Thursday 30 April 2020

न्यूमरॉलॉजी

न्यूमरॉलॉजी वर फारसा काही विश्वास नाही पण जेव्हा कधी त्याचा विषय निघतो, मला वाटतं की २ आणि ४ या आकड्यांशी माझं फार सख्य आहे. म्हणजे बघा माझा वाढदिवस २४, बायकोचा आणि भावाचा ४, यश चा २, नील चा ११ म्हणजे १+१=२, चुलत भावाचा १३ म्हणजे ४, चुलत बहिणीचा २४, भावाच्या बायकोचा २४, तर बिझिनेस पार्टनरचा २२. माझं पहिलं घर चौथ्या मजल्यावर तर आताचं राहतं घराचा नंबर १३ म्हणजे ४. माझा मोबाईल नंबर आहे xx२२४x ४२x४.

२०१९ साल आमच्यासाठी डेंजर गेलं. ७ जुलै २०१९ ला आमचे चार साथीदार एका अपघातात आम्हाला सोडून गेले.

२०१९ संपताना आम्ही टीम मेट्स गप्पा मारत होतो. पण परत न्यूमरॉलॉजी चा विषय निघाला. मी त्यांना म्हणालो माझ्या साठी २ आणि चार हे आकडे लकी आहेत. तेव्हा २०२० हे आपल्याला भन्नाट जाणार. सगळ्यांनी एकमेकांना हाय फाय दिला.

वर्षाची सुरुवात ठीकठाक झाली. पण फेब्रुवारी मध्ये आम्ही नवीन जागेत शिफ्ट झालो. आणि मार्च महिन्याच्या मिटिंग मध्ये खूप भारी स्वप्नं रंगवली. आणि मार्च २२ ला लक्षात आलं की कंपनी तात्पुरती बंद करावी लागणार. आणि एप्रिल महिना (४) तर भयानक गेला. लॉक डाऊन एक्सटेन्ड झालं, आणि महिना संपता संपता या दोन लोकांची बातमी, इरफान खान आणि ऋषी कपूर. अजून काय वाढून ठेवलं आहे उरलेल्या वर्षात देव जाणे.

आता परत कधी मी २ आणि ४ हे आकडे माझ्यासाठी लकी आहेत अशी फुशारकी मारणार नाही. 

Tuesday 28 April 2020

डी ऍक्टिव्हेट

चार एक वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा अकौंट डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा पार अगदी इमोशनल वगैरे पोस्ट टाकली होती. आज ती पोस्ट वाचली तेव्हा हसू येतं. डी ऍक्टिव्हेट चं टॅब दाबताना पार अगदी शेवटल्या सिगारेटचं थोटूक ज्या भावनेने फेकतो तसं झालं होतं. नंतर मग सवय लागत गेली डी ऍक्टिव्हेट करण्याची आणि परत ऍक्टिव्हेट करण्याची. आणि हा काळ अगदी एक आठवड्यापासून ते दोन-अडीच महिन्यापर्यंत आहे. पूर्वी लोकसुद्धा वेलकम बॅक वगैरे म्हणून स्वागत करायचे. आता कुणी ते पण म्हणत नाही. आली परत कटकट असं कुणी म्हणत असावेत कदाचित. पण आता ती एक एसओपी झाली आहे. ज्या भावनेने पोस्ट करतो त्याच भावनेने डी ऍक्टिव्हेट पण करतो.

अधून मधून डी ऍक्टिव्हेट होण्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे, हा लॉक डाऊन पिरियड सोडून द्या, पण दिवसात दीड एक तास फेसबुकवर व्यतीत केला जातो. (माझ्या बऱ्याच नातेवाईकांना मी चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो असं वाटतं). जेव्हा मी पहिल्यांदा डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फेसबुक डी ऍक्टिव्हेट केल्यावर सुद्धा कुठल्यातरी दुसऱ्या कामात अडकलेला असतो. आता या लॉक डाऊन मध्ये सुद्धा मी एक आठवडा डी ऍक्टिव्हेट होतो आणि त्या काळात मी अनेक इतर कामं केली. म्हणजे थोडक्यात फेसबुकवर जो वेळ जातो तो दुसऱ्या कशाला कमी प्रायोरिटी दिल्यामुळे काढता येतो. ज्या वेळेस म्हणून असं लक्षात येतं की आता फेसबुकपेक्षा फार महत्वाची कामं नाही आहेत तेव्हा मग मी परत येतो.

दुसरं म्हणजे मी जे लिहितो ते बहुतांशी स्वानुभवावर आधारित असतं. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात जर काही घडलं की ज्यामुळे मी लो फील करत आहे तेव्हा मला फेसबुकवर यायला आवडत नाही. कारण माझ्याकडे शेअर करण्यासाठी मालमसाला नसतो. त्यामुळे मी इथे फेसबुकवर आनंद मिळवायला वगैरे येत नाही तर माझी मन:स्थिती जेव्हा आनंदी असेल तेव्हा येतो. सहसा इथे काहीही फालतू चालू असेल तरी त्याचा स्वतःवर सहसा परिणाम करून घेत नाही, मग ते राजकारण असो, धार्मिक/जातीय वाद असो वा ट्रेंड असो. डी ऍक्टिव्हेट असताना जर काही शेअर करण्याजोगं घडलं तर मी ब्लॉग वर लिहून ठेवतो आणि परत आल्यावर शेअर करतो.

आता शेवटचा प्रश्न उरतो ते अकौंट लॉग आऊट करून ठेवता येत नाही का? इथे मात्र माझी सपशेल हार आहे. म्हणजे ते काही लोकांना नॉन व्हेज बंद करण्यासाठी श्रावण महिना लागतो तसं मला फेसबुकवर न येण्यासाठी डी ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले उदय जोशी सर किंवा डॉ देशपांडे कसे डी ऍक्टिव्हेट न होऊनही फेसबुकवर येत नाही, ते अजून जमलं नाही.

कुणास ठाऊक काही वर्षाने ते ही जमेल आणि तेव्हा परत ही पोस्ट वाचताना मला हसू येईल. 

