केअर फ्री, च्या सेल्स मध्ये जॉईन झाल्या. इथे त्या पहिल्यांदा अमेरिकन मॅनेजमेंटबरोबर काम करू लागल्या. तिथं त्यांची सेल्स ची करिअर बहरत होती. 

पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. एका सुट्टीसाठी मद्रास मध्ये असताना त्यांच्या नजरेला अमेरिके तील येल विद्यापीठाच्या एम बी ए कोर्स बद्दल लेख आला. त्यांच्या अनेक मित्र मैत्रिणी अमेरिकन ड्रीम बघायला आले पण होते. इंद्राने येल विद्यापीठासाठी अर्ज केला.अनपेक्षित रित्या त्यांना स्कॉलरशिप सकट ऍडमिशन मिळाली. इंद्रा आणि तिचे कुटुंबीय द्विधा मनस्थितीत होते. त्यात भर पडली ती मेत्तुर बर्डसेल परत चालू झाल्यामुळे नॉर्मन वेड, जे इंद्राच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित झाले होते, यांनी इंद्राला पूर्ण व्यवसाय सांभाळण्याची ऑफर केली. 

हा तिढा नॉर्मन वेड यांनीच सोडवला. इंद्राने जेव्हा त्यांना येल युनिव्हर्सिटी च्या ऍडमिशन बद्दल सांगितले तेव्हा त्यांनी इंद्राच नव्हे तर कुटुंबियांना सुद्धा अमेरिकेत जाण्याबद्दल उद्युक्त केलं. 

१९७८ मध्ये इंद्रा कृष्णमूर्ती येल विद्यापीठात स्कुल ऑफ ऑरगनायझेशन अँड मॅनेजमेंट या नवीनच उघडलेल्या शिक्षण दालनात प्रवेश करती झाली. 

असंख्य प्रश्नांना तोंड देत, आव्हानं स्वीकारत, प्रचंड कष्ट करत इंद्रा यांनी  येल विद्यापीठाची मास्टर्स डिग्री मिळवली. लौकिकार्थाने ही त्यांची दुसरी मास्टर्स डिग्री. पण आय आय एम कोलकता आणि येल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात खूप फरक होता. येल मध्ये प्रॅक्टिकल केस स्टडीज वर जास्त भर होता. भारताच्या मद्रास वरून आलेली तरुणी येल विद्यापीठातून अमेरिकेत आपलं स्वप्न साकारण्यासाठी तावून सुलाखून बाहेर पडत होती. 

इंद्रा कृष्णमूर्ती कॉर्पोरेट जग गाजवण्यासाठी सज्ज होताना त्यांची इंटर्नशिप होती शिकागो येथील कन्सल्टिंग फर्म मध्ये. नाव होतं बूझ अॅलन हॅमिल्टन. त्यांची पहिली असाइनमेंट होती इंडियाना स्टेट मधील एका अन्न प्रक्रिये संबंधित व्यवसायाची नीती धोरण आखणे. हे सगळं घडत असताना इंद्रा यांची  राज नूयी या स्मार्ट तरुणाशी. राज तेव्हा इटन नावाच्या इंजिनियरिंग कंपनीत काम करत होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याची परिणीती प्रेमात झाली. लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि इंद्रा कृष्णमूर्ती या इंद्रा नूयी झाल्या. या समांतर घटना घडल्या १९८० मध्ये. 

पूर्ण मास्टर्स झाल्यावर इंद्रा नूयी जगप्रसिद्ध बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) मध्ये रुजू झाल्या. बीसीजी तील त्यांची सहा वर्षे ही अनेक कडू गोड घटनांची साक्षीदार होती. त्याच काळात इंद्रा यांचे वडील श्री कृष्णमूर्ती यांचं निधन झालं. पण हे दुःख पचवताना इंद्रा आणि राज यांचं पहिलं अपत्य प्रिथा जन्माला आली. १९८६ मध्ये इंद्रा यांचा एक मोठा कार अपघात झाला. पण हे सगळं घडत असताना बीसीजी मध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इंद्रा जेव्हा कामावर असायच्या तेव्हा अमेरिकेत तुफान भ्रमंती करायच्या. कदाचित हेच कारण असावं की वडिलांचं निधन आणि कार अपघात या दोन्ही प्रसंगी बीसीजी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. 

