Thursday 19 September 2024

वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. स्पिंडल रिपेयर चा कॉल अटेंड करायला गेलो होतो. इकडच्या तिकडच्या रेफरन्स मधून मला कस्टमरची माहिती मिळाली होती. त्या कंपनीचं नाव होतं मार्केट मध्ये. चांगला बिझिनेस करत होते. साठीच्या आसपास त्यांचे ओनर असावेत. त्यांचं मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं, जे त्यांचे स्पिंडल रिपेयर करायचे. 

मी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला गेलो. मी कॉल वर गेलो की शोधक नजरेने आजूबाजूला बघतो. त्यादिवशी त्यांचे मेंटेनन्स चे लोक कुठं स्पिंडल रिपेयर करतात ते बघितलं होतं. साहेब आले. मी माझं सेल्स पीच चालू केलं. 

"आम्ही स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात आहोत. मी येताना बघितलं तुम्ही कुठे स्पिंडल रिपेयर करता ते. सर, तुम्ही जागा एअर कंडिशन्ड ठेवली नाही आहे आणि तिथे स्वच्छता पण मेंटेन नाही आहे. परत मी बघितलं की स्पिंडल डिसमँटल करण्यासाठी प्रेस पण वापरत नाही आहात. आणि......" 

मी पुढं काही बोलायच्या आत त्या साहेबांनी मला थांबवलं आणि म्हणाले "तुम्ही कशासाठी आला आहात माझ्याकडे? तुम्ही काय बिझिनेस करता ते सांगायला आला आहात की माझ्या कामाचं ऑडिट करता आहात? एक तर तुम्ही स्वतः फोन करून मला भेटायला आला आहात, ते ही बिझिनेस मागण्यासाठी. मी काय चुकीचं करतो यावर तुम्ही सेल्स पीच करणं चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला?"

मी त्यांचं स्पष्ट बोलणं ऐकून गांगरून गेलो. आणि माझ्या चेहऱ्यावर ते दिसलं. मग त्यांनी मला समजावून सांगितलं "असं दिसतंय की तुमचा नवीन बिझिनेस आहे. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पहिल्याच भेटीमध्ये, कस्टमरकडे काय चुकीचं आहे यावर तुमचं सेल्स चं बोलणं बिल्ड नाही करायचं. त्या पद्धतीने पहिले तुम्ही कस्टमरच्या मनात तुमच्या बद्दल चं निगेटिव्ह इम्प्रेशन तयार करता. आलं लक्षात. हं, आता बोला, तुमच्या काय फॅसिलिटी आहेत?"

त्यांनी दिलेला मंत्र मी नंतरच्या सेल्स च्या करिअर मध्ये कटाक्षाने पाळला. कस्टमर कडे जाताना शोधक नजर कायम ठेवली पण तिचा वापर केला की मी त्यांच्या वर्किंग प्लेस मध्ये चांगलं काय आहे ते सांगत गेलो. कस्टमर पण ते ऐकून खुश व्हायचा आणि पुढचं संभाषण मस्त व्हायचं आणि शक्यतो तो कस्टमर आम्हाला बिझिनेस द्यायचा. 

Wednesday 18 September 2024

सतीश

 चेन्नई ला मी ज्या हॉटेल मध्ये राहतो तिथं एक वेटर काम करतो, सतीश नाव त्याचं. बाकी वेटर पेक्षा कामात तो उजवा आहे हे सारखं जाणवायचं. गेस्ट ब्रेकफास्ट ला आला की त्याचं हसून स्वागत करणार, गुड मॉर्निंग म्हणणार, काय हवं नको ते पाहणार, पाण्याचा ग्लास रिकामा झाला की पाणी द्यायला येणार, कॉफी, टोस्ट, चटणी वगैरे काही एक्स्ट्रा आयटम हवा असल्यास लागलीच आणून देणार, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला का हे निघताना आवर्जून विचारणार. बाकी पण तीन चार वेटर्स तिथं असायचे पण त्यांच्यापैकी सतीश एकदम बिझी असायचा. बाकी वेटर टंगळमंगळ करत असताना सतीशचा मात्र कायम कामावर फोकस असायचा. त्याला अजिबात फुरसत नसायची. 

