Friday 31 July 2015

दुखवटा

माजी राष्ट्रपती गेले. समानार्थी शब्द वापरल्याने लोकं पोस्ट वाचतात, म्हणून ही आयडिया. आकाशवाणीवर राष्ट्रीय दुखवटा चालू आहे. त्यामुळे रेडियोवर मुकेश, तलत, मन्ना डे, रफीसाहेब, किशोरदा, लताबाई अशा सर्व दिग्गजांची रडकी गाणी लागताहेत.
आश्चर्य हे आहे की ही गाणी रडकी असली तरी मनाला खुप शांती देतात. कंपनीतून घरी आलो की गुणगुणतच वरती येतो. तलतचं "जिंदगी देनेवाले सुन" लागलं की डेस्टिनेशनला पोहोचलो तरी गाडीत बसून गाणं ऐकत बसलो आहे, मुकेशचं "आसू भरी है ये जीवन की राहे" लागलं की मुद्दामून लांब फिरून परत येतो आहे, "कर चले हम फिदा" लागलं की आंवढे गिळत कार चालवतो आहे, "मन रे तु काहे ना धीर धरे" लागल्यावर काल मला उजवीकडे कर्वे रोडला वळायचं होतं, तर सरळ अलका टॉकीज ला आलो. अशा गमतीजमती चालू आहेत.
दुखवटा संपला तरी या गाण्याची आठवण येत राहील.
एखादं फक्त रडक्या गाण्याचं रेडियो एफ एम चॅनल चालू करावं का?
१०० मेगाहर्टझ वर ऐका एफ एम: रेडियो अश्रू,
रेडियो अश्रू, रेडियो अश्रू
अश्रू बहनेवाले ऑलवेज खुश, ऑलवेज खुश.
म्हातारा बितारा झालो की काय, च्यामायला?


Tuesday 28 July 2015

Letter to Dr Kalam

Rajesh Mandlik, Pune.
13/08/2003

Dr. A.P.J. Abdul Kalam
His Excellency President of India, New Delhi

Ref: Wings of Fire

Dear Sir,

First of all, let me wish you a very happy Independence day. 

This letter of mine is in the context of your book Wings of Fire which I have recently read. I am deeply impressed by the views expressed in the book which prompted me to pen down my feelings. While catching words to express feelings, I realized that I was riding on different waves while reading this book. Can we say it be a pride towards country, or pride being an engineer, or happiness towards success of defense achievement, or inner feeling of learning management philosophy. 

Your journey, which started from Rameshwaram to MIT and then to heights in rocketry and missile technology, is not only amazing but gave a different perspective of living this awarded human life. I am really touched by the respect you have shown to your masters, kindness shown towards colleagues and expectations shown from youth of India. Your success story of SLV 3 and Agni has left me in tears of happiness as I could feel the mammoth efforts you have put in making this venture successful. Ironically SLV 3 is noted as one of the facts that changed India by "India Today" which I noticed next day of reading Wings of Fire. 

I found many management principles which have naturally flown in this book. And these principles are so important that I am sure, if one consistently pursues the same, he/she shall be choose a path of delivering the best. I must state here that you have reached peak of mountain in chapters PROPITIATION and CONTEMPLATION while expressing qualities of leader,  thoughts toward country and a poem where you compared yourself with a well of divinity. 

We all know that there is a endless list of great people in this country who give us sense of pride of being an Indian. From bottom of my heart I place name of Dr Kalam to join such great Indians. 

I would like to end this letter by  committing myself to deliver the best in whatever business I am in and share a  contribution, though squirrel size, in turning out India as developed nation by 2020, which is your dream and now of every Indian's. 

Keeping the faith, with warm personal regards

Sincerely yours


Rajesh Mandlik 

नादिष्ट

फेसबुकमुळे मी बराच नादिष्ट किंवा छंदिष्ट झालो होतो. दोन महिने बाहेर होतो तरी आजही सोशल मिडीयात मला फेसबुकच जास्त आवडतं. घरच्यांना पण सॉलीड पटलं होतं की या माणसाला फेसबुकचा नाद लागला आहे म्हणून.
माझ्यासारखाच नीलला क्लॅश ऑफ क्लॅनचा नाद लागला होता. आ़यपॅड दिसला की झडप मारलीच म्हणून समजा. आई बापाची बोलणी पण खायचा.
मी फेबु डिअॅक्टिवेट केलं अन अॅप फोन आणि आयपॅडवरून उडवून टाकलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं तसं नीललाही वाटलं.
एके दिवशी कंपनीतून घरी आल्यावर आयपॅडवर नील नेहमीप्रमाणे तुटून पडला आणि दोनच मिनीटात माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहत म्हणाला "पप्पा क्लॅश ऑफ क्लॅन उडवलं" मी विचारलं "का" तर म्हणाला "तुम्ही नाही का तुमचं फेसबुक अकाऊंट उडवलंत, मग मी पण......."
असला येडा आहे तो.
नीलला तसं म्हणायला सवय नाही पण पेप्सी बिप्सी ओढतो अधूनमधून. मी रागावतोही त्याला. आपण कुठलाही नाद सोडला की नीलही सोडतो असं नुकतंच कळलं होतं. मी मनात प्रश्न तयारही केला "मी काय प्यायचं सोडलं म्हणजे तु पेप्सी प्यायचं सोडशील?"
मला त्याचं उत्तरही माहित आहे.
प्रश्न मी अजून विचारला नाही आहे. मी घुटमळतो आहे मनात. अगदी कॉम्प्युटरवर फेसबुकमधे कर्सर डिअॅक्टिव्हेट वर नेऊन घुटमळत होतो तसाच.
माझ्या मनात जे उत्तर आहे तेच त्यानं दिलं तर परत वांदे. इथे रिअॅक्टिव्हेट होणं माझ्या हातात होतं. पण तिथे?
नकोच तो प्रश्न!

