Thursday 31 March 2016

मैफील

नील ला आजकाल मराठी हिंदी गाण्यांची आवड निर्माण झाली आहे. आणि त्या कट्यार मुळे परत शास्त्रीय वगैरे. काल काहीतरी गुणगुणत होता. मी विचारलं, काय म्हणतोस. तर म्हणाला "केतकी गुलाब जुही".

आज सकाळी नील माझ्या बरोबर कंपनीत निघाला. कार मध्ये बसायच्या अगोदर "सरणार कधी रण" ऐकून झालं. मग म्हणाला "मला भीमसेन जोशींचं गाणं ऐकायचं आहे"  मी त्याला "टाळ बोले चिपळीला" हे गाणं लावून दिलं. गाणं संपल्यावर तो म्हणाला "Bhimsen Joshi is the greatest singer" मध्ये एक ओळ त्यांची नाही हे ही त्याला कळलं. राम कदमांच्या तोंडून ऐकलेला वसंतराव आणि भीमसेनजींच्या दोस्तीचा किस्सा त्याला सांगितला.

मग लागलं "माझे माहेर पंढरी" गाणं संपल्यावर मी विचारलं "काय बोलतो" तर म्हणाला "काय बोलणार यावर? काही बोलताच येत नाही आहे" दोन मिनिटे शांत बसल्यावर परत म्हणाला "मला असं वाटतंय की ट्राफिक जाम व्हावी. आपण त्यात अडकावं. आणि ही गाणी ऐकत बसावं"

तिसरं गाणं लागलं "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल" एव्हाना तो येडा झाला होता बहुतेक. गाणं संपल्यावर हात जोडत म्हणाला "भीमसेन जोशी तर तानसेन ला ही हरवतील. मला तर त्यांची पूजा करावीशी वाटते"

मला म्हणाला "मला क्लासिकल गाणं शिकण्याचा क्लास लावायचा आहे" मी काही बोललो नाही. तबल्याचा क्लास अर्धवट सोडून त्यांनी मला तोंडघशी पाडलं होतं. आता चार वेळा म्हंटल्याशिवाय मी परत चूक करणार नाही.

कात्रज मागे पडलं. मी एक शेवटचा घाव टाकायचं ठरवलं. त्याला सांगितलं "भीमसेनजींच्या दोन शिष्यांची तुला जुगलबंदी ऐकवतो. जयतीर्थ मेवुंडी आणि आनंद भाटे" सौभाग्यदा लक्ष्मी भारम्मा. आठ नऊ मिनिटांची सुरांची बरसात आहे. न्हाऊन निघतो आपण चिंब. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की तो ही नखशिखांत भिजला आहे. म्हणाला "मेवुंडी भीमसेन जोशींसारखं गातात. भाटेंचा आवाज वेगळा आहे"

कंपनी आली. परवाच एक नवीन शब्द नीलने ऐकला होता, तो वापरत म्हणाला "I am mesmerised"

मी पण अंगावर आलेले काटे झाडत पाऊण एक तासाच्या मैफिलीची सांगता केली. सुरांचं मंदिर झालेल्या कारमधून कर्म मंदिरात प्रवेश करता झालो. आणि दैनंदिन कामाला सुरवात केली.

Wednesday 30 March 2016

आसक्ती

माझ्या आयुष्यात अशी बरीच मंडळी आली, म्हणजे ही लोकं अशी की ज्यांना मी सुरुवातीला भेटलो तेव्हा सॉलिड इम्प्रेस झालो होतो. असं वाटायचं की माणसाने असं असावं. मग या लोकांशी माझे व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणामुळे संबंध आले. अर्थात नैतिक. दिवस सरत गेले, महिने गेले आणि वर्ष ही गेली. काळाच्या कसोटीवर मात्र यातील काही निष्प्रभ झाले. म्हणजे जगाच्या दृष्टीने असतीलही ते कर्तृत्ववान वगैरे पण माझ्या मनावरचा त्यांचा प्रभाव संपला. यातील काही लोकांना मी काही दिवसात जोखलं, तर काहींना ओळखण्यात महिने गेले. काही अति हुशार मंडळींनी कित्येक वर्षं मला गंडवल.

मनाचा तळ दिसणं फार अवघड असतं, नाही? कारण त्यावर कधी प्रेमभावाचं शेवाळं साचलं असतं तर कधी दोस्तीच्या आवरणाखाली तो तळ लपलेला असतो. काही जणांच्या मनावर हुशारीचा तवंग साचलेला असतो तर काही जण शूरपणाचा आव आणत जगत असतात. काहींनी अत्यंत व्यवहारकुशलतेचा मुखवटा घातलेला असतो. आणि आपण त्या बाह्य रुपाला फसतो. (ज्यांना पटतंय त्यांनी "आपण" बहुवचनी शब्द घ्यावा, ज्यांना नाही त्यांनी मी स्वत: ला आदरार्थी संबोधतो असे समजावे).

मग कधीतरी नियती नावाची अद्भुत शक्ती एक धक्का देते. पाणी डचमळतं. तो मुखवटा कधी स्वत:हून फेकून द्यावा लागतो तर कधी परिस्थिती तो ओरबाडून घेते. कुणीतरी असं औषध फेकतं की शेवाळं बाजूला होतं, तवंग हटतो. आणि मग तो मानवी मनाचा तळ दिसू लागतो. अगदी लख्ख.  आणि मग नजरेसमोर येतात कधी अत्यंत निर्बुद्ध तर कधी निर्ढावलेले नालायक चेहरे. शुरपणाच्या नावाखाली लपलेली अत्यंत भित्री जमात. व्यवहार कुशलतेच्या आवरणाखाली ओरबड्णारे अणकुचीदार नखं असलेले पंजे. दुसऱ्याचं भलं करण्याच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरणारे नराधम.

मग हे असं काही दिसल्यावर, काहींना दूर लोटता येतं. काहींना तो विधाता आपल्या वाटेतून अलगद बाजूला काढतो तर काहींना मात्र आपण झेलत राहतो. आयुष्यात फासे असे पडले असतात की मान पक्की अडकली असते. अन मग ही लोकं आपल्या आयुष्याचा भाग बनतात. सहनही होत नाही आणि सांगणार तरी कुणाला असा एक विचित्र तिढा बसतो. आपणही तळ दिसलाच नाही असा अभिनय करत राहतो. समोर दिसणाऱ्या आवरणाला चांदीचं मखर सजवण्यात धन्यता मानतो. परस्पर संबधातला रस निघून जातो, आयुष्य फरफट होतं आणि आपण सक्तीने जगण्याचा पर्याय निवडतो.

खरं तर अशा जगण्याला आसक्ती म्हणायला पाहिजे.  

Tuesday 29 March 2016

भारती

कालच्या लेखात इंजिनियरिंग एक दु:स्वप्न असं लिहिल्यावर एका मित्राचा फोन आला आणि असं का म्हणतोस हे विचारलं. का कुणास ठाऊक मला भारती विद्यापीठाबद्दल विलक्षण अढी आहे. खरं तर कारण काहीच नाही. म्हणजे त्यांच्यामुळे मी डिग्री झालो आणि पुढे त्याचा मला खूप फायदा ही झाला. पण जी कृतज्ञतेची भावना शाळेबद्दल किंवा पॉलीटेक्निक बद्दल आहे ती या कॉलेज बद्दल नाही हे तितकंच खरं. याची काही कारणं ही असावीत:

- प्रायव्हेट कॉलेज हा कन्सेप्ट त्यावेळेस आजच्या इतका बोकाळला नव्हता. गव्हर्नमेंट कॉलेज ला admission नाही म्हणजे आपल्यात काही ग्रॉस कमी आहे असं वाटायचं. आजही बी ई कुठून झाला या प्रश्नाचं भारती विद्यापीठ असं उत्तर देताना हलकीशी कळ उमटतेच. COEP ला आपल्याला admission मिळाली नाही हा सल आजही आहे.

- वर्षाला आठ हजार फी. आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून भरलेली. आपल्या हातून काहीतरी मोठं पाप घडलं अशी भावना आज ही माझ्या मनात येते.

- बरीच नॉन महाराष्ट्रीयन मुलं. आणि प्रचंड श्रीमंत असायची ती. त्यांना महिन्याला येणारे पैसे ऐकून माझे डोळे विस्फारायचे. परत त्यांच्या गाड्या घोड्या. मी सायकलपटू. दरमहा रु २५० वाला. बुजलोच म्हणा ना. खेळात पीछेहाट. अभ्यास सोडून सगळ्या क्षेत्रात मागे.

- मराठी मित्र झाले. नाही असं नाही. पण ते बहुधा असेच मारून मुटकून आलेले असावेत. सगळ्यांनी चेहेऱ्यावर एक विचित्र मुखवटे चढवलेले. वेंधळेपणाचे, बेफिकीरपणाचे, बावळटपणाचे. अन मी बहुधा सभ्यतेचामुखवटा चढवला असावा.

- परत तिसऱ्या वर्षापासून बी जे चा नाद. प्रेमाचा पफलू तिकडं फिट होत होता. तशाही भारती च्या पोरी अजिबात घास टाकत नव्हत्या.

या अशा अनेक घटकांमुळे माझी आणि कॉलेज ची नाळ काही शेवटपर्यंत जुळली नाही हे खरं. नाही म्हणायला काही जणांना इंडस्ट्री मध्ये भेटत राहिलो. मग त्यात काझी आहे, राजेश देशपांडे आहे, नुकतंच प्रशांत नलावडे शी बोलणं झालं, गिरीश ची कंपनी जवळ आहे, केतन मध्ये येउन गेला. पण हे अगदी बोटावर मोजण्याइतके. मागच्या वर्षी  २७-२८ जण भेटले हॉटेल मध्ये. सगळ्यांशी ओळख रिव्हाईव करण्याचा भारी मौका होता. पण माझीच angioplasty झालेली २ सप्टे ला आणि हे रियुनियन होतं ६ ला. मी फक्त सगळ्यांशी गळाभेट करण्यापुरता गेलो. आता परत भेटायचं ठरलं तर जाईन नक्की.

जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींवर असोशीने प्रेम करणारा मी, या कॉलेज बद्दल मी खूपच अनभिज्ञ राहतो. इतका की त्याच्या समोरून जाताना मी एखाद्या जुन्या मित्राला टाळल्यासारखा अगदी नजर चुकवून जातो. 


Saturday 26 March 2016

सोशल मिडिया

मित्रांनो,

आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज काल सगळीकडे सोशल मिडिया चा बोलबाला आहे. WA, फेसबुक हे परवलीचे शब्द आहेत. पूर्वी लोकांना गप्पा मारण्यासाठी चावडी असायची. आता हेच चावडीच काम सोशल मिडिया करत आहे. मी स्वत: फेसबुक चा active युजर आहे.

पण या सोशल मिडिया चे काही भयानक दुष्परिणाम मला माहित झाले आहेत. काहींचा मी अनुभव घेतला आहे तर काही वाचले आहेत. WA आणि फेसबुक चं व्यसन लागल्यामुळे कंपनी आणि कुटुंब उध्वस्त झालेल्या कहाण्या बाहेर येत आहेत. या बाबत चे काही महत्वाचे दुष्परिणाम मी खाली लिहितो.

- शारीरिक आजार. मानेचे दुखणे, सारखं टाईप करून बोटाचे आजार, डोळे दुखणे, खूप जास्त वाचल्यामुळे डोकं दुखणे.

- मानसिक आजार. काही विचित्र फोटो सारखे बघितल्याने येणारे नैराश्य, सामाजिक  परिस्थिती वर चुकीची माहिती वाचल्याने होणारे गैरसमज.

- कुठलंही काम करताना चुकीचे किंवा सोपे डिसिजन घेणे. डिसिजन डिले करणे.

- महत्वाचे फोन करायला विसरणे किंवा एखादे महत्वाचे काम राहून जाणे.

- एखादी महत्वाची वस्तू किंवा गोष्ट विसरणे

- अतीव मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टीबद्दल स्वारस्य न वाटणे. उदा: मुलाने काढलेलं चित्र, प्रवासात दिसणारा निसर्ग इत्यादी

- अपघात. सेल्फी. वाहन चालवताना स्पीड कमी जास्त होणे. रस्त्यावर WA वा फेसबुक चेक करताना चालताना धडपडणे.

कंपनी मध्ये काम करण्यासाठी WA लागतं या अत्यंत बंडल कारणासाठी आपण ते फोन वर डाऊनलोड करतो, पण खोल वर विचार करता तुमच्या हे लक्षात येईल की हे धादांत खोटं आहे. मी स्वत: WA वापरून ६ महिन्यापूर्वी डिलीट केलं आहे आणि विश्वास ठेवा माझं त्यावाचून काहीही अडलेलं नाही.

या व्यसनाला काबूत ठेवण्यासाठी काही सूचना देतो. तुम्हाला जितक्या पाळता येतील तितक्या पाळा.

- कंपनी त आल्यावर फोन खिशातून काढून वेगळ्या जागी ठेवा. काही वेळा ठरवा. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा. त्या वेळात काय खेळायचं ते खेळा.

- फेसबुक फोन वरून उडवा. घरच्या कॉम्प्युटर वर पहा. किंवा तुमच्या मुलाला वा पत्नीला फेसबुक चा पासवर्ड सेट करायला सांगा. घरातून निघताना लॉग औट करून निघा. घरी गेल्यावर त्यांच्या कडून लॉग इन करा.

- WA वर कमीत कमी ग्रुप ठेवा. फोरवर्ड टाळा.

- शक्य झाल्यास दोन ते तीन महिन्यासाठी WA उडवा. जर परत डाऊन लोड केलं तर त्याचा योग्य वापर कसा करायचा याचा विचार नीट विचार करा आणि मग लोड करा.

- शक्य असल्यास स्मार्ट फोन आणि नेहमी वापरातला फोन वेगळा करा.

लक्षात घ्या, WA आणि फेसबुक ने तुमच्या क्रिया/प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवलं नाही पाहिजे. तर तुम्ही त्याला  कंट्रोल केलं पाहिजे. कारण तसं झालं नाही तर तुमचं मनोरंजनाचं रुपांतर दारू सारख्या व्यसनात कधी होईल हे तुमच्या लक्षात पण येणार नाही.

WA किंवा फेसबुक पेक्षा बाकी महत्वाचे app डाऊन लोड करा. जसे की Ola/Uber, IRCTC, Flipkart, Amazon आणि काही अत्यंत उपयोगी गोष्टी ऑन लाईन उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. 

आधी केले मग सांगितले, या प्रमाणे मी वर सांगितलेले उपाय केले आहेत आणि त्याचे पॉझीटिव्ह परिणाम मला दिसले आहेत.

साहेब या नात्यापेक्षा मी तुम्हाला मित्र किंवा सिनियर नातेवाईक या भावनेतून मी हे तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही कुठल्या भावनेतून आणि कसं घ्यायचं हे तुमच्या वर आहे.

Remember, behind every successful man there is deactivated WA or Facebook account.


तुमचा मित्र

राजेश मंडलिक 

Thursday 24 March 2016

GPA

शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद आलियास GPA. माझ्या आयुष्यातलं एक साधं सरळ स्वप्न. हं, माझी नाशिकची शाळा हे मोहक स्वप्न होतं तर माझं इंजिनियरिंग चं कॉलेज हे दु:स्वप्न होतं. तर GPA हे वास्तव. मी आज जो काही अभियंता म्हणून समाजात मिरवतो त्याचा पाया इथे घातला गेला.

नाशिकच्या स्वप्नवत शाळेतून मी औरंगाबाद ला आलो. विल्को च्या घरातून गादी वगैरे घेऊन मी हॉस्टेल ला राहायला आलो. त्या दिवशी ग्राउंड मधल्या झेंड्याच्या पोल च्या चौथऱ्यावर बसून पहिल्यांदा रडून घेतलं आणि मग रात्री पलंगावर आधीपासून स्वागतास तयार असलेल्या ढेकणापासून वाचण्यासाठी खाली गादी टाकली आणि त्याच्या बाजूला रॉकेल ओतलं आणि मग झोपलो. 

आणि मग पुढची तीन वर्षं अक्षरश: जगलो. GPA ची स्टोरी लिहायची म्हंटल तर मी त्या कॉलेज मध्ये वर्गात काय शिकलो हे लिहायचं तर दोन ओळी पण लिहिता येणार नाही. पण हॉस्टेल अन एक्स्ट्रा Curricular यामध्ये जो काही धिंगाणा घातला तो आज नैया वल्व्हवण्यासाठी मदत करतो असं म्हंटल तर अतिशयोक्ती होणार नाही. त्या तीन वर्षात भेटलेले मैतर आज ही तितक्याच असोशीने भेटतात, शिव्या घालतात. किती म्हणून नावं लिहावीत. काही लिहितोच. माझा तीनही वर्षं रूम पार्टनर असलेला अत्यंत पापभीरू असा सिव्हिल इंजिनियर संतोष देशपांडे, मी ज्याला जयभीम चा अर्थ पहिल्यांदा विचारला अन त्यानेही मला समजावून सांगितला असा रमेश नारखेडे, नगरच्या श्रीराम उद्योगाचा डायनामिक मालक सुनील कानवडे, त्याचा रूम पार्टनर आणि टॉप च्या पोझिशनचा competitor शहानवाझ, आणि या दोघांचे उपकार नेहमीच कबूल करणारा रतन, कुठल्याही गाण्याचे गायक/संगीतकार/गीतकार अन चित्रपट माहित असलेला संजय भोगावकर, दोन वर्ष राहिलेला पण ज्याच्या घरचे ही मला अत्यंत प्रेमाने बोलावतात असा मंगेश पाठक, जिगीषा या आजच्या अत्यंत नावाजलेल्या नाट्यसंस्थेच्या उमेदीतल्या काळातला सदस्य विवेक पत्की, ज्याच्या नगरच्या घरी आम्ही नेहमीच जायचो तो विवेक चव्हाण, केवळ माझं व्हिजिटिंग कार्ड दिसलं तर त्यावरून फोन करून घरी येउन भेटलेला बोर्डे,  अतुल मिरजगावकर, राजेश बोरा असे अगणित मित्र. बऱ्याच जणांची नावं केवळ विस्तारभयास्तव लिहित नाही.

मुद्दलात दरमहा रु २५० यायचे. त्यातले ९० रु मेसला. (शेवटी ११० की १२० झाले होते), ३०-४० रु चहा नाश्ता, इस्त्री वगैरे साठी. ५० रु जास्त मागितले कधी, तर कशासाठी पाहिजे हा प्रश्न बाबा विचारायचे. पहिला बूट (हो, आणि त्याला आजकाल शूज म्हणतात) रु ४४ चा घेतला. सकाळी दुध टाकणारा गवळी जसा वापरतो तसा तो बूट. घेतला त्या दिवशी फक्त घालू शकलो. हे सगळे आकडे लिहिताना गंमत वाटते.

