Wednesday 14 December 2016

वाघेला

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



प्यासा

काही शब्द असे असतात की ते उच्चारले की त्या संबंधित काही वेगळ्या गोष्टी लक्षात येतात. उदा: वैशाली म्हंटलं की मला पुण्यातील हॉटेल आठवतं किंवा डेक्कन म्हंटलं की डेक्कन क्वीन असं काहीसं.

प्यासा म्हंटलं की मला गुरुदत्त चा सिनेमा आठवतो. कधी पहिला आता आठवत नाही, पण इतका इंटेन्स सिनेमा खूप कमी नंतर पाहण्यात आला.  आणि त्यातील ते गाणं "ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया". एखादं गाणं आपलं मूड बदलवून टाकतं. तसं हे गाणं ऐकलं की आपण कितीही खुश वा रोमँटिक मूड मध्ये असलो तर एक उदासीची छाया मनावर सरसरत जाते. एखाद्या इराण्याच्या हॉटेल मध्ये गेलो की तिथलं वातावरण पाहून कसं डिप्रेशन येतं अगदी तसं च.

साहिर लुधियानवी काय ताकदीचे गीतकार आहेत हे माझ्यासारख्या कानसेनाने वेगळं आळवायची गरज नाही. आणि हे गीत त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यातल्या त्यात एखाद्याने आपल्याला फसवलं असेल, अन असे प्रसंग भरपूर आले असतात, अन हे गाणं चुकून कानावर पडलं तर मनातील आग डोळ्यातून पाणी बनून कधी व्हायला लागते ते कळत पण नाही.

एकेक शब्द साहिर साहेबांनी तावून सुलाखून निवडला आहे. अंगार नुसता. "तुम्हारी है, तुम ही संभालो ये दुनिया" सांभाळ भाऊ, ही तुझी दुनिया तुलाच लखलाभ.

"वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है," मित्रा, अरे तू काय बोलतोस तुला काही कळतं का? म्हणजे दोस्तीच्या खातीर मी तुला काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही की तू मला इतकं मूर्ख समजावं.

मागच्या आठवड्यात असाच झालेल्या फसवणुकीने उद्विग्न झालो असताना हे गाणं ऐकलं अन अक्षरश: तिथर फितर झालो. घरी येऊन नील ला ऐकवलं. १२ वर्षाचा तो. गाणं ऐकल्यावर त्याच्या नजरेत ली उदासी पाहून मी थिजलो अन साहिर साहेबांना मनोमन सलाम केला. त्या शब्दांनी नील च्या मनावर इतकी पकड घेतली की त्याने गाणं शोधून वहीत पूर्ण लिहून पाठ करून टाकलं.

रफी साहेब आणि एस डी आहेत पण कमाल केली आहे ती साहिर लुधियानवी यांनीच.


ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इन्सान के दुश्मन समाजों की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी,
निगाहों में उलझन, दिलों में उदासी,
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

यहाँ एक खिलौना है इन्सान की हस्ती,
ये बस्ती है मुर्दा परस्तों की बस्ती,
यहाँ तो जीवन से है मौत सस्ती,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

जवानी भटकती है बदकार बन कर,
जवां जिस्म सजते है बाजार बन कर,
यहाँ प्यार होता है ब्यौपार बन कर,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है,
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है,
यहाँ प्यार की कद्र ही कुछ नहीं है,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

जला दो इसे, फूँक डालो ये दुनिया,
मेरे सामने से हटा लो ये दुनिया,
तुम्हारी है, तुम ही संभालो ये दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

क्रेडिट कार्ड

मी पाहिलं क्रेडिट कार्ड १९९० साली घेतलं. सिटीबँक.

१९९४ साली मी सेल्स च्या जॉब मध्ये शिफ्ट झालो.

तेव्हापासून क्रेडिट कार्ड बेधुंद वापरतोय. पण गेल्या २२ वर्षात एकदाही, अँड आय मिन इट, त्याचं पेमेंट ड्यु डेट च्या नंतर भरलं नाही आहे. कारण क्रेडिट कार्ड हा पेमेंट चा ऑप्शन आहे, ते पैसे नाहीत.

सध्या मी तीन कार्ड वापरतो. दोन कंपनीसाठी आणि एक पर्सनल. माझ्या कित्येक देशी अन परदेशी टूर वर मी अक्षरश: एकही रुपया कॅश मध्ये खर्च करत नाही. आज अहमदाबाद मध्ये हॉटेल मध्ये चेक आऊट करताना क्रेडिट कार्ड नव्हतं म्हणून तारांबळ उडाली. तो म्हणाला ए टी एम जवळ आहे, कॅश काढून आणा. मी त्याला बोललो, मी गेल्या सोळा वर्षात ए टी एम मधून पैसे काढले नाही आहेत. हे वाचताना जसं तुम्ही "फेकतोय" असा विचार करताय तसं तो ही म्हणाला. पण ती वस्तुस्थिती आहे, कारचा हॉर्न वाजवत नाही तशीच. अजून पुढे जाऊन सांगतो गेल्या सात वर्षात मी बँकेतून कॅश चार किंवा पाच वेळा काढली असेल. ती ही आमच्या अकौंट्स ऑफिसर ने. सेव्हिंग अकौंटच्या व्यवहारासाठी मी कित्येक वर्षात बँकेत गेल्याचं मला आठवत नाही आहे.

किंबहुना सगळ्यांनी प्लास्टिक मनी चा मुबलक वापर करावा, मी या मताचा आहे. आणि मध्ये अर्थक्रांती नावाची एक टूम निघाली होती. ब्लॅक मनी वर कंट्रोल आणण्यासाठी. ती कितपत व्यवहार्य आहे, या बद्दल शंका आहे. पण प्लास्टिक मनी चा अधिकाधिक वापर हा ब्लॅक मनी वापरात न आणायचा सामान्य माणसाकडे सर्वोत्तम उपाय आहे असं मला वाटतं.

मी कुठंतरी वाचलं होतं की स्कँडेनेव्हीयन देशात ९०% वर व्यवहार प्लास्टिक मनी ने होतात. लक्झेम्बर्ग, स्वीडन, नॉर्वे या देशात बरेच व्यवहार प्लास्टिक मनी ने होतात. हे सारे देश जगातल्या सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम पैकी आहेत. आणि इथे करप्शन लेव्हल कमी आहे. आणि एक गंमत आहे. सगळ्यात मोठ्या करन्सीचं पर कॅपिटा इन्कम चं गुणोत्तर प्रमाण जे लागतं त्या हिशोबाने आपल्या इथे सगळ्यात मोठी नोट शंभर ची असायला हवी.

प्लास्टिक मनी चे फायदे:

१. कॅश बरोबर ठेवावी लागत नाही. त्यामुळे एकदम सेफ.

२. सर्व व्यवहार बिल मागून होतात. त्यामुळे शासनाला टॅक्स जातो.

३. बँकेतून व्यवहार होत असल्यामुळे सर्व गोष्टींची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला माहिती होते. वेगळी स्क्रूटिनी शक्यतो होत नाही.

४. पाकीट जाड नसल्यामुळे पँटच्या मागच्या खिशात पाकीट घालून बसलं तरी हिप च्या अलाईनंमेन्ट मध्ये खूप फरक पडत नाही.

एकंच लक्षात ठेवायचं क्रेडिट कार्ड हा पैशाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन नसून पैसे देण्याचा एक मार्ग आहे.

अर्थक्रांती

अर्थक्रांती ह्या अनिल बोकील यांच्या कन्स्पेटची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स वाचल्या.

देशाचं दरडोई उत्पन्न आणि सगळ्यात मोठी करन्सी याचं नातं खूप वर्षांपासून आहे. अर्थक्रांती बद्दल २००२-०४ च्या आसपास वाचलं होतं, पण त्याआधी पासून आपली सगळ्यात मोठी करन्सी १०० असावी असं मांडण्यात आलं होतं. कारण दरडोई उत्पन्न आणि करन्सी याचा रेशो भारताचा खूप कमी आहे.

यातली एक मेख अशी आहे की परत ५०० आणि २००० च्या नोटा येणारच आहेत. त्यामुळे हा ब्लॅक मनी बाहेर काढण्याचा incidental उपाय आहे जो आर बी आय ने १००० ची नोट आणताना केला होता असं आठवतं. फक्त ज्या पद्धतीने आता निर्णय घेतला गेला तो सनसनाटी पूर्ण आहे हे नक्की.

बाकी अर्थक्रांतीच्या वेब साईट वर transaction टॅक्स आणावा वगैरे लिहिलं आहे. आजमितीला तरी ते स्वप्नवत आहे.

बारा वर्षाच्या नील ने सकाळी अंघोळ करून आल्यावर प्रश्न विचारला "बाबा, म्हणजे आता डॉलर चा रेट ६५ आहे, मग हे झाल्यावर डॉलर स्वस्त होईल का?"

एक अज्ञ पोरगं असले प्रश्न विचारतंय. त्यामुळे फेबुवर सज्ञान लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया येतात, त्यात नवल ते काय?



विनातिकीट

तर झालं असं होतं चार सहावी सातवीतल्या मुली. नागपूर ला आल्या होत्या आंतरशालेय स्पर्धांसाठी. सकाळी ११ ची ट्रेन स्पर्धा वेळेत न संपल्यामुळे चुकली. मग वेट लिस्ट तिकीट काढून संध्याकाळच्या साडेसहाच्या ट्रेन मध्ये बसल्या. बरोबर मास्तर. टीसी ला बर्थ द्यायला जमलं नाही. दोन पोरी ज्या बर्थ वर बसल्या होत्या त्याचा पावशेर लावलेला आठ तासाचा मालक आला अन म्हणाला "चला, पोरीनो जागा खाली करा" पोरींचा मास्तर गायब.

भेदरलेल्या पोरींना माझ्या बर्थवर बसवलं. रात्रीचे दहा वाजलेले. लोअर बर्थ च्या मध्ये खाली फ्लोअर वर जागा असते. सहप्रवाशांच्या मदतीने दोन पोरींचा बिछाना घातला. अजून दोघींची सोय करायची होती.

बाजूच्या कंपार्टमेंट मधला एक जण म्हंटला "इथे पण लोअर बर्थ वर दोन लेडीजच आहेत. याच्या खाली फ्लोअर वर या दोघीना ऍडजस्ट करू शकतो"

दोन मिनिटं तो माणूस काय म्हणाला ते कळलंच नाही. आणि ट्यूब पेटली. जर लोअर बर्थ वर दोन माणसं असती तर रात्री मुलींना त्रास.............

उफ्फ! घरात बहीण अन मी पोरीचा बाप नसल्यामुळे हा मुद्दा माझ्या लक्षात च आला नव्हता.

एकच गोष्ट, पण बऱ्याच मुद्द्यावरून मनात कालवाकालव झाली.

करन्सी

करन्सी नोट प्रिंटिंग हे एक खर्चिक काम आहे. एका विशिष्ट क्वालिटीचा पेपर आणि शाई, सिक्युरिटी चे मुद्दे आणि एकंदरीत प्रिंटिंग प्रोसेस यासाठी एका उच्च प्रतीच्या फॅसिलिटी ची गरज असते आणि ह्याला खूप पैसे ही लागतात. या कारणामुळे बरेच देश करन्सी नोट हे दुसऱ्या देशात छापून घेतात.

भारत, हा जगातला दुसऱ्या नंबर चा करन्सी नोट चा उत्पादक आणि अर्थात ग्राहक ही आहे. असं असूनही आपल्या करन्सी नोट मात्र आपण च छापतो. असं असलं तरी ह्या करन्सी नोट छापण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, म्हणजे कागद, अगदी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या देशांकडून आयात करायचो. उदा: करन्सी नोट साठी लागणारा वॉटर मार्क असणारा पेपर आपण जर्मनी च्या Giesecke & Devrient आणि इंग्लंड च्या De La Rue या आणि अजून काही कंपनीकडून विकत घ्यायचो.

भारत साधारणपणे २२००० मेट्रिक टन हा पेपर दरवर्षी वापरतो आणि त्याची एकूण करन्सी उत्पादनाच्या ४०% पेपर ची कॉस्ट असते. सन २०१६ साली रिझर्व्ह बँकने २१०० कोटी नोटा छापल्या आणि त्याचा खर्च साधारणपणे रु ३५०० कोटी इतका आला.

 असा अवाढव्य खर्च असल्यामुळे करन्सी नोट उत्पादनासाठी आपण स्वयंपूर्ण असावं ही विचारधारा शासनाची होती. आधीच्या शासनाने या दृष्टीने काही पावलं उचलली होती. आताच्या शासनाने मेक इन इंडिया योजनेखाली यावर शिक्कामोर्तब केलं. खर्च आणि सुरक्षेच्या कारणास्तव सध्याच्या सरकारने आर बी आय ला पेपर आणि शाई च्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण होण्याचं आवाहन केलं.

आताच्या घडामोडीत आलेल्या ५०० आणि २००० च्या नोटा ह्या म्हैसूर मध्ये आर बी आय च्या प्रेस मध्ये उत्पादित केल्या आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला लागणारा बराचसा पेपर हा भारतात तयार झाला आहे.

९० एक वर्षांपूर्वी आपण करन्सी नोट बनवायला चालू केली. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यात आलेलं यश हा एक मैलाचा दगड आहे.

१८६२ साली जेव्हा ब्रिटिश लोकांनी करन्सी नोटेची ओळख भारताला करून दिली, तेव्हा ते thomas De La Rue या कंपनीकडून आयात करायचे. आज २०० वर्षांनंतर ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी करन्सी प्रिंटर आणि त्याचा पेपर सप्लायर आहे.

१९२६ साली ब्रिटिशांनी नासिक मध्ये करन्सी प्रिंटिंग प्रेस उभी केली आणि मग तिथे ५ रुपयाची नोट बनवणं चालूकेलं. पुढे जाऊन याच प्रेसमध्ये १००, १००० आणि१०००० रुपयाच्या नोट बनवल्या. आणि त्या सगळ्यादेशात प्रचलित झाल्या. १९४७ साली ब्रिटिश भारतातून निघून गेले. त्यानंतर कित्येक वर्ष नाशिक ची प्रिंटिंग प्रेस आपली पैशाची भूक भागवत होती. पण जशी इकॉनॉमी वाढत गेली, नाशिकची प्रिंटिंग प्रेस अपुरी पडू लागली.मग  १९७५ मध्ये देवास ला दुसरी प्रेस चालू झाली. या प्रेस मध्ये बनणाऱ्या करन्सीमध्ये अजून काही सिक्युरिटी फीचर्स टाकले गेले. १९९७ पर्यंत या दोन प्रेस करन्सी पुरवत होते. पण लोकसंख्येची वाढ आणि कॅश चा बेधुंद वापर याने आपल्याला हा दोन प्रेस कमी पडू लागल्याआणि मग त्यावेळेसच्या सरकारने जवळपास ३६०कोटी करन्सी  नोटची ऑर्डर काही अमेरिकन, कॅनेडियन आणि युरोपियन कंपनीला दिली. या ऑर्डरची व्हॅल्यू  त्याकाळी रु ३५० कोटी इतकी होती. आपल्यापर्यंत हे पोहोचलं नाही पण सरकारवर या निर्णयाबद्दल खूप टीका झाली होती. पैसे तर खर्च झाले होतेच पणसुरक्षेच्या  दृष्टीने ते धोक्याचं होतं.



यातून धडा घेऊन मग भारत सरकारने पाठोपाठ अजून दोन मिल चालू केल्या, १९९९ मध्ये म्हैसूर इथे  आणि २००० ला पश्चिम बंगाल.



प्रिटिंग प्रेस तर झाल्या पण नोटेसाठी लागणारा पेपर बनवणारी एकमेव मिल भारतात होती, एम पी मध्य ेहोशंगाबाद ला. ही मिल चालू झाली १९६८ मध्ये. पण तिची उत्पादन क्षमता होती २८०० मेट्रिक टन इतकी.आपल्या गरजेच्या प्रमाणात हे उत्पादन खूप कमी होतं.बाकी पेपर  मग आपण जर्मनी, इंग्लंड आणि जपान या देशातून आयात करत होतो. भारत सरकारला आणि आर बी आय ऑफिशियल्स ना याची जाणीव होती. मग होशंगाबाद च्या मिल चं एक्स्पान्शन केलं आणि म्हैसूरला अजून एक पेपर मिल टाकली. आता तयार होणाऱ्या नोटांमध्ये भारतात उत्पादित केलेल्या पेपर चा सिंहाचा वाटा आहे. इम्पोर्ट बिलापैकी रु १५०० कोटी तर वाचलेच, पण सुरक्षेच्या दृष्टीने स्वतः ची करन्सी स्वतःप्रिंट  करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे हे सांगायला कुण्या तज्ञ माणसाची गरज नाही.