Friday 24 July 2015

नॉनव्हेजेटेरियन

नॉनव्हेजेटेरियन

 कसलं घमासान चालू आहे शाकाहारी आणि मांसाहारी वरून. सॉलीड. 

 आमच्याकडे बाहेर जेवायला जाणे म्हणजे चिकन मटनच खायचं. शुद्ध, सात्विक नॉन व्हेज खाणारी लोकं आम्ही. मधे एकदा लंडनहून वाघेलाचे मेव्हणे आले होते. पूर्ण शाकाहारी. मी आणि आमचं कुटुंबिय त्यांना घेऊन श्रेयसमधे घेऊन गेलो होतो. श्रेयस हे शाकाहारी थाळी मिळ्ण्याच ठिकाण आहे हे वेगळं सांगत बसत नाही. तिथे थाळी आली समोर तर आमचा नील बोंबटला "ए, अरे चिकन चा लेग पिस कुठं आहे?"

२००५ साली मी मियां, बिबी बच्चोके साथ हॉटेलला जेवायला गेलो होतो. तंदुरीचा आस्वाद घेत होतो सगळेच. गंमत म्हणजे वैभवी, मी आणि नील समोर सोफ्यावर आणि यश aisle मधे खुर्चीवर बसला होता. त्या वाटेवरून जाणारं प्रत्येक कुटुंब यशच्या हातातलं तंदुरी चिकन बघायचं आणि शेजारच्याच्या कानात काहीतरी कुजबुजायचं. "काय हे" वैगेरे तत्सम असं. मला काही कळेना काय झालं ते. एक  बेन तर डोळे विस्फारून बघत होती यशकडे. मी बेनकडे विस्फारित डोळ्याने बघत असताना एकदम वीज पेटली.

झालं असं होतं, पंधरा दिवसापूर्वीच यश ची मुंज झाली होती. आता त्या आधीचे पंधरा दिवस आणि नंतरचे पंधरा दिवस गोडधोड खाऊन यश पकला असावा. खरतर त्याचे पालक ही पालक ची वैगेरे भाजी खाऊन कंटाळले असावेत. एका रविवारी यश ओरडला. आज नॉन व्हेज पाहिजे म्हणून. खरं तर तो आमच्या मनातलं बोलला होता. पण मी आपलं यशच्या नावाखाली चान्स मारला. बटुवामन यशच्या मुंजीच्या वेळेस डोक्यावरती केलेली संजापची वाटी अजून केसांनी पूर्ण झाकली नव्हती आणि हा पठ्ठ्या आणि त्याचे आईबाप मस्त चिकन हादडत होते. वेटरला सांगितलं एक टोपी आण. ती यशच्या डोक्यावर टाकली. हो मग, कुणाची दृष्ट लागायला नको…… खाण्याला.   आणि मग यश ने सुखनैव क्षुधाशांति केली.

बाकी आमच्या मंडळी सौ वैभवी या तर हाडाच्या, आय मीन काट्याच्या  मत्स्याहारी. बोंबिल, पापलेट, सुरमई वैगेरे जलचर प्राणी समोर दिसले की वैभवीच्या पाककलेला विशेष धुमारे फुटतात. एका संक्रांतीला वैभवीला आमच्या मातोश्रींनी बाजारातून काटेरी हलवा आणायला सांगितला आणि मग पुढे काय घडलं हे लिहायचं म्हंटल तर एक वेगळा लेख होईल.

आमच्या एस के एफ चा जेवणाचा थाट काय वर्णावा. पंचतारांकित हॉटेलच्या तोंडात मारेल असा. फोर कोर्स जेवण. दररोज नॉनव्हेज असायचं. सोमवारी मटन, मंगळवारी बोल्हाईचे, बुधवारी चिकन, शुक्रवारी मटन, शनिवारी अंडाकरी, रविवारी फिश. तुम्हाला म्हणून सांगतो, कुठं  सांगू नका, पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत जेव्हा केव्हा कंपनीने नॉनव्हेज बनवलं नाही तेव्हाच माझा जठराग्नि व्हेज खाऊन शांत झाला. कधी तरी कुणी मला कौतुकाने म्हणून जातं, कमीवेळा घडतं असं, की राजेश म्हणजे हाडाचा इंजिनियर आहे त्याचं मूळ हे एस के एफ च्या प्रोडक्शन डिपार्टमेंट च्या ट्रेनिंग मध्ये नसून कँटीन मध्ये आहे हे मी नम्रपणे नमूद करतो. 