बीसीजी च्या वर्क प्रोफाइल मध्ये तक्रार करायला काहीच जागा नव्हती. पण एक हेड हंटिंग कंपनी इंद्रा यांना एक इंटरव्ह्यू अटेंड करण्यासाठी खूप मागे लागली होती. खूप फॉलो अप झाल्यावर शेवटी इंद्रा तो इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाल्या. कंपनी होती मोटोरोला. तिथे इंटरव्ह्यू दरम्यान ओळख झाली गेरहार्ड ब्ल्यूमेयर यांच्याशी. राज यांच्याबरोबर चर्चा करत इंद्रा यांनी ती जॉब ऑफर स्वीकारली. आणि पुढील आठ वर्षात गेरहार्ड यांच्या मेंटरशिप खाली एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आपलं स्थान बळकट केलं. आव्हानं होतीच. प्रिथा पण मोठी होत होती. राज यांचं करिअर पण जोरात चालू होतं. या सगळ्या दरम्यान मोटोरोला ची नीती ध्येय धोरणे आखण्यामागे इंद्रा यांचा लक्षणीय सहभाग होता. स्ट्रॅटेजिस्ट म्हणून इंद्रा यांचं नाव अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रात दुमदुमायला लागलं होतं. 

सगळं व्यवस्थित चालू होतं. पण बदल तर घडतात. त्या न्यायाने गेरहार्ड यांनी मोटोरोला ला अलविदा करत आपल्या मूळ देशात आसिया ब्राऊन बोव्हरी (एबीबी) नावाची प्रसिद्ध कंपनी जॉईन केली. आठ वर्षाच्या काळात गेरहार्ड इंद्रा यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाले होते. म्हणून त्यांनी इंद्रा यांना एबीबी चा अमेरिकेतील व्यवसाय सेट व्हावा यासाठी पाचारण केलं. एबीबी च्या कार्यकाळात त्यांना दुसरी मुलगी झाली, तारा. इंद्रा आपलं करिअर आणि दोन्ही मुलींना मोठं करणं यामुळे खूप व्यस्त झाल्या. त्यांची आई शांता त्याच्या मदतीला आल्या होत्या. इंद्रा यांचा व्यावसायिक आलेख वर जात होता. पण एबीबी च्या व्यवस्थापनात अनेक बदल झाले आणि इंद्रा यांनी तिला अलविदा करत अशा कंपनीत जॉईन झाल्या ज्याने त्यांना केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या पटलावर ओळख दिली. 

कंपनीचं नाव होतं, पेप्सिको आणि दिवस होता ३० मार्च १९९४. 

आव्हान तर स्वीकारलं होतं. बदल तर मोठा होता. गेली १४ वर्षे त्या इंजिनियरिंग क्षेत्रात कार्यरत होत्या आणि पेप्सिको होती फूड अँड बेव्हरेज क्षेत्रातील एक धुरंधर कंपनी. पेप्सिको तील कार्यसंस्कृती आणि त्या नोकरीतून त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही इंद्रा यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक ठरली. पेप्सिको ही त्या काळात अमेरिकेतील पंधरावी मोठी कंपनी होती आणि जगभरात त्यांचे ४५०००० कर्मचारी काम करत होते. इंद्रा यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर चालू झाला आणि पेप्सिको मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वीकारत गेल्या. अनेक देशातले बिझिनेस प्लॅन्स, महत्वाचे टेक ओव्हर्स, मर्जर्स इंद्रा नूयी यांच्या अभ्यासपूर्ण सल्ल्याने पूर्ण झाले. त्याची परिणीती जी व्हायची तीच झाली. एकविसावं शतक उजाडताना इंद्रा या पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्या. इंद्रा आता अजून जोमाने काम करू लागल्या. कंपनीचं विमान त्यांच्या दिमतीला होतं. अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्यांचे झंझावती दौरे चालू असायचे. 

२००६ साली ती अद्भुत घोषणा झाली. इंद्रा नूयी पेप्सिको या जगड्व्याळ कंपनीच्या पहिल्या स्त्री सीईओ म्हणून विराजमान झाल्या. त्याशिवाय त्या पहिल्या इमिग्रंट आणि ब्राऊन कलर सीईओ झाल्या. अनेक अर्थाने इंद्रा यांची कामगिरी ऐतिहासिक होती. आणि भारत सरकारने पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ साली त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरान्वित केलं आणि त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचं यथोचित कौतुक केलं. त्या काळात अजून एक गौरवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील फॉर्च्युन ५०० कंपनीत फक्त ११ स्त्री सीईओ होत्या, अन त्यापैकी एक होत्या इंद्रा नूयी. 