कोविड नंतर फिरणं जस्ट चालू झालं होतं. हॉटेल मध्ये गजबज नसायची. एकदा तर मी एकटाच होतो ब्रेकफास्ट रूम मध्ये. वेटर मध्ये पण फक्त सतीश आणि किचन मध्ये एकदोन कुक असावेत. त्या दिवशी मी सतीशशी थोड्या गप्पा मारल्या. मी विचारलं की  तू चेन्नई चा आहेस का की कोविड च्या भीतीने इतर गावचे वेटर येत नसल्यामुळे तुला बोलावून घेतलं. तर कळलं की सतीशचं गाव पण १८० किमी लांब आहे चेन्नई पासून. कोविडमुळे अगोदरच प्रॉब्लेम मध्ये असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट ने अनेक वेटर्स ला बोलावून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण कुणी दाद दिली नव्हती, अगदी चेन्नई तल्या वेटर्स ने पण नाही. सतीश तयार झाला. हॉटेलच्या मालकाने कार पाठवून सतीशला बोलावून घेतलं. 

मला त्यादिवशी कळलं की सतीशच्या घरी अगदी गरिबी. काम शोधण्यासाठी तो चेन्नईत आला. सध्याच्या हॉटेल च्या बाजूला एक रेस्टोरंट आहे तिथे टेबल साफ करायला म्हणून काम चालू केलं. असंच एकदा माहिती झालं की या शेजारच्याच हॉटेल मध्ये, जिथे मी राहतो तिथे, वेटर्स हवे आहेत. तिथं त्याने जॉब मिळवला आणि प्रचंड कष्टाने आपलं बस्तान बसवलं, सेट केलं. 

मी जेव्हा कधी गेलो तेव्हा सतीश असायचाच जॉब वर. मी त्याला त्या दिवशी गप्पा मारताना विचारलं "तू कधी सुट्टी घेतलेली बघितली नाही मी. सणासुदीला किंवा घरी काही पूजा वगैरे असेल तर जात नाहीस का घरी". तो म्हणाला "जातो की. पण इथे माझी सुट्टी वगैरे होत नसेल तरच. कारण मला या नोकरीने इतकं काही दिलं आहे की माझ्यासाठी कर्म ही पहिली प्रायोरिटी." आणि मग साऊथ इंडियन टोन मध्ये बोलत म्हणाला "this work is worship for me and this work place is temple." 

आज सकाळी त्याच हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करताना माझी नजर सतीशला शोधत होती. माझ्या शेजारी सुटाबुटातील एक कॅप्टन येऊन उभा राहिला आणि मला त्याने विचारलं "सर, मला ओळखलं नाही तुम्ही" मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिलो. तुम्ही बरोबर ओळखलं, तो सतीशच होता. मॅनेजेमेंट ने त्याचे कष्ट, त्याचं निष्ठा जाणली होती. त्याच्या छातीवर त्याच्या नावाची नेमप्लेट होती, आणि खाली लिहिलं होतं "मॅनेजर". मी झटकन उभा राहिलो आणि त्याचा हात प्रेमभराने दाबत त्याचं मनापासून अभिनंदन केलं. 

मी कुठे तरी वाचलं होतं "Walk that extra mile and you will find that road is not much crowded" सतीश त्या वाक्याची जितीजागती मिसाल होता. 

 

Monday 2 September 2024

परवा तैपेई ला येताना सिंगापूरला स्टॉप ओव्हर होता. माझ्या शेजारी एक भारतीय मुलगा बसला होता. काहीतरी करून मी त्याच्याशी बोललो. तर नेमका मराठी निघाला. 