आता तैवानला गेलो होतो, तेव्हा पोर्क, बीफ सगळं हाणलं. विचार केला, खाईन तर काहीही, नाही तर काहीही नाही. ठीक वाटलं. पण हृदयाची नळी एकदा तुंबल्यामुळे तसं ही ते खाणं तब्येतीला इष्ट नाही. त्यामुळे त्याचा फारसा आस्वाद पुन्हा घेणं संभवत नाही. पण या नळीच्या कारणामुळे मी चिकनचं ताट मागवलं की त्याबरोबर येणाऱ्या अंडाकरीतील अंड्याचं पिवळं बलक काढून फक्त एग व्हाईट खातो. तब्येतीबद्दल फारच जागरूक हो आमचा राजेश, असे नातेवाईक म्हणतात ते उगाच नाही. 

मांसाहार खाण्यामुळे जर संबंधात वितुष्ट येणार्या समाजात वाढलो असतो तर आईने चौथीत असतानाच बदड बदड बदडला असता आणि घराबाहेर हाकलून दिलं असतं.

बरं झालं च्यामायला जन्म लवकर झाला. आमच्याकाळी समाज प्रगत तरी होता. 


Thursday 16 July 2015

"चक दे"


मी काही फार मोठा चित्रपट समीक्षक नाही. जे समोर येत गेलं ते पाहत गेलो. पटकथा सशक्त असेल तर चित्रपट सुंदर बनतो इतकं कळलं. अर्थात हे मत झालं. वयोपरत्वे आवड ही बदलत गेल्या. मैने प्यार किया, हम आपके है कौन, कयामत से कयामत तक, दिल वैगेरे सारखे पिक्चर आता बोर वाटतात.

गेल्या काही वर्षात असे सशक्त पटकथेचे काही चित्रपट पाहण्यात आले. लगान, wednesday, सरफरोश, तारे जमीं पर, स्वदेस, इक्बाल, थ्री इडियटस, जो जीता वोही सिकंदर. हे  पटकन आठवतील असे. पण जर कुठल्या चित्रपटाने मनावर गारुड केलं असेल तर तो म्हणजे "चक दे".

हॉकी एकेकाळचा आपला राष्ट्रीय खेळ. ध्यानचंद/रुपचंद असताना २४-० वैगेरे आपण धुतला आहे लोकांना. पण या देशात अनेक गोष्टींना उतरती कळा लागली तशी हॉकी ला पण. पण याच खेळला मध्यवर्ती कल्पनेत घेऊन चक दे ची कथा बांधली आहे, तिला तोड नाही. तुम्ही आठवा, या चित्रपटाचं नाव घेतलं की तुम्हाला कबीर खान झालेला शाहरुख आठवत नाही, त्याचा डायरेक्टर कोण आहे लक्षात नाही, प्रोड्युसर चा पत्ता नाही. लक्षात राहते ती कथा, ती फायनल म्याच.

पहिल्या फ्रेम पासून चित्रपट आपल्यावर पकड घ्यायला चालू करतो. कबीर खानचं इंडियन वुमन हॉकी टीम चा कोच होणं आणि नंतर त्या अख्या टीमला एकत्र आणून प्रशिक्षण देणं आणि त्या सगळ्यांची मोट बांधून एक सशक्त संघ तयार करणं हा एक आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव आहे. उशीर झाला म्हणून सबरवाल ला परत जायला सांगणं, बिंदिया/गुंजन/आलिया या तिघा वात्रट पोरींना जागा दाखवणं, कोमल आणि बलबीरला त्यांच्या नैसर्गिक गुणवत्ते बरोबर संघाचं स्थान आधी हे पटवून देणं, सॉफ्ट स्पोकन विद्या शर्माला संघाचा कर्णधार करणं अशा अनेक घटना मधून एखादी टीम घडवताना काय काय उदयोग करावे लागतात याचं यथार्थ चित्रण केलं आहे.

मुलींना मनातून अगदी असं वाटत असतं की जे चालू आहे, म्हणजे कबीर खानची मनमानी, ती योग्य आहे. पण सामान्य माणसाला असलेला resistance to change आडवा येतो. आणि मग त्या सगळ्या जणी मिळून बंड करतात कोच विरूद्धच. ती सगळी घालमेल फेअरवेल पार्टीला छेड काढणाऱ्या गुंडावर उतरवतात. कर्तृत्व फुलवण्यासाठी प्रतिकूलता तयार व्हावी लागते हेच खरं.

वुमन हॉकी टीम आणि पुरुष हॉकी टीमची लढत पण अगदी उत्कंठावर्धक केली आहे. आणि त्यात मुली हरलेल्या दाखवल्या ह्यात दिग्दर्शकाचं यश आहे. मुली जिंकलेलं दाखवू शकत होता तो. पण जे अतर्क्य ते पचवायला अवघड जातं.

कर्णधार करावं म्हणून बिंदिया सर्वस्व दयायला निघते, त्यावेळेसचा कबीर खानचा निग्रहाचा नकार त्या सीनला वेगळ्याच उंचीवर पोहोचवतो.

फायनलच्या पार्टीला कबीर खान, प्रीती आणि कोमल ला बोलावून ऑस्ट्रेलिया चा कोच तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तेव्हा बघा बुवा आता, असं म्हणून सोडून देतो.

चित्रपटाचं संगीत ही अगदी संयुक्तिक आहे. बादल पे पाव है, चालू होतं आणि ते विमान ऑस्ट्रेलिया ला पोहोचतं तेव्हा आपणही त्या विमानात आहोत असा एक फील येतो. मौला मेरे ले ले मेरी जान म्हणतानाची आर्तता विठ्ठला ला साद घालताना जी भावना येते, तिच्याशीच मिळतीजुळती.

