Tuesday 27 August 2019

सकारात्मक

फेसबुकवरच्या पोस्टवरून असं कुणाला वाटू शकतं की मला सकारात्मकतेचा रोग लागला आहे. हो, अति सकारात्मकता हा रोगच. प्रत्यक्ष जीवनात पॉझिटिव्हिटी ची टाळ सारखी कुटू शकत नाही आणि जर कुटत असू तर त्याचा प्रौढ गटणे झाला आहे असं खुशाल समजावं.

बऱ्याचदा पॉझिटिव्हिटी म्हणजे आयुष्यातला नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणे असा घेतला जातो. हा खरंतर गुन्हाच. मी आतापर्यंत जे पाहिलं आहे, अनुभवलं आहे आणि वाचलं आहे त्यावरून एक निष्कर्ष काढला आहे.

Being positive does not mean overlooking negatives. It just means seeing eye to eye of negativism and telling "I know you are there and I am working on you. With my efforts, I am letting you go."

नैसर्गिकरित्या काही प्रश्न सुटतील ही आपली विशलिस्ट असते. पण प्रत्यक्षात तसं  होत नाही. जेवताना चुकून तोंडात खडा आला, तर आपण त्याला तोंडात ठेवून आता पुढचा घास चांगला येईल, अशी वाट बघत बसत नाही. तर तोंडातला खडा थुंकून टाकतो, तोंड स्वच्छ धुतो आणि मग पुढचा घास घेण्यास सज्ज होतो. नकारात्मकतेवर अगदी असंच काम करावं लागतं.

व्यावसायिक जीवनात प्रश्न उभे राहतातच.  त्यावर साधकबाधक विचार करून एक ऍक्शन प्लान बनवून त्याला उत्तर देण्यात शहाणपणा आहे.  

Sunday 25 August 2019

IMTMA

अनेक इंडस्ट्रीयल असोसिएशन सारखी आय एम टी एम ए ही एक आहे, जिचे आम्ही मेम्बर आहोत. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. आमच्या इंडस्ट्री ला लागणारे अनेक ट्रेनिंग कोर्सेस ते कंडक्ट करतात. फिनिशिंग स्कुल इन प्रोडक्शन इंजिनियरिंग आणि डिझाइन कोर्स ऑफ मशीन टूल हे मला आवडणारे कोर्सेस. डिग्री पूर्ण झाल्यावर जर हे कोर्स केले तर एम्प्लॉयेबिलिटी वाढते असं मला वाटतं. सेटको यथाशक्ती या ट्रेनिंग कोर्सेस मध्ये आपला सहभाग देते.

परवा मशीन टूल डिझाइन कोर्सच्या अवॉर्ड सेरेमनी साठी मी हजर होतो. त्याचे अवॉर्डस सेटकोने स्पॉन्सर केले होते. कोर्स पूर्ण करणाऱ्या मुलांबरोबर विविध कॉलेजेस चे प्रोफेसर तिथं हजर होते. त्यांना सांगितलं की समाजाची उतरंड जर थांबायची असेल तर शिक्षक हे एक नोबल प्रोफेशन परत एकदा बनवण्याची आपली जबाबदारी आहे.

त्या फोरम वर बोलताना मी सांगितलं की इंजिनीअर्स एम्प्लॉयेबल बनवण्याचं उत्तरदायित्व हे स्टुडंट्स, कॉलेजेस आणि इंडस्ट्री या सगळ्यांवर आहे. अवॉर्डस स्पॉन्सर करण्याचे आभार मानण्यात आले त्यावर मी म्हणालो की एक इंडस्ट्री प्रतिनिधी म्हणून आम्हीही काही देणं लागतो. आणि त्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेने हे आम्ही केलं आहे. त्यात जनरोसिटी वगैरे अशी भावना नाही आहे.

मुलांशी संवाद साधताना त्यांना सांगितलं की टेक्निकल स्किल शिवाय स्वयंशिस्त, कामाची शंभर टक्के ओनरशिप, Be an employee...Be an employer अशी कामाची पद्धती, Having.....Doing.......Being ही थिंकिंग प्रोसेस रिव्हर्स करणे आणि संवाद कौशल्य या गोष्टी तुम्हाला बाकी गर्दीपासून वेगळं करतील जिथं फार लोक नसतात.