वडील सोलापूरला एस टी मध्ये कंडक्टर आहेत. हा मुलगा एकुलता एक आहे. वालचंद मधून इंजिनियरिंग करून पोराने कष्ट करत आय आय टी खरगपूर मधून मास्टर्स केलं. कॅम्पस मधून च तैवान मधील एका प्रतिष्ठित कंपनीत जॉब मिळाला म्हणून त्याचा प्रवास चालू होता. पोराचा पहिलाच विमान प्रवास तो ही आंतरराष्ट्रीय. त्याला काळजी होती, इथे भारतीय लोक भेटतील का ते. माझ्या कंपनीतला एक मुलगा मध्ये एक वर्ष तैवान मध्ये होता. त्याने खूप भारतीय गोतावळा जमा केला होता. त्याला या तरुणाबरोबर कनेक्ट करून दिलं. सेटको च्या पोराने सिंगापूर विमानळावर गप्पा मारून एकदम आश्वस्त केलं. या मुलाने मला तैवान व्हिसा मिळायला अवघड असतो का त्याबद्दल विचारलं. मी म्हणालो "अरे, तुझं तर वर्क परमिट आहे, मग कसली काळजी?' तर म्हणाला "वर्षातून एकदा आईवडिलांना इथे आणलं तर माझी मानसिक स्थिती पण चांगली राहील आणि त्यांना पण बरं वाटेल." मी त्याला सांगितलं आहे की, त्याला वाटलं तर मी ही या आठवड्यात भेटेल त्याला. 

तैवान मध्ये ज्या कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं आहे त्या कंपनीचा उच्च पदस्थ भारतीय माणूस आहे. त्याने कंपनीत भारतीय मुलांना घ्यायचा ड्राइव्ह घेतला आहे. अर्थात प्रीमियम इन्स्टिट्यूट मधूनच. 

एकुणात मला त्या मुलाला भेटून फार भारी वाटलं. एकतर लौकिकार्थाने गरीब घरातील मुलगा. आयआयटीयन झाला. बाहेरच्या देशात जॉब लागला आणि त्यातील मेजर काँट्रीब्युशन होतं त्या सिनियर माणसाचं ज्याने भारतीय मुलं घेण्याबाबत आग्रह धरला. त्या तरुणाची कौटुंबिक इको सिस्टम सुद्धा घट्ट. 

देशाची ही अशी सामाजिक वीण इतर कुठल्याही सिस्टम पेक्षा महत्वाची आहे असं मला वाटतं. शिक्षण, कुटुंब, व्यावसायिकता या वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळेच दान योग्य पडले आहेत हे पाहून मला मनापासून आनंद झाला. 

Wednesday 31 July 2024

पुणे

नाही म्हणजे वाईट याच गोष्टीचं वाटतं की पुण्याची ही कॅन्सरस ग्रोथ चालू झाली तेव्हा टेक्नॉलॉजी आपल्या कवेत आली  होती. इंटरनेट मुळे जग जवळ आलं होतं. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे पण विकसित झालं होतं. त्याच्याशी संबंधित संगणक प्रोग्रॅम तयार झालेले होते. तरी आपल्या राजकारण्यांनी, नोकरशहांनी आणि त्यांच्या कंत्राटदारांनी व बांधकाम व्यावसायिकांनी शहराची व्यवस्थित ग्रीस लावून ठासली. त्यांनी टेकड्या सोडल्या नाही, नदी काठ सोडले नाही, जिथं म्हणून शक्य आहे तिथं आपल्या अक्कलशून्यतेने अगदी सिस्टेमॅटिक वाट लावली. एकेकाळी अत्यंत कडक नियमावली असलेल्या या शहराची अंधाधुंद वाढ झाली आणि तिला साथ मिळाली ती नागरिकांच्या बेशिस्तीची. 

या शहराचे प्लॅनर जगभर अभ्यास दौरे करत असतात तरीही यांना स्वयंकेंद्रित स्वभावामुळे स्वतःच्या तुंबड्या भरण्यात फक्त सुख दिसतं. ही लोक पूल कसेही बांधतात, चुकीचे बांधले म्हणून पडतात, रस्त्याच्या कंत्राटदाराकडून अनिर्बंध पैसे खातात आणि शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर बेवारस सोडून देतात. दुचाकी चालवणारी लोक अक्षरश: शीर तळहातावर ठेवून गाड्या चालवत असतात. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्या तरुणाचा जीव जातो आणि त्याचा हतबल बाप एकहाती खड्डे बुजवण्याची मोहीम घेतो. त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात, पण त्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचं मन द्रवत नाही. ते पुन्हा पुन्हा तितकीच घाण करत असतात आणि नागरिक लाचार होऊन जगत राहतात.