अर्थात, हिंदी चित्रपटात मेलोड्रामा लागतोच. त्या न्यायाने काही बावळट सीन आहेतच. उदा: एक गोरे को पहिली बार तिरंगा लहेराते हुए देखा है ही forced  patriotism ची लाईन. किंवा प्रीती सबरवाल आणि कोमल एकमेकांना गोल करू देतात, तो ड्रामा. पण चित्रपटाच्या सुंदरतेला काजळाचा तीट म्हणून खपून जातं ते.

एकूणच एखादा माणूस, ज्याला आयुष्यात काही तरी करून दाखवायचं आहे, आणि ते साध्य करताना येणारे ताणताणाव, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेवावं आणि त्यांनी मात्र ढकलून द्यावं, अशी माणसं भेटतात, अपरंपार कष्ट, कठोर निर्णय घेताना होणारी कुचंबणा, योग्य दिशेने चाललो आहे की नाही या स्वत:च्या क्षमतेची दरवेळेस लागणारी कसोटी, कधी काही अनाहूत पणे चुक झालीच तर वाट्याला येणारी अवहेलना, या सगळ्यांची भावनिक आंदोलनं कबीर खानच्या रूपाने आपल्या समोर येतात आणि त्या भूमिकेचच आयुष्य जगणारी माझ्यासारखी माणसं पिक्चर बघताना अक्षरश: गुंगून जातात.



Wednesday 15 July 2015

सोसायटी

संबंधांची लाईफ सायकल अगदी एखाद दुसर्या केसमधे जुळली पण आहे फेसबुकवर. परिचय, घसट, उतार इथपर्यंत बर्याच जणांबरोबर घडलं आहे. पण हेटाळणी, अद्वितिय अशी एकच केस आहे. पण आयुष्यात मात्र अशी सायकल घडली आहे माझ्याबरोबर. माझं राहतं घर, तिथली सोसायटी, सोसायटीतील माणसं. तिचं नाव आपण सुंदर सोसायटी ठेवू. नावाप्रमाणेच सुंदर. एका मजल्यावर दोनच फ्लॅट. ११ मजल्यावरील २२ फ्लॅटला दोन शिंडलरच्या प्रशस्त लिफ्ट. स्विमिंग पूल, मागे बाग, भरपूर पार्किंग. घरही प्रशस्त, हवेशीर, भरपूर प्रकाशदायी. तुम्ही आलात घरी की प्रेमातच पडाल. शिल्पा आणि अतुलने बघितलं आहे ते. ब इमारत.

या आमच्या बिल्डींगला बिल्डरने जोडली एक ५ वर्षं आधी बांधलेली बिल्डींग. सात मजली. २१ फ्लॅट एकूण. छोटी लिफ्ट, घराचे स्पेक्स पण अर्ध दशक जुने. अ इमारत.

आल्याआल्याच दोन बिल्डींगमधे संघर्ष चालू. अ मधे सगळ्यात छोटं घर ३५० स्क्वे फूटचं तर ब मधे १४०० चं. त्यामुळे सांपत्तिक स्थिती बद्दल दोघांच्याही अवास्तव कल्पना. अ वाल्याला वाटायचं ब वाल्याकडे बख्खळ पैसा आणि भरपूर पैसा म्हणजे तो माणूस हरामखोर. आणि ब वाल्याला  वाटायचं अ वाला गरीब. पण त्याला कुठं माहित होतं अ च्या लॉकरमधे किती सोनं दडवलं ते.

मग राम्या चालू झाला. दोन्ही बिल्डींगमधल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी. एकाच व्यासपीठावर बसवण्याची धडपड. आधी परिचय झाला, मग घसट वाढली. दोन्ही बिल्डींगचं पान राम्या शिवाय हलेना. राम्याला पण वाटलं, आपण कृष्णाचेच अवतार, शिष्टाई साठी पुढे. राम्या जीव तोडून सांगायचा. दोन दिवस झाले की पालथ्या घड्यावर पाणी.

राम्याचा दृढ विश्वास. की लोकं स्वत:ची विवेक बुद्धी वापरतील आणि भांडणार नाहीत. तो आपल्या भूमिकेवर दटून राहिला. दोन्ही बिल्डींगमधले लोक, ज्यांच्याशी राम्याची घसट वाढली होती, एकमेकात भांडू लागले.

राम्याच्या मनातून ही सगळी लोकं उतरू लागली. सात आठ वर्षं प्रयत्न केल्यावर मात्र त्याने हात टेकले. त्याने हात टेकल्यावर तो आता हेटाळणीचा विषय झाला. ज्यांच्याशी राम्याची घसट होती, त्यांच्याबद्दल राम्याच्याही मनात तिडीक उत्पन्न झाली. इतकी की राम्या तिथलं कुणी दिसलं की वाट चूकवू लागला. आणि राम्या दिसला की लोकंही दुसरी वाट धुंडाळू लागले.

गेली दोन वर्षं मी तसंही त्या सोसायटीत खूप कमी राहतो. मी, मोठा मुलगा आणि आई नांदेड सिटीत असतो. हा एक दगड मारून खुप पक्षी मारलेत मी. त्यापैकी हा पण एक.