अन सरतेशेवटी आवाहन केलं की इंजिनियर्स चं मागणी पेक्षा पुरवठा जास्त यामुळे डिग्रेडेशन झालं आहे, पण ती जुनी ग्लोरी परत आणणं हे तुमच्या हातात आहे. चहाचं दुकान टाकण्यात काहीच वाईट नाही, पण ते करताना बाहेर इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालणं हा नतद्रष्ट पणा आहे. मशीन टूल ही मदर इंडस्ट्री पैकी एक आहे. झोकून काम करणाऱ्या इंजिनियर्स साठी तो स्वर्ग आहे. सर्वांचं स्वागत केलं.

(IMTMA चं पुण्यात ट्रेनिंग सेंटर आहे. इंजिनिअरिंग झाल्यावर व्यावसायिक स्किल सेट वाढवण्यासाठी इथं अनेक कोर्सेस आहेत. इच्छुकांनी वेब साईट द्वारे संपर्क साधावा) 

Thursday 22 August 2019

पॉझिटिव्हीटी

काल आनंद मोरे ने एक महत्वाचा मुद्दा मांडला की सकारात्मकता दाखवणं ठीक आहे पण भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. मिलिंद सरवटे सरांनी याबद्दल एक लेख मला मागे पाठवला होता, या विषयावर.

उद्योजकता आणि व्यावसायिकता हे दोन वेगळे पैलू आहेत असं मला नेहमी वाटत आलं आहे. त्या दोघांचे गुण अवगुण आहेत. ज्या लोकांमध्ये दोन्ही पैलूंचे गुण एकवटून येतात ते नारायण मूर्ती, रतन टाटा बनतात आणि फक्त व्यावसायिकता दाखवली तर त्यांचा सायरस मिस्त्री किंवा विशाल सिक्का बनतो.

उद्योजकांचा इमोशनल किंवा सेंटिमेंटल कोशंट हा जास्त असतो, हे मी माझ्यावरून आणि आजूबाजूला जे उद्योजक आहेत त्यावरून सांगू शकतो. व्यावसायिकांचा एनलिटिकल कोशंट जास्त असतो. इमोशनल पद्धतीने एका लेव्हल पर्यंत कंपनी चालू शकते. पण त्यानंतर फक्त सकारात्मकता किंवा नकारात्मकता घेऊन किंवा फक्त स्ट्रॉंग रिलेशन्स वर व्यवसाय केला तर त्याला लिमिटेशन्स येतात. हे वेळीच ओळखून उद्योजकाने जर त्याच्यात व्यवसायिकतेचा अभाव असेल, तर बाहेरून ते हायर करावेत आणि स्वतःच्या इमोशन्सचा लगाम, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, त्या व्यावसायिक माणसांच्या हातात द्यावा.

उद्योजकाच्या तथाकथित पॉझिटिव्हीटी ला, व्यावसायिक एनलिटिकल डाटा चं कोंदण लावतात आणि मग त्या व्यवसायाचं बस्तान बसतं असा माझा अनुभव सांगतो.

माझ्या भावनाप्रधान स्वभावाला लगाम लावायचं काम कंपनीत प्रोफेशनल्स करतात आणि फेसबुकवर आनंद, मिलिंद सर, मेधा नाईक सारखे मित्र मैत्रिणी करतात.

राहता राहिला प्रश्न कौस्तुभ ने मेंशन केलेलं यशस्वी उद्योजक हे बिरुद. जे मी लिहिणार आहे त्यात विनय नाही, न्यूनगंड ही नाही आणि अहंगंड तर नाहीच नाही. एक उद्योजक म्हणून मी स्वतःला दहापैकी सहा मार्क देईल पण व्यावसायिक म्हणाल तर मी स्वतःला अयशस्वी समजतो. व्यवसायिकतेचे गुण मिळतात परफॉर्मन्स मेझर वर. सतरा वर्ष व्यवसाय करूनही मी माझं एस एम इ टॅग काढू नाही शकलो आणि पुढील चार वर्षे तरी काढू शकणार नाही. यातच काय ते आलं. त्यांनतर जर सेटको मिडीयम किंवा लार्ज कंपनी म्हणून ओळखली गेली तर माझ्या उद्योजकतेपेक्षा माझ्या कंपनीतील व्यावसायिक लोकांचा त्यात जास्त वाटा असेल याबाबत शंका नाही.