GPA चं हॉस्टेल हे एक अजीबोगरीब प्रकरण होतं. रूम ला दरवाजे केवळ नावाला होते जसे आमचे अंगावरचे कपडे. एका रूम मध्ये किती जणांनी ठिय्या ठोकायचा याला काही धरबंध नव्हता. काय खायचो, काय प्यायचो याचा काही तपास नव्हता. रात्र भर टे टे खेळायचो. शेवटी निबंधे सर यायचे आणि मग आम्ही खाली मान घालत रूम मध्ये परतायचो.

Badminton चं खरं तर कोर्ट नव्हतं. कुठेतरी हात साफ करायचो अन मग जळगाव ला इंटर कॉलेज खेळलो. फायनल ला माझ्यामुळे हरलो म्हणून रनर अप झालो. क्रिकेट ही खूप खेळलो. 

तिथल्या इलेक्शन झालेल्या. दोन्ही पार्टीत मित्र. सिव्हिल आणि मेक ची नेहमी खुन्नस, पण इथे मिलाप झालेला. आज ही मला कोण कोणाच्या विरोधात होतं ते आठवत नाही. पण इलेक्शन जिंकल्यावर झालेल्या पार्टीत आवर्जून बोलावलं होतं. अहो पार्टी म्हणजे काय हो, डिलक्स हॉटेल मध्ये चहा. आणि तो हॉटेल वाला LP वर गाणे लावू द्यायचा आणि आम्ही नाचायचो. याच पार्टी मध्ये पहिल्यांदा मी धूम्रपानाचा आस्वाद घेतला. 

तिथलं शेवटचं gathering पण खूप एन्जोय केलं. दुसऱ्या वर्षीच्या gathering ला विवेक ने खूप प्रयत्न करून म……मरणाचा म्हणून नाटक बसवलं होतं. आणि आम्हा दगडाकडून अभिनय करवून घ्यायला पार प्रशांत दळवी अन चंद्रकांत कुलकर्णी यांना बोलवायचा. त्यांनी पण खूप इमानेतबारे प्रयत्न केला, पण मूळ इथे आडात नव्हतं तर पोहऱ्यात कुठून येणार. तिसऱ्या वर्षी मात्र fishponds, ऑर्केस्ट्रा, क्विझ या सगळ्यांचा ऑर्गनायझर होतो. आणि सॉलिड धमाल केली होती. ह्या असल्या उद्योगामुळे इंटर्नल मध्ये मास्तरांनी दिल खोल के मार्क दिले आणि फायनल इयर च्या मार्कलिस्ट वर फर्स्ट क्लास चा ठप्पा लागला. कारण थियरी मध्ये जे दिवे पाजळले त्यावरून समोर अंधार च होता. पण मास्तर लोकांनी ओरल अन प्रोजेक्ट मध्ये कृपा केली अन पुढं मग डिग्री करण्याची आफत माझ्यावर आली.  

औरंगाबाद च्या मेस हा एक संशोधनाचा विषय आहे. त्या उस्मानपुरा परिसरातल्या यच्चयावत बल्लावानी या पोटावर जे अत्याचार केले आहेत त्याने जगातले कुठलेही अन्न पचवायची ताकद दिली हे निर्विवाद. 

बाकी ते तंत्रनिकेतन आणि आम्ही यांत्रिकी अभियंता. त्यामुळे मराठवाड्या सारखं रुक्ष. हिरवळ एकदम कमी. नाही म्हणायला आमच्या वर्गात दोघी जणी होत्या. मृगजळ जणू. बाकी सिव्हिल आणि DERE मध्ये भरणा होता. पण वर्गातील पोरगी म्हणजे राखी बांधून घेणे ह्या नाशिक च्या शिकवणुकीचा पगडा भारी पडला आणि तसंही मुळात अरसिक असलेलं हृदय हे आम्हा मित्रांच्या हसी मजाक मध्ये आनंद मानत राहिलं. 

तर अशी आमची GPA ची स्टोरी. शाळेचा विषय निघाला की थोडा भावूक होतो.  या कॉलेज चं अगदी तसं होत नाही पण स्टेशन रोड हून जाताना कॉलेज बघण्यासाठी मान उंचावतेच आणि ते दिसो न दिसो एक कृतज्ञतेचि भावना अंगभर सरसरत जाते. 

Wednesday 23 March 2016

Indigo

I was not keeping well because of stomachache on Sunday March 13, 2016, to the extent I was thinking of cancelling my scheduled trip to Chennai by 6E501 on 14/03/2016. Eventually I decided to go to Chennai only to know that my illness continued for next two days. I was loosing my energy as I could not eat any food. 

With this body condition I boarded with my colleague Aman on 15/03/2016 in 6E385 from Chennai to Pune. I went to sleep before flight took off, which is actually usual ritual. I got up in 45 minutes with dizziness in my head. All of a sudden I profusely started sweating. All things came to my mind which normally a man with two angioplasty would think. I started walking towards toilet thinking that I will fresh up my face using water. By the time I reached toilet, I lost all energy of my body and fainted near to toilet. Indigo staff came to my rescue with lime water and sugar. They also promptly announced if any Doctor is available on board. One Muslim doctor couple came forward who were actually acupuncture specialist. Indigo staff made me comfortable and brought me back to normal in next five minutes. 

I was so upset with overall body condition that I missed to thank staff while disembarking of flight in Pune at 11:55 pm. I thought conveying this to you and request you to pass on my sincere thanks to all the airhostesses who were kind enough to take a swift action to take me out of difficult situation. 

I am quite regular user and also advocate of Indigo in my friend circle and ask them to use it for their business and leisure travel. The 15th March incidence would simply affirmed my affinity and loyalty as a customer towards Indigo.   

Sunday 20 March 2016

क्रिकेट

आज सकाळी न्हाव्याच्या दुकानात संवाद चालू होता. "अच्छा हो गया कोई बादमे विकेट नही गयी. नही तो अपनी टीम बहुत प्रॉब्लेम मे आती। लास्टमे जीत ही गये हम. बहुत मजा आया. साब, आपने देखी की नही" मी नाही म्हंटल्यावर दोघं एकदम "अरे क्या साब, धमाल आयी. वो हार्दिक का कँच देखा नही. हमारे माँ को पसंद आया" पात्र: अजमल आणि रिझवान

*********************************************************************************


मी लहानपणी क्रिकेटवेडा होतो. खेळायला आणि पाहायला खूप आवडायचं. क्रिकेट खेळताना कुठल्याही एका क्षेत्रात निपुण नसताना मी शाळेत आणि पॉलीटेक्निकला वर्गाचा कर्णधार वगैरे झालो होतो. खरं तर हा अवगुण आयुष्याच्या बऱ्याच क्षेत्रात मदतीला धावून आला आहे. Jack of many, master of none.

शाळेत असताना मी अगदी ३०० पानांचा क्रिकेट इनसायक्लोपिडिया बनवला होता. त्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडूंचे फोटो आणि त्यांची माहिती लिहिली होती. अनेक रेकॉर्ड तोंडपाठ होते. १९८३ च्या विश्वचषक कपच्या फायनल ला आमच्या घरी टीव्ही नव्हता. पहिल्या मजल्यावर होता. आम्ही गेलेलं त्यांना फारसं आवडायचं नाही. प्रत्येक ओव्हर ला वर जायचं, दोन मिनिटं match पहायची आणि खाली येउन चुळबुळत बसायचं. असं करत तो थरार अनुभवला.

डिप्लोमा औरंगाबाद ला झाल्यावर पुण्याला आलो. नाही म्हणायला कॉलनीत क्रिकेट खेळायचो पण अशा अंगभूत गुणांचा विकास जिथे होतो त्या कॉलेज मध्ये मात्र सपशेल पिछाडी. पुण्यातल्या भपक्याला भीत मग माझ्यातले क्रिकेट, टेटे आणि बॅडमिंटन हे सगळेच खेळ दुरावत गेले.

इंटर कॉलेज क्रिकेट खेळणं वगैरे पुण्यात जरी झालं नाही तरी बघण्यात अजून स्वारस्य होतं. भारत पाकिस्तान ची वन डे नेहरू स्टेडीयम ला होती. एक तिकीट मिळालं होतं. मी गेलो. गेट वर तोबा गर्दी. गेट उघडल्या बरोबर, पाण्याचा लोंढा घुसावा तसे लोकं पळत सुटले. मी पायर्यांवर पाय घसरून पडलो. मला तुडवत लोकं पुढं गेले. मान वर काढली. गुदमरून मेलो नाही याबद्दल देवाचे आभार मानले.

पाकिस्तानने आपल्याला १२५ मधे उखडलं होतं. बहुतेक तौफिक अहमद होता ज्याने पाच विकेटस काढल्या होत्या. श्रीकांत की कुणाचा तरी कँच एका पाकिस्तानी फिल्डरने बॉर्डरला अफ़लातून पकडला होता. मी टाळ्या वाजवल्या. तर मागे डोक्यावर एकाने जोरात टपली मारली अन म्हणाला "काय रे भिकारचोट, टाळ्या काय वाजवतोस?" कँच चांगला घेतला म्हणून असं म्हणणार होतो. पण गप्प बसलो. रडत खडत आपण हारलो. कुणी जिंकलं म्हणून परत टाळ्या वाजवाव्या वाटत होत्या, पण चार सहा डोळे माझ्यावर रोखून होते बहुधा. त्यामुळे हा जो काय उन्माद चालू आहे, त्याची वाढ अनेक वर्षांपासून हळूहळू होत आली आहे.

साधारण ९७-९८ पर्यंत क्रिकेट फ़ॉलो करण्यात इंटरेस्ट होता. मग वयोपरत्वे कमी होत गेला. २०११ ची फायनल वगैरे काही मोजक्या मँचेस बघितल्या. बाकी काही मिस झालं तर जीवाला हळहळ वाटत नाही. आयपीएल ची तर मी एकही मँच टीव्हीवर बघितली नाही आहे. एक गहुंजेवर बघितली आणि सॉलीड पकलो.