अशी आमची सुंदर नावाची सोसायटी. जिथे एका कंपाऊंडमधे ४३ प्रोफेशनल कुटुंबं राहतात. हो, आणि कॉस्मो एकदम. मराठी आहेत, बोहरी आहेत, गुजु आहेत, ख्रिश्चनही आहेत. एक मयत सोडली तर एकमेकांशी भेटायला लोकांना कारण मिळत नाही.  विविधता मे एकता हे नुसतं वाचायला बरं वाटतं किंवा गोकुळधाम सोसायटीला टिव्ही वर बघून टाळ्या पिटू शकता. पण ते एक अपयशाचं मोठं कारण आहे हे बघायला अजून वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. आमची सोसायटी पाहू शकता.

अतुल, तुझ्या लाईफ सायकलमुळे आठवलं. जखमच ती सुकलेली. खपली काढली की भळभळ वाहू लागते.

Tuesday 14 July 2015

शाम आणि राम

एक असतो शाम अन एक असतो राम्या. दोघं एकाच वर्गात. लहानपणी शाम अगदी टापटिपीचा. परीटघडीचे कपडे, चापून चुपून पाडलेला भांग, सुरेख रचलेलं दप्तर, अक्षर वळणदार. तर राम्या एकदम गावंढळ. कसातरी खोचलेला शर्ट, शक्यतो सेकंड हँड पुस्तके, अन दप्तरात कोंबलेल्या वह्या. शाम मास्तरांनी सांगितल्या हुकुमबर करणार, तर राम्याचं लक्ष मात्र मैदानावर. शाम मैदानाच्या बॉर्डर वरून हाताची घडी घालून फिरणार. तर राम्या मैदानावर झोकून देणार. शाम आणि राम्या यथावकाश दहावी झाले. आश्चर्य म्हणजे राम्याला शाम पेक्षा जास्त मार्क पडले. तर शामचे वडील राम्याला म्हणाले "शाम ला कमी मार्क पडले ते ठीक आहे. बोर्डाची चूक झाली असेल. पण राम्या गधड्या तुला कसे इतके जास्त पडले." राम्या गप्प बसला. शाम आणि राम्याची दोस्ती अबधित राहिली.

पुढं मग शाम गेला व्ही जे टी आय ला डिप्लोमा करायला तर राम्या रत्नागिरीला. शाम पण पास झाला अन राम्या ही पास झाला. इथे मात्र शामला बक्कळ जास्त मार्क भेटले राम्या पेक्षा. शामचे वडील आता नागपूरला होते. आर बी आय मध्ये. शामला व्ही आर सी ई ला admission मिळाली. राम्याला मात्र LIT मिळाली. शाम नागपुरात तर राम्या हॉस्टेल ला. सेकंड ईयर ला एम ३ असतं. डिप्लोमा वाले हमखास गचकायचे. गंमत म्हणजे राम्या झाला पास पहिल्या शॉट मध्ये. शाम मात्र दोन तीनदा पेपर देऊन सुटला. एम ४ ला शामचे वडील म्हणाले "अरे राम्या तूझं गणित चांगलं आहे वाटतं. आमच्या घरी येउन राहत जा आणि आमच्या शामला तुझी गणिताची वही दाखवत जा" शामच्या आईचा राम्यावर खूप जीव. ती त्याला चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालायची. शाम एम ४ पास झाला. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली. 

दोघं सिव्हिल इंजिनियर झाले. शाम लागला शापूरजी पालनजी मध्ये. ब्रिज डिझाईन ला तर राम्या लागला मोठया  बिल्डर कडे, साईट वर. शामची व्हाईट कॉलर टाईट तर राम्या मजुरांना हाकतोय. शाम ला मिळाला परदेशात प्रोजेक्ट. ऑस्ट्रेलिया चा. तेव्हा राम्या मोठया बिल्डर कडून छोटया बिल्डर कडे. काय झालं माहित नाही, पण शामला परदेशात काही झेपलं नाही. राम्याने एकदा फोनवर खूप समजावलं. थोडीशी कळ काढ पण जमव तिकडेच बस्तान. पण शाम प्रोजेक्ट अर्धवट टाकून आला. परत डिझाईन ला. राम्याने त्याचं मिठी मारून स्वागत केलं. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.

शाम आणि राम्या फोनवर बोलायचे, पण शामची मर्जी असेल तर. राम्या मात्र शामचा फोन आला की असोशीने बोलणार. राम्याने कधी फोन केला तर मात्र शाम मिटिंग मध्ये असणार. "I will call you back"  टापटिपीचा शाम फोन टाळत राहिला, गावंढळ राम्या करत राहिला. शाम च्या वैवाहिक जीवनात हलकेसे वादळ उठले. शामच्या सासरेबुवांनी राम्या आणि त्याची गावाकडची बायको मंजुषा यांना घरी बोलावले. शामला नीट समजावून सांगा त्यांच्या पोरीला नीट नांदव म्हणून. राम्या आणि मंजुषाने आपापल्या परीने सांगितलं. शामचा संसार मार्गी लागला. शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.