१८६२ साली इंग्लंड मध्ये बनलेल्या करन्सीच्या प्रवासाचंएक वर्तुळ आता पूर्ण झालं आहे. आतापर्यंतचा प्रवासअसा झाला, यापुढील प्रवास कसा असेल ते काळचसांगेल.







निश्चलनिकरण

आतापर्यंत डीमोनेटायझेशन वर वाचून वाचून डोकं पकलं असेल नाही. हे करायला पाहिजे यावर फारसं दुमत नसावं. त्याची पद्धत काय असायला पाहिजे यावर वाद होऊ शकतात. पण हा रोग कॅन्सर सारखा भारतीय समाजात पसरला होता आणि अशा सर्जरी शिवाय पर्याय पण नव्हता. या भयानक रोगावर काही मिळमिळीत उपाय योजना करायची म्हणजे आत्महत्येसारखं होतं.

२००१ पर्यंत आपली कॅश इकॉनॉमी ही जी डी पी च्या दहा टक्के होती. बँकिंग सिस्टम ची वाढ झाल्यामुळे त्यानंतर ती खरं तर कमी व्हायला हवी होती. पण त्याऐवजी ती वाढत गेली आणि तिचं प्रमाण १२% झालं. १.५ ट्रीलियन च्या इकॉनॉमी मध्ये २% वाढ म्हणजे कॅश चा वापर खूप वाढला होता. आणि हे होताना अधिक रकमेच्या नोटांचं प्रमाण बाजारात वाढत गेलं. बाजारातल्या एकूण रकमेच्या ५०० आणि १००० च्या नोटांची किंमत ही ८५% पर्यंत गेली. या प्रकारामुळे एक आभासी अर्थव्यवस्था तयार झाली ज्यामुळे रियल इस्टेट किंवा सोन्याच्या किमती अवाच्या सव्वा वाढल्या. देशाचा पैसा जेव्हा या अनुत्पादित कामासाठी वापरला गेला तेव्हा बँकांची कर्जे महाग झाली आणि छोटा उद्योजक हा मग धंद्यातून पैसे कमावण्याऐवजी जागेचं ट्रेडिंग किंवा फ्लॅट मध्ये पैसे गुंतवून त्याच्या नोशनल वाढीवर आनंद मानू लागला.

हे निश्चलनीकरण जर यशस्वी झालं तर बँकांकडे ३ लाख कोटी रुपये येणार नाहीत. म्हणजे भारत सरकारला छापण्याची परवानगी मिळणार आहे. आणि जर सगळे इकॉनॉमिस्ट ज्या पद्धतीची मांडणी करत आहेत त्यायोगे टॅक्स मधून अजून तीन लाख कोटी रुपये मिळणार आहेत. या अतिरिक्त पैशांमुळे बँकांकडे मोठी गंगाजळी उपलब्ध होईल. व्याज दर कमी होतील हे प्रत्येक अर्थतज्ज्ञ सांगतो आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा माझ्या लेखी छोट्या उद्योजकांना होणार आहे. मोठ्या उद्योजकांना एफ डी आय मुळे परदेशातून अत्यंत कमी व्याज दरात पैसे उपलब्ध होतात पण छोट्या उद्योजकांना मात्र देशी बँक इंटरेस्ट वर अवलंबून राहावं लागतं. आणि इ एम आय मधेच उद्योजकांचा प्रॉफिट दिला जातो.

यशस्वी निश्चलनीकरणानंतर उद्योजकांचा अनुत्पादित गोष्टींमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह संपेल आणि ते आपल्या बिझिनेस मधून प्रॉफिट कमावण्यावर जोर देतील. आणि एस एम इ जे देशाच्या जी डी पी च्या ४० ते ५०% सहभाग देतात, हे देशाला प्रगतीकडे नेण्यात कारणीभूत राहतील, अशी आशा वाटते.

तसंही अनिश्चतेतेच्या काळात आशावादी राहण्यावाचून आपल्या हातात काय आहे? 

सेल्समन

तसं माझं करिअर एस के एफ मध्ये प्रॉडक्शन इंजिनियर म्हणून चालू झालं. तिथे असताना काहीतरी बिझिनेस करावा असा किडा डोक्यात वळवळू लागला. आणि मी तो पार्टटाइम चालू ही केला. त्याला मदत म्हणून मी १९९४ साली रेसिडेंट इंजिनियर म्हणून सेल्स चा जॉब शोधला. आणि मी खऱ्या अर्थाने सेल्समन झालो.

सेल्समन, ऐकायला कसं वाटतं ना! "नुसते बोलबचन असतात रे" "फेकू असतात" "लाळघोटे असतात" "धंदा मिळवण्यासाठी काय करतील सांगता येत नाही" असे एक ना अनेक पासिंग कॉमेंट्स पास होतात. आज या घडीला माझा मेन डोमेन सेल्स आहे असं सांगितलं की लोकं आदराने बघतात. ते माझ्या सेल्स डोमेन कडे बघून नव्हे तर मॅनेजिंग डायरेक्टर या पदामुळे याची जाणीव आहे मला.  कारण मला माहित आहे, इंडस्ट्री मध्ये किंवा एकुणात सेल्स च्या माणसाला किती टक्के टोणपे खावे लागतात ते. मी ही खाल्ले. कारकिर्दीच्या सुरुवातीला इतके नकार आणि अपमान सहन केले आहेत की काय सांगू तुम्हाला! पण तो एकेक नकार सेल्स च्या माणसाला व्यवसायात स्ट्रॉंग बनवत जातो. नकार पचवणं अवघड असतं आणि म्हणून ह्या जॉबला लोकं कंटाळतात. अन त्यातल्या एम्प्लॉयर ने धंद्याचं प्रोफाइल फालतु ठेवलं असेल तर मग बेकार वांदे. उदा: टेली मार्केटिंग, एम एल एम.

अशा कित्येक कंपन्या आहेत ज्यांचे उंबरठे वर्षानुवर्षे झिजवले. तिथल्या आढ्यताखोर लोकांनी तीन तीन तास केबिनच्या बाहेर बसवून ठेवलं. पण हरलो नाही. बंगलोर मधील अशा एका कंपनीने सातत्याने ३-४ वर्ष अशी ट्रीटमेंट दिली. अन आज गेली सहा वर्षे तीच कंपनी टॉप १० कस्टमरच्या लिस्टमध्ये एक नंबर ला आहे.

जॉब मध्ये असताना पुण्यातल्या एका कंपनीने सकाळी अकराची अपॉइंटमेंट दिली होती. साडेपाच लाखाची ऑर्डर. १९९५ साली ती खूप मोठी ऑर्डर होती, आजही आहे. रात्री साडेआठ वाजता तो एम डी आमच्यासमोर त्याच्या असिस्टंट ला "यांना उद्या सकाळी ९ वाजता बोलाव" असं सांगून तोऱ्यात निघून गेला. दुसऱ्यादिवशी ऑर्डर तर घेतलीच आणि त्यानंतर अशी आमची चटक लावली की  जॉब सोडेपर्यंत त्या कंपनीत मी जायचो तेव्हा पायघड्या टाकायच्या बाकी राहिलं होतं.

आज जवळपास बावीस वर्ष झालीत मी सेल्स मध्ये आहे. दोन रुपयांच्या हायड्रोलीक सील पासून ते सव्वा कोटीच्या आटोमेशन सिस्टम पर्यन्त बरंच काही विकलं. सुदैवाने ज्यांच्या साठी काम केलं ती उत्तम प्रॉडक्टस होती. प्रॉडक्ट ची चांगली क्वालिटी ही पहिली गरज तर आहेच, पण त्याबरोबर कामात कमालीची consistency, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात perseverance, मार्केट बद्दल सजगता, फिरण्याची आवड आणि वर लिहिल्याप्रमाणे येणाऱ्या नकाराने खचून जाता परत दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने दिवसाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवणे हे गुण अंगिकारले तर तुमची तर उन्नती होतेच, पण ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता, ती पण पुढच्या कक्षेत प्रवास करते.

मला स्वतः ला त्यामुळे सेल्स च्या माणसाबद्दल प्रेमादर वाटतो. अगदी सिग्नल वर येणाऱ्या वस्तू विकणाऱ्या लोकांना ही मी हाडतुड करत नाही. टेलिमार्केटिंग वाल्या मंडळींना व्यवस्थित उत्तर देतो. कधीकधी राग आवरत नाही म्हणून चिडतो पण त्यांचा तिरस्कार करत नाही.

तसं बघायला गेलं तर आयुष्यात आपण थोड्या फार फरकाने का होईना, पण प्रत्येकजण सेल्स मन असतो. कोणत्याही नात्यात मग ते प्रोफेशनल रिलेशन असो वा पर्सनल. हो पर्सनल नात्यात ही, एक आई मूल सोडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्यातले सेल्सचे गुण डिस्प्ले करावे लागतात......मग तुम्ही माना वा न माना. 

निलचा फटका

परवा एम सी सी आय ए च्या हॉल मध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मला पाच मिनिटे बोलायचं होतं. म्हणून मी घरात थोडी तयारी करत होतो. नील कडून रफ पेपर घेतला आणि काय बोलायचं याबद्दल पॉईंट्स लिहून त्याची उजळणी करत होतो. समोर २०० एक इंडस्ट्री प्रोफेशनल्स असणार होते, त्याचं हलकं का होईना दडपण होतं.

माझं सगळं नाटक बघून नील म्हणाला "पप्पा, तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. नाहीतरी तुम्ही बोलत असताना सगळे झोपाच काढत असतील"

हे असं आहे.

घरात असले फॅमिली मेम्बरं आणि फेसबुकवर महेंद्र लोमटे अन सर्जेराव जाधव यांच्यासारखे मित्र असल्यामुळे पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. 

डोक्याला शॉट

तर निश्चलनीकरणावरच्या पोस्टवर येणाऱ्या घमासान कॉमेंटना प्रत्युत्तर दिले. निर्णय कसा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी कशी चुकली आहे, इंटरेस्ट रेट कमी होतील पण शॉर्ट टर्म मध्ये जीडीपी वैगैरे कशी मार खाणार आहे यावर बेधुंद रात्रभर कॉमेंटा कॉमेंटी करून तारवटलेल्या डोळ्यांनी मी कंपनीत पोहोचलो.

आज सकाळी ९ वाजता आमचा सीए दत्त म्हणून समोर उभा होता. मला म्हणाला

"राजेश, तुमचा करंट रेशो १ च्या खाली गेला आहे. काही उपाय करायला हवा"

मी म्हणालो "करून टाका काय उपाय करायचा ते"

सीए: "अहो, उपाय मी काय करणार? तुम्ही करायचा"

मी: अच्छा, पण मग करंट रेशो म्हणजे काय

सीए: अहो मंडलिक, कितीदा सांगितलं, अधून मधून टॅली बघत जा म्हणून. करंट रेशो म्हणजे करंट asset आणि करंट लायबिलिटी याचा रेशो. हा १.३ च्या वर हवा.

मी: पण मग मी काय करू?

सीए: देवा, अहो जरा बॅलन्स शीट बघत जावा कधी तरी. बरं ते जाऊ द्या. मी तुम्हाला सांगितलं की गेल्या दीड वर्षात तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली ती इंटर्नल accruals मधून केली. मी तुम्हाला सांगितलं की हे केलं तर तुमच्या वर्किंग कॅपिटल वर स्ट्रेन येईल. बँक प्रपोजल वर काम चालू केलं का?

मी: अहो, मी कंपनीच्या अकौंट मधून पैसे खर्च केले आहेत.

सीए: पण मी तुम्हाला सांगितलं ना की तुमचा प्रॉफिट जर बँक इंटरेस्ट पेक्षा चांगला असेल तर बॅंकेकडून लोन घेऊन धंदा केलेला शहाणपणाचं ठरतं. कॅश फ्लो त्याने सुधारतो. ही रियालिटी असते. त्यावर लक्ष नाही दिलं तर सप्लायर चं पेमेंट वेळेवर जाणार नाही.

मी: हो, पण सध्या व्यवस्थित आहे ना. वेळ येईल तेव्हा बघू. बाकी हे काय तुम्ही अकौंट्स बद्दल बोलताय त्यावर नंतर बोलू.

तर उसळून सीए म्हणाला "काय हो मंडलिक. तुमच्या फेबु लिस्ट मध्ये आहे मी. तुमच्या कंपनीचं बॅलन्स शीट कसं बघावं ते तुम्हाला धड कळत नाही आणि इकडे फेबु वर तुफान बाण सोडत असता. जरा थोडी कंपनीची काळजी असेल तर आवरा हे."

आयला, काय ही सीए मंडळी डोक्याला शॉट लावतात राव. विकेंड खराब जाणार आता. 

चरणस्पर्श

मी लहानपणापासून वयाने मोठं असलेल्या आणि माझ्या मनात ज्यांच्या बद्दल प्रेमादर आहे अशा  लोकांच्या पाया पडतो. हो, दोन्ही क्रायटेरियात बसली पाहिजे समोरची व्यक्ती. वर्ष सरली. ज्यांचे पाय धरावेत अशा मोजक्या व्यक्ती आजकाल भेटतात.

असो.

एक माझं निरीक्षण असं आहे की पूर्वी पाया पडताना पूर्ण वाकून आम्ही चरणस्पर्श करायचो. मधल्या काही काळात असं बघायचो की लोकं अँकल ला स्पर्श करून नमस्कार करायचे. हळूहळू ते पायाच्या पोटरीला स्पर्श करून नमस्काराचा सोपस्कार पार पाडत होते.

परवा एका लग्न समारंभाला गेलो होतो तिथे आजकालची पोरं, समोरच्या व्यक्तीच्या गुडघ्याला टच करून नमस्कार केल्याचं दाखवत होते.

याच स्पीडने नमस्काराची जागा शरीराच्या वरच्या भागात सरकत गेली तर.............

आवरतो.

😊😊

Monday 12 December 2016

शॉर्ट फिल्म infrences

कालच्या शॉर्ट फिल्मचे मी काढलेले inferences:

- जगात असलेली आर्थिक विषमता. (ह्यात काही नवल नाही म्हणा)

- श्रीमंत आपली संपत्ती सांभाळण्यात मश्गुल आहे तर गरीब आपली गरिबी सावरण्यात.

- आयुष्यात अशी वेळ येऊ शकते की परिस्थितीमुळे श्रीमंत माणसाला आपल्या संपत्तीवर पाणी सोडावं लागतं.

- गरीब शक्यतो जे आपलं नाही त्याची आस ठेवत नाही.

- परिस्थितीमुळे जर संपत्ती गमावली असेल तर परिस्थिती च परत आपल्याला मिळवून देईल याबाबतीत श्रीमंत शेवटपर्यंत आशावादी असतो.

- नियातीपुढे हतबल झाल्यानंतर बहुतांश श्रीमंत माणसं "चला, आतातरी गरिबाला मदत करू" या भावनेने मदत करतात.

- कुणाचं तरी भलं होईल या भावनेने केलेली मदत ही खरं तर आपलं च भलं करत असते, मनाला आनंद देत असते. आनंद, दोघांच्याही मनाला.

- एक शक्यता अशीही असते की तो श्रीमंत मुलगा एक शूज न फेकता त्याच्या बरोबर घेऊन जातो. जगात अशीही मानसिकता असणारे लोकं असतात, "मला नाही मिळत ना, मग तुलाही नाही"

शॉर्ट फिल्म

मध्ये एक भारी शॉर्ट फिल्म बघितली.

एक श्रीमंत बाप आपल्या पोराला घेऊन रेल्वे स्टेशनला जातो. पोराच्या पायात चकाचक पॉलिश केलेले शूज. तिथेच कोपऱ्यात एक दुसरं गरीबाचं पोर बसलेलं. त्या पोराच्या स्लिपरचा पट्टा तुटला असतो. अन तो असोशीने स्लीपर दुरुस्त करत असतो. त्यावेळेस त्याची नजर त्या श्रीमंत पोराच्या चकचकीत शूज कडे जाते. आपल्या गरिबीचं दुःख त्याच्या नजरेतून ओघळतं.

श्रीमंत पोरगं आपल्या बापाचा हात धरून गर्दीतून वाट काढत रेल्वेच्या डब्यात चढतो. गर्दीच्या रेट्यामुळे त्याच्या एका पायातला शूज प्लॅटफॉर्म वर पडतो. अन एका शूज निशी पोरगं डब्यात शिरतो. झालेला प्रकार त्याच्या लक्षात येईपर्यंत रेल्वे सुटते. एक शूज पडला म्हणून पोरगं बोंब मारतं.