अजून एक जाता जाता सांगावंसं वाटतं की कौस्तुभला जे यशस्वी म्हणून अभिप्रेत आहेत तसे सोशल मीडियावर खूप कमी लोक लिहितात. कारण ते कदाचित वर लिहिलेले परफॉर्मन्स मेझर अचिव्ह करण्यात बिझी असावेत. मी तिथं स्वतःला बिझी ठेवत नाही म्हणून इथं वेळ देऊ शकतो इतकाच काय को फरक.  

Monday 19 August 2019

सोशल मीडिया

जे जे म्हणून पहिलं ते आयुष्यभर लक्षात राहतं. पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचा भाग झालो हे नेहमीच लक्षात राहील. कार्यक्रम संदर्भात कन्फेशन: तिथं पोहोचेपर्यंत वाटलं नव्हतं की कार्यक्रमाची मांडणी इतकी आखीव रेखीव असेल. विषय जोरकस होते. दर्जा एकंदरीत वरचा होता. त्याबद्दल समीर, मंगेश आणि टीमचे अभिनंदन. प्रसादचे आभार की त्याने माझं नाव इथं सुचवलं. एक प्रेक्षकांची संख्या सोडली, तर नाव ठेवायला अजिबात जागा नव्हती.

दोन सेशन मध्ये पॅनलिस्ट होतो. "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" आणि "मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा"

पहिल्या विषयावर पॅनलिस्ट म्हणून बोलण्यापेक्षा मलाच शिकायला खूप मिळालं. दोन तर महत्वाचे मुद्दे आहेत. माझे टेकअवे मी इथं लिहिणार नाही आहे. कुणाला हवे असतील त्यांनी मेसेंजर वर संपर्क करावा. पण एक मात्र बोललो की सोशल मीडिया तर्फे मार्केटिंग करण्याची अक्कल मला फार उशिरा आली आणि माझे त्या बद्दलचे खूप मिस कन्सेप्शन होते जे गेल्या वर्षभरात दूर झाले. सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रकार सिरीयसली उद्योजकांनी घ्यायला हवा. २०१४ मध्ये नाही म्हणायला, थोड्या राजकीय विषयावर पोस्ट लिहायचो आणि त्यामुळे मी माझे कस्टमर्स आणि सहकारी यांना फेसबुकवर मित्र यादीत जागाच नाही दिली. ती मोठी चूक झाली. पुढे मग राजकीय पोस्ट लिहिणं हे अलमोस्ट बंद केलं. आता मात्र एक दिशा मिळाली आहे आणि ती दुसऱ्या पॅनल डिस्कशन मध्ये सांगितली.

दुसऱ्या टॉपिक मध्ये पहिले विचारलं की  पोस्ट चोरी होतात त्याबद्दल काय म्हणणं आहे. कौशल इनामदार आणि सारंग साठे हे दोघे दृकश्राव्य माध्यमातील त्यामुळे त्यांना ही चिंता असणारच. पण मी आणि गौरी या टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहिणारे. मी सांगितलं "हा प्लॅटफॉर्म मी निवडला आहे. आणि त्याचा फॉरमॅट असा आहे की पोस्ट या उचलल्या जाणार आणि त्याबद्दल कन्सर्न असण्यात काही मतलब नाही. जो पर्यंत माझी पोस्ट वापरून कुणी अर्थार्जन करत नाही तो पर्यंत मी बोंब मारण्यात मतलब नाही. इंटरनेट चा खर्च याशिवाय मी त्या कन्टेन्ट वर फिजिकल खर्च करत नाही. ज्यांना स्वतःचं लिखाण चांगलं वगैरे वाटतं त्यांनी पुस्तक काढावं आणि पैसे कमवावे."