शाम आणि राम्या, दोघांचेही करियर आकार घेऊ लागलं. राम्याने मग धंद्यात उडी घेतली. ब्रिज construction साठी  उपकरण बनवू लागला. शापूरजी पालनजी राम्याचा कस्टमर होऊ शकत होता. शाम ने थोडा जरी शब्द टाकला तर नक्कीच. शब्द टाकणं तर दूरच पण शामने राम्याला कधी विचारलं ही नाही तू काय बनवतोस म्हणून. थोडी वर वर विचारपूस करायची बास. तरीही एकदा बाहेरच्या संदर्भाने शामला शापूरजी मध्ये भेटायला बोलावलं, देशपांडे साहेबाने. राम्या देशपांडे साहेबाच्या समोर बसला होता ते शामने पाहिलं. शाम साहेबाची  केबिन उघडून आत आला. राम्याला वाटलं, आता शाम आपल्याबद्दल सांगेल, प्रोडक्ट बद्दल सांगेल. पण नाही, शामने देशपांडेशी हवापाण्याच्या गप्पा मारल्या अन राम्याकडे ढुंकूनही न बघता निघून गेला. राम्याच्या हृदयात बारीकशी कळ उमटली. मिटिंग झाल्यावर राम्या आपुलकीने शामला भेटला. जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात दोघांनी आपापल्या बायको पोरांच्या चौकश्या केला. राम्या दु:खी मनाने  चालू लागला.शाम आणि राम्याची दोस्ती अबाधित राहिली.

शाम तसा अबोल, अन राम्या मात्र बडबड्या. शामशी तर बोलणारच पण शाळा कॉलेज मधल्या पोरांशी गप्पा टप्पा.  राम्याने शाळेतले पोरं बोलावली, संजय, महेश, सुरेश, संदीप. शामला ही बोलावलं. शामने विचारलं "कोणा कोणाला बोलावलं आहेस" राम्याने सांगितली सगळ्यांची नावं. शाम म्हणाला "ही पोरं येणार असतील तर मी येणार नाही" शामची अटीयुक्त मैत्री बघून राम्याची सटकली. राम्याने शामचे आतापर्यंतचे सगळे गुन्हे माफ केले होते. पण हे मात्र अति झालं.

शाम आणि राम्याची दोस्ती बाधित झाली.

शाम आणि राम 

Sunday 12 July 2015

सी डी ओ मेरी शाळा

मी ६८ चा. म्हणजे जन्मवर्ष हो. साधारण या वयाचे बरेच जण शाळा या प्रकाराबद्दल नोस्टाल्जिक वैगेरे होतात. भावूक. बावळटासारखे. मी पण होतो. बावळटासारखाच.

हं, माझी शाळा सीडीओ मेरी हायस्कूल नाशिक. दिंडोरी रोडला या शासनाच्या वसाहती. सीडीओ मेरीच्या अधिकार्यांनी नाशिक एज्यु. सोसयटीला, पेठे हायस्कूलला, गळ घातली की आमच्या पोरापोरींना घडवण्यासाठी कॉलनीत शाळा चालू करा. आणि मग ती आपण क्रिकेटमधे ती वर्ल्ड टीम निवडतो ना तसं त्या कमिटीमधून उत्तमोतम सर अन बाई बाकीच्या शाळातून निवडून काढल्या अन आमची शाळा सुरू करायला पाठवल्या. सराफ सर, पुरा वैदय, कुलकर्णी सर हे मुख्याध्यापक म्हणून सुरूवातीच्या काळात लाभले. पण शाळेची सेकंड लाईन ची खरी कमाल होती. विद्यार्थीप्रिय दि कृ गोटखिंडीकर, य दा जोशी, भा रा सुर्यवंशी, महाजन सर, भिसे बाई, सी एम कुलकर्णी, शिंदे बाई, साठे बाई, हिरे सर अशा उत्तमोत्तम शिक्षकांची फौजच उभी राहिली.

सीडीओ मेरीच्या अलीकडे आमची वसाहत होती, विद्युतनगर. पण मग आजूबाजूच्या मुलांना अॅडमिशन द्यावी म्हणजे जरा मुलामुलींची संख्या वाढेल या प्रस्तावामुळे आमचा पण नंबर लागला.

शाळा नवीन, वर्ग पुर्ण बांधून व्हायचे होते. पटसंख्या पण खुप जास्त नाही. पहिले दोन एक महिने तर एकाच वर्गात अख्खी शाळा भरायची. एक रांग पाचवी, मग सहावी, सातवी आणि आठवी. समोर सर वा बाई. तिथेच पार्टीशन टाकून एक टेबल. टीचर्स रूम. भातुकलीची शाळा. पहिल्या वर्षीतर वर्ग तयार नव्हते तेव्हा वरांड्यात बसायचो बेंच टाकून. उजवीकडे पाऊस अन समोर वाड सर.

पण मग हळूहळू फुलू लागली शाळा. स्टेज आलं, प्रयोगशाळा आली, खेळाचं सामान आलं. मिहीरसेन, ध्यानचंद, सी के नायडू, तेनसिंग असे ग्रूप पडले. सगळे मुलं मुली यात विभागले गेले. त्यामुळे आमच्याकडे आंतरवर्गीय स्पर्धा नसायच्या तर या ग्रूपमधे खेळायचो. आणि खेळ कुठलाही वर्ज्य नव्हता. लगोरी, खो खो, कबड्डी, रिंग, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, उंच उडी, डबलबार, मॅरेथॉन, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ. (मी कधी बुद्धीबळ खेळलो नाही हे वेगळं सांगायला नको) तुम्ही नाव काढायचं की साहित्य, जागा हजर. एक तास खेळायचा कंपलसरी. गेल्या ४६ वर्षाच्या आयुष्यात, एक अँजियोप्लास्टी सोडली, तर आजारी म्हणून घरी बसल्याचं आठवत नाही मला. त्याचं कारण लहानपणी बेफाम खेळलो, त्यामधेच आहे यात शंका नाही.

वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि उपक्रमांची वर्षभर रेलचेल असायची. पहाटेचे सुर्यनमस्कार, कांदेनवमी, वर्गसजावट, वक्तृत्वस्पर्धा आणि गॅदरिंग. झुंबड नुसती. उसंत नसायची. आणि सगळ्यांचा सहभाग. सुटका नव्हती. माझ्या सारख्या मुखदुर्बळ पोराकडून वक्तृत्व किंवा नाटकातून काम काढून घेणं म्हणजे बैलाकडून दूध काढण्याइतकं अवघड. पण ते सुद्धा शाळेत घडलं, यातच काय ते समजा. परवाच बंगलोरमधे एका कॉन्फरन्सला तासाभराचं भाषण ठोकणार होतो. यशने विचारलं "तुम्हाला स्टेज फिअर नाही का?" त्याला शाळेची स्टोरी सांगावी लागेल.

शिकवण्याची हातोटीपण विलक्षण होती. गोटखिंडीकर सरांनी गणित आणि शास्त्र या विषयाची गोडी लावली. जोशीसर, वाडसर भाषा विषय खुप पोटतिडकीने शिकवायचे. सुर्यवंशी सरांनी ड्रॉईंग मधे रंग भरायला शिकवले. मी सोडून सगळ्यांची या विषयात प्रगती झाली. पुढे डिप्लोमाला सरळ लाईन मारावी लागली तेव्हाच मला ड्रॉईंग जमलं. भिसेबाईंनी संस्कृत सारखा विषय आवडीचा केला, तर शिंदेबाईंनी हिंदी. महाजन सरांनी सरळ उभं रहायची शिस्त लावली. वरच्या वर्गात सीएम कुलकर्णी बाई, पटेल बाई, देव सर यांनीही आमच्यासारख्या दगडांवर छिन्नी हातोडी चालवली. आणि अगदी सुबक नाही पण ओबडधोबड का असेना, अशी माणसं तयार केली. पु रा वैद्य आणि सराफ सरांनी शाळेवर आणि पर्यायाने आमच्यावर पुत्रवत प्रेम केलं.

सगळेच एकमेकांना ओळखत असू. सुधाकर आणि गवळी काका कुटुंबाचा भाग होते. या सुधाकरची गंमत आहे. प्रताप, माझा मित्र आठवी झाल्यावर नागपूरला गेला. म्हणजे ८१ ला. त्यानंतर आम्ही परत पुण्याला भेटलो. कामाला लागलो. साधारण ९९ साली नाशिकला शाळेत सगळ्यांनी जायचं ठरवलं. प्रताप १८ वर्षाने शाळेत जाणार होता. ८१ साली शामळू दिसणारा प्रताप आता एकदम हिरो झाला होता. स्टायलिश भांग वैगेरे. (आता टकलावरून हात फिरवतो). शाळेत गेलो. सुधाकर भेटला. आम्ही विचारलं "काय ओळखलं का". सुधाकर प्रत्येकाला नावानिशी ओळखू लागला. आम्ही प्रतापला पुढं केलं "याला ओळखलं का?" मी विचार केला, आता पडली याची विकेट. तर म्हणाला "याला कोण विसरणार?" मी बोललो "फेकू नकोस" तर म्हणाला "आपला मित्र आहे हा, प्रताप. प्रताप निकम" आम्ही येडपाटलो.

त्यामुळेच या शाळेत दोन वर्षं जरी बरोबर राहिलो तरी आजही संपर्कात बरेच जण आहोत. तसं आम्हा कुणाकडून अगदी दैदिप्यमान वैगेरे काही घडलं नाही पण लौकिकार्थाने यशस्वी वैगेरे ज्याला म्हणता येईल अशा मुला मुलींची पिढी घडली. त्यात डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाऊंटंट आहेत, वकील आहेत.  जॉबमधे मोठ्या हुद्द्यावर आहेत, काही स्वत:चा बिझीनेस सांभाळत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी एकत्र भेटलोच तर स्वत:चा हुद्द्याचा मुखवटा फेकून एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून सामोरं जाण्याची संवेदनशीलता बाळगून आहेत.

१८ डिसेंबर २०१० रोजी आम्ही सगळे शाळेत भेटलो. तब्बल २७ वर्षांनी. बरेच सर आणि बाईपण आले होते. बाहेर कडाक्याची थंडी होती पण त्याच १० अ च्या खोलीत आमचा वर्ग भरला होता आणि तिथे मैत्रीच्या आणि आदराच्या भावनेचा उबदारपणा होता. आकार उकार बदलल्यामुळे बेंचवर शरीर घुसत नव्हतं, पण शरीराचं वय वाढतं, मनाचं नाही. आम्ही बेंचवरच बसलो. आकार उकार बदलल्यामुळे बेंचवर शरीर घुसत नव्हतं, पण शरीराचं वय वाढतं, मनाचं नाही. आम्ही बेंचवरच बसलो. बाई आणि सर भरभरून बोलत होते. वेळेचं बंधन होतं नाहीतर सगळ्यांनी रात्र जागवली असती. मागच्या रविवारी ८-९ जण भेटलो आणि परत त्या निर्व्याज मैत्रीची अनूभुती घेतली.