पुढील १३ वर्षात पेप्सिको ने इंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केली. सेल्स, प्रॉफिट, मार्केट कॅप, इन्व्हेस्टर रिटर्न्स या प्रत्येक व्यावसायिक मेझर्स मध्ये पेप्सिको ने लक्षणीय वृद्धी केली. पण इंद्रा यांच्या कारकिर्दीचं सगळ्यात आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पी डब्ल्यू पी प्रोग्रॅम. परफॉर्मन्स विथ पर्पज. पेप्सिको ची उत्पादनं ही तब्येतीस हानिकारक आहेत हा आरोप वर्षानुवर्षे होत होता. त्याला उत्तर देण्यासाठी पी डब्ल्यू पी या कार्यक्रमाद्वारे पेप्सीकोने आपल्या उत्पादनाच्या हेल्दी कंटेंट मध्ये खूप सुधारणा केली. या कारकिर्दीत इंद्रा नूयी यांना अनेक पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले. 

२०१८ साली आपल्या एकूण कारकिर्दीची चाळीस वर्षे, आणि पेप्सिको मध्ये २४ वर्षे पूर्ण केल्यावर इंद्रा नूयी या पेप्सिको च्या सी इ ओ या पदावरून सन्मानाने पायउतार झाल्या. 

इंद्रा नूयी यांच्या झळाळत्या कारकिर्दीबद्दल वाचताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. घर आणि अत्यंत व्यस्त जबाबदारीची नोकरी करताना त्यांची चांगलीच कसरत झाली. एक किस्सा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितला की पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्यावर त्या अत्यंत उत्साहात घरी गेल्या तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आणि त्यांना ही खुशखबरी घरी सांगायची होती. त्यांनी घरात प्रवेश करताना ही बातमी आईला सांगितली. तर त्या बातमीकडे फारसे लक्ष न देता त्यांची आई इंद्रा यांना म्हणाली की घरातील दूध संपलं आहे. ते आधी घेऊन ये. इंद्रा साहजिक आहे, नाराज झाल्या. त्या आईला म्हणाल्या सुद्धा "मी इतकी आनंदाची बातमी घेऊन आले आणि त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तू मला दूध आणायला सांगितले हा  अन्याय नाही का?" त्यावर त्यांची आई म्हणाली "घरात येताना तो तुझा राजमुकुट गॅरेज मध्ये सोडायचा. इथे घरात तू आधी तुझ्या नवऱ्याची बायको, मुलींची आई आणि माझी मुलगी आधी आहेस. मग तुझी पेप्सिको ची पोझिशन". त्यांच्या यशस्वीतेचा विचार करताना त्यांचे पती श्री राज नूयी यांनी जी सपोर्ट सिस्टम उभी केली ती कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे की इंद्रा यांची कारकीर्द बहरावी यासाठी त्यांनी स्वतःच्या घौडदौडीला लगाम घातला असावा. 

पेप्सिको मधून निवृत्ती घेतल्यावर सुद्धा इंद्रा  अमेरिकेत खूप व्यस्त  आयुष्य जगत आहेत. अनेक कंपन्यांच्या बोर्ड वर त्या सल्लागार म्हणून काम करतात. 

अमेरिकन कंपनीची सीईओ म्हणून एकदा इंद्रा यांना इंग्लंड मध्ये आमंत्रित केलं होतं. हाय प्रोफाइल चर्चेत इंग्लंडचे पंतप्रधान पण त्यावेळी सामील होते. त्यांनी नूयी यांना विचारलं की "तुम्ही ३० वर्षांपूर्वी इंग्लंड ला न येता अमेरिकेला का गेल्या?" हजरजबाबी इंद्रा पटकन म्हणाल्या "मी इंग्लंडला आले असते तर आज तुमच्या बरोबर जेवायचं निमंत्रण मिळालं नसतं." अमेरिकेतील संधी आणि त्या काळातील प्रगतीशील इकॉनॉमी चं सार त्या उत्तरात दडलं होतं. 

