Monday 27 June 2016

ब्रेक्झिट

इंग्लंड इयु मधून दूर होणार, या निर्णयाचा भारताच्या इकॉनॉमी वर किती दूरगामी परिणाम होतील याबद्दल मी काही भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही. म्हणजे त्या बद्दल काही ढेकळं करत नाही. मग युरो चढला तर काय, सोन्या चांदीचे भाव एल एम इ ठरवते याचा आपल्यावर काय फरक पडेल यावर हिरीरीने मतं मांडणाऱ्या पंडितांबद्दल मला अतीव आदर आहे. जी बी पी थोडा झोपला तर वेस्टविंड चे स्पेअर्स मला स्वस्त मिळतील आणि कस्टमर मला लागलीच उद्यापासून डिस्काउंट साठी फोन करतील या काळजीने फक्त मला ग्रासलं आहे. त्या पलीकडे मार्केट १००० पॉईंट ने का पडलं, आणि राजन साहेबांना स्टेटमेंट का द्यावं लागलं हे आपल्या छोटा असलेल्या मोठ्या मेंदूच्या पलीकडचं आहे.

ते बाकी काही असलं, तरी त्या सार्वमताच्या प्रक्रियेने मात्र मी चकित झालो आहे. मुळात असं मत अजमावण्याचं धाडस करणं आणि अतिशय छोट्या मार्जिन ने विरोधात मत गेल्यावर राष्ट्रप्रमुखाने राजीनामा देणं हे तिथली लोकशाही प्रगल्भ असण्याचे लक्षण नव्हे काय? मध्ये शशी थरूर यांचं लंडन मधील भाषण ऐकलं. सगळ्या गोर्यांच्या मध्ये उभं राहून थरूर साहेब इंग्लंड ने भारताला कसं लुटलं यावर धुलाई करत होते. आणि ते ब्रिटिश खुल्या मनाने त्या टीकेला टाळ्या वाजवून दाद देत होते.

आपल्या देशात राहून फक्त वेगळं राज्य मागणाऱ्या तेलंगण ला कशाला सामोरं जावं लागलं हा इतिहास अगदी ताजा आहे. अतिशय जायज अशा वेगळं विदर्भ मागणाऱ्या लोकांना कसं हिणवलं जातं, अस्मितेच्या नावाखाली त्यांच्या तोंडाला कशी पानं पुसली जातात हे आपण सोयीस्कर पणे विसरतो. काश्मीर ला भारतात राहायचं की नाही यावर सार्वमत घ्या असं चौकात उभं राहून म्हणायची कुणाची प्राज्ञा आहे ते सांगा.  ह्या देशात राहणाऱ्या लोकांनी त्या इंग्लंडच्या एकूणच प्रक्रियेवर भाष्य करणे हेच मुळात गमतीशीर आहे.

यावर असं म्हंटल्यावर माझा एक दोस्त म्हणाला "नंतरच्या प्रतिक्रियेवरून वाटत नाही की ती लोकशाही प्रगल्भ आहे" मी त्याला म्हणालो "हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण क्रियेपेक्षा प्रतिक्रियेवर जास्त लक्ष देतो"

असो. गोर्यांचा माझ्यावर सत्तर वर्षानंतर ही प्रभाव आहे असं म्हणा पण भौगोलिक दृष्टया ब्रिटन आता काही भारी उरलं नसेल पण लोकशाहीच्या दृष्टीने मात्र ते ग्रेट ब्रिटन आहे असं आपलं मला वाटतं.

Sunday 19 June 2016

deactivate

नाही म्हणजे आता येणं भाग पडलं. काही फोन्स झाले, मेसेजेस आले. काहींनी काळजीपूर्वक चौकशी केली. काही मित्रांनी "अरे आहेस, की गेलास?" अशी प्रेमळ विचारणा ही केली. कुणी आम्हाला अन्फ्रेंड किंवा ब्लॉक केलं का, असं  दरडावून विचारलं. पुन्हा एकदा सांगतो, मी कधीही आता पर्यंत वैयक्तिक रित्या त्रास दिल्याशिवाय अन्फ्रेंड केलं नाही आहे. ब्लॉक तर फार दूरची गोष्ट. उलट आता वॉल वर आलो तर मित्र संख्या १५० एक जणांनी कमी झाल्यासारखी वाटते. अकौंट deactivate असताना मित्रांनी उडवलं असं दिसतंय. रोज दुधाचा रतीब टाकणाऱ्या गवळ्याने पंधरा दिवस दुध टाकले नाही की आपण त्याला बंद करतो. अगदी तसेच.