गरीब पोराच्या झाला प्रकार लक्षात येतो. तो उठतो अन पळत जाऊन प्लॅटफॉर्म वर पडलेला शूज उचलतो अन त्या पोराला द्यायचा प्रयत्न चालू करतो.

रेल्वे चा वेग वाढतो. गरीब पोरगं पण पळण्याचा स्पीड वाढवतो. हात पुढे करून तो शूज द्यायचा अतोनात प्रयत्न करतो पण अयशस्वी होतो.

आता प्लॅटफॉर्म ची लांबी संपणार असते. आपण तो शूज त्या श्रीमंत पोराला देऊ शकणार नाही म्हणून गरीबाचं पोर दुःखी कष्टी होतं. त्याचवेळेस आता काही शूज ची जोडी आपल्यापर्यंत पोहोचत नाही हे जाणवून ते श्रीमंतांचे पोर नाराज होतं.

दोघांची हतबलता दिसत असतानाच अचानक श्रीमंताचं पोर पायातला दुसरा शूज काढतो अन त्या गरीब मुलाच्या दिशेने प्लॅटफॉर्मवर फेकतो.

फिल्म संपते.

श्रीमंत अन गरीब यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारी ४ मिनिटांची फिल्म.

 Philanthropy comes by force not by choice.

रडतखडत

आता मी त्या कंपनीचं नाव नाही लिहीत, पण या कंपनीत साधारण मी २० एक वर्षांपासून जात आहे. सप्लायर म्हणून. गेली २० वर्ष ही कंपनी रडत खडत चालू आहे. तेव्हापासून सप्लायर च्या पेमेंट ची बोंब आहे. त्यावेळेस माहित असून मी त्यांच्या बरोबर धंदा केला अन अडीच तीन लाख रुपये गमावून बसलो. वेळच्या वेळी पगार मिळत नाही म्हणून तेव्हाही एम्प्लॉयीज ओरडायचे. आज ही ओरडतात. फरक इतकाच आहे की त्यावेळेस काही दिवसांनी पगार उशिरा व्हायचा, आज सहा सहा महिने पगार होत नाही. काही लोकं रिटायर झाले तर त्यांचा पीएफ न देण्याचा क्रिमिनल गुन्हा पण कंपनी करते आहे. इतकं असूनही याचे एम डी वर्किंग कॅपिटल आणि फायनान्स मॅनेजमेंट वर तोंड वर करून लेक्चर झोडतात.

परवा परत मी त्या कंपनीत गेलो होतो. आश्चर्य याचं वाटतं की आज ही त्या कंपनीत गेले २० वर्षे काही लोकं काम करत आहेत. कोणतं मोटिवेशन असतं या लोकांना की ते अशा डचमळत्या कंपनीला सोडत नाही? सालं माझ्या कंपनीत टार्गेट सेल झाला नाही म्हणून मी या वर्षी साधा इंसेंटिव्ह नाही दिला तर लोकं नाक मुरडून काम करत आहेत. अन इथे सहा महिने पगार नाही लोकांना. की या लोकांच्या फायनान्शियल गरजा पूर्ण झाल्यात अन पैशाची गरज नाही. बरं ही मंडळी टेक्निकली कॉम्पिटंट दिसतात. मग यांना दुसरीकडे जॉब न शोधण्याची बुद्धी कशी येत असावी? की बाहेर काही चांगलं होऊ शकतं यावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे?

काही कळत नाही बुवा आपल्याला! 

मी आणि माझं

फक्त स्वतः चं सुख पाहणारी आत्ममग्नता ही एखाद्याच्या अहंकाराइतकीच त्रासदायक असते. अहंकारी माणसं दुसऱ्याचं काहीही ऐकून घेत नाहीत तर आत्ममग्नतेच्या भोवऱ्यात गरगर फिरणारी माणसं हे आपलं सुख जपण्यासाठी समोरचा काहीही म्हंटला तरी ऐकून घेतात.

प्रथमदर्शी थंड दिसणारी ही माणसं खरंतर आपलं सुख जपण्यासाठी अत्यंत लाचार असतात. माझं खाणं, माझं पिणं, माझी वेळ यातच ही मंडळी मश्गुल असतात. आणि त्या कोषात राहण्यासाठी समोरच्याची चिडचिड किंवा त्याने केलेला अपमान हे सहजगत्या पचवून जातात.

अहं पणाच्या आगेत जळणाऱ्या माणसाइतकंच स्वयंसुखाला सोकावलेल्या माणसाचं आपल्या आजूबाजूला बागडणारं अस्तित्व मला तरी डिसकम्फर्टेबल करतं.

Saturday 5 November 2016

The Drought Within

नमस्कार,

सप्रेम भेट म्हणून The Drought Within नावाचं पुस्तक आपल्याला कुरियर ने पाठवलं आहे. त्याचा स्वीकार व्हावा.

हे पुस्तक खास भेट म्हणून पाठवण्यामागे काही कारण आहे. सदर पुस्तक फेबु मित्र शिवा आयथळ याचा पंधरा वर्षीय मुलगा गणेश आयथळ याने लिहिलं आहे. आणि विषय आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल याची फिक्शन पद्धतीने केलेली मांडणी.

त्याचं साहित्यिक मूल्य चांगले आहे असं मला वाटतं. अर्थात मी एक वाचक आहे, समीक्षक नाही. पण हे पुस्तक partridge नावाच्या पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलं आहे जी पेंग्विन ची शाखा आहे यातच सगळं आलं. एखादं पुस्तक प्रकाशित करण्याअगोदर ते वेगवेगळ्या कसोटीवर कसं चेक केलं जातं याची माहिती मी जेव्हा ऐकली तेव्हाच त्याच्या गुणवत्ते बद्दल खात्री वाटली.

चकित करणारा भाग हा  की एक पंधरा वर्षाचा मुलगा, आणि पुस्तकाची संकल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हा तो एक दोन वर्षाने लहान असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर किती सखोल विचार करू शकतो. याशिवाय कौटुंबिक आणि सामाजिक सुसंवाद/विसंवाद याचं वर्णन बघून आपण स्तिमित होतो.

या पुस्तकातील चित्रे शिवा च्या एका विद्यार्थ्याने काढली आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं की तो निराशेने त्रस्त होता. गणेश चं हस्त लिखित त्या मुलाच्या हातात शिवाने दिलं आणि त्या मुलाने झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि एक वेगळीच ऊर्जा त्याला मिळाली आणि त्याने ते तीस चाळीस चित्र शिवाला प्रसांगानुरूप काढून दिली. आणि तो मुलगाही निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आहे.

पुस्तकाचं नाव आपले फेबु मित्र आर बी देशपांडे यांनी दिलं आहे.

शिवा अन गणेश आयथळ या बाप लेकाने ह्या पुस्तकाचे उत्पन्न शेतकऱ्यांचं rehabilitation करण्यासाठी वापरण्याचं ठरवलं आहे.

एकंदरीतच ह्या पुस्तकाची कल्पना, संकल्पना मला मनोमन आवडली. म्हणून या संकल्पाचा अत्यंत छोटा का असेना आपला सहभाग म्हणून काही प्रती आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवत आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही भेट नक्कीच आवडेल.

पुन्हा एकदा सस्नेह नमस्कार.

राजेश मंडलिक

Higher education

I have completed Diploma in Mechanical Engineering and then by virtue of my parents wish I pursued BE Production Engineering. I joined SKF as my first job and then worked for Rollon Hydraulics. I worked as an employee for 13 years and then ventured in my business in 2002.

While I was working in SKF, I came across with many successful diploma holders who eventually reached top position of managerial ladder. I grew up in SKF seeing these diploma technocrats managing whole company. I carried that impression in my mind while starting my company Ultra Precision Spindles.

I hired most of the diploma holders in my company, rather all of them. The company was employing all diploma holders those days, except me.

I was always happy with this set of people. I was also carrying preconceived notion that degree holders work for few years only to leave the company for extra bucks. This possibility is always there.

A year back, when we needed to hire engineers, our ad appeared news paper asking diploma holders to apply for the positions. Though few degree holders applied and I interviewed them. I found their maturity level much higher compared to diploma holders I talked. Eventually I hired degree holders as against my usual practice.

After working with these new set of engineers I found them to be much matured, their grasping power is better and they work with certain thought process which is in line with organisational requirements. In short, I found that intelligence quotient of our company is better today than a year back.

It is always said that attitude matters, education does not for one to succeed. I realised that this could be true in case of entrepreneur but not in case of employees. Education certainly makes difference. I think what is required is to assess personality test while recruiting people. And we should get rid of preconceived notion that highly educated people do not work for long. Even if they do not work for longer tenure, we should continue  to hire them.

I have concluded that possibility of stabilising business is more when you hire more and more higher education people.

(There is a possibility that less educated people might feel offended. But remember, thoughts are related to employees and not employer. On the contrary, many rich and famous businessmen are drop outs of schools)

Friday 28 October 2016

राजेश

इथे मी पोस्टवर जे तारे तोडतो, त्यावरून काही, म्हणजे काहीच, जणांचा असा समज, त्याला मी गैर म्हणणार नाही, झाला आहे की मी बिझिनेस मध्ये घेतलेल्या निर्णयाचं मला अनुमोदन हवं आहे किंवा त्याचा उदो उदो इथे व्हावा. काही गोष्टी मी क्लीअर करतो.

- सगळ्यात पहिले म्हणजे, निर्णय हा घेतल्यावर त्याची प्रोसेस इथे लिहितो. फेबु वरच्या कॉमेंट्स वरून त्या निर्णयाचं गैर किंवा योग्य हे मी ठरवत नाही. इथे जयजयकार झाला काय किंवा हिणवलं काय माझे बिझिनेस चे निर्णय पूर्ण विचारांती घेतले असतात. इथे मी शेअर करतो तो एक अनुभव म्हणून. आणि मी ज्या परिस्थितीत बिझिनेस करतो, ती बऱ्याच जणांच्या आयुष्यात येऊ शकते आणि लोक त्याला कनेक्ट होऊ शकतात.




- दुसरं म्हणजे अगदीच नम्रपणे नमूद करतो की फेसबुक वर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर माझ्या कंपनीचं नाव भारत भर पोहोचलेलं होतं आणि पर्यायाने माझं. इतकंच नव्हे तर जगात सुद्धा आमच्या कंपनीचं नाव आमच्या फिल्ड मध्ये बऱ्याच लोकांना माहित आहे. आणि सुदैवाने ते ही चांगल्या गोष्टींसाठी. त्यामुळे फेसबुकवर कॉमेंट्स आणि लाईक मला क्षणभर आनंद देत असतील, पण मला खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा एखादा कस्टमर आमच्या सर्व्हिस वर खुश होतो. किंवा माझी कंपनी आदल्या वर्षीपेक्षा ग्रोथ पोस्ट करते. आज मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही कुठल्याही, अँड आय मिन इट, कुठल्याही VMC/HMC असलेल्या मशीन शॉप मध्ये जा. याचा स्पिन्डल कुठे रिपेयर करतात असं विचारा. बहुतेक वेळा आमच्या कंपनीचं नाव तो सांगेल. गॅरंटी आहे.

- काही लोकं मला लेखक वगैरे समजतात. तुम्हाला सांगतो, मला स्वतः ला एक अभियंता म्हणून ओळख अतीव प्रिय आहे. लक्षात येतंय का अ भि यं ता. माझ्या आयुष्यातले काही ध्येय हे फक्त आणि फक्त माझे अभियांत्रिकी ज्ञान, मग ते तुटके फुटके का असेना, पूर्ण करेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. By virtue of FB, लिहायची गोडी लागली आहे म्हणून मी लिहितो. कुणीतरी माझं नाव न लिहिता वलय वगैरे लिहिलं होतं. इथल्या वलयापेक्षा मला परवा महिंद्र नासिक मधला मेंटेनन्स हेड "अरे, यार तुला व्हिजिटिंग कार्ड ची काय गरज आहे. स्पिन्डल म्हंटलं की तुझं नाव डोळ्यासमोर येतं" हे जो ते म्हणाला, ते मूठ भर मांस वाढवतं.

- काही पोस्ट या हाझनेस चे अनुभव हे शतप्रतिशत खरे असतात. तिथे मला खोटेपणाची झुल पांघरावी लागत नाही. एकदम अस्सल आहेत ते.

- मागे एकदा लिहिल्याप्रमाणे माझी ही लोकांनी ठासून मारली आहे. आज ही मारत आहेत. मलाही अपयश आले आहेत. पण त्याचा बाजार मांडत नाही. त्याची गरज मला वाटत नाही. लिहिलं तर त्याची कारण मीमांसा लिहितो. कुणास ठाव माझ्यासारख्या साध्या दुसऱ्या उद्योजकावर तशीच वेळ आली असेल तर काही तरी मिणमिणतं दिसेल.

आणि सगळ्यात शेवटी पर्सनल

मी सेंट परसेन्ट मध्यमवर्गीय संसारी माणूस आहे. माझी बायको वैभवी, पोरं यश आणि नील, आई, माझे नातेवाईक, आणि माझे मित्र यांच्यात मी खुश आहे. थोडं लोकांशी बोलायला आवडतं. आणि जगायचा Core purpose "To exchange knowledge and information to enhance eachother's quality of life" हा ठेवल्यामुळे extrovert आहे. म्हणून फेबु वरच्या लोकांशी भेटायला पण आवडतं. काही लोक सल्ले मागतात, काही देतात, काही गप्पा मारण्यासाठी भेटतात. मी तिथे शक्य तितकं योगदान देतो. आणि हो exchange म्हणजे देवाणघेवाण. पण याचा अर्थ असा नाही की कुणीही काहीही भंकस करावी. काही स्पेसिफिक सांगायचं, विचारायचं असेल तर नक्कीच वेलकम. अदरवाईज तुमचं सौन्दर्य, तुमचं स्टेटस तुम्हाला लखलाभ. मी माझ्या आयुष्याचा राजा आहे. उगाच नाही माझ्या आत्याने माझं नाव राजेश ठेवलं. 

व्हिटेरी

आता अमेरिकेत व्हीटेरी नावाचा गृहस्थ भेटला होता. त्याचे प्रोडक्टस त्याला भारतात विकायचे होते. मला म्हणाला, तू विकशील का? मी म्हणालो, मला माझा उद्योग भरपूर आहे. अजून प्रॉडक्ट नाही विकू शकत.

पण त्याला सांगितलं "तीन मेजर इंडस्ट्रीयल सिटी त माझे रिप्रेझेंटेटीव्ह आहेत. मी तुझे प्रॉडक्टस त्यांना विकायला सांगू शकतो. ते माझ्या पे रोल वर नाही आहेत. तुझे प्रॉडक्टस त्यांच्या बास्केट मध्ये आले तर त्यांना फायदा होईल"

व्हीटेरी खुश झाला. म्हणाला "हे डील जमलं तर तुझी कन्सल्टन्सी फी काय आहे ते सांग. मी देईन"

मी म्हणालो "फी वगैरे ची काही गरज नाही. यात सगळेच विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. तुला सेल्स ची माणसं भेटतील, माझ्या मित्रांना प्रॉडक्टस मिळतील धंदा वाढवायला"

तर तो म्हणाला "आणि तुला?"

मी बोललो "मानसिक समाधान. आणि मला माहित आहे, मला याचा फायदा भविष्यात नक्की होईल"

तो म्हणाला "काहीतरीच काय! असं नाही होत कधी"

मी त्याला किस्सा सांगितला

"साल १९९९९. मी तेव्हा बुसाक+शाम्बान ची सिल्स विकायचो. मला सुपर स्टील ने त्यांच्या मिल मध्ये हायड्रोलिक्स मध्ये आमचे सिल्स कसे बसवता येतील ते बघायला बोलावलं. त्यांचे ड्रॉइंग्स बघितल्यावर मला कळलं की त्यांचे हायड्रोलिक्स सिलिंडर आणि पॉवर पॅक चे सप्लायर्स त्यांना फुल लुटत आहेत. मी तिथल्या कदम साहेबाना सांगितलं कि तुमच्या सप्लायर्स ला काही कळत नाही आणि ते तुम्हाला फालतू माल सप्लाय करून लुटत आहेत. कदम म्हणाले, मग आता तूच सप्लायर्स दे. मी त्यांना लिहून दिलं. पॉवर पॅक साठी पुण्याची हैड्रोथर्म आणि सिलिंडर साठी मुंबई ची इंडियन हायड्रोलिक्स आणि फास्ट सिलिंडर्स.