कर्माने अमेरिकन आणि मनाने अजूनही जिथे जन्म झाला त्या भारताची कास धरून ठेवलेल्या पद्मभूषण इंद्रा नूयी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 





 

Saturday, 20 December 2025

मी जेव्हा अगदी छोट्या स्वरूपात व्यवसाय चालू केला होता तेव्हा त्याच को ऑपरेटिव्ह बँकेत आम्ही खातं उघडलं होतं. १९९९ साली जेव्हा प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंड ला जायची संधी मिळाली तेव्हा आमच्या कडे पैसे नव्हते तेव्हा याच बँकेने आम्हाला रु ५०००० कर्ज दिलं होतं. इतकंच नव्हे तर ५०० डॉलर्स घेण्यासाठी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी डॉलर्स बरोबर पोतंभरून कौतुक पण दिलं होतं. 

पुढे त्या छोट्या व्यवसायाने बाळसं धरलं आणि जेव्हा कधी पैशाची गरज लागली तेव्हा त्यांनी आम्हाला टर्म लोन दिलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. 

२०१० च्या सुमारास आम्हाला एक चेक आला होता. काही लाखाचा चेक होता. ज्या कंपनीचं पेमेंट होतं ते खूप फॉलो अप करून आम्हाला मिळालं होतं. फक्त एक चूक झाली होती. स्पिंडल मध्ये एन लिहायचं ते विसरले होते. त्यावेळी बँकिंग इतकं कडक नव्हतं. एक लेटर दिलं की चेक पास व्हायचा. असं एकदा आधीच्या मॅनेजर ने क्लिअर पण केला होता. पण यावेळेस मात्र त्याच बँकेचा मॅनेजर अडून बसला की चेक क्लिअर करता येणार नाही. मी खूप मिनतवारी केली की प्लिज चेक क्लिअर करा, खूप कष्टाने पेमेंट मिळालं आहे. अमाउंट मोठी आहे. नवीन पेमेंट करायला वेळ लागेल. मला पैशांची गरज पण होती. पण मॅनेजर साहेब काही बधले नाही. शेवटी मी चेक परत घेऊन आलो आणि महिन्याने नवीन चेक मिळाला. 

बँक मॅनेजर च्या वागण्याने मी खूप हर्ट झालो. डोक्यात तिडीकच गेली म्हणा ना. मी दुसऱ्या एका मोठ्या प्रायव्हेट बँकेत अप्रोच झालो आणि अकौंट उघडलं. हळूहळू माझं बँकिंग पहिल्या बँकेकडून नवीन बँकेत शिफ्ट होऊ लागलं. दोन-तीन वर्षात आमचं बहुतेक बँकिंग या मोठ्या बँकेमार्फत होत गेलं. गेल्या सहा सात वर्षात त्या पहिल्या को ऑप बँकेत व्यवहार शून्य झालं होतं. 

आम्ही अकौंट क्लोजर चा फॉर्म भरल्यावर तिथून तीन अधिकारी आले काल आणि अकौंट बंद करू नका म्हणून रिक्वेस्ट करत होते. पण आता खूप उशीर झाला होता. चांगले रिलेशन्स असून सुद्धा केवळ एका माणसाने अडमुठेपणा दाखवल्यामुळे बँकेने एक चांगला कस्टमर गमावला होता. कदाचित त्यावेळेस आमचं अकौंट मोठं नसावं पण व्यवसायाचं आताचं स्वरूप बघता त्या अधिकाऱ्यांना जाणवलं असावं की आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे ते. 

असं आमच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा होतं. एखाद्या कस्टमरला आम्ही वर्षानुवर्षे सर्व्हिस देत असतो. शेकडो स्पिंडल रिपेअर केले असतात. पण एखाद्या स्पिंडल मध्ये आम्ही दर्जा राखू शकत नाही किंवा काही मोठी चूक होते. आधीच्या कामाची पुण्याई इथं बऱ्याचदा कामाला येत नाही. कस्टमर आम्हाला ब्लॅक लिस्ट करून टाकतो. (दुसरी कडे हात पोळल्यावर परत आले पण आहेत). 