कृतीशील निर्णय

तसं पाहिलं तर मी कमालीचा भित्रा माणूस. आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसं काही विचित्र घडलं की माझी विचारधारा मृत्युपाशी जाऊन थांबते. पण असला भित्रा स्वभाव असला तरी कृती करायची म्हंटली की ही भीती पळून जाते. करोना चं नाटक चालू झालं तेव्हा मी कंपनीत सांगितलं की " हा व्हायरस आला आहे आणि आपल्या हातात फक्त त्यापासून सावधान राहणं आहे आणि आपल्यामुळे तो दुसऱ्याला होणार नाही हे बघणं आहे. त्यामुळे भीती आहे पण घाबरून काम करणं बंद वगैरे असं करू नका तर त्या भीतीवर मात करण्यासाठी काही कृती शोधा आणि कृतिशील रहा." अर्थात बहुतेकांना ते पटलं नाहीच, काहींनी पटल्यासारखं दाखवलं पण कृती शून्य. अर्थात मला कुणाला कमी लेखायचं नाही आहे कारण या आजाराची व्याप्ती मोठी आहे. तेव्हा हा संदर्भ घेऊन मी  लिहिणार त्यावर विचार नक्की व्हावा असं माझं आवाहन आहे.

व्हायरस जेव्हा आला तेव्हा मी काळजी काय घ्यायची हे लोकांना सांगितलं आणि त्यांना हे ही सांगितलं की लागलं तर मी त्यांची कंपनीत राहायची व्यवस्था करेन. सगळ्यांनी मनातून तो उपाय उडवून लावला. गंमत म्हणजे कंपनी चालू करण्यासाठी शासनाने जी नियमावली आणली, जी प्रत्येकाला प्रत्यक्षात आणायला अवघड आहे, त्यात हा एक नियम आहे की कंपनीने शक्य झाल्यास लोकांची कंपनीत राहायची व्यवस्था करावी.

तो व्हायरस, त्याची काम करण्याची पद्धत लक्षात आल्यावर मी मनातून घाबरलो असलो तरी लॉक डाऊन मध्ये जेव्हा कधी म्हणून गरज म्हणून काम करायची वेळ आली तेव्हा सर्व काळजी घेऊन बाहेर पडलो. हे कुणाला आततायीपणाचं वाटेल. पण चार दिवस आपलं घरच्या अन्नदान कार्यक्रमासाठी, त्यांनतर तीन दिवस कंपनी चालू करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी (हा एक पोस्टचा विषय आहे), मग कंपनीतील अर्जंट काम संपवण्यासाठी दहा दिवस अन त्याबरोबर आपलं घर बरोबर ग्रोसरी किट्स वाटण्यासाठी. या दिवसात एक दिवस त्या नॉन करोना पेशंटला लिफ्ट पण दिली.

जरी घाबरट असलो तरी मी विचार केला:

- जी काही कामं आली  ती "अबाऊव्ह सेल्फ" अशा प्रकारची होती. कारण या कुठल्याही कामात माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता.

- व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मेडिकल स्टाफ काळजी घेतोय आणि दररोज कामावर जातोय तर आपण योग्य ती काळजी घेऊन काम का नाही करू शकत?

- ज्या लोकांची इम्यून सिस्टम चांगली आहे त्यांना हा व्हायरस त्रास देत नाही आणि इम्यून सिस्टम चांगले असण्याचे निकष गेली अनेक वर्षे पाळतो आहे.

- जरी संसर्ग झाला तरी पेशंटचं बरं होण्याचं प्रमाण हे ८५% आहे. मग आपण त्या ८५% असू अशी आशा बाळगण्यात काय चूक आहे.

या विचारांनी माझ्या भीतीवर मात केली अन काम केलं.

हातातली कामं उरकली म्हणून परत गेले चार दिवस लॉक डाऊन मध्ये आहे. पण महत्वाचं काम आलं तर परत कामाला बाहेर जाईल.

भीती जर आपल्याला निष्क्रिय बनवत असेल तर ती विजयी होईल, पण मनातील भीतीमुळे जर आपण काही कृतीशील निर्णय घेत असू अन तिची अंमलबजावणी करत असू तर भीतीवर आपण विजय मिळवू.

मी दुसरा पर्याय निवडला.

(यांनंतरही जर मला करोनाचा संसर्ग झालाच तर आला मोठा दीडशहाणा अशी भावना जर तुमच्या मनात आली तर माझा नाईलाज आहे.)



Monday 27 April 2020

सरकारी जॉब

डिप्लोमा होताना वडील सारखे म्हणायचे की हे संपलं की  मएसईबी मध्ये जनरेशन ला लावून टाकतो. कसाबसा मला डिप्लोमा ला फर्स्ट क्लास मिळाला आणि आईबाबांच्या मनात मला बीई करण्याचं आलं आणि सांपत्तिक स्थिती फार चांगली नसताना त्याकाळी नवखं असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेज मधून बीई झालो. तेव्हाही बाबांच्या मनात होतं की मी एमएसईबी मध्ये जनरेशन ला जॉईन व्हावं. पण माझ्या डोक्यात "करेन तर प्रायव्हेट नोकरी" हे खूळ कुठून डोक्यात आलं हे मला आजपर्यंत उमगलं नाही आहे. आणि तो पगडा इतका की माझा मित्र मंगेश पाठक केंद्र सरकारच्या सी आय आर टी या डिपार्टमेंट ला लागला तेव्हा मी त्याला ही सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरी कर असा न मागता बिनकामाचा सल्ला द्यायचो. 

पुढे ज्या पद्धतीने मंगेशची सी आय आर टी मध्ये कारकीर्द फुलत गेली, त्याने मला त्याचा अभिमान तर वाटतोच पण आज पन्नाशीत जेव्हा मी माझ्या वागणुकीचा विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. शासकीय नोकरीला कमी लेखण्याची माझी विचारधारा किती तकलादू होती हे आज प्रकर्षाने जाणवतं. 