दुसरा विषय ट्रोलिंगचा. ट्रोलिंग हे मुख्यतः राजकीय आणि धार्मिक विषयावर पोस्ट अथवा कॉमेंट टाकली की होतं. व्यावसायिक लोकांनी राजकीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक या कुठल्याही मुद्दयांवर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करू नये, असं मला वाटतं. आपल्या राजकीय भावनेचं प्रकटीकरण हे मतपेटीद्वारे आणि धार्मिकतेचं प्रदर्शन हे घरातल्या देव्हाऱ्यात मांडावं. सोशल मीडिया त्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. तो ज्यांच्यासाठी आहे ते त्याचा दणकावून वापर करत आहे. आपण त्याच्या फंदात पडू नये.

क्लोजिंग रिमार्क मध्ये हेच सांगितलं की सोशल मीडिया हे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी चांगलं टूल आहे. आणि मुख्य म्हणजे ते आपल्यासाठी बनलं आहे आपण त्याच्या साठी नाही. तर त्या डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया याचा वापर आपल्या वृद्धीसाठी वापरावा, मग ती व्यावसायिक असो वा वैयक्तिक असो.  

(बाकी विषय आणि त्यावर बोलणारे लोक धारदार होते. सायबर हायजिन, सायबर व्हिक्टिम, व्यवसायिक यश हे सगळे मुद्दे राज्याच्या कानाकोपऱ्यात जावे असं मला मनापासून वाटतं आणि एकूणच सर्वांची इन्क्लुजिव्ह ग्रोथ व्हावी हि सदिच्छा.)

Thursday 15 August 2019

सोशल मीडिया

सोशल मीडिया हा बऱ्याच जणांप्रमाणे माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सध्या मी फेसबुक, व्हाट्स अप आणि लिंक्ड इन वर ऍक्टिव्ह आहे. इथं प्रत्येकाचा अजेंडा असतो. माझाही आहे.

मी इथं ब्रॅंडिंग करत असतो. एक तर माझं स्वतःचं किंवा माझ्या व्यवसायाचं आणि अगदी उद्दात्त वगैरे म्हंटलं तर देशाचं. स्वतःचं ब्रॅंडिंग करणे या पद्धतीला "स्वतःची लाल करणे" असं इथं बोललं जातं. ब्रॅंडिंग म्हणजे 'समोरच्याच्या मनात स्वतःची प्रतिमा तयार करणे.

या मधील हे कंपनीचं ब्रॅंडिंग इथं फेसबुकवर मी फार उशिरा चालू केलं. काही करणं होती त्यासाठी.  पण स्वत:चं ब्रँडिंग चालू करून आता तीन चार वर्षे झालीत. ब्रँड मार्केट करण्यामागची खरी गोम ही आहे की तुमचा प्रत्यक्ष डिलिव्हरन्स हा ब्रँड प्रॉमिस प्रमाणे हवा. तो देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो.

हे करताना इथं मी कुणाला मित्र वाटतो, कुणाला दादा वाटतो, कुणाला आदरयुक्त भीती वगैरे वाटते. काही जणं डायरेक्ट खिजवतात, कुणी आडून टोमणे मारतं, कुणी जेष्ठतेच्या भावनेने काळजीपूर्वक सल्ला देतं की न्यून किंवा अहंभाव येऊ देऊ नको. मला या सगळ्यांचा आदर आहे. मी हे एन्जॉय करतो.

यातील गंमत अशी आहे की माझ्या प्रत्यक्ष जीवनात व्यवसायाच्या अनुषंगाने या सर्व भावना अधिक तीव्रतेने शो केस होतात. इथं त्यामानाने या सर्व भावना मवाळ असतात. प्रत्यक्षातील माझं प्रेम किंवा दुःख, मिळणारा आदर किंवा माझा अहंकार, लोकांच्या मनातील माझ्या बद्दलची भीती किंवा माझं न्यूनत्व हे इथल्यापेक्षा धारदार असतं. त्यामुळे इथं मला क्षणिक दुःख किंवा सुखशिवाय अंगाला काही लागत नाही. आर जे संग्राम सांगतो तसं मी सोसल इतकं सोशल मीडिया वापरतो.  सोशल मीडिया वर ब्रँड बनवताना काही दोस्ती झाली आहे, ती मात्र जीवापाड जपतो. सोशल मीडिया हे बॅरिअर माझ्यासाठी तुटतं.