व्यवसायाचा हा एक अवघड मुद्दा आहे. इथं चुकीला माफी नाही. प्रत्येक व्यवहार हा कस्टमर सेन्ट्रीसिटी च्या कसोटीवर खरा ठरावा लागतो तेव्हा कुठं सस्टनेबल व्यवसाय उभा राहतो. 

Thursday, 4 December 2025

पाहुणा


आजकाल प्रवासात लोक मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसतात त्यामुळे सहप्रवाशांबरोबर फार गप्पा होत नाहीत. पण एक काळ होता की प्रवास सुरु झाल्या झाल्या, थोडंफार सेटल झालं की नाव गाव, काम कुठलं अशी जुजबी चौकशी प्रवासी करायचे, आणि नंतर मग गप्पा सुरु व्हायच्या. डब्यातील खाण्याचं देवाणघेवाण सुरु व्हायचं. डेस्टिनेशन आलं की एकमेकांचा निरोप घेतला जायचा. भेट तिथं संपायची. आणि असे सहप्रवासी विस्मरणात जायचे. तो प्रवास संपल्यावर परत त्यांना भेटलो असं फार क्वचित घडायचं. पण घडायचं. 

मला कमीत कमी पाच जण आठवतात ज्यांना मी प्रवासात भेटलो आणि नंतर माझा त्यांच्या बरोबर डायलॉग झाला. नुसताच झाला नाही तर अनेक भेटी पण झाल्या. एक तर खूप मोठी हस्ती होती. एकेकाळी पुणे औद्योगिक क्षेत्रात त्यांचं नाव होतं. त्या भेटीत मी त्यांना व्यवसायाचे अनेक प्रश्न विचारले आणि नंतर पण अनेक वेळा त्यांना भेटलो होतो. एक जर्मन माणूस भेटलेला. शेतकरी होता तो. भेटल्यावर त्याला आठवड्याने मराठी नॉन व्हेज खाण्यासाठी सुर्वे मध्ये घेऊन गेलो होतो. एक जण माझा कस्टमर झाला तर दुसऱ्याबरोबर मी मर्जर चे खाचखळगे समजून घेण्यासाठी भेटलो. एका परदेशातील ट्रिप मध्ये मला एक शेट्टी भेटले होते. मुंबईत बार होता त्यांचा. त्यांनाही जाऊन भेटलो. 

पण हे सगळं अनेक वर्षांपूर्वी घडलेलं जेव्हा मोबाईल होते, पण त्याचा आज इतका कहर वापर नव्हता. काही दिवसांपूर्वी मी अहमदाबाद हुन मुंबईला ट्रेन ने येत होतो. माझ्या शेजारच्या बर्थवर एक पस्तिशीतील तरुण घरी मराठीत सांगत होता कि गाडी मिळाली व्यवस्थित. बाकी दोन लोक गुजराती भाषिक होते. मी त्या मराठी बोलणाऱ्या युवकाशी गप्पा चालू केल्या. रात्री साडे आठ ते साडे दहा आम्ही गप्पा मारल्या. त्या दोन तासात एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल पूर्ण माहिती झाली. सर्वेश त्याचं नाव. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बाय म्हणताना सर्वेश म्हणाला की मला तुमच्या एकूणच व्यावसायिक प्रवासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. तुमची कंपनी बघण्यासाठी मी पुण्याच्या पुढील ट्रिप मध्ये आवर्जून येईल. खरं सांगायचं तर मला वाटलं की देखल्या देवा दंडवत या न्यायाने सर्वेश म्हणाला की येईल म्हणून पण नंतर विसरून जाईल. 

पण आश्चर्य म्हणजे तीन दिवसांपूर्वी सर्वेश चा फोन आला की तो पुण्यात येतो आहे आणि त्याला मला भेटायचं आहे. तो कंपनीत येईपर्यंत मला वाटलं नव्हतं की तो खरंच येईल. पण तो आला. मला यायला थोडा उशीर झाला पण तेवढ्या वेळात त्याने आवर्जून कंपनी बघितली. व्यवसायाबद्दल फीडबॅक देताना त्याने आवर्जून सांगितलं की तुमचा स्टाफ फार वेलकमिंग नेचरचा आहे. रिसेप्शनिस्ट रेवती, आमचा ऑफिस सांभाळणारा बाबू आणि त्याला कंपनी ज्याने दाखवली तो श्रीपाद या सगळ्यांचं त्याने खुलून कौतुक केलं. 