अाता चालू असलेली अंतर्देशीय स्पर्धा चांगली वाटते. भारत कुठल्याही देशाच्या विरूद्ध जिंकला वा हारला तर सारख्याच पातळीचं आनंद किंवा दु:ख होतं. तो जिंकावा असं वाटत राहतं.

उर्वरित स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा.

आणि संघाच्या अतीव चाहत्यांना पण शुभेच्छा 

Thursday 17 March 2016

Who am I

Some time back, I wrote a series of 4 articles named अ…….अभियंत्याचा. I wrote in my mother tongue i.e. Marathi. This being a ritual now a days, to share it on WA, I did it. One my friends asked me question: Why did you write this?. The question was not simple as seen. The hidden meaning between lines also tones "Do you consider yourself over smart?" "I know people read your blogs. Does it mean that you should write any scrap?" "Don't you have any other better thing to do?" "Are you not doing good in business?" He asked only one question, but it echoed many more.
I too questioned myself. Why did I write those experiences? The simplest answer to this was, who else will write this? There is nothing noticeable happened in my career. And my achievement are not those noteworthy that I should write autobiography. I can not beat drums as well. May be I can whisper in someone else's ears by sharing my experience. I lived life so far with straight forward principles with very few hurdles. Still a company from US could locate our company situated in one corner of Pune and decided to join hands with us. 

The first question is often asked "Job or business?" Many young friends ask me this. (I am almost nearing 50 now. Naturally I have right to offer free advice). This set of people normally passes the comment "You are lucky, you are in business" Or "You must be having fun filled life, you being in business" I laugh at them. The things are not easy as you think to do business. I have simple equation. If you work as if you are an employer, you end up climbing managerial ladder and reach top or one day you become an employer. And when you run business as if you are an employee with feeling of creating value of stakeholders, your company reaches new heights. No doubt, you become wealthy having your own business. But you pay price for that. Some pay by offering less time to family or some pay sacrificing on their health. I strongly believe that had I been employee all my life, materialistic point of view I would have been at same status quo as of now. And if some one derives out of this statement that I am not good businessman, so be with it. The only difference I could sense is the liberty to take decision is more as businessman than as an employee.

The other important aspect of business that there is lot of risk. Many people withdraw PF, some one mortgages his house, some one boroughs money from open market to fulfill his or her business dreams. To be frank, I have not done any of it. Does it mean that I did not stretch myself to limits? I did, but not related to money. It does not mean that I had ample of money. But I have stretched my finances till the time I could sustain. While I took risks on all other fronts but not managing finances. And because of this I never had to pinch my stomach to live. It is said that your professional life blossoms when you face odd situations. And mine must have been dull for rest of the world. But personally, I am content with this calculative risk taking life style.
Does it mean that I did not work hard? Certainly I did. I traveled almost 100 kms a day on M 80, I have traveled in six seater hanging half of my body outside of it, many a times I walked under the scorching heat and I have also traveled in trucks to make sales call. But to be frank, I never felt that I am doing some thing great nor did I had grudge for my life style. I enjoyed it a lot.
As a businessman, I prey to the Almighty to give me wisdom to pay my team's money which they deserve in time, pay suppliers payment without any delay and not be defaulter while repaying bank loans. And believe me, He was always kind to me to fulfill these aspirations.
I strongly believe entrepreneur is not a noun but an adjective. It is quality. And this need not be monopoly of businessman alone but it can be quality of employees as well. You may call them as intrapreneur.

I would like to give an emphasis on the fact that business is not too risky affair provided you should have calculative or analytical approach. Once you decide your directions based on professional experience and more over you walk using ethical business practices, no wonder you get on the highway of progress prosperity. This is my experience and I am sure many entrepreneurs will second it.  

Wednesday 16 March 2016

ड्रेसकोड

नवरत्न नावाच्या बिल्डिंग मध्ये आम्ही चौथ्या मजल्यावर राहायचो. दुसऱ्या मजल्यावर पाटील म्हणून कुटुंब राहायचं, रादर अजूनही राहतं. फारच मस्त कुटुंब आहे ते. पाटील काकू म्हणजे मायेचा झरा नुसता. आणि बोलण्याला थोडी ग्रामीण हेल. डोक्यावर कायम पदर घेणाऱ्या काकूंचे बोलणं म्हणजे कानाला मस्त वाटायचं.  नवरत्न सारख्या कॉस्मोपॉलिटीन इमारतीत त्यांनी आपलं मराठमोळं गावपण जपलं आहे. त्यांचा मुलगा बंटी आज पोलीस डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या कामगिरीवर तैनात असतो.

मी सांगतोय तो काळ 2001 च्या सुमारास. त्यावेळेस बंटी असावा विशीच्या आसपास.

त्याच दुसऱ्या मजल्यावर शिरसकर काकू अन त्यांची दोन मुलं राहायचे. मोनिका आणि समीर.  दोघंही बंटीला दादा च म्हणायचे. खूप निर्व्याज मैत्री आहे दोन्ही कुटुंबाची. तेव्हाही होती. मोनिका साधारण बंटी पेक्षा एखाद दोन वर्षांनी लहान.

दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक एकमेकांना ओळखायचे. दोन दशकापूर्वी अशी नाती असायची.

तर झालं असं की एके दिवशी मोनिकाच्या तीन चार मैत्रिणी तिच्या घरी राहायला आल्या. आता बंटी दादा ला त्यांची भेट घडवणं हे क्रमप्राप्त होतं.

दुसऱ्या दिवशी या पंचकन्यांचा मोर्चा बंटी दादा कडे. नव्या जमान्याच्या मुली त्या. शॉर्ट, स्लिव्हलेस बनियन टाईप काहीतरी टॉप. असा तो अवतार. आणि पाटलांच्या दरवाजावर थाप "बंटी दादा, हे बघ मी माझ्या मैत्रिणींना घेऊन तुझ्याकडे आली आहे" इति मोनिका

बंटी भौ, चड्डीत अन बनियन मध्ये सोफ्यावर तंगड्या पसरून टीव्ही पाहत होते. मोनिका चा आवाज आणि तिच्या बरोबर मैत्रिणी हे ऐकल्यावर तो तारुण्य सुलभ भावनेने ताडकन कपडे बदलण्यासाठी निघाला.

किचन च्या खिडकीतून पाटील काकूंना हा पोरींचा जत्था दिसला आणि त्या ओरडल्या "अरे बंटी दार उघड बाळा" बंटी लगबगीत म्हणाला "आलोच कपडे व्यवस्थित करून. चड्डी अन बनियन वरच आहे मी"

तर काकू आपल्या मस्त ग्रामीण भाषेत म्हणाल्या "आरं, नगं उगी लगबग करूस. त्या पोरीबी तसल्याच कपड्यात हायेत. गप, दार उघड".

चड्डी या विषयावर खूप चर्वण चालू आहे. म्हंटलं आपण पण हात धुऊन घ्यावेत.

(बाय द वे, वडाच्या झाडाला मी एकदा शायनिंग टाकत बनियन ट्री म्हणालो तर इंग्रजी माध्यमात शिकलेली आमची एक मैत्रीण फणकाऱ्याने म्हणाली, अरे ते बॅनियन ट्री म्हणायचं. काही नाही, लिहिता लिहिता आठवलं आपलं.

बॅनियन ट्री म्हणे)ड्रेसकोड

Friday 11 March 2016

Entrepreneurship Development

पोस्ट टाकली अन बऱ्याच लोकांनी विचारलं की व्हिडियो नाही का? अगदी खरं सांगू, मी पहिल्यांदाच हे भाषण वगैरे करत असल्यामुळे ते काही सुचलंच नाही. तर जे काही सांगितलं ते संक्षिप्त रुपात लिहायचा प्रयत्न करतो आहे.

- मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असते. त्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर पूरक शब्द आहेत. आणि उद्योजकता हा शब्द नोकरदाराला पण लागू होऊ शकतो.

- काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये. तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाचा उद्देश हा कमर्शियल ठेवतो तर उद्योजक मात्र value creation चं काम करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील कनेक्टेड गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो. व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल. कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक calculation मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक analytical approach बरोबर intuition चा आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते. व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.

- ज्या नोकरदारांमध्ये उद्योजकता असते त्यांना Intrepreneur म्हणतात. अंतर्गत उद्योजक. साधारणपणे हे Intrepreneur लोकं नोकरीच्या ठिकाणी टॉप पोझिशन ला जातात नाही तर मग Entrepreneur बनतात.

- उद्योजकाच्या बिझिनेस चालू करण्याच्या पहिल्या चार स्टेप असतात. तो बिझिनेस हा छंद म्हणून चालू करतो. तेव्हा काही भव्य दिव्य आपल्याकडून घडेल हे त्याच्या ध्यानीमनी नसतं. मग तो त्याच्या कडे व्यवसाय म्हणून पाहू लागतो. आणि सप्लायर आणि कस्टमर यांच्याशी नेट्वर्किंग करू लागतो. मग हळू हळू स्वत:ची टीम जमवू लागतो. आणि मग साधारण पणे काही वर्षात त्याला व्यवसायच रूप येतं. या ठिकाणी व्हिजन, मिशन, strategy यांचा वापर करून पुढचा road map ठरवावा लागतो.

- स्वत:ला व्यवसायापेक्षा मोठं समजू नका. व्यवसायाकडे त्रयस्थ नजरेने बघा. 