आम्ही टेक्नॉलॉजी च्या मदतीने डिजिटल पेमेंट चा जगात डंका बडवतो पण एक माईचा लाल इथं पैदा होत नाही की जो डिफेक्ट फ्री सिगनल रस्त्यावर बसवेल, त्याला व्हिजन कॅमेरा ची साथ देईल. कुणाचा तरी उठतो, सिग्नल चे खांब रोवून मोकळा होतो. त्याची प्रणाली काय आहे, परिणामकारकता काय आहे, अचूकता काय आहे याची कुणाला झाट पडलेली नसते. असले भंगार रोड अन त्या जोडीला ही बेशिस्त इको सिस्टम. मग गाड्या चालवणारे वाहतूक शिस्तीला खुंटीला टांगतात. तरुण, म्हातारे, पुरुष, बायका होलसेल मध्ये शिस्तीला गाड्या चालवताना फाट्यावर मारत असतात. ते सिग्नल तोडतात, रस्त्याने उलट बाजूने येतात, नो एन्ट्री मध्ये गाड्या चालवतात, मूर्खासारखी पार्किंग करतात. अगोदरच बोजवारा उडालेल्या सिस्टमला अजून खड्ड्यात घालतात. 

आम्हाला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची त्याची अक्कल नाही, ओला आणि सुका कचरा वेगळा कसा ठेवावा याचं तारतम्य नाही, नदीचं पाणी स्वच्छ कसं ठेवायचं ते खिजगणतीतही नाही, बंदी टाकूनही तो घाणेरडा गुटखा खाऊन लोक पचापच रस्त्याने थुंकत असतात, प्लास्टिक च्या पिशव्यांची बंदी आम्ही झुगारून टाकतो. आम्हाला ऑर्गनाईझ्ड केऑस करायला खूप आवडतो. 

एकेकाळी देशाची सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधाचं शान असलेलं शहर आता बकाल, रोगांच्या साथीचे, रस्त्यावरील अपघातांचे, ड्रग्ज चे, अनिर्बंध बांधकामे केल्यामुळे आलेल्या पुराचे शहर म्हणून ओळखू लागले आहे ही एक दुःखद शोकांतिका आहे. 

  

Monday 8 July 2024

 

1)     तर साधारण पणे १९९५-९६ ची गोष्ट असेल. एफ सी रोडच्या एका हॉटेल मध्ये मी माझ्या साहेबाचे रुमचे बुकिंग करायचो. त्यावेळेला एका रात्रीचे २५०० रु मोजायचो. सागर प्लाझा त्या काळात ३००० रु चार्ज करायचे एका रात्रीचे.

१९९७ साली मी दिल्ली ला प्लास्ट इंडिया साठी गेलो होतो. कॅनॉट प्लेस ला मरिना इंटरनॅशनल मध्ये राहिलो होतो तेव्हा एका रात्रीचे ३००० रु मोजले होते वट्ट. खाणं, लॉंड्री, राहणं मिळून इतकं बिल झालं होतं की माझी क्रेडिट कार्ड ची लिमिट क्रॉस झाली होती.

त्याच सुमारास बोनी, माझा बॉस, विमानाने यायचा बंगलोर हुन. दररोज विमान असायचं. पण एकच. एक दिवस एअर इंडिया चं (तेव्हाची इंडियन एयरलाइन्स) तर एक दिवस जेट चं. आणि भाडं असलंच काहीतरी ३००० रु वगैरे.

आज वीस वर्षे झालेत. ते एफ सी रोड च्या हॉटेल कडे ढुंकून पण बघत नाही कुणी. गुरगाव मध्ये लेजर इन २३०० रु मध्ये मिळतं, प्राईड जास्तीत जास्त ४५००. एरो सिटी चं असेल तर ५०००. हैद्राबाद चं मारीगोल्ड मिळतं ४००० ला तर चेन्नई चं जेपी नावाचं कोयंबेडू चं अफलातून हॉटेल २८०० रुपयेमध्ये.