कदम साहेबांनी मला खुश होऊन याबद्दल कन्सल्टन्सी फी ऑफर केली. मी बोललो, सर, मला फी काही नको. तुम्ही जो पर्यंत इथे आहात तो पर्यन्त आर एफ क्यू मध्ये बुसाक शाम्बान चे सील लिहायचे.

फास्ट आणि हायड्रोथर्म दोघांनी मला ऑर्डर मध्ये कमिशन ऑफर केलं. मी म्हणालो, मला कमिशन नको. एक खात्री द्या, की तुम्ही आमचे सिल्स निदान मी असे पर्यंत तुमच्या कंपनीत स्टॅंडर्ड कराल.

१९९९ ते २०१० पर्यंत सुपर स्टील ने या तीन सप्लायर बरोबर कमीत कमी १०० कोटी रुपयांचा बिझिनेस केला.

मला काय मिळालं.? मी २००२ मध्ये सिल्स विकणारी कंपनी सोडली. पण आज ही, म्हणजे १४ वर्षांनंतर तिन्ही कंपन्या आमचे सिल्स वापरत आहे.

सुपर स्टील्स च्या आर एफ क्यू मध्ये आज पण आमचे सिल्स स्पेसिफाय केले जातात.

पुण्याच्या हायड्रोथर्म चा ओनर देशपांडे माझा बिझिनेस मधील mentor आहे.

ठाण्यातील फास्ट सिलिंडर्स चे ओनर मला लहान भाऊ समजायचे.

आणि कदाचित इंडियन हायड्रोलिक्स च्या शुभेच्छा असतील कि माझा बिझिनेस जरा बरा चालू आहे.

या प्रकाराला मी traingular working म्हणतो. आणि सेल्स चं हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. आणि तसंही जगण्याचा core purpose "To exchange knowledge and information to enhance brand "India"" हा आहे."

"आलं का तुझ्या लक्षात मला कन्सल्टिंग फी का नको ते"

हात मिळवून गेला तो. पण नजरेत त्याच्या विचित्र भाव होते. "This man looks to be crazy" असे काहीसे.

मी मनात म्हणालो "आम्ही इंडियन आहोतच असे.......क्रेझी"

रिअल पार्टनर

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



पाकिस्तानशी धंदा

मध्ये एका पोस्टवर एकाने प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तान च्या कस्टमर शी बिझिनेस कराल का? प्राप्त परिस्थितीत अर्थातच "नाही".

पण मेख अशी आहे की पाकिस्तान ने जर आमच्या सारख्या लहान कंपनी बरोबर तिथल्या कंपनीने बिझिनेस रिलेशन्स डेव्हलप करण्याइतका व्यापार उदीम वाढवला असता तर तो देश आज च्या परिस्थितीत आहे, तसा असला असता का?

त्याचं ही उत्तर अर्थात नाहीच.

कर्म कसे करावे हे शिकण्यासाठी धर्म वापरला तर समाजाची, देशाची उन्नती होते. पण धर्माने लोकांना वापरायला सुरुवात केली की त्याचा पाकिस्तान होतो, सीरिया होतो.

धर्माच्या अति आहारी जाणं हे समाजासाठी मारक आहे हे धार्मिक तत्ववाद्यांनी लक्षात ठेवावेच. पण त्या पेक्षा जास्त त्यांच्या अनुयायांनी ध्यानात राहू द्यावे. 

अलगोरिदम

हे फेसबुकचं अल्गोरिदम भारी आहे. समाजात चालणाऱ्या विविध भांडणाच्या पोस्ट फार काही पोहचत नाही माझ्यापर्यंत. किंवा गांधी आणि नेहरूंच्या बदनामीच्या पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल आहेत असं वाचायला मिळतं. माझ्यापर्यंत पोहचत नाहीत.

मला असं वाटतं की जितका एखादया गोष्टीचा उन्माद करणे धोकादायक आहे तितकं साप समजून दोरीला धोपटणे पण चुकीचे आहे.

मला आठवतं फेबु वा WA नव्हतं त्या दिवसात एकदा उद्धव ठाकरे म्हणाले "आम्हाला कागदी वाघ म्हणालात, तर याद राखा" मी बातम्या आठवल्या, पेपर आठवून पाहिले, पण असं कुणी म्हंटल्याचं लक्षात नाही आलं. म्हणजे उगाच आवई सोडून द्यायची. विरोधकांना पण आयतं कोलीत मिळतं आणि जर नंतर कुणी खरंच कागदी वाघ म्हंटलं की समर्थकांना चेव चढतो.

एका गृहस्थाची पोस्ट वाचली, त्यात लिहिलं आपण पाकिस्तानशी स्पर्धा करतो. पाकिस्तानशी स्पर्धा? आत्मनिंदेचा इतका विलोभनीय आविष्कार या आधी वाचनात नव्हता आला. नाही म्हणजे स्वतः चे पाय जमिनीवर राहण्यासाठी फटकारा हो. पण इतकं. मुळात पठाणकोट आणि उरी च्या पाठोपाठच्या दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्यांचे तळ आपण नेस्तनाबूत केले आहेत. हे अभिनंदनीय आहेच. पण याला एखादं युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात उन्माद करणं जितकं हास्यास्पद आहे तितकं च जे झालं ते चुकीचं झालं असा गळा काढणं हे पण करंटेपणाचं लक्षण आहे. मुळात हा काही निर्णय नाही झाला की टेस्ट मॅच संपली, फटाके फोडा. समजा परत एखादा दहशतवादी हल्ला झाला, की परत हिनवण चालू. टोकाचीच भूमिका.

अहिंसा वादी आहोतच आपण. याचा अर्थ असा आपण दुसऱ्या ची आगळीक काढत नाही. पण इतके दहशतवादी हल्ले होऊन हातावर हात ठेवून गप्प बसायचं? There are risks and costs to action. But they are far less than the long range risks of comfortable inaction. कालानुरूप संदर्भ बदलतात, आंतरराष्ट्रीय राजकारण बदलतात, सामाजिक समीकरणं बदलतात आणि आपण मात्र आपल्या विचारांना केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आवळून बसायचं?

दुसऱ्यांवर अन्याय करणं हे पाप आहे, पण तो अन्याय सहन करणे हे पण पापच आहे.

हा आपला देश अजून प्रगत नसेल पण अमेरिकेइतका उधळ माधळ करणारा नाही, फ्रांस इतका रंगेल नाही, जर्मनी इतका कंजूष नाही, चीन इतका आढ्यातखोर नाही, जपान इतका रिजिड नाही, आणि पाकिस्तान शी तुलना करण्याइतका हलका नाही.

असो. गांधी जयंती आणि शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.




नैतिकता

मी आणि पार्टनर सिंहगड रोड ला पार्किंग शोधत होतो. सगळीकडे फुटपाथवर भाजी आणि फळ विक्रेते बसले होते अन त्यांच्यासमोर काही मला गाडी लावता येत नव्हती. थोड्या वेळात माझा संयम सुटला, आणि त्या गरीब म्हाताऱ्या भाजी विक्रेत्याकडे बघत म्हणालो "च्यायला, या लोकांकडे काही नैतिकताच नाही. फुकटच्या जागेवर धंदा करायचा आणि त्यावर नंतर मालकी हक्क सांगायचा."

पार्टनरने त्याचं ते सिग्नेचर छद्मी हास्य केलं आणि म्हणाला

"एक लक्षात ठेव, गरीब लोकांना नैतिकता परवडत नाही. They simply can not afford to have morals. दोन वेळच्या पोटाची भ्रांत ज्यांना मिटवायची आहे त्यांना तू नैतिकतेच्या गोष्टी शिकावतोस.  आणि म्हणून त्यांना धर्म बांधून ठेवतो. धर्मात शिकवलेल्या गोष्टी पाळल्या की त्यांना वाटतं नैतिकता पाळली. प्रॉब्लेम तुझ्यासारख्या दांभिक लोकांकडून समाजाला आहे. नैतिकता हा धर्म असं पाळणं तुला खरं तर शक्य आहे.  तसं असूनही तुम्ही त्याला घोडे लावता आणि मग बालाजीच्या दानपेटीत पैसे ओतता नाही तर साईबाबा ला मुकुट चढवता. And that's how you pretend to have morals"

"ती बघ, तिथे पार्किंगला जागा झाली आहे. जा, गाडी लावून ये"

(मूळ कल्पना: खुशवंतसिंग)

इंटरव्ह्यू बुम रँग

आम्ही तिघे इंटरव्ह्यू घेत होतो. एक यंग डायनॅमिक पोरगं समोर होतं. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरं देत होतं. मी त्याला प्रश्न विचारला "How do you look at yourself five years from now?" प्रश्नाचं उत्तर तर त्यानं चांगलं चालू केलं अन अचानक त्याच्या आवाजातील धार कमी झाली. आणि त्यानंतरच्या डिस्कशन मध्ये ती पूर्वार्धातील तडफ नव्हती. तरी मी त्याला सेकंड इंटरव्ह्यू साठी बोलावलं. तो गेला अन एच आर चा माणूस आत आला अन म्हणाला "सर तो मुलगा सेकंड इंटरव्ह्यू ला येणार नाही असं म्हणतोय. तुम्ही बाहेर येऊन बोला त्याच्याशी"

मी बाहेर गेलो आणि का येणार नाही असं विचारलं. तर म्हणाला "सिलेक्शन झाल्यावर तुमच्या शेजारी बसलेले माझे बॉस असतील असं तुम्ही म्हणाला होतात" मी म्हणालो "हो बरोबर"

तर म्हणाला "पाच वर्षानंतर मी स्वतःला कसं बघतो या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते कानात काडी घालून कान साफ करत होते. हे करताना त्यांचे डोळे बंद होते. माझं स्वप्न जिथे मांडत होतो तिथे ते इंटरव्ह्यू घेणारे अत्यंत अजागळ काम करत होते. तुम्ही लोकं माझं करिअर काय बनवणार?"

मी काही बोलायच्या आत तो निघून गेला पण. मी अवाक झालो.

संध्याकाळी सगळे इंटरव्ह्यू प्रोसेस झाल्यावर एच आर चा माणूस आला आणि त्या पोराचीच मेल दाखवली.

त्यात लिहिलं होतं "तुमचा कॉल आल्यावर मी तुमच्या डायरेक्टरचं linked in आणि फेबु प्रोफाइल चेक केलं. इंटरव्ह्यू देताना कॅण्डीटेट ने कसं वागावं याचे खूप तारे तोडले आहेत तुमच्या साहेबाने. जरा इंटरव्ह्यू घेताना काय एकटिकेट्स आणि मॅनर्स पाळायचे याबद्दल ही तुमच्या साहेबांना विचार करून लिहायला सांगा"

खरंच तारे तोडणं सोपं असतं, नाही? 

बाळबोध प्रश्न

म्हणजे एक बाळबोध प्रश्न आहे बघा.

आता समजा पानशेत मध्ये X कोटी लिटर पाणी जमा होतं अन वरसगाव मध्ये Y कोटी लिटर. दोन्ही धरणाची एकत्रित क्षमता X+Y कोटी लिटर्स.

आता याच्या समजा काही टक्के पाणी शेतीला लागणार. समजा a टक्के.

म्हणजे (X+Y)-a(X+Y)/100 इतकं लिटर्स पाणी लोकांना वर्षभरासाठी वापरायला उपलब्ध आहे.

आता वर्ल्ड स्टॅंडर्ड प्रमाणे माणशी १२५ लिटर दिवसाला लागतं. आपण पुण्यासाठी ते १५० लिटर पकडू.

म्हणजे पुण्याची लोकसंख्या

 (X+Y)-a(X+Y)/100
__________________

365X150

इतकीच असणं अपेक्षित आहे.

आता पुण्याची लोकसंख्या आपण P समजू. एका घरात चार माणसे

म्हणजे एकूण घरांची H संख्या P/4 इतकी पुरे आहे.

एका घरात आता कमीत कमी एक चारचाकी (F) आणि एक दुचाकी आहे. (D).

एका वेळेस समजा २०% चारचाकी आणि ३०% दुचाकी रस्त्यावर असतात. म्हणजे 0.2×H आणि 0.3x H.

मग इतकी वाहने रस्त्यावर एका वेळेस आली तर किती स्क्वे किमी चे रस्ते लागतील.

म्हणजे असे काही calculations होतात की आपलं वाटेल तशी शहराची वाढ होत जाते? हा माझा बाळबोध प्रश्न आहे.

आणि हो, शाळेत जे गणित शिकवतात त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही असं काही नसतं.

काय म्हणता? 😊😊

(गणिताच्या शिक्षक मंडळींनी समीकरणं बरोबर आहेत का हे चेक करू नये. भावना महत्वाची. आणि तरुण मित्रांनी ही भावना कोण असा प्रश्न विचारू नये)

Thursday 27 October 2016

पहिला इंटरव्ह्यू

साल १९८६. राम डिप्लोमा करून औरंगाबादहून पुण्याला आला. रिझल्ट लागायचा होता. रामचे वडील म्हणाले, नुसता काय टाईमपास करतोस. रिझल्ट लागेपर्यंत काही काम कर.

राम अशोकनगर ला राहायचा युनिव्हर्सिटी रोड ला. त्याच रोडला एक कंपनी होती. सुपर इंडस्ट्रीज नाव ठेवू यात तिचं. रामचे वडिलांनी कुणा ओळखीच्या माणसाला सांगितलं, सुपर मध्ये रामला काही दिवसासाठी जॉब मिळतो का ते बघ. त्या काकांनी चावी फिरवली अन रामला इंटरव्ह्यू चा कॉल आला.

राम इंटरव्ह्यू साठी कंपनीत गेला. तो त्याचा पहिलाच इंटरव्ह्यू. तळघरात कॉन्फरन्स रूम होती. दोन खुर्च्या मांडल्या होत्या. मध्ये टेबल. अन बाजूला टी पॉय. राम खुर्चीत जाऊन बसला.

इंटरव्ह्यू घेणारे संजय सर आले. ते त्यांच्या खुर्चीत बसले. बसल्यावर काही कळायच्या आत त्यांनी त्यांचे पाय बाजूच्या टी पॉय वर ठेवले. अन राम ला आय सी इंजिन बद्दल विचारलं. अन अजून काही प्रश्न विचारले. समोर ठेवलेले पायातले बूट बघत पहिलाच इंटरव्ह्यू देणाऱ्या आणि  गांगरलेल्या राम ने यथाबुद्धी उत्तरं दिली. प्रश्न संपल्यावर बायो डाटा समोरच्या टेबल वर फेकत संजय सर म्हणाले " तसं काही फार येत नाही तुला. पण त्या एम एस इ बी तल्या साहेबांनी शब्द टाकला म्हणून घेतो तुला. महिन्याचे ५०० रुपये देईल ट्रेनी म्हणून. परवा पासून ये कामाला"

टी पॉय वरचे पाय तसेच ठेवत त्यांनी रामला निरोप दिला.

घरी येऊन रामने वडिलांना सांगितलं की माझं सिलेक्शन झालं नाही. दोन दिवसांनी ते काका तणतणत घरी आले अन रामच्या वडिलांना म्हणाले "अहो काय तुमचा राम. सिलेक्शन होऊन ही जॉईन झालाच नाही" भास्कर रावांनी रामला बोलावलं आणि जरबेत विचारलं "काय रे काय म्हणतात काका. जॉईन का नाही झालास" राम म्हणाला "मला नाही आवडली ती कंपनी" तर काका म्हणाले "काम चालू न करताच तुला कसं कळलं कंपनी खराब आहे ते. तुझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून मी शब्द........."

राम त्यांना अर्धवट थांबत म्हणाला "त्या सरांना इंटरव्ह्यू मध्ये लोकांशी कसं बोलायचं ते कळत नाही. जॉब करताना ते माझ्याशी काही नीट वागणार नाहीत" रामच्या नजरेतुन चीड ओसंडत होती. आणि राम तिथून निघून गेला.

नंतर भास्कर राव, रामचे वडील, रामच्या आईला सांगत होते "पोराला शिंगं फुटली आहेत. समजावा त्याला"

पुढे रामने भास्कररावांच्या सांगण्यावरून धनकवडी ला ३०० रुपये महिन्याला अशी नोकरी केली.

आज ३० वर्षे झालीत याला. उत्तर ऐकताना कुणी कानात काडी घातली म्हणून राम ने दिलेला जॉब पोराने नाकारला यात रामला काही वावगं वाटलं नाही. त्या पोराने मारलेले डायलॉग काल्पनिक असतीलही पण त्या पोराच्या नजरेत चीड रामला दिसली जी त्याच्या स्वतः च्या नजरेत ३० वर्षांपूर्वी वाहिली होती.

नजरेची भाषा फक्त प्रेमात बोलायची असं थोडीच आहे. व्ययवसायिक जीवनात पण वापरू शकता. 