हे सगळं मी बोलणार आहे १८ ऑगस्टला "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" या विषयावर पॅनेलिस्ट म्हणून. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून यावं. 

Monday 12 August 2019

हव्यास

शनिवारी सांगलीला टेम्पो पाठवायचा होता. नेमकं टेम्पो मालकाच्या आजोबांचं निधन झालं. मग जे काही पाठवायचं ते कारने पाठवलं. कार सोमवारी सकाळपर्यंत आली नव्हती. म्हणून कंपनीत कॅबने आलो.

कॅब मध्ये फोनवरून फळणीकरांशी बोलत होतो. औषधं कितीची झाली वगैरे चर्चा चालू झाली. मग पूरग्रस्त परिसरातील डॉक्टरशी बोलणं झालं. पुढच्या लॉट मध्ये काय पाठवायचं ते मागवून घेतलं. उद्या आमच्या क्रिसलीस ग्रुप मध्ये चर्चा ठरली, ते ही फोनवर बोलणं झालं. 

तर ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागे एक कारण आहे. किंवा एक मित्रवर्य म्हणतात तसं वाचणाऱ्यावर प्रभाव पडण्याचा मला हव्यास आहे. तर जे तसं समजतात त्यांनी तसं समजावं. 

तर कारण हे आहे की कॅब मधून उतरण्याअगोदर कॅब ड्रायव्हर म्हणाला "तुम्ही सर कॅबचं भाडं देऊ नका."

मी विचारलं "का?"

तर म्हणाला "तुम्ही इतकं करताय तर माझ्याकडून फुल न फुलांची पाकळी".

मी समाधानाने हसलो. माझं कॅब अकौंट कार्डला  कनेक्ट आहे. शून्य रुपये आल्यावर म्हणाला आग्रह करू लागला, कॅश परत देतो.

मी म्हणालो "मित्रा, मदत करावी हे तुझ्या मनात आलं, हे खूप आहे. मदतीचा चान्स आज हुकला. कुठं तरी करशील नक्की"

मनोभावे आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला.

दुसर्यावर प्रभाव पाडण्याचा हव्यास मला आता फेसबुकच नाही तर प्रत्यक्ष जीवनात पडला आहे. 

Saturday 10 August 2019

सेल्स कॉल

काल नासिकला गेलो होतो. कस्टमर कॉल वर. बऱ्याच दिवसांनी मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स हातात घेतले. मशीनमध्ये घुसून काम केलं. शर्ट ला ऑइल लागलं आणि ट्राऊजर ला काळे डाग पडले. जेवण्याच्या आधी हात धुतले खरे, पण हाताला तो जुन्या काळात येणारा मंद असा ऑईलचा वास आला. माझ्या लेखी तो वास म्हणजे पारिजातक चुरगळल्यावर हाताला जो येतो तोच.

हे माझं आवडतं काम. कस्टमर ला सोल्युशन देणे. इम्पोर्ट सब्स्टीट्युट बनवणे. थोडक्यात कस्टमरची कम्फर्ट लेव्हल तयार करणे. आजकाल कस्टमर पण अवघड प्रश्न विचारत नाहीत. पूर्वी बजाज ऑटो, टाटा मोटर्स वगैरे कंपनीतील लोक असे प्रश्न विचारायचे की उत्तरं देताना त्रेधा उडायची. आता कुणी असे इंटरेस्टिंग प्रश्न विचारले की भारी वाटतं. आणि मी मग बोलूनही दाखवतो, की चर्चा करताना मजा आली.