फेबु वर नसताना नेहमीच्या मंडळींशी भेटणं चालूच आहे. कालच मुकुंद,  दोन मेधा आणि सुबोध बरोबर जेवलो. अमेरिकेहून शिल्पा आली, तेव्हाही जयंतच्या घरी स्नेह संमेलन पार पडलं. फोन होतात. गणेश आहे, विनय गुप्ते आहेत आणि बरेच.

तर मित्रांनो, सुर्हुदानो, मी आहे बरं. अगदी व्यवस्थित आणि ठणठणीत. बरं मग deactivate का केलं अकौंट?. तर अगदी खरं सांगायचं तर काही कारणं आहेत. इंडस्ट्री च्या बऱ्याच लोकांना माहित आहे की दोन वर्ष रेसेशन चालू आहे. अच्छे दिन दृष्टीक्षेपात दिसत आहेत पण त्याला पकडावं तर मृगजळासारखे ते पुढे धावत आहेत. पावसाप्रमाणेच ते ही चकवा देत आहेत. ३१ मार्च पर्यंत एकदम झकास दिवस गेले. कंपनीत लोकं वाढवले, तिचं एक्स्पान्शन ही झालं, दिल्लीत माणूस  जॉईन झाला आणि अचानक सेल्स डाऊन झाला.

शेवटी आपण कितीही तारे तोडले तरी काही परफोर्मंस मेझर्स असतात हो. आणि कंपनीचा सेल हा त्यापैकी एक. तिथे गोता खाल्ला की काही सुधरत नाही. म्हणजे इथे येउन चार दीड शहाणपणाच्या गोष्टी पकवायच्या असतील तर धंदा जागेवर पाहिजे. तिकडे बेसिक मध्ये राडा झाला की इथल्या माझ्या पोपटपंचीला काही मतलब राहत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अभियंता ही पदवी मी पांघरून झोपतो आणि तिथेच  मला उबदार वाटतं.

त्यामुळे अजून एक दोन महिने तरी येणं होणार नाही अशी चिन्ह आहेत. शिल्पा केळकर नी विचारलं की, तुला लॉग आउट होऊन  जमत नाही का? तर उत्तर आहे, "नाही". Deactivate झालं की सायकोलॉजिकली मला असं माहित असतं की मी इथे नाही आहे. अगदी लॉग इन आणि activate च्या प्रोसेस मध्ये काहीही फरक नसला तरी.

ब्लॉग्ज  ही कमी लिहिले. अगदी दोन चार मस्त इन्स्पिरेशनल घटना घडल्या आहेत. अगदी तुमच्या माझ्या सारख्या लोकांची सक्सेस स्टोरी आहे. पण त्याही लिहायचा धीर होत नाही आहे.

काल चार जणांचे फोन आले. आणि आज एका फेसबुक फ्रेंडशी लांबलचक कॉल झाला. त्यामुळे विचार केला, माझी ख्यालीखुशाली तुम्हाला सांगावी आणि तुम्हा सगळ्यांचं दोन दिवसासाठी का होईना दर्शन घ्यावं. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

बाकी निवांत



Tuesday 7 June 2016

शिल्पभेट

शिल्पाचा चार सहा महिन्यापुर्वीच मेसेज आला होता, की ती भारतात येतेय म्हणून. इतक्या आधी कार्यक्रम ठरवणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमीच असूयामिश्रित आदर वाटत आला आहे. मी पण अगदी टेचात सांगितलं, मी आहे, काही काळजी करू नकोस. मेसेंजर वर ग्रुप बनला. मेसेजमेसेजी चालू झाली. मेसेंजर वापरण्याबाबत मी फारच कंजूष आहे. काही स्त्री वर्ग याबद्दल माझ्यावर नाराज पण आहे.

४ जून तारीख मुक्रर झाली. जयंताने त्याच्या घराची दारे ग्रुप साठी उघडी केली, अन रात्रीच्या जेवणाची व्यवस्था अंगावर घेतली.