मंजुळे

काही पिक्चर असे असतात की आपण जितक्यांदा पाहतो त्याच्या अजून प्रेमात पडत जातो. उदा: शोले.

काही पिक्चर असे असतात की आपण एकदाच पाहतो अन त्याचा इफेक्ट असा असतो की परत बघावा वाटत नाही. असं वाटतं, कुणास ठाव त्याची परिणामकता कमी होईल काय! मनावरचा त्याचा प्रभाव ओसरेल का! उदा: सैराट.

चला विषय निघाला तर सांगून टाकतो. माझी आई २३ सप्टेंबर ला जर्मनीला गेली. अडीच एक महिन्यासाठी. तिचे को पॅसेंजर होते, नागराज मंजुळे. आई ने काही ओळखलं नाही. मग बहुतेक दुसऱ्या कुणी सांगितलं असेल. फ्रँकफूर्ट एअरपोर्ट ला उतरताना त्या भल्या गृहस्थाने आईला बाहेर पडायला पूर्ण मदत केली, पार केबिन लगेज वरून काढेपर्यन्त. माझा मेव्हणा अमोल घ्यायला येणार होता, तर तो येईपर्यंत थांबू का असं ही विचारलं. सगळ्यात हाईट म्हणजे दुसऱ्या दिवशी मराठी लोकांनी आयोजित केलेल्या डिनर साठी आईला फोन करून निमंत्रण दिलं. विचारपूस केली, व्यवस्थित पोहोचलात का म्हणून. काही कारणाने आई जाऊ नाही शकली ती गोष्ट वेगळी.

मंजुळे साहेब, मानलं तुम्हाला. तुमच्याशी कधी भेट होईल असं काही संभवत नाही. या पोस्ट द्वारेच आभार अन सलाम तुम्हाला. 

पार्टनर १२

पार्टनर सिगरेट पित भिंतीत खिळे ठोकत होता.

"तुला माहित आहे पार्टनर, मी आतापर्यंत फेबु वर कुणाला मित्र विनंती नाही पाठवली"

"फेकू नकोस" सिगरेट ची राख फेकत राम निर्विकार पणे म्हणाला.

आयला, याला कसं कळलं म्हणून मी चपापलो.

"कशावरून म्हणतोस की मी फेकतोय" उसनं अवसान आणून मी विचारलं.

"हे बघ, खरं काय ते मला माहित नाही. पण मी तुला विचारलं की जे तू म्हणतोस ते सिद्ध करून दाखव, तर शक्य आहे का तुला? ज्या गोष्टी तू सिद्ध करू नाही शकत त्यावर शायनिंग का टाकतोस."

पुढं म्हणाला "तसं ही चमकोगिरी अशा गोष्टींची करत जा, जिथे quantifiable measures असतील"

दोन मिनिटानंतर मी त्याला म्हणालो

"तुला माहित आहे, एक दीड महिन्यांपूर्वी फेबुवर माझी ५००० मित्र संख्या पूर्ण झाली"

सिगरेट चं थोटुक पायाखाली चिरडत पार्टनर ने एक बेकार कटाक्ष टाकला अन म्हणाला "मग. पुढं काय?"

मी म्हणालो "अरे तूच म्हणालास ना quantifiable measures सांग म्हणून?"

तर राम म्हणाला "अरे, त्याने काही फरक पडतो का?"

"म्हणजे?"

"तुला सगळं कसं उलगडून सांगावं लागतं रे. म्हणजे रेल्वे चं जवळपास सव्वा लाख किमी चं नेटवर्क आहे त्यातून वर्षाला ८०० कोटी लोकं प्रवास करतात. किंवा वॉटर टेबल २०० फुटावर गेलं होतं ते जलसंवर्धनमुळे ३० फुटावर आलं. अशा गोष्टींचं कौतुक. अगदी थोडक्यात सांगायचं तर तुझ्या बिझिनेस मध्ये ४५ लोकं काम करतात अन तीन वेंडर्स चा बिझिनेस चालवण्यास तू कारणीभूत आहेस याचा अभिमान ठेव. आणि अभिमान ठेव, गर्व नाही. ५००० झाले म्हणतोय"

अन म्हणाला "चल निघतो मी. तसंही पोस्टची लांबी वाढेल तुझी. आणि हो, तुझ्या मित्रांना सांग, व पु च्या पार्टनर शी माझी तुलना नको. दोघांची जातकुळी वेगळी आहे"

पार्टनर निघून गेला.

मी जातकुळी या शब्दावरून काही राडा होईल का, याचा विचार करत बसलो. 😊😊

फर्स्ट ए सी

पुण्याहून अहमदाबाद ला निघालो आहे, ट्रेन ने. अहिंसा एक्स्प्रेस. (ट्रेन मध्ये आराम करायला मिळतो वगैरे कारणं झूठ आहेत. धंदा मंदीत असल्यामुळे विमानप्रवास परवडत नाही आहे). सेकंड ए सी अपग्रेड होऊन फर्स्ट ए सी मिळाला. मी पहिल्यांदाच फर्स्ट ए सी ने प्रवास केला.

फक्त दोन बर्थ असणारी केबिन मिळाली. अपर आणि लोअर बर्थ असणारी. इथे बर्थ ची रुंदी पण मोठी असते. केबिनला दरवाजा आहे. ज्याला आतून कडी लावता येते. आत कोण आहे हे बघण्यासाठी दरवाजाला काच आहे. पण तसं दिसू नये यासाठी आतून पडदा दिला आहे. ए सी चं तापमान अत्यंत आल्हाददायक ठेवलं आहे. मंद सुवास दरवळणारा रूम फ्रेशनर उडवला आहे. उबदार अशी दुलई दिली आहे. का कोण जाणे बर्थ सारखीच दुलई ची रुंदी पण मला सेकंड ए सी तल्या पेक्षा जास्त वाटते आहे.

रात्री पुणे स्टेशनवर टीसी म्हणाले, "सध्या एकटेच आहात. दरवाजाची कडी आतून लावू नका. रात्री कुणी प्रवासी आला तर तुमची झोपमोड होणार नाही"

रात्र झाली. गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली. हा सिलसिला सकाळपर्यंत चालू राहिला. पण माझ्या केबिनमध्ये कुणीही आलं नाही.

तळटीप:

- फर्स्ट आणि सेकंड ए सी च्या बर्थच्या संरचनेत बदल असला तरी टॉयलेट च्या स्वच्छतेची लेव्हल सारखीच असते. (वेगळी का असावी, फर्स्ट ए सी तुन प्रवास केल्यावर तू गुलाबपाणी सोडतोस का? पार्टनर अशी कॉमेंट करेल)

- टीसी ने उल्लेख "प्रवासी" शब्द उच्चारला तेव्हा त्याच्या मनात तो शब्द पुरुषवाचक होता की स्त्रीवाचक याचा मी रात्रभर विचार करत होतो.

ऑम्लेटी

सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. माझे एक नातेवाईक त्यांच्या मुलाने कुठल्या बिझिनेस मध्ये जावं याची माझ्याबरोबर चर्चा करत होते. त्या मुलाला काहीतरी हॉटेलिंग मध्ये करायची इच्छा होती.

मी त्यांना फक्त अंड्यापासून बनवता येऊ शकेल अशा eating joint ची कल्पना सांगितली होती. Eggatarian हॉटेल. माझा तर प्रोजेक्ट रिपोर्ट पण डोक्यात होता. हॉटेल चं नाव ऑम्लेटी. अगदी इंटेरिअर सकट. म्हणजे फॉल्स सिलिंग ऑम्लेट सारखं दिसावं वगैरे. ऑम्लेट चे विविध प्रकार (अगदी fluffy ऑम्लेट) म्हणजे मसाला, एग व्हाइट, चीज, बटर, हाफ फ्राय आणि मग भुर्जी, scrambled eggs, एग करी, एग मसाला, एग राईस, एग सँडविच त्याच्या बरोबर उच्च क्वालिटीचा ब्रेड किंवा बन. बाजूला रोस्टेड कॉफी चं मशीन अन एक सॉलिड ambience.

माझ्या नातेवाईकांनी पण सेक्सी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता. गाडी कुठे बारगळली ते कळलं नाही. Project never took off. पण दोन एक वर्षात एक्स्प्रेस वे वर मॉल मध्ये एग संडे नावाचं तसं दुकान दिसलं अन आता तर निलायम च्या जवळ अथर्व नावाचं असं दुकान निघालं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. सिंहगड रोड happening road झाला आहे. नांदेड सिटी जवळ कुणाला असा जॉईंट टाकता आला तर धूम पळेल. सिंहगड ला जाणारे हवशे गवशे ब्रेकफास्ट ला थांबतील. शनिवार रविवार उभं राहायला जागा मिळणार नाही.

आणि ले फार्म मध्ये कोंबड्या जी अंडी देतात त्यात चिकन तयार होत नाही म्हणजे ती अंडी बाय प्रॉडक्ट आहे कोंबडीचं. म्हणजे गाय म्हशीच्या दुधासारखं. व्हेज एकदम.

त्यामुळे कोंबडी आधी की अंडं या विचारात पडू नका. आपल्यासाठी अंडं च आधी.

प्रोजेक्ट सुचवला आहे आणि टाकलाच तर मी ऑर्डर देईल बरं "एक डबल एग व्हाइट मसाला ऑम्लेट विथ  ब्राऊन ब्रेड टोस्ट" कन्सल्टिंग फीस म्हणून फक्त पहिल्या ऑर्डर चे पैसे माफ कराल.

मग कधी चालू करताय "ऑम्लेटी"

धंदा १

तर अमोल चौधरी ने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मी दोन धंदे लिहिले होते. दुसऱ्या धंद्याबद्दल सांगायच्या आधी एक वस्तुस्थिती सांगतो.

रिक्षा........बारकाईने बघितलं तर आजच्या ऑटोमोबाईल मधलं सगळ्यात बंडल डिझाइन. ऊन, थंडी अन पाऊस यातून कुठलंही संरक्षण न करणारं, अपघात झालाच तर बॉडीची पूर्ण वाट लावणारं (म्हणजे, वाहनाच्या आणि माणसाच्या), वर्षानुवर्षे न बदललेलं, सगळ्यात मोठा चेंज काय तर फ्रंट इंजिन, रिअर केलं आणि आता सी एन जी आलं. पण अदरवाईज काहीच फरक नाही. बजाज आणि टी व्ही एस ची तरी चांगली आहे रिक्षा पण दोन ते तीन वर्षात पूर्ण खुळखुळा होणारा त्या पियाजो च्या मूळ डिझायनर ला साष्टांग प्रणिपात.

आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे रिक्षाचा धंदा करणाऱ्या लोकांची वृत्ती. वर्षानुवर्षे एकाच गाडीवर त्याच पद्धतीने, की ज्यात बहुतेक व्हॅल्यू सिस्टम मध्ये लोकांना लुबाडणे, अरेरावी करणे, कस्टमर ला गरज असेल तेव्हा अडवणूक करणे असे गुण उधळले जातात. (अपवादानी स्वतः ला सन्माननीय समजणे). किंबहुना इतके सारे दुर्गुण असताना हा धंदा इतके वर्ष तगला हे आपल्या समाजाच्या पराभूत मानसिकतेचं एक लक्षण आहे.

पण आता वरील कारणामुळे या धंद्याला घरघर लागली आहे.  ओला अन उबर या लोकांनी धूम मचवली आहे. पण अजूनही धंद्यात स्कोप आहे असं मला वाटतं. पुण्यात एकूण ऐंशी एक हजार रिक्षा असाव्यात. पुढच्या दहा एक वर्षात रिक्षा पुणे आणि बऱ्याच शहरांच्या रस्त्यावर नसतील असा माझा अंदाज आहे. अन पब्लिक ट्रान्सपोर्ट वर्ल्ड क्लास बनायला किती दशकं जातील हे देव जाणे. विचार करा आज रस्त्यावर असणाऱ्या ६०००० रिक्षा नसतील तर टॅक्सी किती लागतील.

सरासरी पाच रु किमी इंधनाचा खर्च, पन्नास पैसे किमी मेंटेनन्स, २ रु किमी ड्रायव्हर आणि दोन रुपये किमी लोन इंटरेस्ट.  साडेनऊ रु प्रति किमी हा सेदान गाडीचा खर्च आहे. सध्या तिचा रेट १२ ते १४ प्रति किमी मिळतो. ड्रायव्हर ठेवून ही सरासरी २ रु प्रति किमी फायदा आहे. खर्च जाऊन रु २०००० प्रति महिना. त्यात स्वतः गाडी चालवली अन लोन नसेल तर सरळ रु ५०००० प्रति महिना कमाई.

उगाच नाही अमिताभ बच्चन अन रतन टाटा ओला मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत.

कष्ट आहेतच पण एका टॅक्सी मध्ये एका कुटुंबाला जगवायची ताकद आहे.  दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आज कुणी साथ दिली असेल तर टॅक्सी धंद्याने.

बघा, विचार करा अन............स्टार्टर मारा. 😊😊

पार्टनर ११

सचिनने राजीनामा दिला आणि माझ्या तोंडून शब्द पडले "खऱ्याची दुनिया नाही राहिली. यांच्याशी कितीही चांगलं वागा, वेळेवर टांग देतातच".

पार्टनर ने विचारलं "कुठे चाललाय सचिन"

मी म्हणालो "असेल इथं कोणत्यातरी आपल्या सारख्या कंपनीत"

तर पार्टनर म्हणाला "अरे सेगमेन्ट सोडून जात नाही आहे ना. नशीब समज. आपल्या इंडस्ट्रीत राहतोय ना, ठीक आहे मग"

"अरे, पण यांना ट्रेनिंग द्यायचं, जीव तोडून. स्किल सेट शिकवले की जास्तीच्या चार पैशांसाठी हे दुसरीकडे जाणार"

पार्टनर: असलेल्या मॅन पॉवर च्या १०% गव्हर्नमेंट ट्रेनी इंजिनियर म्हणून अप्रेंटीस म्हणून घ्यायचे नियम आहे. त्याला तू हरताळ फासतोस. ट्रेनिंग दिलं तर एक उत्तरदायित्व पूर्ण केलं असं समज की. आणि लक्षात ठेव तुझ्या लोकांना असं ट्रेनिंग दे की बाहेर लोकांनी विचारलं पाहिजे, आधी सर्व्हिस ला कुठं होतास ते. नाव काढलं पाहिजे सेटको चं त्यांनी.

मी: आयला हे बरं आहे. म्हणजे आम्ही पोरांना शिकवायचं आणि त्यांनी मात्र..........

पार्टनर: पूर्ण ऐक तर. त्यांना ट्रेनिंग दे आणि त्यांना असं ट्रीट कर की त्यांनी तुझी कंपनी सोडताना चारदा विचार केला पाहिजे.

मी: म्हणजे

पार्टनर: म्हणजे

"Train your employees so well that they can leave your organisation

And treat them so good that they do not think of leaving your company."

"तुझ्या उर्वरित प्रोफेशनल लाईफ चं हे एक तत्व ठेव."


पार्टनर चा युक्तिवाद बिनतोड असतो. मी होकारार्थी मान डोलावतो. पर्याय तरी काय आहे दुसरा. 

तो

पहाटेची वेळ. साडे चार वाजले असतील. मी आळोखे पिळोखे देत हॉल मध्ये आलो. तो ही आला अन म्हणाला "चल, आटप लवकर. मॉर्निंग वॉक ला जायचं आहे." मी म्हणालो "हे दररोज चं काय आहे रे. तसंही दिवसभर ऑफिसमध्ये धावपळ होतेच की. चालणं म्हणशील तर सहा सात किमी चालतो मी दिवसभरात. तो व्यायाम नाही का मग". तर तो म्हणाला "अरे तो थोडी एक्सरसाईज. ते करताना तू टेन्शन मध्ये असतोस. एक्सरसाईज आणि टेन्शन हे बेकार कॉम्बिनेशन आहे. त्यालाच तर एक्सरशन म्हणतात"

मी पोहोचलो रामटेकडी वर. सव्वापाच साडेपाच ची वेळ. किर्र अंधार होता अन दाट झाडी. त्यातून जाणारी एकच पायवाट. चंद्राच्या प्रकाशात दोन एक फुटपर्यन्त अंधुक दिसत होतं. धीर केला अन चालू लागलो. तो होताच बरोबर.  मी म्हणालो "आपण  चालतोय अन समजा एखादा साप किंवा एखादं पिसाळलेलं कुत्रं अंगावर धावत आलं तर काय करणार. फाटेल माझी. त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं या विचारानेच माझा थरकाप उडतोय"

तो म्हणाला "हे तुझं असं आहे. म्हणजे तुला आव्हान घ्यायला आवडतं. पण त्या आव्हानाने प्रति आव्हान उभं केलं तर तुला प्रेशर्स असह्य होतात. आणि तुझी एखाद्या गोष्टीला hypothetical पद्धतीने हाताळण्याची विचारधारा. मग तुझ्या हृदयाच्या वाहिन्या तुंबतात. नशिबाने आता पर्यंतच्या आव्हानांना उत्तर देताना तुझी पावलं बरोबर पडली ते ठीक आहे. आता कसं मिणमिणत्या प्रकाशात का होईना काळजीपूर्वक पाऊल टाकतोस तसं तुला आयुष्यात ही प्रश्नांना उत्तर शोधताना छोटे छोटे थ्रेड मिळतात. अशा छोट्या धाग्यांनी मिळून एक मजबूत दोरी तयार होते अन मग तो विधाता त्या प्रश्नाच्या गर्तेतून तुला वर ओढतो.  Otherwise I can say that you like to take challenges but not pressures arising out of them"

मी म्हणालो "पण हे असं कुठपर्यंत चालू राहणार?"