त्याचा निघतानाचा रिमार्क फार महत्वाचा होता. तो म्हणाला "ट्रेन मध्ये बोलल्यावर तुमच्या कंपनीबद्दल, तिथल्या कार्यसंस्कृतीबद्दल एक प्रतिमा तयार झाली होती. ती प्रतिमा प्रत्यक्षात पण तशीच आहे हे छान वाटलं."

कंपनीत अनेक ग्राहक, मित्र, नातेवाईक येतात आणि कौतुक करून जातात पण केवळ दोन तासाच्या ओळखीवर कंपनीत आलेला हा पहिलाच पाहुणा आणि ते परवा एका पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे काही उद्देशाशिवाय. मला ही भेट खूप आनंदी करून गेली. 


 

Wednesday, 19 November 2025

 काही दिवसंपूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबाद वरून बांद्रा टर्मिनस ला ट्रेन ने आलो. प्लॅटफॉर्म वरून चालत असताना अचानक एक माणूस समोरून आला आणि मला हिंदीत प्रश्न विचारला "कहा से आए हो?" मी सांगितलं "अहमदाबाद". मला आय कार्ड मागितलं. मी पहिल्यांदा चपापलो. स्वतःला सावरत मी उलट विचारलं "तुम्ही कोण आहात?" तर डाव्या तळव्यात लपवलेलं त्यांचं आयकार्ड दाखवलं. साध्या वेशातील पोलिसच होते ते. मी आधार कार्ड दाखवलं. एव्हाना माझ्या एक दोन वाक्याने कळलं की मी मराठी आहे. बाकी सांगितलं की दिवसभर काम करून संध्याकाळी पुण्याला जाणार आहे. 

त्यांनी मला जायला सांगितलं. जाताना मी त्यांना प्रश्न विचारला "असं माझं चेकिंग का केलं?". ते जास्त काही बोलले नाही. फक्त रँडम चेकिंग आहे म्हणाले. 

तिथून निघाल्यावर मी माझ्या भावाकडे गेलो. फ्रेश होण्यासाठी. त्याला मी झालेला किस्सा सांगितला आणि रँडम चेकिंग झालेलं सांगितलं. त्यावेळेस हसत भाऊ म्हणाला की तुझं रँडम चेकिंग झालेलं नाही आहे. तर तुला प्रश्न यासाठी विचारले गेले की तुझ्या बॅगचा रंग हिरवा आहे. (तो खरंतर हिरवा नव्हता तर तो त्याकडे झुकणारा पोपटी होता). आणि दिल्ली बॉम्ब स्फोट नंतर दोनच दिवसात मुंबईला आलो होतो. 

म्हणजे माझ्या जागी कुणी अस्लम किंवा मोहसीन असला असता तर त्याला बाजूला घेऊन कसून तपासणी झाली असती. 

मुस्लिम दहशतवाद्यांना हे  कळत नाही आहे की त्यांच्या निषेधार्ह कृत्यामुळे अनेक भारतीय मुस्लिम नागरिकांवर काय आपबिती येते ते. टेररिझम मुळे लॉ अबायडिंग मुस्लिम नागरिकांकडे संशयाने बघण्याचा जो शिफ्ट आला आहे तो योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही आहे, पण तो आला आहे हे अधोगतीचे परिमाण आहे. 

Monday, 10 November 2025

विवादास्पद

या सगळ्या पोस्टच्या धबडग्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आहे. 

देशाची आर्थिक उन्नती होत असताना बऱ्याच मित्रांचा असा आग्रह असतो की आपलं सोशल फॅब्रिक पण अजिबात उसवलेलं नाही आहे असं मानावं. 

याउलट काहींना वाटतं की आपली सामाजिक वीण उसवलेली आहे तर मग या आर्थिक बाबी सुधारत आहेत तर त्याचं काय कौतुक?

मग परिस्थिती काय आहे? अर्थात हे माझं मत आहे. पण लिहायचा प्रयत्न करतो. 

मी परवाच्या पोस्टवर एक वाक्य लिहिलं की "विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही", त्यात विवादास्पद या शब्दावर एका जवळच्या मित्राने आक्षेप घेतला. त्यावर मी काही मत व्यक्त करतो. 