प्रायव्हेट जॉब आणि सरकारी जॉब याची तुलना करताना काय गमावलं आणि काय कमावलं याची जर गोळाबेरीज केली तर उत्तरात फार तफावत येत नाही. किंबहुना मूर्त आणि अमूर्त गोष्टींचा विचार केला तर चिमूटभर श्रीमंतीच्या बदल्यात मूठभर मेंदूची शांतता आणि दोन हाताच्या कवेत मावतील इतके आयुष्याचे सुनहरे क्षण मी मिस केले असं बऱ्याचदा वाटतं.  प्रायव्हेट जॉब आणि पर्यायाने मी व्यावसायिक झालो पण या प्रवासात मी जे टक्के टोणपे खाल्ले, धोके पत्करले ते सरकारी नोकरीत करावे लागले असतेच असं वाटत नाही. 

याबाबत माझं आणि माझा मित्र संतोष देशपांडे यांची नेहमी चर्चा होते. बी एस एन एल मध्ये चौतीस वर्षे नोकरी करून त्याने नुकतीच व्ही आर एस घेतली. त्याला माझ्या धंद्याबद्दल फार अप्रूप आणि कौतुकही. खुल्या मनाने तो बोलून पण दाखवतो. पण जेव्हा माझे टेन्शन्स आणि आडवेतिडवे ट्रॅव्हल प्लॅन बघून काळजी पण व्यक्त करतो. आणि असंही म्हणतो की आम्ही एकमेकांचे रोल चेंज केले तरी तितक्याच सहजतेने स्वीकारले पण असते. सरते शेवटी आम्ही दोघेही एकच निष्कर्ष काढतो, जे आयुष्य आपण निवडलं आहे त्याचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे. ते इमानेइतबारे जगावं, एन्जॉय करावं. एकमेकांना चिअर्स करत पेग संपवतो आणि तो त्याच्या मार्गाला जातो अन मी माझ्या. 

Friday 24 April 2020

सापेक्षता

टाटा या ग्रुप बद्दल माझ्या मनात तीव्र आदर आहे. त्यांनी देशात आणलेली औद्योगिक परिवर्तन. टाटा एअरलाईन्स, (जी नंतर एअर इंडिया झाली), टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टीसीएस, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्या त्यांनी चालू केल्या आणि नावारूपाला आणल्या. टी आय एस एस, आय आय एस सी सारख्या संस्था चालू केल्या. टाटा ट्रस्ट तर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली. जे आर डी टाटा यांचा फोटो आमच्या शॉप फ्लोअर ला लावला आहे. जर मी टाटा च्या कुठल्याही कंपनीत लागलो असतो तर एक लॉयल एम्प्लॉयी म्हणून नाव काढलं असतं.

पण असं असलं तरी ते तसे आहेत म्हणून मी त्यांचे प्रॉडक्टस विकत घेईल याची शाश्वती नाही. किंबहुना माझ्याकडे टाटा ची कुठलीही कार नाही आहे आणि ना मी तिचं फारसं कधी कौतुक केलं आहे. टाटा ग्रुप ची कंपनी म्हणून मी फक्त विस्तारा ने प्रवास करेल असा पण सुद्धा कधी केला नाही. अगदीच नाही म्हणायला आम्ही अशात टीसीएस ची इऑन नावाची इआरपी वापरतो, पण ती टाटा ग्रुप ची आहे म्हणून नव्हे तर तिची उपयुक्तता सिद्ध झाली, त्यामुळे वापरतो. टाटा नॅनो न चालण्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तिची क्वालिटी आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली नसावी असा एक माझा अंदाज आहे. पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहायचा योग फार कधी आला नाही, पण जेव्हा आला तेव्हा राहील तर इंडियन हॉटेल्स मध्येच असं कधी ठरवलं नाही. याचं कारण माझ्या सापेक्ष त्यांच्या प्रॉडक्टस किंवा सर्व्हिसेस ची क्वालिटी आणि रेट हे मला इम्प्रेस करू शकले नसावे.

कुणाचं चांगलं वागणं हे हे त्यांनी दिलेल्या प्रॉडक्ट क्वालिटी ला ऑप्शन असू शकत नाही.

आमच्या बिझिनेस मध्ये आम्ही भरपूर गोष्टी कस्टमर बरोबर शेअर करतो. आणि माझे किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर चे त्यांच्या बरोबर अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तरीही काही मोजके कस्टमर आमच्याकडे आजकाल काम पाठवत नाही. आमचा एक सेमिनार आहे "व्हाय डू स्पिंडल्स फेल अँड हाऊ टू प्रिव्हेंट इट". आमच्या बिझिनेस च्या रिलेटेड आम्ही खूप गोष्टी सांगतो. हेच कस्टमर तिथं कौतुक करतात, टाळ्या वाजवतात पण बिझिनेस देत नाही. कदाचित आमची क्वालिटी, रेट किंवा आफ्टर सेल्स ग्राहकाला पटत नसावी.

इतकं काय पण इथं मी फेसबुकवर वेगवेगळे अनुभव शेअर करतो. माझ्या जवळच्या लोकांना माहित असतात ते. पण मला लोकांनी त्या गोष्टीमुळे स्वीकारावं असं जर मनात ठेवलं तर तसं प्रत्यक्षात होत नाही. त्यांना स्वतःच्या अपेक्षा असतात, त्यांची जर पूर्तता केली नाही तर ते सरळ बाय करतात. लोकांच्या गुड बुक्स मध्ये रहावं या उद्देशाने जर वागणं ठेवलं तर पदरात काही पडत नाही.

त्यामुळे तुमचं चांगलं वागणं, लोकांना मदत करणं हे आपल्या जागी ठीक. ते तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करता हा भाव हवा. जर दुसऱ्यासाठी करतो आणि म्हणून दुसर्यांनी मला स्वीकारलं पाहिजे असा भाव ठेवला तर निराशा वाट्याला येते.

त्यामुळे सापेक्षता हा सिद्धांत भौतिकशास्त्रातच नव्हे तर भौतिक जगण्यात सुद्धा चपखल लागू होतो.
  

Thursday 23 April 2020

चीन

ज्या देशांनी चीन मध्ये खूप गुंतवणूक केली आहे, ते देश चीन मधून पाय काढता घेण्याच्या विचारात आहे, आणि उत्पादन करण्यासाठी ते नवीन देश शोधत आहेत अशा खूप बातम्या धडकत आहेत. भारताला या बाबतीत नक्कीच संधी आहे. आणि का नसावी? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, शिक्षित तरुणाई उपलब्ध आहे, आपली अकौंटिंग पद्धत जगमान्य आहे आणि बँकिंग पद्धत ही तगडी आहे, आपलं कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्ल्ड क्लास आहे, लेबर कॉस्ट ही चीनच्या १/३ आहे.