शिल्पा आणि बाकींना भेटायच्या अगोदर संतोष आला. माझ्यासारख्या नॅनो साईझ च्या भांडवलदाराबद्दल त्याच्या मनात जरा शंकाच आहे. त्याने मला काही अवघड प्रश्न विचारले. मी त्याला काही यथाबुद्धी उत्तरं दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मॉर्निंग वॉक ला गेलो. तिथून  ते नाष्टा होईपर्यंत संतोष ने प्रगती म्हणजे काय यावर माझं बौद्धिक घेतलं. तुम्हाला सांगतो, संतोष जर माझ्याबरोबर १५ दिवस राहिला तर हा मंडलू कमंडलू घेऊन विरक्तीच्या रस्त्यावर हिमालयाकडे कूच करेल. 

मग दिवस रेणुकादास बाळकृष्ण देशपांडे असं भारदस्त नाव असलेल्या, पण आर बी डी असं छोटं नामकरण केलेल्या तरल मनाच्या पण विद्वान माणसाची वाट पाहण्यात गेला. प्रत्येक गावाची हिसका देण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही परभणीचे लोकं वेळ न पाळून आपला हिसका दाखवतो.  त्याप्रमाणे आर बी डी नी तो खूप वेळा दाखवला. मला अगदी आपलं माणूस भेटल्याचे जाणवले. पुण्यात राहून मी ही आजकाल भेटण्याची दिलेली वेळ पाळण्याचा अतोनात प्रयत्न करतो. पण ३० वर्षं पुण्यात राहूनही माझ्यातला परभणीकर अजूनही जिवंत आहे, याचं मला खुप समाधान वाटलं. 

माझ्या मनात दोन गाड्यात बसून १० जणांनी जयंत कडे जावं असं होतं. पण नियती असा रंग दाखवते की आपण हतबल होतो. आम्ही चार जण तीन गाड्यात बसून गेलो. मी, संतोष, अतुल अन सगळ्यात तरुण सुकुमार राजेंद्र गानू. गानू सरांच्या एजिंग प्रोसेस चा बहुधा रिव्हर्स गियर पडला आहे. 

वरात पोहोचली. वराती मागून यजमान पोहोचले. नमस्कार चमत्कार, हातमिळवणी, गळाभेट यथामैत्री पार पडली. आणि मग गप्पा कुटायला सुरुवात झाली. रमा, संतोष, आर बी डी यांच्या कोपरखळ्या रंग भरू लागल्या. तोंडी लावायला जयंत चे वन लायनर्स पंचेस होतेच. स्वरूपा खर्डेघाशी प्रमाणेच इथेही सगळ्यावर करडी नजर ठेवून होती. ऋचा तिच्या मोगऱ्यासारखा आनंद प्रसवत राहिली. आर बी डी आणि जयंत यांनी लेखन या विषयावर मेलामेली केली त्याचं वाचन झालं. मी थक्क झालो. 

संतोष, आर बी डी देवरूखला जायचा प्लॅन बनवत होते. मला हे माहित नाही की ते कधी जमवतील. पण मला त्यांचा हेवा वाटला. सध्या मला असं कुठे जाण्याचं विचार करण्याचं स्वातंत्र्य ही नाही आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

जिने हा सगळा भेटीचा घाट घडवून आणली ती शिल्पा मात्र शांत होती. तिच्या मनात काय चालू होतं याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. ती इनमिन चार पाच वाक्य बोलली असेल. गेली २५ वर्ष ती देशाबाहेर आहे. भारतात आल्यावर नातेवाईक आणि मित्र यांच्याबरोबर वेळ घालवून ते क्षण ती पदरात जमा करत होती जणू. बहुधा परत गेल्यावर वेळ मिळेल तसा ती त्या क्षणात डुंबत असावी. अर्थात हा माझा आपला अंदाज. 

रात्री उदरभरण झाल्यावर स्वरूपा ने साद दिली, विंदा. एखादं लहान मूल twinkle twinkle little star म्हणतं आणि मग पाहुणे टाळ्या वाजवतात अन ते पोर खुश होतं. माझं सध्या तसं झालं आहे. नुसती चावी मारायचा अवकाश की मी चालू होतो. नंदू ने मध्ये त्याचे काही कडक शेर ऐकवले. शिल्पाने माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला संदेश वाचून दाखवला. मला माझाच हेवा वाटला. त्यानंतर ही माझी काही थांबायची तयारी नव्हती. शेवटी कुणीतरी विषय बदलून मैफल संपली असं जाहीर केलं आणि माझ्या उत्साहावर पाणी फिरलं.