पहिल्यांदा पॉझिटिव्ह गोष्टी बघू यात. तर आजच्या घडीला भारत हे लोकशाही असलेलं जगातील सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. तब्बल ९० कोटी मतदार मतदान करत असतात. १९५१ पासून देशात रक्तविहीन निवडणुका पार पडत असतात. सर्व जातीचे, धर्माचे, भाषिक लोक मतदान करत असतात. 

पण एक म्हणावं वाटतं की प्रगल्भ लोकशाही म्हणजे फक्त दर पाच वर्षांनी काहीही हल्लागुल्ला न होता निवडणुका होणे इथपर्यंत मर्यादित नाही आहे तर त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट सिस्टम मधली पारदर्शकता, कामाप्रती असलेलं उत्तरदायित्व, काही महत्वाच्या संस्थांना असणारी स्वायत्तता या निकषावर आपल्या इथे, त्यातही महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे. मतदारांना गृहीत धरून आपले विरोधी पक्ष फोडणे, त्यातील न्यायिक प्रक्रियेबद्दल वेळकाढू धोरण ठेवून संस्थापकांकडून नाव, निवडणूक चिन्ह ओरबाडून घेणे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एकेकाळी घणाघाती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकार स्थापन करणे, केवळ पक्षबदल केला म्हणून इ डी च्या चौकशा बंद करणे, रस्ता, वीज, पाणी हे महत्वाचे प्रश्न लोकांनी विचारूच नये म्हणून समाजाला धार्मिक आणि जातीय लढतीत झुंजवत ठेवणे, आर्थिक प्रगती ज्या इंडस्ट्री मुळे होते असे प्रकल्प आपल्या नाकाखालून दुसरे राज्य घेऊन जातात त्याकडे कानाडोळा करणे, शिवराळ भाषेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना घालून पडून बोलणे म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ ही लोकशाही ची लक्षणं म्हणत असतील तर मग बोलणंच खुंटलं. 

अनेक राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते हे की पोझिशन्स ला आल्यावर करोडो रुपयाच्या संपत्तीचे मालक होतात, ते कसे होतात असा कुठला उद्योग असतो की त्यांच्या इतक्या जमिनी, बंगले, गाड्या होतात याबद्दल ना कुणी प्रश्न विचारायचे नाही आणि विचारले तर त्याला असं कचाट्यात पकडायचं की त्याने परत आवाजच केला नाही पाहिजे. 

मीडियावर पूर्ण कब्जा करून टाकायचा. असे नॅरेटिव्ह पसरवायचे की सरकारच्या धोरणांची फक्त स्तुती आणि स्तुतीच झाली पाहिजे. 

ज्यांनी म्हणून विरोध केला त्यांना वेगवगेळी प्रलोभनं दाखवून सरकारच्या जागांवर बसवून देऊन त्यांचे आवाज बंद करणे हे तर अगदी सर्रास घडतं आहे. 

ही सगळी विवादास्पद लक्षणं नव्हेत काय?

भारतातील लोकशाही रुजलेली आहे पण ती प्रगल्भ झालेली नाही आहे. ती केऑटिक आहे आणि मॅच्युरिटी पासून तर खूप लांब आहे. हे खरं आहे की जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे कारण एक सशक्त संविधान आपल्या हातात आहे. पण तरीही समानता, निवडणूक आयोग/इ डी/सी आय डी सारख्या अनेक संस्थांची स्वायत्तता, आणि नागरी संस्कृती ही अजून शंकास्पद परिस्थितीत आहे हे ही तितकंच खरं आहे. लॉ आणि ऑर्डर चा बोजवारा उडालेला आपल्याला ठायी ठायी दिसतो. अगदी ट्राफिक मॅनेजमेंट पासून ते अगदी घृणास्पद गुन्हे करणारे इकडे तिकडे मोकाट फिरताना दिसतात. 

असो. आणि सोशल मीडियावर ही परिस्थिती आहे. विरोध दर्शवणारा "विवादास्पद" हा इतका माईल्ड शब्दही लोकांना सहन होत नाही, आणि मी जो राजकीय विषय लिहायचं टाळतो त्याला मत देण्याविषयी उद्युक्त करायचं आणि मग बडवत बसायचं हा पण एक नवीन ट्रेंड दिसतो आहे. 

थांबतो. 