तरीही आपण सध्याच्या परिस्थितीत जगाचा उत्पादक म्हणून चीनला सशक्त पर्याय होऊ शकतो का यावर प्रश्नचिन्ह उभं रहावं अशी परिस्थिती आहे. 

साम्यवादी देश आणि अन एथिकल वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार असली तरी चीनने गेल्या तीन दशकात एक उत्पादक म्हणून प्रचंड मुसंडी मारली आहे. आणि त्याला पर्याय म्हणून भारतच नव्हे तर इतर कुठल्याही देशाला उभं राहणं ही अशक्य नसली तरी प्रचंड अवघड बाब आहे. अगदी भारताचा विचार केला तर तब्बल ८७ बिलियन डॉलर्स चा द्विपक्ष व्यापार आहे, त्यापैकी ७० बिलियन डॉलर्सच्या गोष्टी आपण चीन कडून विकत घेतो जे आपल्या एकूण आयातीच्या १३.७% आहे. भारतात इतर देशातून आयात केलेल्या गोष्टीत काही चायनीज प्रॉडक्टस असतात. एकूण गोळाबेरीज करता वार्षिक १५० बिलियन डॉलर्सच्या आसपास आपण चायनीज प्रॉडक्टस आयात करत असू. आणि यात मोबाईल फोन्स, व्हाईट गुड्स, सॉफ्ट टॉईज, ऑटो पार्ट्स, पॉवर जनरेशन इक्विपमेंट, फार्मा मटेरियल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याला पर्याय उभा करायचा असेल तर ही एखाद दोन वर्षाची बाब नसून पुढचं पूर्ण दशक भारताने अनेक पातळीवर बाब केलं तर ते होण्याची शक्यता असेल. 

जेव्हा कधी म्हणून चीन ने भारताच्या विरुद्ध कुरापत केली की देशभक्तीचा पूर ओसंडून वाहतो. यावेळेस तर भारतच नव्हे तर पूर्ण जगात चीनच्या विरुद्ध वातावरण तयार झालं आहे. पण असं असलं तरी चीनने आपले पाय अनेक देशात भक्कम पणे नसले तरी पसरले आहेत. नुकतं पीपल बँक ऑफ चायना ने एच डी एफ सी मध्ये १. ७५ कोटी शेअर्स घेतल्यावर आरडाओरड झाली. पण जी एम जी हेक्टर गाडी आपण कौतुकाने मिरवतो ती चायनीज कंपनी आहे आणि तिने भारतात रु ५००० कोटी ची इन्व्हेस्टमेंट केली आहे. चीनमधल्या ऑटो कंपनीने, तळेगाव स्थित जी एम प्लांट विकत घेतला आहे. ज्या झूम ची सध्या हवा आहे तिचा फाउंडर जरी अमेरिकन नागरिक असला तरी तो चायनीज आहे.

"जगासाठी उत्पादक देश" ही बिरुदावली मिरवणं हे अभिमान वाटण्याजोगं आहेच पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. देशाच्या तिन्ही घटकांनी स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. आणि ते तीन घटक म्हणजे वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि देश/शासनाच्या पातळीवर हे बदल आवश्यक आहेत.

वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर देशातील प्रत्येक माणसाने विचार करण्याच्या पद्धतीत बदल आणणं गरजेचं आहे. "मी" "माझा" या  पलीकडे विचार, गुणवत्तेची पातळी आणि वैयक्तिक उत्पादकता अनेक पटीने वाढवणे ही येणाऱ्या काळाची गरज असणार आहे. आणि या गोष्टींबरोबर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली अंगीकारली तर ह्या येणाऱ्या संधीचं सोनं करत देशाचा सर्वांगीण विकास होण्यात हातभार लावण्याची संधी प्रत्येक भारतीयाला मिळेल यात काही शंका नाही.

एकेकाळी उद्योजकतेचं माहेर असणाऱ्या या देशाच्या समाजाची आजची संरचना मात्र आज उद्योगपूरक आणि नावीन्यतेचा ध्यास धरणारी नाही आहे. इतिहासाच्या बाष्कळ प्रेमात बुडलेला आणि धार्मिक व जातीयवादात अडकलेला हा समाज नाविन्यपूर्ण कल्पनेचा उदोउदो करत नाही. आणि एखादी कल्पना अपयशी ठरली तर तिच्या निर्मात्याला आपण गुन्हेगार समजतो. धोका पत्करणे, त्याला काउंटर करण्यासाठी प्लॅनिंग करणे आणि सरतेशेवटी धोका घेऊन मारलेल्या उडीतून सही सलामत बाहेर पडणे या प्रोसेस ला समाज शहाणपण म्हणून स्वीकारत नाही. तर दुसऱ्या बाजूला माझ्यासारखे एस एम इ उद्योजक सुद्धा जगाच्या दृष्टीने आपल्या देशाचा ब्रँड हा स्वीकारार्ह नाही हे लक्षात घेत नाही आणि तो करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलत नाही.

आणि सरतेशेवटी एक देश म्हणून उद्योजकतेला प्रमोट करण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसाय पूरक देश म्हणून गेल्या काही वर्षात आपण जबरदस्त प्रगती केली आहे. इंडेक्स च्या लिस्ट वर १३० च्या आसपास असणारा आपला देश ६३ वर येऊन पोहोचला आहे. पण चीन सारखी अद्भुत उत्पादकता आणायची असेल तर व्यवसाय पूरकता अजून वाढवायला हवी. छोटे इंडस्ट्रियल पार्क्स, फायनान्स ची उपलब्धता, कस्टम्स आणि इतर टॅक्स स्ट्रक्चर, डिजिटल डिव्हाइड कमी करणे या क्षेत्रात प्रचंड सुधारणा अपेक्षित आहे. या करून व्हायरस प्रकरणात ज्या पद्धतीने व्यावसायिकांना इंस्ट्रक्शन्स देण्यात आल्या त्या अनाकलनीय होत्या. शासनाने उद्योगाला सहकारी म्हणून बरोबर घ्यावं लागणार आहे. मनुष्यबळ विकास आणि शिक्षण या दोन्ही मंत्रालयाला गृह किंवा संरक्षण मिनिस्ट्री इतकं महत्व असणं ही भविष्याची गरज आहे.