तर तो म्हणाला "जब तक है जान. जोवर तुझा जीव कंपनीत आहे अन तुझ्या अंगात जीव आहे, तोवर हे चक्र चालू राहणार. दोनपैकी एक गोष्ट नसेल तेव्हा तुझी सुटका होणार"

"अरे, पण एखाद्याची कपॅसिटी......"

"तो विचार नको करुस. आपल्या हातून भव्य दिव्य"च" घडायला पाहिजे असं काही नाही आहे. हा जो "च" आहे ना, तो खूप प्रॉब्लेम्स घेऊन येतो आयुष्यात. Do not burn the bridges. तू जगात यायच्या आधी ही हे जग चाललं होतं अन नंतर ही चालणार आहे. स्वतः ला खूप जास्त सिरियसली घेतलं की दररोजच्या आयुष्यातल्या आनंदाला तिलांजली द्यावी लागते."

त्याच्याशी बोलता बोलता रामटेकडी पूर्ण पार झाली. त्या भरार पहाटवाऱ्याचा आस्वाद घ्यायला तिथे दुसरं कुणीच नव्हतं.

एव्हाना झुंजूमुंजू झालं होतं, तांबडं फुटलं होतं. अन त्या प्रकाशात मला समोरचा रस्ता आता स्पष्ट दिसत होता.

"तो" कोण तुम्हाला माहित आहे. तुमची ओळख झाली आहे त्याच्याशी. 

मिस्त्री

आपली काही इतकी मोठी पोहोच नाही बुवा की टाटा ग्रुप ने मिस्त्री साहेबाना का उडवलं याच्यावर भाष्य करू शकेल. हो म्हणजे गेल्या १४ वर्षात पहिल्यांदा एका मॅनेजर ला मी ऑगस्ट मध्ये उडवला. पण तसं करताना माझीच जास्त फाटली होती. ते करण्याआधी त्याच्या परफॉर्मन्स चं मॉनिटरिंग आणि हे कळणं की हा आपला मिस हायर आहे हे जास्त तापदायक होतं.

पण जे झालं ते दुर्दैवी. अन ते ही टाटा सारख्या ग्रुप मध्ये. परत चार वर्षांनी. आणि सायरस मिस्त्री पण कुणी लुंगे सुंगे नव्हते. शापुरजी पालनजी घरातले, जे टाटा सन्स चे सगळ्यात मोठे शेअर होल्डर. कसलं वादळ झालं असेल याची कल्पना आपण सामान्य लोकं नाही करू शकत. इन्फोसिस मध्ये नारायण मूर्तींना असंच परत यावं लागलं होतं. अर्थात टाटा ग्रुप काहीतरी भारी डिसीजन घेतलीच आणि ह्या सगळ्या प्रकारातून बाहेर पडतील याबद्दल शंका नाही.

काही दिवसांपूर्वी टॉप ग्रेडिंग नावाचं पुस्तक वाचलं. त्यात मिस हायर च्या पोटी चुकवलेली किंमत ही त्यांच्यावर डायरेक्ट केलेल्या खर्चाच्या १५ ते २० पट असते असं प्रुव्ह करून दाखवलं होतं. म्हणजे मिस्त्री साहेबांचं वार्षिक रेम्युनरेशन १८ कोटी वगैरे असावं. चार वर्षात ७२ कोटी आणि त्याच्या १५ पट. म्हणजे हजार एक कोटी स्टेक ला लागले. अर्थात साडेचार लाख कोटी रेव्हेन्यू असलेल्या टाटा ग्रुप ला हा धक्का फार मोठा नाही.

मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. आपण आपलं त्यांना क्रयासिस मधून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा देण्याशिवाय फार काही वेगळं म्हणू नाही शकत. 

Sunday 16 October 2016

Training

"Professionalizing business for sustainable growth" हो असाच विषय होता पॅनल डिस्कशन चा. या विषयावर बोलण्यासाठी मी विचार करत होतो. तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. त्या साधारणपणे मांडल्या आहेत.

माझी कंपनी सध्या छोटी आहे. वर्षे सरतील अन कुणास ठाव ती मोठी होईल ही. पण ती फक्त मोठी होऊन कामाचं नाही तर तसं होताना काही मूळ सिद्धांतावर ती उभी राहिली पाहिजे असं माझं मत आहे. आता हे मूळ सिद्धांत कोणते अन त्यावर कंपनीचा डोलारा कसा उभा राहील हे समजून घेणं म्हणजे कंपनीला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवणं. आणि तसं करणं हे कंपनीला लंबी रेस का घोडा बनवतं.

काही कंपनी आपल्याला माहित आहेच. टाटा, आज जवळपास १५० वर्षे झालीत, अत्यंत दमदार वाटचाल करत आहे. अमेरिकेत तर अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्यांचं वय हे दोनशे वर्ष आहे. कशा चालत असतील या कंपन्या. 

हे सगळं आपल्याला कळणार कसं? एक केस स्टडी म्हणून मला स्वतः ला घेतलं, तर करिअर ची पहिली पाच वर्षे मी एस के एफ मध्ये काढली. म्हणजे तेव्हा मी अगदीच बाळ होतो. त्यानंतरची आठ वर्षे मी बंगलोर च्या रॊलॉन हायड्रॉलिक्स नावाच्या कंपनीत होतो. कंपनी बंगलोर ला अन मी पुण्याला. अन मी हार्ड कोअर सेल्स चा माणूस. सेल्स शिकलो पण व्यावसायिकता नाही. आणि त्यानंतर बिझिनेस. बरं घरात बिझिनेस चं वातावरण नाही. लहान भावाने व्यवसाय चालू केला पण ते ही माझ्यासारखं. आपल्यांनंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे असं वाटत होतं. पण ते कसं करायचं ते कळत नव्हतं. 

पण हि जी भावना आहे की "आपल्यानंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे" ही कंपनीला व्यावसायिक पद्धतीने चालवायच्या इच्छेची पहिली खूण  आहे. आणि या जोडीला "माझ्या नंतर माझ्या कंपनीची सूत्रे माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या (जावयाच्या) हातात असली पाहिजे" अशी इच्छा "नसणं" ही त्या व्यवसायिकतेची दुसरी खूण आहे. त्याच पद्धतीने मी कंपनी चालवली अन त्याचमुळे २०१२ साली जेव्हा मी कंपनी सेटको ला विकली तेव्हा माझ्या पोटातलं पाणी थोडं पण हललं नाही. बाकी सगळे आर्थिक व्यवहार सोडले तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे माझ्या कंपनीचं वय अचानक शंभर वर्ष झालं. कारण सेटको ची स्थापना अमेरिकेत १९१२ साली झाली आहे. 

पण तरीही एक मोठा पेन एरिया होता अन तो म्हणजे human asset management. म्हणजे कंपनी वाढत चालली आहे. लोकं वाढत चालली आहेत. आता ह्या सगळ्यांची ग्रोथ मोजायची कशी? हा एक मोठा प्रश्न होता.

म्हणजे पहिले दोन प्रश्न आणि हा तिसरा पेन एरिया. या प्रश्नांवरती उत्तर काय याच्या शोधात असताना मला एका ट्रेनर बद्दल माहिती झाली. आज नाव नाही लिहीत, पण ह्या ट्रेनर ची पद्धत वेगळी होती हे नक्की. त्याच्या आधी मला अनेक जण भेटून गेले. "One minute success" किंवा "एका दिवसात उद्योजक बना" अशा पद्धतीचे. मुळात उद्योजक असणं हे संपत नाही, तर तो एक प्रवास असतो. आपण आपल्या  एम्प्लॉईज ला ट्रेनिंग देतो, जेव्हा कारसाठी ड्रायव्हर बघतो तेव्हा त्याला कार व्यवस्थित चालवता येते का, ते बघतो. पण मग त्याच पद्धतीने स्वतः उद्योजक व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षित आहे का, हा प्रश्न तितक्याच तीव्रतेने विचारतो का? 

मला असं वाटतं की तो प्रश्न विचारायला हवा. आणि नुसता उद्योग चालवणं म्हणजे पैसे कमवायचे हाच जर उद्देश असेल तर अशा प्रशिक्षणाची गरज नाही. पण वर लिहिलेले तीन मुद्दे जर तुम्हाला व्यवसायात जोपासायचे असतील तर असं प्रशिक्षित होणं अत्यंत गरजेचं आहे. 

असा प्रशिक्षक निवडताना काळजी घ्यायला हवी हे नक्की. सगळ्यात आधी म्हणजे, त्या प्रशिक्षकाने हे सगळं सोसलं असलं पाहिजे. म्हणजे उद्योजकता प्रसवताना जो त्रास होतो तो एखाद्या बाळंतिणी पेक्षा कमी नसतो. आणि त्या ट्रेनर ने जर ते अनुभवलं असेल तर तो  तुम्हाला तो त्रास कसा सहन करायचा ते शिकवतो. हो, आणि एक.  जर कुणी तुम्हाला म्हंटल की  तुम्हाला त्रास होणारच नाही असं शिकवतो, तर तो फेकतो आहे हे खुशाल समजावं. त्रास होणारच, तो त्रास कसा सहन करायचा ह्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजे उद्योगात व्यावसायिकता आणणे. 

मी जो कोर्स केला त्यात मूळ सिद्धांताविषयी (Core values) आणि मूळ उद्देश (Core purpose) बद्दल शिकवलं गेलं. हे किती महत्वाचं आहे, नाही? म्हणजे आपण आलो का या पृथ्वीवर? त्या कोर्स ची फी तगडी आहे. पण हे मूळ सिद्धांत आणि मूळ उद्देश हे माहिती होणं बेशकिमती आहे. अजोड आहे. याची किंमत होऊ नाही शकत. 

सगळ्यात मुख्य म्हणजे मला माझा विकनेस कळाला. आणि अर्थात स्ट्रॉंग पॉईंट पण. आता त्या माझ्या वीक पॉइंटवर मी जीव तोडून काम करतो आहे. 

आणि दुसरा एक मुद्दा आहे. मी हा कोर्स करतो आहे. आणि आपली मैत्री आहे. तर मी तुम्हाला हे सगळं शिकवू शकतो का? तर उत्तर आहे ........ "नाही". या ट्रेनर लोकांनी त्याचा एक स्ट्रक्चर्ड फॉरमॅट बनवला असतो. त्या लॉजिकल सिक्वेन्स ने ते शिकवत गेलं तर ते तुमच्या गळ्यात उतरतं. कदाचित उद्या मी "ट्रेनिंग"   हाच व्यवसाय केला तर शिकवू शकेल ही, पण आज नाही.

अन सगळ्यात शेवटी महत्वाचं: 

- अशी व्यावसायिकता आणली म्हणजे तुमची कंपनी अनेक दशकं चालेलच का?

- आणि व्यावसायिकता म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला उद्योगाची सूत्रे द्यायचीच नाहीत का?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं "नाही". असं ट्रेनिंग गॅरंटी कशाचीही देत नाही, पण शक्यता मात्र तयार होते. 

तसंही, जन्म मरणाच्या फेऱ्यात गॅरंटी फक्त जन्म आणि मरण याचीच असते. बाकी तर फक्त शक्यता असतात.   

Friday 7 October 2016

चीन १

तर मुद्दलात राडा कसा आहे ते सांगतो.

तुम्हाला पी सी बी माहित आहे का? नाही नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाही. मी म्हणतो ते प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर पीसीबी हा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा जीव कि प्राण असतो. म्हणजे डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच. हे पीसीबी सिंगल लेयर आणि मल्टि लेयर अशा दोन प्रकारात येतात. मल्टी लेयर पीसीबी मुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची साईज लहान होत चालली आहे.

भारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त १०% भारतात बनतात. आणि ८०% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे दहा टक्के पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.

अजून एक छोटा हिशोब सांगतो. ह्या पीसीबी इंडस्ट्री मध्ये स्पिन्डल लागतात. माझ्या अंदाजाने भारतात ५००० स्पिन्डल वापरले जात आहेत. चीन मध्ये एका छताखाली २००० स्पिन्डल असलेल्या किमान १० कंपन्या मला माहित आहेत.

कळतं का चीन कुठपर्यंत तुमच्या घरात घुसलं आहे ते. राष्ट्रभक्तीच्या वल्गना करताना जरा थोडा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. नाहीतर आपलं उचललं बोट, अन दाबला की बोर्ड. केलं फॉरवर्ड. आणि हे तर मी तुम्हाला पीसीबी चं सांगितलं. अजून दोन उद्योगाबद्दल अशीच माहिती देऊ शकतो. अहो आपल्या इथे २०० किमी प्रति तास ही रेल्वे करण्याचा विचार आज आहे ना तिथे चीन मध्ये ३५० किमी प्रतितास इतक्या वेगाने रेल्वे पळत आहेत.

त्यामुळे मनगटात दम असेल ना तर हे पीसीबी सारखे प्रॉडक्टस भारतात चीन पेक्षा कमी भावात बनवून दाखवा.  अन हे शक्य आहे. आज भारताचा लेबर चीन पेक्षा अर्ध्या भावात मिळतो. पण त्याला जोड लागते ती सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती ची. ती नाही म्हणून हे असले बहिष्कार वगैरे पळपुटे आवाहन करावे लागतात. बाबा रामदेव परवडला. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लिव्हर आणि पी अँड जी च्या उरात धडकी भरवली त्याने. एखाद्या प्रॉडक्ट ला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.

काल सांगितलं तसं चीन देश म्हणून मला अजिबात झेपत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे.

तेव्हा असले मेसेजेस फॉरवर्ड करून स्वतः चे हसे नका करून घेऊ. चीन च्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्या ऐवजी, प्राचीन अन अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा वृथा अभिमान सोडा. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे.

शेवटच्या वाक्यात यमक सॉलिड जुळलं आहे

चीन २

आतापर्यंत जे अनुभवलं, वाचलं आणि ऐकलं त्यावरून माझ्याच चष्म्यातून..........चीन.

कालच्या आर्टिकल मध्ये राहुल अकोलकर आणि सौरभ परांजपे या युवा उद्योजकांनी कॉमेंट केल्या त्यावरून जे सुचलं ते लिहितो.

चीन च्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय volume या असे प्रॉडक्टस आपल्याकडे पाठवतो. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी जर खराब असेल, आणि ती बहुतेकदा असतेच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाही आहे. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब क्वालिटी चा आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही. आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५ मध्ये मी चीन मध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार क्वालिटी चा सापडला की मोन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.

ह्या उलट आपला भारत देश. लॉ व्हॅल्युम पण हाय कॉस्ट आणि क्वालिटी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची, अशा प्रॉडक्टस मध्ये जगभर पॉप्युलर आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, राहुल ने सांगितलं ती ऑटोमोबाईल इंडस्ट्री. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती, चायनीज उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजक लोकांच्या  कल्पकते समोर आणि राजकीय इच्छाशक्ती समोर चायनीज भारतात प्रवेश पण करू शकत नाही. इतकंच नाही तर ऑटोमोबाईल मध्ये लागणाऱ्या मेकॅनिकल पार्टस मध्ये सुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचष्मा टिकवून ठेवला आहे.

मी ज्या इंडस्ट्री ला रिप्रेझेन्ट करतो तो मशीन टूल इंडस्ट्री. अतिशय कॅपिटल इंटेनसिव्ह. इथे सुद्धा चायनीज कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचं captive कंझमप्शन हा जरी एक इश्यू असला तरी चायनीज प्रॉडक्ट ची खराब क्वालिटी हा एक मोठा मुद्दा आहे. आमच्या कडे चायनीज स्पिन्डल रिपेयरला येतात. अत्यंत दरिद्री क्वालिटी चे  असतात ते.