खरं तर मी हे काही लिहिणार नव्हतो. पण कुणीच काही लिहिलं नाही असं मला कळलं. संतोष ने आणलेली जांभळाची वाईन आणि क्षमा वहिनींनी केलेला स्वयंपाक माझ्या अंगात सळसळू लागला आणि मग आज आठवड्यानंतर हे लिहून एका कर्तव्यपूर्तीचं समाधान मला लाभतंय. अगदी खरं सांगायचं तर 'राजेश कविता छान म्हणतो" अशी माझी कुणीही पब्लिसिटी केली नाही हे ही खूप डाचत होतं. 

आज शांत झोप लागेल.  

शार्दुल तिथे फारच स्थितप्रज्ञ होता. त्याला आमच्या सगळ्याबद्दल काय वाटलं असेल हा विचार मला आजही भेडसावतो आहे. 


Wednesday 1 June 2016

TS

I have decided to meet Mr T Srinivasan along with Vijay. Vijay, a childhood friend of mine and owner of small scale industry, has a unit in MIDC. T Srinivasan, fondly known as TS, is a Chairman of ₹1200 CR TS group. Vijay knows TS for last 3 years. TS has found Vijay as quite innovative entrepreneur, the reason Vijay is partner in one project started by TS.

Vijay and me meet quite regularly and our discussions revolve around many subjects under the sun. He has been talking of TS with high regards. He often mentioned humbleness of TS and that he commutes in Indica, though his son uses BMW, his quick decision making and so on. He told me that TS traveled in seventies all the way from Karnataka to Pune with not much education and no penny in pocket and worked even as labor. He created world out of zero and reached staggering turnover of ₹1200 CR today. Vijay often used to say that I should meet TS once. I used to ignore saying that he is such big man and may not have any interest in meeting me. Vijay simply said "it is for your interest Rajesh. Let's go"

It was Tuesday, 5 pm. Myself and Vijay entered TS posh office. Vijay told me unusual ritual that every person who meets TS touches his feet as gratitude. I know TS age is nearing 70, though was surprised with this custom of touching his feet. I showed my concern to Vijay. So he said, "I never bothered to ask the reason. If you feel awkward in doing so, just forget it" Neither I agreed nor disagreed. Though I felt little odd.

TS office was beautiful. I mean there was not too much of fancy about it, but it carried grace. It was neat and tidy, color scheme was superb, a light music at the background. An atmosphere was serene. Everyone was working at its desk. There was no chaos which we usually find in offices. I must say, the office was different than others.

Vijay was regular visitor there. He said that we will be called in next 5 minutes. I was sitting on luxurious sofa and watching the office carefully. We were called in TS cabin in next 5 minutes.

TS came out if his cabin. Vijay completed ritual of touching his feet. I pretended to  touch his feet and went to his cabin. I started observing TS. He must be 5 1/4 feet tall, not very fair, half bald, wearing ultra white shirt. He was normal person sitting in nicely articulated cabin. To be honest, he was not seen like running an empire of ₹1200 CR from any angle. "How are you?" he asked. His tone was typical south Indian. As soon as we started talking, an office boy knocked the door and said "Sir, I am pushing off to my town". TS said to him "Ravi, wait for 5 minutes".

The moment Ravi went out, TS said "Ravi is with me since last 12 years. His wife is pregnant and has gone to her village for getting baby. delivered. Today he is going to meet her. His parents are old. I know, he will not take anything for them and save money. So I sent person to market to get some sweets, farsan and some cloths for his parents."

Now, I was moved by TS gesture and modesty.  A man who is running such a huge business was thinking so deeply about office boy and moreover his family.

In few minutes, a person came with all the stuff which TS asked to bring for Ravi and his family. TS said to Ravi "take this and hand it over to your wife and parents. And do not forget to convey my regards to your parents." He also gave some currency notes amounting to 3 or 4 thousand rupees. Ravi said, "Sir, I already drew some adavnce. I can't take this." TS said "you can settle that with office accounts. This is gift from me." Ravi was in tears and he touched his feet and quickly left cabin.

We again started talking with each other. I was answering TS questions, though I was thinking about Ravi episode which I witnessed minutes before. Somehow, my mind could not get rid of humanity and humbleness showered by TS. I could see the glimpses of one of the great qualities TS possesses.

After a while, there was time to say good bye. He said "do come again. And let me know if you have business proposal. We will work together." I nodded and touched his feet before leaving his cabin. Honestly,  this time, it was quite natural reflex  as my brain received a signal to touch TS feet without Vijay mentioning it.