थोडक्यात उद्योजकतेच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांनी, म्हणजे वैयक्तिक/सामाजिक/राष्ट्रीय, आपल्या स्किलसेट्स ला धार लावण्याची गरज आहे. मागे सुद्धा मोबाईल फोन उत्पादन करण्याचा मोठा ड्राइव्ह आला होता. पण कार्बन किंवा मायक्रोमॅक्स चं निशाण फार जोमाने फडकताना दिसत नाही. किंवा तो १००० रु चा मोबाईल वाला पण गायब झाला आहे.

संधी दाराशी आली आहे. आणि त्याबद्दल आशावादी असावं अशी जागतिक परिस्थिती पण आहे. तिचं सोनं करण्यासाठी सनातनी काम करण्याच्या पद्धती, रुढात्मक विश्वास आणि तथाकथित शहाणपणा याला तिलांजली देऊन एक नवीन भारताची चळवळ उभारावी लागेल. अन्यथा ही चीन विरोधी लाट एक बुडबुडा म्हणून विरून जाईल आणि दोन वर्षानंतर परत आपले लोक काही पैसे वाचतात म्हणून घरं सजवण्यासाठी चीन वरून फर्निचर कंटेनर भरून आयात करतील.












Wednesday 22 April 2020

Revised

A lot has been discussed about the countries who had invested significantly in China now planning to move out and shift their manufacturing units in other countries.  Among the top contenders, India is a prime choice and rightly so. India is the largest democratic country in the world, the average age being just 26. The youth is definitely talented, our accounting practices are accepted worldwide and we have robust banking system. We have a fairly good communication infrastructure, our labour cost is still less than that  of China and we practice  of frugal work habits..

 Having said all this, we need to analyse , strategies and have a definitive road map  to shoulder this responsibility. China has maintained  the top  position   for close to three decades and practically is the  super power of the world. China has certainly eradicated poverty of major section of society, in spite  of being a Communist country,  not to mention the unethical work practices

It would be a tough task, though not impossible for all countries to replace China as a major supplier to the world. If we consider only India its bilateral trade is close $ 87 Bn. Out of which China exports $70 Bn worth goods to India which is close 13.7% of total imports. Can we simply stop that and develop products indigenous? Other than this the products which are imported from other countries carry some or the other Chinese sub assembly or part. In short directly or indirectly we must be importing more than $150 Bn worth of Chinese goods. And these imports are in varied range of products like soft toys, sports goods, white goods, automobile parts, pharma sector, solar panels, household items, mobile phones etc

Our patriotic emotions surge everytime  China does something against the interest of India, We demand the Chinese products be banned. Remember the incidents of China helping Pakistan few years ago, or their skirmish  with Indian soldiers on North East border? This time emotional quotient against China is very high all across the globe .

It is practically impossible to immediately stop trade with China,  and create supply chain as alternative to it. Most of the Chinese companies have globally set up their establishments .There was an uproar when The People Bank of China bought 1.75 Crores of shares of HDFC. But we should not forget that MG Hector is Chinese company who invested Rs 5000 crores in India. The car is a matter of pride and a status symbol among people who have bought it. Clearly the emotions are misplaced and we are giving out confused signals.  Another Chinese company has already bought the  Talegaon GM plant at an undisclosed amount. Zoom, the app, which , nowadays has become very popular, to hold all our video meetings,  is founded by Eric Yuan, a Chinese, now an American and Chinese nationalilty

I think it is a mammoth task. We need to work on the fundamentals and different verticals as individuals, as a Society and at the national/government level. All this would require radical changes. Given to understand the scale of opportunities it would be worth bringing about the changes.

As individuals, we need to evolve as better citizens and think for the betterment of the society and the Nation, above everything. We need to inculcate the qualities of higher ethics, quality standards, higher productivity and make excellence a necessity. But the fact is that majority of us are far behind the average standard of world on these aspects Along with a strong set of values. we can certainly contribute in accelerating growth and capturing this new envisaged opportunity.

Once known as a very entrepreneurial society, we now rarely encourage innovation or even failures. We discard people, not their ideas leading to a complete dearth of new ideas. We find it difficult leaving our comfort zones.  The ideas which  worth pursuing should be propelled in to scalability. And there would be failures. As a society, are we going to stop looking at failures as crime.? One can list hundred of Chinese companies whose individual production numbers are equivalent to India's national production. We need to have a better social eco system to take risk, mitigate risk and eventually de risk it. Business owners, particularly SME segment, should work on improving brand value of our country .India as a country is not yet very trusted brand for deliverance.

Our government can be more proactive towards  business owners. India has progressed extremely well on ease of doing business from the rank of at 130, today we stand at 63. Is that enough to capture the opportunity? SMEs who contribute 45% of total GDP and 40% of total exports are at dismay of receiving support on various aspects. Small industrial parks, quick availability of finance, easing out customs procedures are few of the areas of improvements. The rules regulations and procedures can be more user friendly. This will encourage a lot of people to become entrepreneurs. The Govt could also guide businessmen to choose the right country as business partners. China, better known as dragon, is already spreading its voracious legs in India. In the process of curbing imports from China, it should not happen that Indian soil is used by Chinese companies and bring their unethical work practices.

As individuals/society/government, we should  sharpen our skills  to grab this opportunity. We have lost quite a few opportunities earlier.A few start -ups did well, however could not sustain,. We need to evaluate where things went wrong and execute  remedial actions. Our H,R  and education ministry should become more proactive and people friendly.

I strongly believe that we as a nation  the country need  to challenge conventional work practices, beliefs and wisdom across pyramid of country. Else our patriotism will be restricted to sporadic events.

As I conclude, I wish to state that I am definitely optimistic and do believe that we are capable of becoming a globally acknowledged country for international business.

Tuesday 21 April 2020

Are we ready to capture opportunity?