- बिझिनेस करताना लोकांचा पगार, सप्लायर्स चे पैसे आणि बँकेचे हप्ते वेळेवर द्यायचा आटोकाट प्रयत्न करा. अगदी जीवाच्या पलीकडे जाऊन. 

- बँक तेव्हाच तुम्हाला लोन देईल जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसेल. लोन हवं असेल तर balance sheet स्ट्रॉंग बनवा. दारासमोर BMW आहे अन Balance Sheet स्ट्रॉंग नसेल तर बँक लोन देणार नाही. बँकेबद्दल कितीही मिस कन्सेप्शन असतील तरी लोन घेण्यासाठी बँके इतका trusted पार्टनर दुसरा नाही. रादर बँक आपलं जितकं लोन approve करते, आपण तितकेच पैसे  उचलायला लायक असतो. बँकेकडून लोन घेऊन परत बाहेरून पैसे उचलायचा वेडेपणा करू नका.  

- काही मुद्दे सांगितले.
१. Be open to change. Do not resist change. Change is always for good. Change is short term. Transformation is long term. Change is starting point of transformation. Aim to transform the thing. 
२. Cash flow is reality. Profits are notional. 
३. Act. Action is more important, even if it proves wrong, than not acting at all. The consequences of mistakes out of action is normally of lesser magnitude than not acting. You have to break an egg if you want to eat an omelet. Do not procrastinate. Action delayed is action denied.  
४. Think on broader scale. Do not let your thought process hover around you and your family. Think beyond that. Think for your colleagues, society and most important, the nation. तुमच्या टर्नओव्हर ची सांगड, भले तो कितीही कमी असू दे, देशाच्या GDP शी लावली, मग तो fractional percentage मध्ये असे ना का , की व्यवसायाचा उद्देश बदलून जातो. 
५. Aim to goal. Simply dribbling a ball will not allow you to lift a trophy. Pushing a ball in to net will.
६. Be an employee, be an employer. उद्योजकता अंगात असेल तर मग नोकरी करा व व्यवसाय, यश तुम्हाला जवळ करणार. 

अजून बरेच मुद्दे आहेत, पण ते खूप पाल्हाळ लावल्यासारखं होईल. महत्वाचे मुद्दे वर कव्हर केले आहेत. यातले काही पुस्तकी आहेत तर बरेच माझी मतं आहेत. कुणाला त्यावर चर्चा करायची असेल तर स्वागत आहे. कदाचित माझेही काही मिस कन्सेप्शन दूर होतील. 

एखाद्या रम्य संध्याकाळी यावर चर्चा करण्यासाठी तुमच्या बरोबर बसायला आवडेल………चहा प्यायला हो! तुम्हाला काय वाटलं? 





Thursday 10 March 2016

JV

२०१२ साली मी आणि माझ्या पार्टनर ने आमचे स्टेक सेट्को ला विकले, तेव्हा आम्हाला पहिला प्रश्न विचारला "का विकली तुम्ही कंपनी" अवघड प्रश्न खरं तर. आमचीच ब्रेन चाईल्ड असलेली कंपनी, जी आम्ही गोर्यांना विकली. काही जणं genuinely प्रश्न विचारायचे. पण बर्याच जणांचा भाव असा असायचा की "येडे आहात का तुम्ही कंपनी विकता आहात?" जेव्हा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारला तेव्हा मला ही हाच प्रश्न पडला "मूर्ख आहोत का आपण, कंपनी विकली ते?" खरं तर हे करण्यामागचे काही कारणं होती जी मला पक्की माहित होती, पण जवळचे, दूरचे मधील बरेच जणं हे विचारीत तेव्हा माझाही आत्मविश्वास जरा डळमळला. मला जरी उत्तरं माहित होती तरी लोकांच्या मनातील विचार ऐकून मला धक्का बसायचा.

पहिला डायलॉग.: "बघ भावड्या, पुढच्या तीन वर्षात तुला कंपनीच्या बाहेर फेकलेलं असेल. मग बसा बोंबलत" joint venture चं चौथं वर्षं चालू आहे आणि असं काही पुढच्या ७-८ वर्षात तरी होण्याची सुतराम शक्यता नाही आहे. किंबहुना प्रकृती मुळे मीच जरा डचमळलो तेव्हा या गोर्यांनी माझं मनोधैर्य उंचावलं. अगदीच खरं सांगायचं तर प्रोफेशनल नात्यापलीकडे जाऊन मैत्रीचे बंध घट्ट होत चालले आहेत.

दुसरा डायलॉग: 'बघा बॉस, कुणीतरी अमेरिकेहून येईल अन बसेल तुमच्या बोकांडी. मग नाचा तो सांगेल तसं" अगदी खरं सांगू, असं काहीही घडलं नाही. JV होण्या आधी मी जशी बिझिनेस ची वाट लावायचो तशीच आज ही लावतो आहे. आज ही आधी सारखी मनमानी चालू आहे. खरं तर जेफ आणि क्रेग आम्हाला नवनवीन गोष्टी करायला भरीस पाडतात. चेन्नै सर्व्हिस सेंटर चालू करणं हे आर्थिक दृष्ट्या फार अवघड नव्हतं, पण ते चालू करताना जो मोरल सपोर्ट लागतो तो नक्कीच त्यांनी दिला.

"बघ हं, तुमचं नाव मार्केट मधून गायब होईल. आणि ते झालंही. पण त्यांच्या मुळे नाही तर मीच त्यांच्या मागे लागलो की आपण अल्ट्रा प्रिसिजन नाव बदलून सेटको स्पिंडल ठेवू यात. आणि या मागे काही कारणं होती. आणि हे डिसिजन घेतल्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. 

मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे की काय कारण असेल की हजारो मैल दूर असलेल्या एका मोठ्या कंपनीच पुण्यातल्या एका छोट्या कंपनीबरोबर व्यवस्थित पार्टनरशिप चालू आहे. बाकी काहीही कारणं असोत, एक कारण मात्र छातीठोकपणे मी सांगू शकतो आणि ते म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता. JV चालू झालं तेव्हा आम्ही आठवड्यातून एकदा फोन वर बोलायचो. आता आम्ही महिनो न महिने फार बोलत नाही. झालंच तर चार महिन्यातून एक मिटिंग होते. कंपनीसाठी काही गोष्टी सगळे मिळवून ठरवतो आणि त्यावर अंमलबजावणी करतो. वाद होतात, नाही असं नाही पण दोघांना माहित असतं की हे कंपनीच्या फायद्यासाठी आहे. वैयक्तिक अहंकार कुरवाळायला कुणीही बांधील नसतं.  
हे मी का सांगतोय? तर बर्याच छोट्या व्यावसायिकांना या JV प्रकाराबाबत एक अढी असते. पण तुमच्या कंपनीपेक्षा तुम्ही स्वत:ला मोठे समजत नसाल आणि एखाद्या तटस्थासारखे आपणच उभ्या केलेल्या बिझिनेस कडे पाहत असाल, तर JV सहज होतं आणि त्यात काम करणे हा एक आनंददायी अनुभव असतो.  

Developed Nation 1

- India will be developed nation when rich people will take pride in 
commuting in public transport and not when poor people will dream of buying a car. 


- India will be developed nation when we can exchange Indian rupee against dollars or euro at currency exchange bureau at international airport. 
- India will be developed nation when any other Rajesh can open up company near to his native Parbhani and will  not face problem of digital divide or skilled manpower. 
- India will be developed nation when fully loaded truck will run at 70 kmph and reach from Bangalore to Pune without even minor accident. 
- India will be developed nation when bottled water will be sold not for non availability of pure water but for ease in carrying it. 
- India will be developed nation when my parents will not worry of going from one platform to other by staircase in railway station.
- India will be developed nation when a man will ride a cycle rikshaw for joy and not for meeting his daily expenses on food. 
And 
- India will be developed nation when we open Sonography clinics again not for killing female fetus but to celebrate arrival of bundle of joy irrespective of if it is a boy or girl. 
Let us put our full energy, force to rotate this giant wheel to achieve the required momentum so that it rotates in its own to go to next orbit. 









Wednesday 9 March 2016

Developed nation

Once I was watching Malaysia photographs in Delhi at my cousin brother's house, who just returned from there. I was really jealous of Malaysia. What a tiny country which developed beyond our imagination. But then I realised, there are many countries around world who are nowhere near India, when we compare them with size or population. These countries are developed to such a magnitude that we are really surprised and awestruck to watch them. Let it be Singapore of area 100 sqkm or be Thailand. Take the case of Taiwan or Indonesia or for that matter a micro size of Mauritius. But the quality of life in those countries is much better than even Mumbai. In fact as a countrymen, we are far better than many countries on the business aspects of transparency. We are flexible and adaptable. We Indians are neither stubborn or rigid nor arrogant. We are frugal. Despite all such beautiful qualities, we are left far behind than rest of the world as far as prosperity is concerned. 
I was accompanied once by an American in car while traveling from my home to the company. We were stopped at signal in Swargate square. We were surrounded by many beggar kids knocking glass for want of money. Fellow American said to me "Rajesh, I have traveled so many countries around the world, but believe me I have not seen such poverty level anywhere else in the world. As a society, why can't you do something to eradicate this?" I was depressed for next couple of hours. 
Keeping aside political conditions, I feel that we do not follow some of the basic things in day to day life. We lack in self discipline, passion for cleanliness, integrity at every stage of life. The over glorification of history is one big hurdle in our progress. We are too much engrossed in pampering our past which has no relevance for today or tomorrow. In short we are falling short in strengthening our social commitments towards nation. We feel too good of ourselves as a country when Mr Nadela, Ms Nooyi or Mr Pichai  head some foreign companies. But we forget to anlyse if it was possible had any of them stayed in India to pursue their professional career.
Indeed, we all have to work hard. We all have to put up our sleeves and make this country livable and lovable. We should stop beating the drums of calling our country as "prospective superpower". We have been calling this ourselves for years together and still carries the tag "developing nation" instead of "developed nation".  
I know, it is really futile exercise to write blog on the subject. But we can pass on the message of following basic mandatory qualities through this social and professional media network. And who knows, a chain reaction can be developed to pass on such messages only to bring change in the society and then subsequently in the nation. Finally, this is the first step by keeping faith that we have to shoulder the tag of "Developed Nation" by 2020. 

an Entrepreneur

Saturday March 5, 2016. Indeed, it was a day that I will remember for rest of my life. 