आज पुणे बंगलोर मध्ये आज दिवसाला वीस एक फ्लाईट आहेत. ऍडव्हान्स मध्ये तिकीट काढलं तर २२०० मध्ये तिकीट मिळतं. परवा दिल्ली बंगलोर तिकीट २३५० मध्ये मिळालं.

नाही पण हे मी तुम्हाला का सांगतोय? लाल करायची म्हणून. ती तर करायचीच आहे, पण इथे महत्व अधोरेखित होतं ते कॉम्पिटिशन चं. ती झाली आहे म्हणून किमती कमी झाल्यात. पुरवठा आणि मागणी याची सांगड असली की ग्राहकाला स्वस्त भावात चांगली सर्व्हिस मिळते.

हो, पण आज का? काही नाही, आमचा पण एक स्पर्धक पुण्यात शॉप थाटतोय. सुरुवातीला धास्तावलो होतो. पण मग विचार केला, येतोय ते बरंच आहे. स्पर्धा नाही म्हणून येणारा बिझिनेस गिळून अजगरासारखा सुस्तावलो होतो. थोडी मोनोपोली ची सुखनैव भावना मनात रुंजी घालत होती. आता बरोबर पाय लावून पळेल. सर्व्हिस अजून चांगली देईन. किंमत पण वाजवी ठेवेल. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन.

स्पर्धा कितीही आली तरी एक वास्तव मात्र कुणीही हिरावू शकणार नाही, अन ते म्हणजे हा स्पिन्डल रिपेयरचा बिझिनेस organised पद्धतीने करणारी भारतातील आमची पहिली कंपनी. फक्त "Father of Low Cost Airlines" म्हणून गौरवले गेलेले कॅप्टन गोपीनाथ हे नाव स्पर्धेमुळे जसं अस्तंगत झालं तसं आमच्या कंपनीचं होऊ नये, हीच मनोकामना.......दिल से ( स्पर्धा का महत्वाची ते थोडं स्पष्ट करावं लागेल, एक पॅरा अॅड करणे )-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


व्य व्यवसायात स्पर्धा असणं हे अपरिहार्य आहे. तरीही बरेच व्यवसाय हे स्पर्धेला थ्रेट समजतात. किंबहुना व्यवसायात स्पर्धा नसेल तर मोनोपॉली तयार होण्याची शक्यता असते. कदाचित त्यातून आत्मसंतुष्टता येण्याची शक्यता असते. आणि कुणास ठाऊक अल्पसंतुष्टता पण येऊ शकते. व्यवसायात स्पर्धा असेल तर आपल्याला नाविन्यपूर्ण कामाच्या पद्धतीचा अंगीकार करावा लागतो. व्यवसायातील कुठल्याही विभागात कौशल्य विकास करणं हे क्रमप्राप्त होतं. त्यामुळे साहजिकच व्यवसायातील संबंधित सर्व लोकांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, आपत्कालीन व्यवस्थापन, ग्राहक असंतुष्ट असेल तर त्याचे व्यवस्थापन, उत्पादनाचे गुणवत्ता व्यवस्थापन या आणि अशा अनेक आघाड्यांवर काम करत त्यात सुधारणेला सातत्याने वाव असतो. 


स्प    स्पर्धा नसेल तर ग्राहकाला काय मिळतं याचं उत्तम उदाहरण १९८० च्या अगोदरचे वाहन उद्योगाचे ग्राहक सांगू शकतील. अवजड उद्योगामध्ये टाटा आणि अशोक लेलँड, कार्स मध्ये हिंदुस्थान मोटर्स (अम्बॅसॅडर) आणि प्रीमियर ऑटोमोबाइल्स (फियाट) आणि दुचाकी वाहनामध्ये बजाज आणि एपीआय (लॅम्ब्रेटा) आणि फारतर एल एम एल. अत्यंत सुमार दर्जाचे वाहन फक्त स्पर्धा नसल्यामुळे त्या काळातील लोकांवर थोपले गेले. १९८३ मध्ये आलेली मारुती सुझुकी आणि त्यानंतर १९९१ नंतर आपण जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर अनेक वाहन उद्योग याने