A lot has been talked about countries who invested heavily in China are planning to move out of China and they are looking for different lands to set their manufacturing units. Out of few countries, India is certainly top contender. And why not? Finally, India is the largest democratic country in the world, it has got young talent available in ample, our accounting practices are accepted world wide and we have robust banking system, we have fairly good communication infrastructure, our labor cost is still 1/3rd of China and we are habitual of frugal work practices.

Having said all this, are we ready as country to shoulder this responsibility of being manufacturing hub of rest of the world? Indeed, China has carried this tag for close to three decades and practically became super power of the world. Keeping aside China's image being communist country, it has certainly eradicated poverty of major section of society.

At large its really tough task to replace China as a supplier to the world. And this is true not only for India but rest of the countries as well. If we take case of India alone, its bilateral trade is close $ 87 Bn. Out of which China exports $70 Bn worth goods to India which is close 13.7% of total imports. Can we simply stop that and develop products indigenous? Other than this the products which are imported from other countries carry some or the other Chinese sub assembly or part. In short directly or indirectly we must be importing more than $150 Bn worth of Chinese goods. And these imports are in varied range of products like soft toys, sports goods, white goods, automobile parts, pharma sector, solar panels, household items, mobile phones etc

Whenever, China did something wrong against the interest of India, there was wave of patriotism in India of banning Chinese products. It did happen when China helped Pakistan few years back or they fought with Indian soldiers on North East border. This time emotional quotient against China is very high not only in India but across world. But is it really possible stop getting Chinese products and create supply chain as alternative to it. Another fact is that Chinese companies have already set up their establishments not only in India but across world. There was lot of hue and cry when The People Bank of China bought 1.75 Crores of shares of HDFC. But we should not forget that MG Hector is Chinese company who invested Rs 5000 crores in India and many of our friends have bought its car as a matter of pride. Another Chinese company have already bought Talegaon GM plant at undisclosed amount. Zoom on which we are holding our meeting these days is promoted by Chinese, though he is American national today,

As per me, its a mammoth task. And probably as a country we need to work on fundamentals. We need to change working pattern at all three levels. One is of course at individual level, other is at society level and third at national or government level.

If we talk about individual level, every Indian needs to change its thinking pattern. He or she should be obsessed by only thought of eradicating poverty of our country and one should consider him/herself as a soldier on this mission. Thinking above self, passion for deliverance of quality product and exhibiting very high productivity are the essential ingredients of individual personality. And most of the working class is far behind the average standard of world on these aspects. If we inculcate these qualities along with strong value system, we can certainly contribute in accelerating growth and capturing this new envisaged opportunity.

Once a very entrepreneurial society, we have very poor social structure today for business with innovative mindset. Neither we encourage innovation at household nor at educational institutes or nor at banking segments. If for some reason an idea does not work, we scrap the person who suggested idea. Under the pretext of frugality, we are confined to make prototypes which has natural death as there is no scalability thinking.  It should  become national movement that ideas which are worth pursuing should be propelled in to scalability. And there would be failures. As a society, are we going to stop looking at failures as crime.? One can list hundred of Chinese companies whose individual production numbers are equivalent to India's national production. Do we have social Eco system to take risk, mitigate risk and eventually de risk it.? Business owners, particularly SME segment, should work on improving brand value of country as such. India as a country is not yet very trusted brand for deliverance. How other countries are perceiving India as a country is to be surveyed and benchmark standards are to be set at national and then down line every individual level.

Our government needs to change its treatment to business owners. India has progressed extremely well on ease of doing business from the rank of at 130, today we stand at 63. Is that enough to capture the opportunity? SMEs who contribute 45% of total GDP and 40% of total exports are at dismay of receiving support on various aspects. Small industrial parks, quick availability of finance, easing out customs procedures are few of the areas of improvements. In recent outbreak of Corona, we have observed ambiguous nature of instructions to start business activity. From getting permission to resume business till starting the unit, instructions and rules were formulated in such a way that business owners gave up resuming business, forget about stimulus package offered by other countries.

All three corners, individual/society/government, should sharpen their skills to grab this opportunity. It is not the case that we did not get opportunity in the past. Few years back, there was a drive to produce mobile phones in India. Where are companies like Karbon, Micromax? Where is a company who came out with Rs 1000 mobile phone? HR Development and education ministry should have equal stature and importance like Home or Defense ministry for next decade.

Just to conclude, the country needs to be shaken only to challenge conventional work practices, beliefs and wisdom across pyramid of country. Otherwise this so called patriotic wave will just create bubbles in the air and two years down the line our friends will run to China to buy furniture for their home decoration just to save few bucks.


Wednesday 15 April 2020

इतिहास

ज्या दैदिप्यमान इतिहासाचे आपण गोडवे गातो त्या इतिहासात असं बऱ्याचदा घडलं आहे की  दोन राजे एकमेकांचे शत्रू असायचे, पण बाहेरचा कुणी दुश्मन आला तर मात्र दोन राजे एकत्र यायचे आणि त्या बाहेरच्या दुष्मनाचा खात्मा करायचे.

तो दुश्मन परत गेला की हे दोन राजे परत एकमेकांवर तलवारी चालवायला तयार व्हायचे.

इतिहासातून या गोष्टी शिकायच्या असतात. नाहीतर आम्ही फक्त, जगाला शून्य दिला, आमच्याकडे पुष्पक विमान होतं असल्या बाता मारण्यात मश्गुल राहतो आणि बाहेरचा अगदी भयानक स्वरूपाचा शत्रू राज्यात येऊन धुमाकूळ घालतोय तरी दोन्ही राजे दररोज रात्री तलवारीला धार लावत असतात अन दुसऱ्या दिवशी वाग्बाण सोडून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. या प्रोसेस मध्ये शत्रू आपले अक्राळविक्राळ हातपाय पसरतोय हे या राज्यांच्या ध्यानात पण येत नाही आहे.

राजेहो, तुम्हाला इतिहास नव्याने शिकायची गरज आहे. 

Monday 13 April 2020

चूक

सीन १.