Dr Jayant Patil, Principal RC Patel Institute of Technology is connected with me on Facebook. He is an IITian and Doctorate. I am lucky to call him friend by virtue of social media connection. Dr Patil called me two weeks back and said "I read your blogs. Why don't you share your experience on entrepreneurship with final year students of mechanical engg of our college?" I happily nodded positively only to feel later, if I have made mistake by saying "yes". I also felt as if some one is asking Ashish Nehra to coach budding batch of batsmen.  

I kept aside all negative vibes and reached Shirpur at 8:30 am. And believe me, I was taken a back with the prosperity this college and town possess. The huge college building, properly maintained lush green lawn, air conditioned class rooms, thousands of computers placed in many labs, workshop equipped not with education models but actual machines, king size play ground, library filled with books of all the topics under the sun and I could sense the positive energy all around the premises. 

And what a town it is! Widened concrete roads, no signs of water shortage despite we are on the blink of summer, municipality with under ground drainage system all across town, water table which once went down to 350 ft has come back to 30 ft because of numerous water conservation projects, a textile park offering jobs to thousands of young people and also offering ready market to cotton producer who were otherwise sending cotton to other states, gold refinery. Ya! you read it right, a gold refinery. Yes, my friends, I am talking about a town which is very much located in our nation, in our state called Shirpur. I was watching this whole development process led by visionary Mr Amrish Patel. 

Exactly at 11 am, I started my speech on entrepreneurship development in front of 110 young engineers with 15 professors. I just asked them, if I can speak in Marathi. There was big sigh of relief in me when all of them agreed. I know, I can better express myself in my mother tongue. Within no time, I could hold grip on audience. There was time when laughter erupted and many a time they clapped. This was my first experience to hold interactive session with so many young people. I do not know what students and professors thought of it, but I thoroughly enjoyed those 120 minutes. Yes, I was talking for good 2 hours. I have opened many cards, principles on which I nurtured this business. And believe me, I received standing ovation and big round of applause. No wonder, I would hear that clapping sound for many years to come. The two girls were reading thanks giving speech and I was mesmerized with the experience I had some minutes before.  

I know Rajesh, who has once traveled inter cities across India by every known mode of transport and now a frequent flyer. I also know Rajesh, who once commuted on M 80 for sales calls and now commutes in air conditioned car to attend business meetings. I like him. No doubt about it. But I love Rajesh, who at the age of 12 could not speak even for 3 minutes and today could hold his feet for 120 minutes with extempore talk. I admire this Rajesh than other two cases. Indeed, I consider it as an achievement. 

Normally, speaker leave that flower bouquet on the stage once function is over. But I carried it along with myself. I wanted to carry those 120 minutes along with rose aroma which was practically spreading over my brain, my heart and in fact every part of my body. 

To my utter surprise, Dr Patil offered me a packet with money. In fact, we never spoke of it and so I denied. But Dr Patil saw to it that I accept it. I could have same joyous feeling which I had while taking my first salary when I was 21 or for that matter same joyous feeling which I had when  I received a cheque for column writing in Dainik Samna, last year. The amount was never important, the key was deep satisfaction feeling at the bottom of heart. 

I just distributed the amount among employees who completed 5 years in my company. They are responsible ones for what I am today.......an Entrepreneur.  

Tuesday 8 March 2016

JV

In 2012, myself and my business partner sold our stake of our company to Setco, the first question that was asked "Why did you sell maximum stake of your US company?" It is nice question. But the hidden question was "Are you idiot to sell your own stake?". When I observed that many friends and technocrats have asked this question, I gave a thought and asked question to myself  "Am I really fool to sell my own company?"
The first thing which every one would say "Look, you will be thrown out of  company in next 3 years". We are running in 4th year of JV and there are no signs that to happen. In fact the bond is growing stronger, every day.
The another statement "Be aware, some one from abroad will sit on your head and you will have to dance on his tunes." To tell you frankly, there is no change in our status and we still have freedom to take decisions which are in the best interest of the company. Our principal from  will act as catalyst to expedite for decisions of expansion, they  give advice on cash flow management. In fact they support us morally and help is to expand methodologically, analytically. 
"Remember, your name will be wiped out of market" Indeed, it happened. But not because of them. It was we, who proposed to change our company name from Ultra Precision Spindles Pvt Ltd to Setco Spindles India Pvt Ltd. There are certain reasons behind it. And we do not have any regrets giving up our name which was otherwise our brain child. 
I wonder, why this JV between big US company and macro Indian company is going great?. I think one of the main reasons is transparency in transactions. We used to have weekly call in initial days. But, now after 4 years, we do not call each other for months together. We meet once in 4 months, hold our board meeting, exchange our thoughts, decide on actions and work on it. We do have difference on opinions on certain issues. But while arguing, both the companies know that it is debated in the best interest of company and not to pamper individual's ego. 
I would like to state here that JVs are not that bad as said by many owners, in particular of SMEs.  If you look at your own enterprise by bird's eye view, JVs work wonders, where you enjoy liberty in taking decisions by having international exposure in all areas of business. 
Rajesh Mandlik (9822454204,RajeshM@Setco.com)

Sunday 6 March 2016

५ मार्च २०१६.

शनिवार ५ मार्च २०१६, एक संस्मरणीय दिवस होता माझ्यासाठी.

फेसबुक वर मित्र आहेत डॉ जयंत पाटील, प्राचार्य आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि शिरपूर चे. स्वतः एम टेक आय आय टी खरगपूर अन डॉक्टरेट. अशा उच्च विद्याविभूषित माणसाला ह्या फेबु मुळे आपण मित्र वगैरे म्हणू शकतो, हे थोर आहे. तर
सरांनी मला वीस एक दिवसांपूर्वी फोन केला अन म्हणाले "मी तुमच्या पोस्ट वाचतो. तुम्ही आमच्या कॉलेज मध्ये entrepreneurship विषयावर मेकॅनिकल इंजि च्या फायनल इयर च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधाल का?" हो तर म्हणून गेलो मी. पण मनात आलं हे म्हणजे होतकरू फलंदाजांसमोर आशिष नेहरा ला उत्तम batting कशी करावी हे सांगायला बोलावण्यासारखं आहे. पाटील सर थोडे गल्ली चुकले का?

तर पोहोचलो सकाळी साडे आठ नऊ च्या सुमारास. आणि मग डोळे विस्फारत ते कॉलेज अन शिरपूर गावाची महती ऐकली, अनुभवली. भव्य बिल्डिंग, व्यवस्थित मेन्टेन केलेली लश ग्रीन लॉन, वातानुकूलित क्लास रूम, हजारो कॉम्पुटर असलेल्या लॅब, मॉडेल न ठेवता वर्क शॉप मध्ये खऱ्या मशिन्स, खेळण्याचं ग्राउंड, भली मोठी लायब्ररी, आणि सकारात्मकतेने भारलेलं असं ते कॉलेज.

अन गावभर काँक्रिटिकरण झालेले प्रशस्त रस्ते, उन्हाळा तोंडावर आलेला असताना पाणी टंचाई आसपास न फिरकणारी जल व्यवस्था, अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टम असणारी नगरपालिका, पंधरा वर्षांपूर्वी ३५०फुटावर गेलेलं वॉटर टेबल आता जलसंवर्धनामुळे ३० फुटावर आलं आहे ते, कापूस पिकून तो बाहेर जाऊ नये म्हणून दहा हजार लोकांना जॉब आणि शेतकऱ्यांना मार्केट मिळवून देणारं टेक्स्टाईल पार्क, आशियातील पहिली गोल्ड रिफायनरी, हो, गोल्ड रिफायनरीच, कुठल्याही किमतीला शेत जमीन न विकण्याची मानसिकता. हो हो, मी आपल्याच देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या अमरीश पटेल नावाच्या नेत्याने केलेली करामत केलेलं गाव विस्मयचकित होऊन बघत होतो.

आणि मग अकरा वाजता माझं Entrepreneurship Development वर बोलणं चालू झालं. पोरांना विचारलं, मराठीत बोलू का. होकार मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. आणि मग एकेरी, दुहेरी धावा घेत मग जसे चौके, छक्के बसू लागतात तसं ते भाषण रंग भरू लागलं. हंशे वसूल होऊ लागले अन प्रसंगी टाळयाही पडू लागल्या. माझा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. त्या मुलांचं अन प्रोफ़ेसरांचं काय मत झालं ते तेच जाणे, पण मी मात्र ते १२० मिनिटे खूप एन्जॉय केले. हो, तब्बल दोन तास बोलत होतो. ज्या तत्वांना धरून हा बिझिनेसची नैय्या हाकली, ते सगळे पत्ते ओपन केले. आणि प्रश्नोत्तराच्या वेळे नंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो कित्येक दिवस माझ्या कानात गुंजत राहील. त्या दोन मुली आभाराचे भाषण वाचत होत्या अन मी उभ्या जागी थिजलो होतो.