सगळ्यात बेकार गोष्ट या चायनीज लोकांची आणि ती म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता. आमचे बीडकर काका आहेत फेबुवर. स्टॅंडर्ड हैड्रोलिक्सच्या पंजाबी उद्योजकाला चायनीज कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर च्या डील मध्ये करोडो रुपयाला कसा गंडा घातला याची सुरस कथा त्यांच्याकडून ऐकावी. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात बिझिनेस डील फायनल करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मी सुद्धा तीस एक चायनीज बिझिनेस प्रोफेशनल्स बरोबर संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले. चायनीज लोकांनी कसं गंडवलं याच्या अजून चार पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर (ड्युरा सेल ची भारी स्टोरी आहे यावर) आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चायनीज मंडळींच्या जवळपास ही फिरकत नाही. आपल्याकडे जे प्रॉडक्टस सप्लाय केले जातात ते खूप कमी प्रॉफिट मार्जिन वर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही तर तिथलं राजकीय सपोर्ट आणि बँकिंग सिस्टम त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.

आपल्याला जे चांगले चायनीज प्रॉडक्टस मिळतात ते पाश्चात्य आस्थापनेखाली बनले जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानीज काँट्रॅक्ट उत्पादकाबरोबर apple चे बिझिनेस मॉडेल बेजोड आहे.

हे आहे असं आहे.  चायनीज प्रॉडक्टस ला नाकारा ते त्यांची क्वालिटी भंगार आहे म्हणून ना की देशभक्तिच्या नावाखाली.  क्वालिटी बेकार आहे हा मेसेज चायनीज प्रॉडक्टस ला कायमचं हद्दपार करेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चीन ने पाकिस्तानवर अटॅक केला तर त्यांचे गचाळ प्रॉडक्टस सुद्धा आम्ही आनंदाने वापरणार!?

अत्यंत राक्षसी म्हत्वाकांक्षेने झपाटलेल्या चीन ला मानवता विरोधी वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार आहे. त्यांच्या एकुणात वर्क कल्चर पेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.

थोडक्यात सांगायचं तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दीपावणारी प्रगती त्यांनाच लखलाभ. आपण भारतीयांनी आपली उद्योजकता वापरून, फ्रुगल इंजिनीअरिंगने, स्वस्त किमतीत उच्च दर्जाची क्वालिटी देऊन, Make in India आपल्या अंगात भिनवून आणि सगळ्यात महत्वाचे हे करताना एथिकल वर्क प्रॅक्टिसेस ची कास धरून या चायनीज प्रॉडक्टस ला हद्दपार करू यात.......... बहिष्काराने नव्हे.

माझ्या लेखी देशभक्ती किमती आहे. व्यापाराशी तिची सांगड घालण्याइतकी स्वस्त नाही आहे.

Thursday 6 October 2016

डबल ढोलकी

एक देश म्हणून चीन मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या काही प्रोडक्टस ची क्वालिटी दळभद्री आहे. ते मी वापरत नाही. पण काही प्रोडक्टस मात्र भारी आहेत. ते मी वापरणार.

सध्याच्या सरकारच्या बऱ्याच पॉलिसी मला आवडत नाही. पण  दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून पी ओ के मध्ये दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्याचे पुरावे मला मागावेसे वाटत नाही. पण जे मागतात, त्यांनाही ते मागण्याचा हक्क आहे असं माझं मत आहे. कारण ती त्यांची बुद्धी आहे. तसंही २० जुलै १९६९ रोजी अपोलो चंद्रावर गेलं नाही असे म्हणणारे महाभाग आहेत. ट्वीन टॉवर अमेरिकेच्या संरक्षण खात्याने उडवले असेही तारे लोकं तोडतात. उद्या ओसामा ला मारलं  नाही असं लोकं म्हणू शकतील. गांधी नावाचा फायदा घेण्यासाठी नेहरूंनी इंदिरा मॅडम ला फिरोज गांधींच्या प्रेमात पडायला भाग पाडलं हे ही लोकं बरळू शकतात. लोकांच्या अशा विचित्र स्टेटमेंट्स ला किती महत्व द्यायचं हे माझ्या हातात आहे. पण त्यांना शिव्या देण्याचा आततायी पणा माझ्याकडून होणार नाही याची गॅरंटी आहे.

साधारण पणे माझ्यासारख्या लोकांना डबल ढोलकी किंवा दांभिक म्हणतात. काही लोकं माझ्या सारख्याना षंढही  म्हणतात. त्यांना तसंही  म्हणण्याचा हक्क आहे असं मी मानतो.

बोलणाऱ्याचे तोंड अन काम करणाऱ्याचे हात तुम्ही पकडू शकत नाही. आम्ही हाताचा वापर करणारे कामगार. आम्ही शांतपणे काम करतो.

आता बोला! तुम्हाला तोंड दिलंय. पुढं काय.

पाकिस्तानी

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बंगलोर मध्ये IPCA ने अरेंज केलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात आम्ही भाग घेतला होता. आमच्या बूथ वर एक पाकिस्तानी एक उद्योजक व्हिजिटर म्हणून आला होता. त्याचं नाव आता आठवत नाही. झहीर ठेवू. पाकिस्तानचा म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी त्याला बसायला खुर्ची वगैरे दिली. कॉफी मागवली. आणि पाकिस्तानातील औद्योगिक वातावरणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याने त्याच्या उर्दू भाषेत काही गोष्टी सांगितल्या.

"कुठला बिझिनेस अन कसलं काय साहेब. काही वर्षे मी इंग्लंड मध्ये जॉब करून स्वतः च्या देशात काही उद्योग थाटावा म्हणून पाकिस्तानात परत आलो. (EMS) काही लष्करी कॉम्पोनंट सोडले तर मॅन्युफॅक्चरिंग शून्य आहे. आमच्या देशात तुम्हाला जगातल्या उत्तमोत्तम कार्स दिसतील पण त्या डायरेक्ट इंपोर्टेड असतात. असं बेकार वातावरण आहे आमच्या इथे, कोण प्लांट टाकणार. मी इथे प्रदर्शनात आलो आहे. मला तुमचा सगळ्यांचा हेवा वाटतो. किती प्रोग्रेसिव्ह वातावरण आहे. आमच्या इथले सरकार लष्कराच्या हातातले बाहुले आहे. हिंदुस्थान विषय निघाला की त्यांना तुम्ही केलेली प्रगती दिसत नाही फक्त काश्मीर दिसतं." आणि बरंच काही बोलत होता तो.

जाताना म्हणाला "निघताना आपण घरी यायचं निमंत्रण देतो. मी पण देतोय. कधी वेळ आलीच तर मी मेहमाननवाजीत कमी पडणार नाही. पण मला माहित आहे, तुम्ही येऊ शकणार नाही. शेवटी स्वर्गातून नरकात कोण येईल"

त्याच्या हातातला हात सोडवून घेताना मला कसंसंच वाटलं. 

पार्टनर १०

आमच्या एका ट्रेनर ने आम्हाला प्रश्न टाकला. "Tell me five things that you do which create wealth in your organisation".

मी विचार करत बसलो. काही सुधरलं नाही. शेवटी मग पार्टनर वर हा प्रश्न फेकला. पार्टनर म्हणाला दहा मिनिटे दे.

दहा मिनिटानंतर त्याने एक चिठ्ठी सरकवली. आणि त्यात खालील प्रमाणे लिहिलं.

Five things which will create wealth for organisation:

1. Invest in human asset management. Training, challenging conventional wisdom.

2. Work on creating transparent organisation to the best possible extent.

3. Work on processes and systems by which you will achieve customer delight, make suppliers happy and fulfill employees aspirations.      

4. Find innovative work practices and work on continuous improvement in processes.

5. Work on creating an organisation which is socially responsible.

हे वाचल्यावर माझ्या चेहऱ्यावर मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं. ते पाहून पार्टनर म्हणाला "मला माहित होतं, तुला हे सुधारणार नाही. पण कसं आहे मित्रा, तुझी being rich (श्रीमंत) आणि being wealthy (संपन्न/समृद्ध) यामध्ये गल्लत होत आहे. श्रीमंती ही मूर्त असते तर संपन्नता अमूर्त. मुख्य म्हणजे कमावलेली श्रीमंती जर टिकवायची असेल तर माणूस संपन्न असणं गरजेचं आहे. तर मग श्रीमंतीला सुवास येतो. नाहीतर मग stinking rich किंवा filthy rich असं काही जणांच्या श्रीमंतीला संबोधलं जातं."

"तुझ्या मनात जी कामं आली होती ती श्रीमंत (rich) बनण्यासाठी होती. पण कंपनीला संपन्न (wealthy) बनवायचं असेल तर मला वरच्या गोष्टींवर काम करावं लागेल" पार्टनर म्हणाला.

हा पार्टनर जास्त डोक्यावर बसतोय. ह्याच्या बरोबर आता फारकत घ्यावी. खूप बिल झालं. 

क्रेझी इंडियन

आता अमेरिकेत व्हीटेरी नावाचा गृहस्थ भेटला होता. त्याचे प्रोडक्टस त्याला भारतात विकायचे होते. मला म्हणाला, तू विकशील का? मी म्हणालो, मला माझा उद्योग भरपूर आहे. अजून प्रॉडक्ट नाही विकू शकत.

पण त्याला सांगितलं "तीन मेजर इंडस्ट्रीयल सिटी त माझे रिप्रेझेंटेटीव्ह आहेत. मी तुझे प्रॉडक्टस त्यांना विकायला सांगू शकतो. ते माझ्या पे रोल वर नाही आहेत. तुझे प्रॉडक्टस त्यांच्या बास्केट मध्ये आले तर त्यांना फायदा होईल"

व्हीटेरी खुश झाला. म्हणाला "हे डील जमलं तर तुझी कन्सल्टन्सी फी काय आहे ते सांग. मी देईन"

मी म्हणालो "फी वगैरे ची काही गरज नाही. यात सगळेच विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. तुला सेल्स ची माणसं भेटतील, माझ्या मित्रांना प्रॉडक्टस मिळतील धंदा वाढवायला"

तर तो म्हणाला "आणि तुला?"

मी बोललो "मानसिक समाधान. आणि मला माहित आहे, मला याचा फायदा भविष्यात नक्की होईल"

तो म्हणाला "काहीतरीच काय! असं नाही होत कधी"

मी त्याला किस्सा सांगितला

"साल १९९९९. मी तेव्हा बुसाक+शाम्बान ची सिल्स विकायचो. मला सुपर स्टील ने त्यांच्या मिल मध्ये हायड्रोलिक्स मध्ये आमचे सिल्स कसे बसवता येतील ते बघायला बोलावलं. त्यांचे ड्रॉइंग्स बघितल्यावर मला कळलं की त्यांचे हायड्रोलिक्स सिलिंडर आणि पॉवर पॅक चे सप्लायर्स त्यांना फुल लुटत आहेत. मी तिथल्या कदम साहेबाना सांगितलं कि तुमच्या सप्लायर्स ला काही कळत नाही आणि ते तुम्हाला फालतू माल सप्लाय करून लुटत आहेत. कदम म्हणाले, मग आता तूच सप्लायर्स दे. मी त्यांना लिहून दिलं. पॉवर पॅक साठी पुण्याची हैड्रोथर्म आणि सिलिंडर साठी मुंबई ची इंडियन हायड्रोलिक्स आणि फास्ट सिलिंडर्स.

कदम साहेबांनी मला खुश होऊन याबद्दल कन्सल्टन्सी फी ऑफर केली. मी बोललो, सर, मला फी काही नको. तुम्ही जो पर्यंत इथे आहात तो पर्यन्त आर एफ क्यू मध्ये बुसाक शाम्बान चे सील लिहायचे.

फास्ट आणि हायड्रोथर्म दोघांनी मला ऑर्डर मध्ये कमिशन ऑफर केलं. मी म्हणालो, मला कमिशन नको. एक खात्री द्या, की तुम्ही आमचे सिल्स निदान मी असे पर्यंत तुमच्या कंपनीत स्टॅंडर्ड कराल.

१९९९ ते २०१० पर्यंत सुपर स्टील ने या तीन सप्लायर बरोबर कमीत कमी १०० कोटी रुपयांचा बिझिनेस केला.

मला काय मिळालं.? मी २००२ मध्ये सिल्स विकणारी कंपनी सोडली. पण आज ही, म्हणजे १४ वर्षांनंतर तिन्ही कंपन्या आमचे सिल्स वापरत आहे.

सुपर स्टील्स च्या आर एफ क्यू मध्ये आज पण आमचे सिल्स स्पेसिफाय केले जातात.

पुण्याच्या हायड्रोथर्म चा ओनर देशपांडे माझा बिझिनेस मधील mentor आहे.

ठाण्यातील फास्ट सिलिंडर्स चे ओनर मला लहान भाऊ समजायचे.

आणि कदाचित इंडियन हायड्रोलिक्स च्या शुभेच्छा असतील कि माझा बिझिनेस जरा बरा चालू आहे.

या प्रकाराला मी traingular working म्हणतो. आणि सेल्स चं हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. आणि तसंही जगण्याचा core purpose "To exchange knowledge and information to enhance brand "India"" हा आहे."

"आलं का तुझ्या लक्षात मला कन्सल्टिंग फी का नको ते"

हात मिळवून गेला तो. पण नजरेत त्याच्या विचित्र भाव होते. "This man looks to be crazy" असे काहीसे.

मी मनात म्हणालो "आम्ही इंडियन आहोतच असे.......क्रेझी"

सचिन पाठक

काल दिवसभर मनावर एक मळभ साचलं होतं. काय करणार मित्रा, सकाळीच तू गेल्याचा फोन आला. तुला निरोप दिल्यावर चेहऱ्यावर उसनं हसू आणत दिवस ऑफिस मध्ये घालवला. संध्याकाळी घरी आल्यावर नील ने नेहमीप्रमाणे मिठी मारली. मी जरा जास्तच वेळ त्याला धरून ठेवलं होतं. रात्री पोझिटिव्हीटी उधार घेत व्हीटेरी ची पोस्ट टाकली. थोडं धैर्य गोळा केलं आणि झोपलो. मग मात्र तुझं जाणं रंग दाखवायला लागलं.  रात्रभर तळमळत बसलो. तुझ्या जाण्याने अनेक आठवणी फसफसून वर आल्या.

नाही म्हणजे वय वाढत चाललं तसं जवळच्यांचे मृत्यू पचवत चाललो आहे. पण तुझा मात्र चाळिशीतला बाय बाय चटका लावून गेला मित्रा. तसं लौकिकार्थाने आपण गेल्या बारा तेरा वर्षात सात ते आठ वेळाच भेटलो असू. त्या भेटीतल्या मोजक्या गप्पा, आश्वासक हास्य अन एखादी गळाभेट इतकीच काय ती माझ्या जवळची पुंजी. पण तरीही रात्री कळवळलो, अनेकदा. माझ्या अत्यंत आवडत्या कुटुंबावर नियतीने केलेला हा दुसरा घाव मलाही घायाळ करून गेला. मन विदीर्ण झालं.

आमच्यासारखे किती जण असतात, छातीत दुखतं, पाठ दुखते, पाय दुखतात, वर्षभर सर्दी असते. पण तरीही आम्ही असतो, रडत खडत का होईना जगतो. आणि तू त्या आश्वासक हास्याचा मालक, आजारी पडतोस काय आणि आज नसतो काय! सगळंच विचित्र.

हे असं होतं खरं. कार्यबहुल्य, कम्युनिकेशन गॅप असल्या तोंडदेखल्या कारणाने तुझ्याशी घट्ट मैत्री करणं या जन्मात राहिलं यारा. याची चुटपुट मला आता आयुष्यभर लागून राहील.

दोस्ता, तुला मन:पूर्वक श्रद्धांजली

रियल पार्टनर

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



पाकिस्तान

मध्ये एका पोस्टवर एकाने प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तान च्या कस्टमर शी बिझिनेस कराल का? प्राप्त परिस्थितीत अर्थातच "नाही".

पण मेख अशी आहे की पाकिस्तान ने जर आमच्या सारख्या लहान कंपनी बरोबर तिथल्या कंपनीने बिझिनेस रिलेशन्स डेव्हलप करण्याइतका व्यापार उदीम वाढवला असता तर तो देश आज च्या परिस्थितीत आहे, तसा असला असता का?

त्याचं ही उत्तर अर्थात नाहीच.