आम्ही नवीन ग्राइंडिंग मशीन घेतली होती. २००६ साली. बिझिनेस मध्ये नवीन, त्यामुळे रिसोर्सेस माहित नाही. आम्हाला ग्राइंडिंग ऑपरेटर ची गरज होती. आम्ही त्यावेळेस ग्राइंडिंग एका टूल रूम मधून करवून घ्यायचो. तिथे एक सतीश नावाचा स्किल्ड ऑपरेटर होता. आणि आमचं सगळं काम तोच करायचा. आम्ही जी मशीन घेतली होती तीच सप्लायर कडे पण होती. आम्हाला रेडिमेड ऑपरेटर नजरेसमोर दिसत होता. आमचा पाय घसरला. आम्ही त्याला आमच्याकडे काम करायला आमंत्रण दिलं.

तो आलाही. पण तीन दिवस काम केल्यावर काय किल्ली फिरली माहित नाही. पण सतीश परत त्या टूल रूम मध्ये गेला. आम्हालाही गिल्ट फिलिंग होतं की आपण आपल्याच सप्लायर चा माणूस फोडला. पण जादू झाली आणि आम्ही त्या गुन्ह्यातून आपसूक मुक्त झालो. त्यानंतर मात्र आम्ही सप्लायर, कस्टमर, स्पर्धक कंपनीतून कुणी माणूस घ्यायचा नाही अशी शपथ खाल्ली. आणि आजतागायत पाळतो आहोत.

सीन २.

मला बंगलोर मध्ये माणूस घ्यायचा होता. खूप शोध घेतला पण बजेटमध्ये बसणारा आणि स्किल सेट असणारा माणूस मिळतच नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर एक सापडला. गिरीश त्याचं नाव. मी त्याला एका संध्याकाळी ऑफर लेटर द्यायला जाणार होतो. त्याच सकाळी माझा अशा कंपनीत कस्टमर कॉल होता जिथे गिरीश ने काम केलं होतं. सहज बोलताना मी तिथे सांगितलं की गिरीश आमच्या कंपनीत बहुतेक पंधरा दिवसात जॉईन होणार आहे.

कस्टमरने मला गिरीश ची सारी स्टोरीच सांगितली. तो कंपनीत कशा चोऱ्या करायचा अन नंतर दारुड्या झाला. मी अजून दोन तीन ठिकाणहून ती कहाणी खरी असल्याचं कन्फर्म केलं. लाँग टर्म मध्ये फसलो असतो, मी जर त्याला घेतलं असतं  तर. पण जादू झाली अन मी त्या प्रॉब्लेम मधून आपसूक मुक्त झालो.

सीन ३.

एक चायनीज स्पिंडल कंपनी आहे. शिरस्त्याप्रमाणे त्यांचे स्पिंडल खूप स्वस्त. आणि त्या प्रकारचे स्पिंडल आमच्या रेंज मध्ये नव्हते. काही भारतातले कस्टमर आमच्या खूप मागे लागले की त्यांची एजन्सी घ्या. आमच्या रेंज मध्ये त्यांचे प्रॉडक्टस नव्हते मग त्यामुळे मी पण विचार केला की असू द्यावी चायनीज कंपनीची रेंज आपल्या बास्केट मध्ये. भरपूर मेलामेली झाली. त्यांनी आमची कंपनी ऑडिट करायचं ठरवलं. २५ डिसेंबर २०१९ ला या चायनीज कंपनीचे लोक आमचं ऑडिट करायला पुण्यात येणार होते. मी पण पूर्ण तयारीत होतो.

२५ डिसेंबर ला सकाळी चायनीज कंपनीचा मला फोन आला. त्यांनी बंगलोर मध्ये कुठल्या दुसऱ्या कंपनीला एजन्सी दिली आणि आता पुण्याला येत नाही म्हणाले. मी त्यांना म्हणालो की तुम्ही हीच गोष्ट पुण्याची माझी कंपनी बघून, ऑडिट करून सांगू शकत होते. भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम मधून मी इथेही आपसूक मुक्त झालो.

असे अनेक किस्से आहेत. मी काही तरी चूक वागायला जातो, पण विधात्याच्या मनात काही वेगळं असतं, आणि ती चूक काही माझ्याकडून घडत नाही.

Saturday 11 April 2020

करोना विरुद्धची लढाई

करोनानंतर बिझिनेसचं स्वरूप काय असेल याबाबत बरेच तर्क वितर्क चालू आहेत. मी स्वतः याबाबतीत खूप आशावादी आहे. अन त्याचं कारण माझा या विषयावर खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे. मी फक्त इतिहासाचा संदर्भ घेतोय.

माझ्या माहितीत तीन चार अशा घटना आहे की ज्याने एखादा देश किंवा सारं जग ढवळून काढलं. त्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे येणारे काही आरिष्ट आर्थिक स्वरूपाचे होते तर काही अगदीच विध्वंसक नेचरचे होते.

१९१८ साली एक फ्लू आजाराने साऱ्या जगाला वेठीला धरलं होतं. १९३० साली अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन आलं होतं. १९३८ ते १९४५ साली दुसरं महायुद्ध झालं. २००० साली ११/०९ झालं. आणि २००८ साली सब प्राईम मुळे जगाच्या अर्थ व्यवस्थेला हादरे बसले. जपान मध्ये काही वर्षांपूर्वी त्सुनामी आली.

तुम्ही जर इतिहासातील या घटनांचा धांडोळा घेतला तर प्रत्येक घटनेनंतर जग किंवा देश अधिक जोमाने कामाला लागलं आणि असंख्य चांगल्या गोष्टी घडल्या.

उदाहरणासाठी आपण दुसरं महायुद्ध घेऊ यात. कारण या महायुद्धात आतासारखं सारं जग ओढलं गेलं होतं. अर्थात करोनाविरुद्ध लढाई बऱ्याच देशांनी लढायची आहे. पण १९४५ ला दुसरं महायुद्ध संपलं आणि जगातले बरेच देश हे संपन्नतेच्या मार्गावर लागले. अमेरिका ने ग्रेट डिप्रेशन नंतर कात टाकली आणि दुसऱ्या महायुध्दानंतर साराच युरोप आणि त्यातल्या त्यात जर्मनी आणि एशियातील जपान हे देश प्रगतीच्या घोड्यावर सवार झाले. या दुसऱ्या महायुद्धानंतर जगानेच एकंदरीत युद्ध या प्रकारचा धसका घेतला आणि आज ७५ वर्षे झालीत पण तितकं व्यापक आणि विध्वंसक युद्ध झालं नाही. करोना प्रकार तितका विध्वंसक होईल का तर कदाचित आर्थिक बाबीवर होईल पण मनुष्य हानी तितकी होणार नाही असं वाटतं. नव्वदीत आखाती देशात युद्ध झालं पण त्याचं कारण आणि आवाका हा वर्ल्ड वॉर २ पेक्षा छोटा होता.