शप्पथ सांगतो, मिळेल त्या वाहनाने इंटर सिटी प्रवास करण्यापासून फ्रिक्वेन्ट फ्लायर झालेल्या अन १९९४ साली एम ८० वरून मार्केटिंग करत आज वातानुकूलित कार मध्ये बिझिनेस मिटींगला जाणाऱ्या राजेश पेक्षा हा वयाच्या १२ व्या वर्षी पहिलं भाषण ३ मिनीटेही न बोलू शकणारा आणि आता १२० मिनिटे extempore बोलू शकणारा राजेश मला स्वतः ला जास्त भावला. आयुष्य सार्थकी लागलं.

अशा प्रसंगी तो मिळालेला बुके वक्ता तिथं सोडून जातात. मी मात्र तो घेतला बरोबर. त्या गुलाबाच्या सुवसाबरोबर मी १२० क्षण मी अंगात भिनवून घेतले. माझ्या मनाच्या कुपीत ते क्षण आता बंदिस्त झाले आहेत.

ध्यानी मनी नसताना त्या कॉलेजने पाकीट हातात दिलं, मानधानचं. हे काही बोललो नव्हतो मी, पण पाटील सरांनी आग्रहाने घ्यायला सांगितलं. वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेल्या पहिला पगार अन आयुष्याच्या या टप्प्यात  दैनिक सामना ने सदर लिहिल्याबद्दल दिलेला चेक अन हे पाटील सरांनी दिलेलं पाकीट, प्रत्येक वेळी आनंदाची अनुभूती तीच. रक्कम किती ते महत्वाचं नव्हतंच कधी. भाव महत्वाचा.

आनंद शितोळे म्हणालेच आहेत "फेसबुक म्हणजे हातात मिळालेली जळती काडी आहे. मग तिने स्वतः ला च प्रकाश देणारी पणती पेटवायची, की दुसर्यांना प्रकाश दाखवणारी मशाल पेटवायची की सगळंच दहन करणाऱ्या मारुतीच्या शेपटीला आग लावायची, हे तुम्ही ठरवायचं"

मला मात्र आयुष्याला अर्थ देणारे अनेक अध्याय फेसबुकमुळे वाचायला मिळाले आणि अजून कित्येक वाचायला मिळतील या बाबत माझ्या मनात शंका नाही. 

Thursday 3 March 2016

कॉमेंट्स

मला काही मित्र सांगतात की पुस्तक काढ जे लिहितो त्याचं. मागे यावर थोडं लिहिलं होतं. फेसबुक किंवा ब्लॉग लिहिणं हा एक फॉर्म आहे. आपल्या क्रिकेट मध्ये कसं टेस्ट, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी तसं.  पुस्तक लिहायला एक कमिटमेंट लागते. फेसबुक वर मित्र यादीच्या १०-२०% लाइक मिळवणारा माणूस लेखक होऊ शकेल यावर मला शंका आहे. हं, कदाचित त्याच्यात लिहिण्याचा किडा असेल, पण ती सवय कल्टिव्हेट करण्यासाठी खूप पापड बेलावे लागतील.

फेसबुक वर लिहिलं जातं त्यात लांबीची फक्त काळजी घ्यावी लागते. रुंदी ची काळजी तुमचा स्क्रीन घेतो. मोबाईल, आय पॅड, डेस्कटॉप, काहीही असलं तरी रुंदी फिट बसते. बाकी फेसबुक वरच्या लिखाणाला खोली कुठे लागते? ती लागत नसल्यामुळे मी खूप फडफड करू शकतो. त्यामुळे कंटाळा न येईपर्यंत च्या लांबीत शब्द संपदा घुसडली की जमतं सगळं.

अगदी खरं सांगायचं तर, मला तर माझ्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स जास्त आवडतात. म्हणजे, आता नावं लिहित नाही, काही मित्र अगदी कॉमेंट स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे ते पोस्टत नाहीत पण त्यांच्या कॉमेंट्स! क्या कहने. म्हणजे काही उत्तम लिहिणाऱ्या लोकांच्या कॉमेंट्स छान असतात च. पण मी लिहितो ती कॅटेगरी वेगळी. हे कॉमेंट पटू. प्रतिक्रियावादी. कधी संवादी तर कधी विवादी. त्यांच्या कॉमेंट्स मध्ये भावोत्कटता असते, अभिनंदन असतं, मैत्र असतं, हास्य असतं आणि कधी चीड ही. एक माझे मित्रवर्य असे ही आहेत की जे पोस्ट ला सहमत असतील तर लाइक ठोकून जातात अन नसतील तर खडूस, तिरसट अशी कॉमेंट आवर्जून करतात. माझे तर कित्येक ओळखीचे लोकं म्हणतात ही "राजेश, तु ठीक लिहितोस, पण त्या वरच्या कॉमेंट्स बहारदार असतात" मला तर हे ऐकून कधी कधी असं वाटतं की आपण काही न पोस्टताच कॉमेंट पडाव्यात.

मी स्वतः उत्तम कॉमेंट कर्ता नाही आहे. त्यामुळे मी कॉमेंटत नाही. मागे त्यामुळे आत्ममग्नतेचा माझ्यावर आरोप केला. म्हणजे काय तर मी माझ्याच पोस्ट वर बागडतो. खरंही असेल ते. पण पोस्ट लिहायची, कॉमेंट वाचायच्या, शक्य तिथे रिप्लाय द्यायचा अशी देशोन्नतीची कामं केल्यावर परत दुसऱ्यांच्या पोस्ट वाचायच्या अन त्यावर ही कॉमेंटायचं. खूप होतं ते. त्यामुळे अगदी वाचेल त्या पोस्ट वर कोमेंटायला होत नाही. आता काही पोस्ट असतात च अशा की जिथे प्रतिक्रिया क्रमप्राप्त असतं. आणि झालंय असं की पुण्यात 30 वर्ष राहिल्यामुळे दुसर्यांची स्तुती हात राखून करतो अन विद्रोह, अस्मिता वैगेरे भावनांशी तोंड ओळख नसल्यामुळे कॉमेंट पण एकदम सपक.

असो. तर सदर पोस्ट समस्त कॉमेंट कर्त्याना समर्पित. तुमच्या अशा विविध रसांनी ओथंबलेल्या कॉमेंट नसत्या तर हे प्रकरण फारच निरस असलं असतं.

आणि हो, आता मित्रांना सांगतोच आता की पोस्ट पेक्षा कॉमेंटचं संकलन करतो अन त्याचं पुस्तक काढू. माझ्या पोस्टीपेक्षा ते नक्कीच जास्त वाचनीय असेल. 

Tuesday 1 March 2016

समास

एक ट्रेनिंग प्रोग्रॅम चालू होता. काही सिनियर मंडळी होती, काही हुशार लोकं पण होती. या सगळ्यामध्ये एक frail, दोन वर्ष अनुभव असलेला तरुण पण होता. चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या मुलाकडे कुणाचं लक्ष असण्याचं कारण नव्हतं. त्यालाही त्याची जाणीव होती. एका कोपर्यात तो निमूटपणे बसला होता.

 ट्रेनर ने चार भूमितीचे आकार सांगितले. सर्कल, त्रिकोण, चौरस आणि चौथा आकार म्हणजे विचित्र होता झेड आकाराचा.

सहभागी असलेल्या लोकांना त्यांनी आवडता आकार कुठला ते लिहायला सांगितले. मग प्रत्येक आकार तो म्हणायचा आणि ज्यांना तो आवडतो त्यांनी  हात वर करायचा.

सर्कल, उपस्थितांपैकी 8 एक जणांनी हात वर केले.

त्रिकोण, 12 जणांनी हात वर केले.

चौरस, 10 जणांनी अनुमती दाखवली.

झेड आकार आवडतो असं सांगणारा मात्र एकंच दिवटा निघाला. सगळे जण त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. त्याला ही खूप अवघडल्यासारखं वाटू लागलं.

त्या ट्रेनर ने प्रत्येक आकाराचा अर्थ सांगायला सुरुवात केली. सर्कल आवडणाऱ्या लोकांचे गुणविशेष, त्रिकोण ज्यांना भावतो त्याची खासियत आणि चौरस ज्यांना आवडतो ते कसं काम करतात हे सांगितलं.

आता राहिला झेड आकाराचा अर्थ. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर कुतूहल तर ज्याने झेड आकार आवडतो असं सांगितलं त्याला टेन्शन. झेड, हा काय आकार आहे. कुठून ते लिहिलं असंही वाटून गेलं.

ट्रेनर म्हणाला "शक्यतो झेड आकार ज्यांना आवडतो ते हुशार नसतात, पण आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे असतात. आलेल्या परिस्थितीला तोंड कसं दयायचं हे त्यांच्या पटकन लक्षात येतं, कारण ती लोकं रिजिड नसतात, तर adaptable असतात. We should have at least one in the organisation who likes Z shape and we are lucky to have one in our group"

अचानक त्या मुलाकडे सगळे कौतुकाने पाहू लागले. सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं.

अगदी शब्दांच्या गर्दीत, एरवी दुर्लक्षित असलेला, समासातला शब्द, लक्ष वेधून घेतो, तसंच.

😊😊

यश अपयश

इंटरव्ह्यू घेताना बऱ्याचदा अशी लोकं येतात की ज्यांचा आधी स्वतः चा बिझिनेस असतो. पण काही कारणामुळे तो अयशस्वी झाला असतो.

ह्या लोकांकडे त्या जॉब ला लागणारे क्वालिफिकेशन आणि अनुभव असतो. पण तरीही ते स्वतः त्यांच्या बिझिनेसमध्ये अपयशी झाले असतात, यामुळे मनात त्यांच्या capability बद्दल एक शंका तयार होते. जर ते स्वतः चा बिझिनेस वाचवू शकले नाही तर दुसऱ्याचा कसा सांभाळू शकतील हा प्रश्न उभा राहतोच.