कर्म कसे करावे हे शिकण्यासाठी धर्म वापरला तर समाजाची, देशाची उन्नती होते. पण धर्माने लोकांना वापरायला सुरुवात केली की त्याचा पाकिस्तान होतो, सीरिया होतो.

धर्माच्या अति आहारी जाणं हे समाजासाठी मारक आहे हे धार्मिक तत्ववाद्यांनी लक्षात ठेवावेच. पण त्या पेक्षा जास्त त्यांच्या अनुयायांनी ध्यानात राहू द्यावे. 

माझा भारत

म्हणजे बघा

केरळची साक्षरता घेऊ यात.

कर्नाटकच्या KSRTC चं अनुकरण सगळ्या राज्यात करू यात.

रेल्वे शताब्दी अन राजधानी सारखी चालवू यात. (आम्हाला नको बुलेट ट्रेन वगैरे)

विमानसेवेला इंडिगो चा मापदंड लावू यात.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात चं उद्योजकतेचं मॉडेल सगळ्या राज्यात राबवू यात.

हरयाणा आणि पंजाब सारखी शेती करू यात.

शिरपूर चं आणि राजेंद्र सिंह यांचं जल संवर्धनाचं मॉडेल रेप्लिकेट करू यात.

चंदिगढ, भुवनेश्वर, जमशेदपूर आणि मैसूर चं टाऊन प्लॅंनिंग आणि स्वच्छता घेऊ यात.

दिल्लीची मेट्रो सगळीकडे चालवू यात.

श्रीनगर आणि नॉर्थ ईस्ट सारखं निसर्गाचं सौन्दर्य जीवापाड जपू यात.

आणि हो,

सोनोग्राफी क्लिनिक मध्ये गर्भनिदान करून मुलीचं येणं तिच्या येण्याआधी सगळे साजरे करू यात

सिंगापूर नको अन शांघाय नको

वरवर दिसणाऱ्या अप्रगत भारतात एक अत्यंत विकसित भारत लपलाय.

त्याच्या वरची साठलेली जळमटं साफ करून एक समृद्ध आयुष्य जगू यात.

म्हणजे, राज्यकर्त्यानो

बघताय ना 

Sunday 18 September 2016

बिझिनेस प्रपोजल

मुकुल शर्मा दिल्लीतील आमच्या क्षेत्रातला एक नावाजलेला बिझीनेसमन. कटिंग टूल ची एजन्सी आहे त्याच्याकडे. दणकेबाज श्रीमंत आहे, मुकुल. एन आर आय स्टेटस आहे. बायको मुलं दुबईत राहतात. हा पंटर येऊन जाऊ असतो. उंची इंपोर्टेड गाड्यांचा त्याला भारी शौक. फोर्ड, निसान च्या एस यु व्ही उडवतो तो दिल्लीत. आणि "I fly business only" ह्याचा त्याला खूप अभिमान पण आहे.

का कोण जाणे, आमच्या स्पिन्डल बिझिनेस मध्ये त्याला खूप इंटरेस्ट. जेव्हा आम्ही तिसरी स्पिन्डल रूम पुढच्या वर्षी दिल्लीला काढणार हे त्याच्या कानावर पडलं आणि तो मला अप्रोच झाला की आपण मिळुन स्पिन्डल रूम काढू. म्हणाला "क्या यार आप एक दो रन निकालते हो. मेरे साथ काम करो, चौके छक्के लगाएंगे". त्याने त्याचं बिझिनेस प्रपोजल मांडलं. ज्या पद्धतीने तो सांगत होता, ते खूप इम्प्रेसिव्ह होतं. तो म्हणाला "आपण पुढच्या दोन महिन्यात स्पिन्डल रूम चालू करू" त्याच्या धडाडीचं मला कौतुक वाटलं. सेटको अमेरिका आता कुणी नवीन शेअर होल्डर घेण्यासाठी राजी नव्हतं. पण मी जेफ ला त्याच्याबद्दल सांगितलं. जेफ पुण्यात आला होता तेव्हा मुकुल स्पेशली त्याला भेटण्यासाठी दिल्लीहून आला. त्याचं बोलणं पाहून जेफ ला माझ्या बोलण्यातील तथ्य कळलं.

जेफच्या पुढच्या व्हिजिट ला दिल्लीला मुकुलच्या ऑफिस मध्ये भेट द्यायचं ठरवलं आणि एकत्र काम करण्यावर डिस्कशन करायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे मी आणि जेफ मुकुल शर्मा च्या ऑफिस मध्ये गेलो. श्रीमंती अशी ओसंडून वाहत होती. त्या ऑफिस मध्ये असलेल्या प्रत्येक गोष्ट कुठल्या देशातून आणली हे मुकुल सांगत होता. ते सगळं कीर्तन ऐकल्यावर आम्ही बिझिनेस बद्दल बोललो. मुकुलचा प्लॅन जबरदस्त होता. त्याचा त्याच्या सेल्स आणि मार्केटिंग स्किल्स बद्दल भलताच आत्मविश्वास होता. जेफ आणि मी सॉलिड इम्प्रेस झालो होतो.

दुपारी दीड वाजता आम्ही मुकुलच्या आलिशान एस यु व्ही मधून जेवायला निघालो. एका गल्लीतून आम्ही मोठ्या रस्त्याला आलो. अन आम्हाला उजवीकडे वळायचं होतं. पण रस्त्यावर सिमेंटचे टेम्पेररी ब्लॉक टाकून मध्ये जाड दोर टाकून रस्ता उजवीकडे वळण्यासाठी बंद होता. साहजिकच डावीकडे वळून यु टर्न मारून आम्ही आम्हाला जिकडे जायचं तिकडे येणार होतो.

मुकुल ने गाडी पुढे घेतली आणि सरळ तो जाड दोर तोडून गाडी उजवीकडे काढली. हे करताना एक वेगळाच बेदरकार पणा मुकुलच्या चेहऱ्यावर होता आणि तो दोर तोडल्यावर एक अभिमान.

दुपारी एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवलो. परत काही फाईन डिटेल्स वर काम केलं आणि पुण्याला येण्यासाठी दिल्ली एअरपोर्ट वर आलो. आल्यावर मी आणि जेफ कॉफी पिताना जेफ म्हणाला "So what do you think Rajesh of Mukuls proposal.? Impressive, isn't it?"

मी जेफ ला म्हणालो "Yes, it is. Though we can't go with MuKul for business"

जेफ ने आश्चर्याने विचारलं "Why so"

मी म्हणालो "I found MuKul quite aggressive while breaking traffic rule. I think this attitude is not good for long term business. We better scrap this proposal"

जेफ म्हणाला '"Rajesh, I echo what you say. With you on this" हे म्हणताना त्याने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.  

थोडक्यात काय तर आडनाव सांगताना चूक केली म्हणून जीएम पोजिशन ला एकाचा ऍप्लिकेशन उडवला तसं  साधा ट्रॅफिक रुल मोडला म्हणून अख्ख बिझिनेस प्रपोजल स्क्रॅप करण्याचं पाप माझ्या अंगावर घेतलं. 

ओंजळ

काही जणांच्या पोस्ट अशा असतात की जणू समुद्र. त्यात विशालता तर असतेच पण खोली ही असते, अर्थाला. अनुभवाचे शिंपले किनाऱ्यावर चमकत असतात.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू शांत तळं. त्या वाचल्यावर काहीच बोलावसं वाटत नाही. तळ्याच्या काठावर बसून नीरव शांतता अनुभवावी तसं ह्या पोस्ट वाचून आपण स्तब्ध होतो. दगड टाकून चुबुक असा आवाज करून तिथली शांतता भंग करावी वाटत नाही.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू एखादी नदी. चांगल्या वाईट गोष्टी कशा सामावून घेते नदी, तसंच बरे वाईट अनुभव घेत जीवनाचा प्रवाह ठरवणारी.

काही पोस्ट मात्र पूर आलेल्या नदीसारख्या बेफाम विध्वंसक असतात. त्यात चीड असते, अन्याय झाल्याची भावना असते.

काही पोस्ट या शेतातून जाणाऱ्या पाण्यासारख्या असतात. त्यात संगीत असतं, नाद असतो.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, जणू डोंगरातून धावत येणाऱ्या पाण्याचा झरा. त्यात आवेग असतो, त्याचे तुषार जेव्हा अंगावर पडतात, मन प्रसन्न होतं. आपण सुखावतो, चेहऱ्यावर आपसूक हास्य उमलतं.

काही जणांच्या पोस्ट मात्र डबक्यासारख्या असतात. साठलेलं पाणी कुजलं असतं. विचारांची घाण साफ केली नसते, आणि मग उग्र दर्प  त्या डबक्यातून येत राहतो.

चॉईस भरपूर आहे. ओंजळ कोणत्या पाण्याने भरायची हे आपण ठरवायचं. 

रेखांश

परतीच्या प्रवासात मी डेट्रॉईट वरून शिकागो ला येत होतो. विमानाची सिटिंग अरेंजमेंट २+३ अशी होती. मी माझ्या सीट वर पोहोचलो तर शेजारच्या सीट वर एक अप्रतिम सौन्दर्य बसलेलं. साधारण ४५-५० ची असावी. इटालियन असावी बहुधा.

मी बसताना गुड मॉर्निंग असं म्हंटलं, ती पण पुटपुटली, खिडकीतून बाहेर बघत राहिली.

 थोडा वेळ गेला. ती सौन्दर्यवती निद्राधीन झाली. अन मी पण स्वर्गवासी झालो.

शिकागो जवळ आलं तसं ती जागी झाली अन मी ही जागा झालो.

विमान लँड झालं अन रनवे काही अंतर गेलं अन अचानक त्या अप्सरेने माझा आर्म रेस्ट वर चा हात धरला आणि ओरडली "Oh my God". तिच्या चेहऱ्यावरचे भीतीदायक भाव बघून मला वाटलं हिला काय खिडकीतून विंग ला आग वगैरे लागलेली दिसली की काय. पण तसं काही नव्हतं.

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती ललना माझ्या खांद्याला धरून परत चित्कारली "Oh my God. I am going to miss my connecting flight"

माझं लक्ष गेलं तिच्या फोन कडे. त्यावर 10:05 अशी वेळ दिसत होती. तिने तिचा बोर्डिंग पास दाखवला त्यावर तिच्या नेक्स्ट फ्लाईट ची वेळ होती 10:30.

मी तिला बोललो "Your phone is on Flight mode. Turn it off" तिने तसं केल्याबरोबर फोनमध्ये 9:05 अशी वेळ दिसू लागली.

शिकागो हे डेट्रॉईट पेक्षा एक तास पुढे आहे. फोन वर टाइम झोन तेव्हाच चेंज होतो जेव्हा तुम्ही नेटवर्क मध्ये असता. सगळा घोळ तिच्या लक्षात आल्यावर खदखदून हसू लागली. चार वेळा थँक्स म्हंटलं तिने मला. ते म्हणताना तिचे दोन्ही हात तिच्याच गालावर होते.

कुणाच्या नशिबात कशामुळे काय होईल हे सांगता येत नाही. पृथ्वीवरच्या रेखांशामुळे असे क्षण आयुष्यात आले हे नवलच नव्हे काय?

तळटीप:

- जर टाइम झोन चेंज चा घोळ माझ्याही लक्षात आला नसता तर तिने पुढे काय केलं असतं हे आठवून आता मला दुःख होतं. नाही तिथे चांगुलपणा दाखवायची सवय आता सोडायला हवी.

- प्रसंग जसाच्या तसा घडला आहे. फक्त ललनेचं वय आणि सौन्दर्याचं परिमाण यात फेरफार होऊ शकतात. मी माझ्या परीने केले आहेत, तुम्ही तुमच्या परीने करू शकता. 

नंदू

नंदकुमार चव्हाण, नंदू म्हणायचो आम्ही त्याला. एस के एफ ला होता माझ्या बरोबर. ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये असायचा. त्याची आणि माझी शिफ्ट सहसा एक असायची. वयाने ७-८ वर्षाने मोठा होता तो माझ्यापेक्षा. काही लोकांशी आपली  मैत्री होताना वयाचं महत्व एका आकड्यापुरतं मर्यादित असतं. नंदूची आणि माझी चटकन मैत्री झाली.  त्याची मेमरी खतरनाक होती. त्या वेळेला काही कॉम्पुटर वगैरे नव्हते. पण स्टोअर्स मधल्या हजारो गोष्टी कुठल्या रॅक मध्ये ठेवल्या आहेत हे त्याला बरोबर लक्षात असायचं. "६२०८ ची ड्रायव्हिंग प्लेट दे रे नंदू" असा आवाज दिला की नंदू ती बरोबर हुडकून द्यायचा.

एस के एफ ला मी अगदीच कोवळा इंजिनिअर होतो. करिअर च्या सुरुवातीला आधार देणारं कुणी असेल तर ते आकार चांगलं घेतं. अशी आधार देणारी अनेक मंडळी होती (आजार देणारी पण होती), नंदू त्या पैकी एक होता. अनुभवी असल्यामुळे त्याला कंपनीची बरीच माहिती होती. लोकं कशी आहेत, कुणाशी कसं वागायचं याचं ज्ञान तो कायम द्यायचा. सेकंड किंवा थर्ड शिफ्ट मध्ये गप्पा मारण्यासाठी आम्हाला सुर्याखालील कुठलाही विषय वर्ज्य नसायचा. वैभवी बरोबर माझं तेव्हा प्रेमप्रकरण चालू होतं. सेकंड शिफ्ट ला तिचा फोन ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये यायचा. नंदू आवाज द्यायचा "डॉक्टर मॅडम चा फोन आला रे".

पुढे १९९४ साली मी एस के एफ  घेऊन सोडली आणि नंदूने व्ही आर एस घेऊन १९९८ साली. नंदू ने एस के एफ का सोडली हे एक मला न उलगडलेलं कोडं आहे. म्हणजे त्याचं तेव्हा वयही जास्त नव्हतं आणि कंपनीतले लोकं ही त्याच्या कामावर खुश असावेत.

काही वर्षांनी तो माझ्याकडे जॉब साठी अप्रोच झाला, पण तेव्हा माझ्याकडे जागा नव्हती. मग त्याने बहुधा मिळेल ती नोकरी केली.

२००६ की ७ ला माझ्याकडे नंदू फिट होईल अशी जागा तयार झाली. मी त्याला निरोप पाठवला. आणि नंदू आमच्याकडे जॉईन झाला. कामात तो पद्धतशीर होता. समरासतेने काम करायचा. कंपनीची पार्टी वगैरे असेल तर त्याच्या उत्साहाला उधाण यायचं. सगळं चांगलं चालू होतं, तर नंदूला हृदय विकाराचं निदान झालं. त्याची कुठली वाहिनी ब्लॉक झाली होती.

इ एस आय च्या थ्रू त्याची अँजिओ प्लास्टी झाली आणि यथावकाश तो कंपनीत जॉईन झाला. पूर्वीचा जोश त्याच्यात नव्हता आणि आम्हीही त्याला जपूनच कामं सांगायचो.

नंदू ९:३० ते ९:४५ ला वाघेला बरोबर कंपनीत यायचा अन त्याच्या बरोबर निघायचा. त्याने मग एक हिरो होंडा विकत घेतली. कंपनीची वेळ ८:३० होती. ती पाळण्यासाठी त्याने बाईक घेतली असावी असा माझा अंदाज आहे. पण तरीही तब्येतीपायी त्याच्या खूप सुट्ट्या होऊ लागल्या. बाईक घेतली तरी वेळ पाळणं त्याला जमत नसे. जॉब करणं त्याला अवघड जात होतं पण कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला सोडता पण येत नव्हता.

एके दिवशी संध्याकाळी आम्ही हार्ट टू हार्ट बोलत बसलो होतो. मी त्याला म्हणालो "नंदू, तब्येत बरी नसून तू किती कष्ट करतोस. गुरुवार पेठेतून नांदेड फाट्याला यायचं, परत जायचं. दिवसभर काम करायचं. कशाला इतका जीवाला त्रास करून घेतोस. तुझी इच्छा असेल तर मी गावात तुझ्यासाठी जरा लाईट जॉब बघतो. विचार कर तू" निरोप घेऊन तो गेला.

दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला. "काल रात्री नंदू सिव्हिअर हार्ट ऍटॅक ने गेला"

तेव्हापासून मला टोचणी लागली आहे की आदल्या दिवशीच्या बोलण्याचा अर्थ मी इंडायरेक्टली जॉब सोडायला सांगतोय असा नंदूने घेतला की काय?

आज सहा वर्षे झाली या घटनेला. दोनदा प्रायश्चित पण घेतलं मी. पण आजही ती नंदू बरोबर ची संध्याकाळ आठवली की मी सैरभैर होतो.