२००० साली अमेरिकेत ११/०९ झालं. त्यानंतर गेली २० वर्षे दहशतवादाच्या मायनर घटना सोडता अमेरिकेत दहशतवादामुळे मनुष्य हानी झाली नाही.

यावरून लक्षात येईल माणूस हा तसा खूप हुशार प्राणी आहे. तो जर काही संकट फेस केले तर त्याच्या अस्तित्वाची लढाई जोमाने करतो. अर्थात पृथ्वीची ताकद ही माणसापेक्षा खूप जास्त आहे. तिच्या मनात येईल तेव्हा माणसाचं असणं हे काही क्षणात ते नसणं करू शकते. पण माणूस नावाच्या प्रजातीला आपलं अस्तित्व राखण्याचा हक्क आहेच.

मला असं वाटतं  की करोना विरुद्धची लढाई मनुष्य प्रजाती निकराने लढेल आणि जिंकेल ही. आणि त्यानंतरही काही अशा गोष्टी उदयाला येतील की ज्याने परत असं संकट किमान पुढचे दोन दशकं येणार नाही आणि आलंच तर त्याच्याशी दोन हात करायची तयारी असेल.

(जगाच्या संदर्भाशिवाय आपल्या भारत देशात पण काही संदर्भ आहेत. पण मी ते मुद्दाम दिले नाहीत कारण त्याला लागलीच आपल्या धार्मिक आणि राजकीय अस्मितेशी सांगड घालून आजकाल धुळवड साजरी होते. म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला) 

Friday 3 April 2020

प्रकाशमान

टाळ्या वाजवायचं अपील केलं, वाजवल्यासुद्धा. पण तेव्हाही लिहायची इच्छा झाली होती, पण नव्हतं लिहिलं. इतक्या मोठया देशाचे प्रीमियर, आपण काय त्यांना सांगणार? कुठे ते राजा भोज अन कुठे मी गंगू तेली. कधी म्हणून त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं, आज ऐकलं आणि घोर निराशा पदरी पडली. किती गोष्टी होत्या बोलण्याच्या? जेव्हा म्हणून आमच्या सारख्या उद्योजकांच्या लेव्हल ला आम्ही देशाचे प्रवक्ते म्हणून आम्हालाही काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या उत्तराची दिशा या भाषणातून मिळायला हवी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. कुठलाही प्रश्न आपण सब्जेक्टिव्ह पद्धतीने हाताळतो, त्यात ऑब्जेक्टिव्हिटी अजिबात नसते. संख्याशास्त्र आणि तर्कशास्त्र हे बाकी शास्त्राप्रमाणे खूप प्रगत झाले आहेत. ते वापरून देशाच्या जनतेला दिलासा देणारे कितीतरी अनुमान आपण बांधू शकतो.

१. साधारण पणे इकॉनॉमी चं किती नुकसान होतंय. पण पुन्हा एकदा काम चालू झाल्यावर आपण कसं जोमदार प्रयत्न करून झालेला लॉस भरून काढू यात. याचा सांख्यिकी स्तरावर अभ्यास करून व्यवस्थित विश्लेषण आणि विवेचन.

२. लोकसंख्या इतकी जास्त असूनही आपल्याकडे रुग्णांची संख्या जास्त का वाढली नाही याची लॉजिकल कारणं काय आहेत? आय सी एम आर च्या डायरेक्टर चं काय म्हणणं आहे?

३. आपण पाहिजे तितक्या टेस्ट करत नाही आहोत. एका सरकारचे प्रवक्ता म्हणून आपण या आरोपाचे कसे खंडन करता?

४. एक विशिष्ट वर्ग विचित्रासारखा वागून करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ करतोय, याबद्दल आपण काय इशारा देता?

५. सर्व राज्य सरकारे अत्यंत इमानेइतबारे काम करत आहेत. त्यांचं धैर्य वाढवणारे चार शब्द! अगदी राजकीय विरोधक असले तरी केजरीवाल किंवा ठाकरे साहेब यांच्या सारख्या नेत्यांबद्दल कौतुकाचे शब्द बोलू शकत होते.

६. एस एम ई सेगमेंट जो आज सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देतो आहे त्यांना दिलासा म्हणून आपण काय प्रयत्न करत आहात. इथे काम करणारे लोक आपापल्या गावी गेले आहेत. लॉक डाऊन काढल्यावर त्यांना परत आणण्यासाठी काही विशेष व्यवस्था करणार आहात का?

७. काही शहरं असतील की जिथे सुरुवातीला पेशंट संख्या जास्त होती, पण नंतर तिथे कंट्रोल आला. अशा शहरांच्या नागरिकांचे अभिनंदन. 

८. या रोगावर लस शोधण्यासाठी देशात काय प्रयत्न चालू आहेत आणि आपण त्यामध्ये कुठल्या टप्प्यावर आहोत.

९. जागतिकीकरणावर या सगळ्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत.

१०. कोणत्या उद्योगाने येणाऱ्या वर्षात जास्त प्रयत्न करून देश स्वयंपूर्ण करायचा आहे.

सर, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आणि बाकी अनेक गोष्टीमुळे करोना प्रकरण अजूनही हाताबाहेर गेलं नाही आणि ते जाणारही नाही याची ग्वाही देता आली असती.

असो. यातून बाहेर पडण्याचे आम्ही लोक मार्ग शोधतो आहोतच. त्यात तुमचाही हातभार आहेच पण भविष्य कसं उज्वल आहे हे सांगितल्यावर काही दिवसांनी करोना साथ संपली असं ज्यावेळेस आपण घोषित केलं असतं हा अख्खा भारत "लख लख तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती" म्हणत तुम्ही न सांगता आम्ही प्रकाशमान केला असता.