मला कळतं की असं pre occupied notion मनात असणं हे त्या माणसावर अन्याय करणारं आहे. पण मी अशा लोकांना बोर्ड वर घेऊ शकलो नाही हे वास्तव आहे. ही पॉलिसी चुकीची असू शकते याचा मी बर्याचदा विचार करतो.

मनातच काही पॉलिसीबद्दल रिजिड राहून एखाद्या गोष्टीकडे बघणं कसं चुकीचं ठरू शकतं याचं फार मार्मिक उदाहरण ली आयोका याने आपल्या आयोका बाय आयोका या आत्मचरित्रात दिलं आहे. आयोका ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी. आयोका फ़ोर्ड कंपनीत इंजिनियर म्हणून जॉईन झाले आणि प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचले. फोर्डला मस्टांग सारखी अनेक अपत्य त्यांनी दिली. ते इतके लोकप्रिय होते की अमेरिकेचे प्रेसिडेंट कँडिटेट असणार होते. बर्याच अँड मधे ते स्वत:च असायचे. मतभेदामुळे त्यांनी फ़ोर्ड सोडली, रादर he was fired. आणि त्यानंतर त्यांनी क्रायसलर ही भारतात फार लोकप्रिय नसलेली, पण बिग थ्री पैकी एक जॉईन केली. क्रायसलर पूर्ण डबघाईला आली होती आणि तिला आयोकांनी कसं उर्जितावस्थेत आणलं त्याची चित्तथरारक कथा त्या पुस्तकात आहे.  (आयोका चा उच्चार आयकोका करायचा असतो म्हणे. फारच अवघड स्पेलिंग आहे त्याचं. कंस चालू झाला तर अमेरिकन आडनावाचा एक क़िस्सा सांगून टाकतो. आमचा एक परिचित आला होता ज्याचं आडनाव होतं आयकानसिअर. त्याचं स्पेलिंग ह्या आयकोका सारखंच अवघड. त्याने व्हिजिटिंग कार्ड वरच आडनावाच्या खाली लिहून टाकलं I-CAN-SEE-HER, असं वाचा)

तर आयोका म्हणतात "फोर्डची एक पॉलिसी होती की युनिव्हर्सिटी तून फक्त टॉपर फोर्डमधे जॉईन करून घेत असत. It means, had Mr Isaac Newton and Mr Albert Einstein been studying in the same university, Ford was lucky enough to hire only either of them"

काही गोष्टींसाठी कन्वेन्शनल पॉलिसीला तिलांजलि द्यावी.

चेन्नैत असाच बिझिनेस मधे अपयशी ठरलेला माणूस सेल्स मँनेजर म्हणून घेतला आहे.

बघू काय होतं ते. 😊😊

अनिल अंबानी

खुपदा विचार करतो पोस्टू नको यात आज. पण प्रवासात लोकं भेटतात अन विषय देऊन जातात.

जेफ बरोबर काल राजकोट विमानतळावर होतो. एक बंधू उगाच माझ्याकडे हसत होता. मी पण हसल्यासारखं केलं. गडी चांगला सुटाबुटात होता. बोर्डिंग पास घेऊन झाल्यावर जेफबरोबर गप्पा मारत असताना तो आला अन मधेच येऊन म्हणाला

बंधू: आपको कही देखा है
मी: अच्छा, मुझे नही लगता

मी असं बोलल्यावर काही न बोलताच परत गेला.

आमच्या गप्पा चालू झाल्यावर परत हा मधेच येत म्हणाला

बंधू: क्या आप अहमदाबाद मे रहते हो
मी: नही

पुनामे रहता हूँ म्हणेपर्यंत पंटर परत त्याच्या खुर्चीकडे रवाना.

काहीवेळाने परत आला अन म्हणाला "मुझे कहा वो समझमे नही आ रहा है, लेकिन हम कही मिले है" आता मात्र मी नाराज झालो. कारण मी आपण कसं आधी नाही भेटलो हे सांगायच्या आत, बंधू पाठ करून चालू लागायचा. आताही "मेरा पुनामे बिझिनेस......." असं चालू केलं तर पंटर गायब. लैच सटकली. जेफ ला कळंना काय चालू आहे ते.

विमानात बसण्यासाठी रांगेत उभा राहिलो अन तो परत माझ्याकडे आला.

"क्या आप रिलायन्स मे काम करते हो?"

माझा पेशन्स संपला.

मी म्हणालो "हो"

त्याच्या चेहर्यावर हसू उमटलं अन खुशीत येऊन मला म्हणाला

"क्या नाम है तुम्हारा?"

मी बोललो

"अनिल धीरूभाई अंबानी"

नंतर मुंबईला लगेज बेल्ट वर दिसला तो. पण तसाच गेला. मी दिसलो म्हणून बँग सोडली का बेल्टवर, काय माहित?

😊😊

सापेक्ष

कसं आहे की, कुठल्याही व्यक्तीबद्दलची प्रतिमा ही सापेक्ष असते. म्हणजे आता बघा, एखादा लाचखोर माणूस असेल अन तो बायकोला नवलखा हार आणून देत असेल तर तिच्या नजरेत तो भारीच, नाही का? त्यांचे पोट्टेही त्याच्यावरून जीव ओवाळत असतीलच, नाही का? पण ज्यांच्याकडून पैसे खाल्ले, त्याचा तळतळाट लागेल की हो त्याला.

म्हणजे कसं आहे, तो सलमान. आता परवा तो फिल्मफेयर प्रोग्रॅम मन लावून बघत होतो. अन आला की हा बाबा. फुटपाथ वाल्याला उडवलं अन त्याही पेक्षा रवींद्र पाटलाची स्टोरी. मनातून उतरलेला तो दबंग गडी. आता बच्चन साहेब किंवा माधुरी बाई त्याच्याशी हात मिळवताहेत. एक तर त्यांची काही मजबुरी असावी किंवा मग मला जी सलमान बद्दल चीड असावी ती बच्चन साहेबांना वा नेने बाईना नसावी.

किंवा आता हे संजू बाबा. आमच्या सारख्याना जे वाटतं ते विधु विनोद चोप्रा ला का वाटावं. आमच्या साठी जो देशद्रोह तो त्यांच्यासाठी खेळणं मोडून पुरून टाकलं. आता आम्हाला नाही बघवत मुन्नाभाई, त्याला इलाज नाही.

पण अनिल कपूर अन जॉनी लिव्हर ने दाऊद च्या पार्टीत कमर हलवली ते विस्मृतीत जातं.

आयुष्यभर त्यांनी उत्तमोत्तम गाणी दिली. त्या गाण्यांचं असलेलं गारुड "त्यांनी पेडर रोड वर फ्लाय ओव्हर नाही बनवू दिला" किंवा "आयुष्यभर कुणाला संगीत क्षेत्रात पुढे नाही येऊ दिलं" या आरोपांमुळे दूर नाही होत. तर काही जण त्यावर मात्र पेटतात. स्वतः कुणाला मदत म्हणून छदाम दिलेला नसतो, पण "शासनाने दिलेला प्लॉट तो. हॉस्पिटल साठी त्यात नवल ते काय" किंवा "दुसऱ्याच्या पैशाने बांधलं ते" असं काही जण बिनदिक्कत बोलून जातात. असतात एकेकाची मतं.


समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी झटलेल्या लोकांनी काही स्टेटमेंट केलं की मला नाही वाटत फणा काढून उभं राहायला. बरं मुख्य म्हणजे त्यांना हौस ही नसते मत प्रदर्शित करायची. आम्हीच विचारतो " अण्णा, तुम्ही काय म्हणता?" "ताई तुमचं मत काय?" "आमटे साहेब, तुम्हाला काय वाटतं?" तुम्ही मागं लागता, उत्तर द्या. आणि उत्तर तुम्हाला आवडेल तेच द्यायचं. म्हणजे हे समाजकार्य करणाऱ्या लोकांनी छोटी सुद्धा चूक कारायची नाही, अशी काही लोकांची ठाम धारणा असते.

आम्हाला वाटतो आदर त्यांच्या बद्दल. तुम्हाला नाही वाटत. ठीक आहे, तो तुमचा प्रश्न.

अलोकनाथ अन गोविंदा कुठली ऍड करतात ते माझ्यातरी फुल डोक्यात जातं. दुसऱ्या कुणाला ते योग्य वाटू शकेल. सांगता येत नाही.

हे असं आहे. चांगली कामं आणि वाईट कामं यावर आपण एखाद्याला जोखत राहतो. सामान्यांच्या बाबतीत होतं, पण ते व्यक्त होत नाही. किंवा काही बांधिलकीमुळे आपण तडजोड करतो. कधी तोडतो तर कधी जोडून ठेवतो.

प्रसिद्ध लोकांबाबतीत ते व्यक्त होतं. ते होताना व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष तिरस्काराची किंवा आदराची पातळी बदलत जाते.

काहींची कुणाबद्दल ती अगदीच उथळ असते आणि ही उथळ भावना नेहमी दुसर्याची असते, आपली मात्र अगदी तर्कशुद्ध असते असं प्रत्येकाला वाटतं,  म्हणून वादविवाद होत राहतात.

जाता जाता:

अशी उथळ वक्तव्ये करताना मला दोन गोष्टी माहित असतात:

- एक तर मी जे बोलतो हे त्यांच्या पर्यंत पोहोचणार नसतं.

- आणि पोहोचलंच तरी माझी दखल घ्यायला ते मोकळे नसतात.