Saturday, 8 November 2025

काही वर्षांपूर्वी मीच एक पोस्ट टाकली होती की चीन उत्पादनावर बहिष्कार टाकून काहीच साध्य होणार नाही आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर कंबर कसून कामाला लागण्यात शहाणपण आहे. त्याला अजून एक पार्श्वभूमी अशी होती की भारतातील दोन मोबाईल फोन उत्पादक, कार्बन आणि मायक्रोमॅक्स, हे सपशेल अपयशी ठरले होते. 

त्यांनतर अनेक घडामोडी घडल्या. कोविड आलं. कोविड मुळे चीनने जगाचा उत्पादक ही आपली विश्वासार्हता पूर्ण गमावली. त्यात भरीस भर म्हणून की काय पण अमेरिका आणि चीन मध्ये आता पराकोटीला पोहोचलेलं ट्रेड वॉर तेव्हा सुरू झालं. सेमी कंडक्टर ची सप्लाय चेन रोखून चीनमुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकाच नव्हे तर जगातल्या ज्या देशांनी चीनमध्ये प्लांट उभे केले होते, त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात असलेल्या कमी लेबर कॉस्ट मुळे तिथलेच देश उत्पादक शोधू लागले. 

या सर्व देशांमध्ये सशक्त पर्याय उभा राहिला तो म्हणजे भारत. होलसेल मध्ये उपलब्ध असणारं तरुण टॅलेंट पूल, इंग्रजी भाषेशी जवळीक, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मुळे तयार झालेला ब्रिज, कितीही विवादास्पद असली तरी खोलवर रुजलेली लोकशाही यामुळे जगभरातील उत्पादक भारताचे दरवाजे ठोठावु लागले. . आपण सुद्धा प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह देत या हे दरवाजे उघडले. सर्वच क्षेत्रात गुंतवणूक आल्या पण या इंसेंटिव्ह चा सगळ्यात मोठा दावेदार ठरला तो मोबाईल उत्पादक. 

मोबाईल उत्पादनाने भारतातील केलेली नेत्रदीपक प्रगती अचंबित करणारी आहे. दक्षिण भारतातील चेन्नई, होसुर आणि बंगलोर हा पट्टा तर उत्तर भारतात नोएडा मध्ये आज जवळपास ३०० कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत. याचा परिणाम असा झाला की आठ एक वर्षांपूर्वी प्रत्येक मोबाईल फोन आयात करणारा भारतीय ग्राहक आजच्या घडीला प्रत्येक मोबाईल फोन आपल्याच इथे उत्पादित केलेला वापरतो. 

यातील पुढची आकडेवारी तर डोळे दिपावणारी आहे. मोबाईल उत्पादनाची निर्यात गेल्या दहा वर्षात शंभर पट वाढली आहे. आजच्या मितीला भारत रु १.२ लाख करोड किमतीचे मोबाईल निर्यात करतो. अमेरिकेत आयात केले जाणारे स्मार्ट फोन भारतात सगळ्यात जास्त बनतात. इथे आपण चीनला मागे टाकलं आहे. आजवर या क्षेत्राने जवळपास १५ लाख डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट रोजगार निर्मिती केली आहे. 

आता कुणी म्हणेल की या सगळ्या उत्पादक कंपन्या बाहेरच्या देशातील आहेत. हे मान्य केलं तरी हे लक्षात ठेवायला हवं की एकदा तुम्ही इथल्या जमिनीवर उत्पादन चालू केलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि इथल्या लोकांना. १९८३ मध्ये वसलेल्या मारुती सुझुकी चा सगळ्यात मोठा उत्पादक भारत आहे आणि त्यांचं वाहन क्षेत्रातील काँट्रिब्युशन हे वादातीत आहे.

मोबाईल पाठोपाठ आता सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुंतवणूक घेऊन उभी आहे. मोबाईल इंडस्ट्री स्थिरस्थावर होईपर्यंत सेमी कंडक्टर इंडस्ट्री भरतीय उत्पादन क्षेत्रात हलचल निर्माण करणार आहे. 

मागील अडीच दशकं सर्व्हिस इंडस्ट्री ने गाजवल्यावर किमान पुढचे दशक उत्पादन क्षेत्र, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गाजवणार अशी चिन्ह तरी सध्या दिसत आहेत.