कंपनी मोठी झाली. मॅनेजमेंटचं काम वाढलं. स्ट्रॅटेजी, बॅलन्स शीट, एचआर, फायनान्स हे असलं काहीतरी अवघड काम आजकाल करावं लागतं.

काल जाणवलं, हार्ड कोअर टेक्निकल काम केलं की दिल गार्डन होऊन जातं. पण नंतर हे पण वाटलं, की तेच काम करत राहिलो असतो तर कदाचित ग्रोथ पण झाली नसती. कुणास ठाऊक जॉईंट व्हेंचर पण झालं नसतं आणि पुण्याव्यतिरिक्त चेन्नई आणि दिल्लीत प्लांट पण चालू करू शकलो नसतो.

ते काय असेल ते असेल, पण आता ठरवलं आहे. सहा महिन्यातून का होईना एखादा असला खंग्री टेक्निकल सेल्स कॉल करायचा. वर उल्लेखलेली अवघड काम करताना डोकं खूपदा पकून जातं. त्यावर उतारा म्हणून.  मन फ्रेश होऊन जातं.



Thursday 1 August 2019

हेडोनिक ट्रेडमिल

समजा मी एक कार विकत घेतली. त्याचा आनंद साधारण एक आठवडा टिकतो. एकदा ती कार माझ्या इको सिस्टम चा भाग झाली की माझं मन कुठलातरी दुसरा आनंद शोधण्यासाठी बाहेर पडतं. हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हेडोनिक ट्रेडमिल. (ट्रेडमिल वर आपण पळत राहतो पण असतो त्या जागेवरच, म्हणून हे नाव दिलं असावं असा माझा अंदाज) आपण काही भौतिक गोष्टींचा पाठपुरावा करतो, ज्यामुळे मला आनंद वाटेल. ती गोष्ट कवेत आल्यावर आपल्याला यशस्वी झाल्याचा अनुभव येतो. त्या अनुभवातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो आणि मग आपण परत कोणत्यातरी नवीन अनुभवामागे धावत सुटतो.

पण मग यातून सुटका आहे का? तर आहे. तात्विक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आली आहे. काही काळासाठी पटतं ही आपल्याला. पण थोड्या दिवसात आपल्याला त्याचा विसर पडतो.

१. जितके लागतात तितके पैसे मिळवण्याइतकं काम करा. (याचा अर्थ पैसे कमवू नका असा नाही.) एक लॉंग टर्म सेव्हिंग प्लॅन बनवला आणि रिटर्न्स ठरवले की मग पैसे जास्त मिळाले तरी त्याचा आनंद होत नाही. जिवंतपणी मोक्ष मिळाला असं होतं मग.

२. व्यायाम करून तब्येत खणखणीत ठेवा. आणि एनर्जी वाढवा.: या उपायाचे अनंत फायदे आहेत.  व्यायाम, झोप आणि मोजके पण व्यवस्थित खाणं याला चॉईस ठेवण्यात मतलब नाही. याला महत्व दिलं की हे शरीर जे रिटर्न्स देतं त्याला तोड नाही.

३. जे लोक आवडीचे आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवा: समान विचारसरणीचे लोक, मित्र, फॅमिली यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. ह्या लोकांना आपण गृहीत धरतो पण अडचणीवेळी हीच लोक आपल्या मदतीला येतात.

४. ज्या गोष्टी आयुष्यात डोक्याला शॉट लावतात त्यांना आयुष्यातून कायमचं हद्दपार करा. अशा गोष्टी शोधा आणि त्यावरचे उपाय छोटे असतात. उदा: टूर ची बॅग तयार ठेवायची अन त्यात चार्जर, टॉयलेटरीज ची बॅग वेगळं ठेवणे. दिलेली वेळ पाळणे. वगैरे.

५. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं. नवनवीन आव्हानात्मक परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणे. जर असं काही नसेल तर अशी आव्हानात्मक परिस्थिती शोधणे अन त्यावर मात करणे. नवीन प्रोजेक्ट्स, काही शिकणे (भाषा, वादन, गाणे, खेळ काहीही). यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो.

(एका इंग्रजी लेखाचा स्वैरानुवाद)