माणूस नावाच्या इमारतीचा पाया भक्कम करणारे हे सीडीओ मेरी शाळेचे दिवस आमच्या सगळ्यांसाठी आयुष्यभराचे संचित आहेत.कधीही मला शाळेची आणि २०१० च्या कार्यक्रमाची आठवण झाली की मी रोमांचित होतो आणि आनंदाच्या डोहात तरंगत राहतो, कितीही वेळ.

"आनंदाचे डोही आनंद तरंग" 

Friday 10 July 2015

भूतकाळ

सकाळी सकाळीच नांदेड सिटीत दुध घ्यायला जातो मी. एक लिटर, म्हशीचं, चितळेंच्या. आज मालक आला होता, पण दुध पोहोचलं नव्हतं. मग काय भोचक प्रश्न आणि विस्तारीत उत्तरांची जुगलबंदी.

मी: काय कसा आहे धंदा

मालक: फर्स्टक्लास

मी: काय गावातच राहता का

मा: नाय, इकडंच ललितमधे. दोन फ्लॅट एकत्र केले आहेत.

माझ्या चेहर्यावर आश्चर्ययुक्त प्रश्नचिन्ह.

मा: बाकीपण आहेत दोन चार फ्लॅट इथंच.

आता माझ्या प्रश्नचिन्हाच्या बरोबर आ पण वासला.

मा: अहो, हे ललित अन मंगलभैरवची जमीन माझीच आहे. (एकूण दहा एक एकर)

माझं तोंड बंद झालं. पण मनात विचार आला

आता कसली घंटा तुझी जमीन. कापलीस तु कोंबडी सोन्याचं अंडं देणारी. आता अंडी मगर साहेब खाणार. विसरा आता की ही जमीन तुमची होती ते.

हे असंच होतं ना बर्याचदा. आपण आपला भूतकाळ असा कवटाळून बसतो ना. कुरवाळत. बाबा एम एस ई बी त होते.  त्यांचे कित्येक मित्र रिटायर्ड झाल्यावर पाच वर्षाने पण ओळख करून दिली की "एमएसईबी होतो चीफ इंजिनियर" हे बोलूनच जायचे. पण ते बोलताना त्यांच्या चेहर्यावरचे भाव फारच केविलवाणे वाटायचे मला.

एका औद्योगिक प्रदर्शनात एक पासष्टीचे गृहस्थ आले स्टॉलवर. कार्ड दिलं, लार्सन अँड टुब्रोचं. वर नाव लिहीलं होतं आणि खाली हुद्दा, रिटायर्ड जनरल मॅनेजर. आणि ते रिटायर्ड पेनाने लिहीलेलं. मी विचारलं "कधी सोडला जॉब" तर म्हणाले "झाले सहा वर्षं" मी बोललो "मग काय कन्सल्टन्सी वैगेरे" तर म्हणाले "नाही, काही नाही. पण जवळपास अशी प्रदर्शनं असतील तर फक्त जाऊन येतो. तेवढाच इंडस्ट्रीचा फील" फारच करूण वाटले होते त्यांचे डोळे.

आमच्या स्पिंडल रिपेयरमधे अनेक पन्नाशीच्या पुढचे मेंटनन्स मॅनेजर्स, त्यांच्या तरूणपणी ते कसे स्पिंडल रिपेयर करायचे हे रंगवून सांगतात आणि त्या धर्तीवरचे प्रश्न विचारतात. खरं तर सगळीकडे बदल झाला आहे तसाच स्पिंडल रिपेयरची पद्धतीत पण झाला आहे. पण भूतकाळातच रमलेल्या या एकेकाळच्या हुशार इंजिनियरला त्याची कल्पनाही नसते. आणि मग विचित्र वाटतं, हसू पण येतं. नंतर वाईटही वाटतं.

आता हेच बघा ना, भविष्यात मगर साहेबांच्या घरी हे कालचे मालक दुध टाकताना त्यांच्या नातवांना म्हणाले "पोरांनो, ही जमीन माझी आहे" तर ते ज्युनियर मगर काय विचार करतील?

आईच्यान सांगतो, देवाने भूतकाळ विसरण्याचा प्रोग्राम मेंदूत फीड करावा, लवकरात लवकर.

Thursday 9 July 2015

Share Market

While most of the financial experts boast of hefty returns in equity markets, I am personally really skeptical of it. No, I do not mean that share market does not offer attractive returns. I simply mean that efforts you put in to overcome and understand volatility of market, the time you spend on it and then get sleepless nights over declining market due to some godforsaken reasons, the returns are not that attractive.

And if you closely observe financial analyst, they have the convincing power on reasoning for either of case. I mean any leading share broker or financial analyst is confident while talking on the reasons for market going up. The same broker is equally confident to reason out the declining market trend, even though market crashes the same evening.

If you look at the SWOT analysis of market, you have to rely on opportunities and threats, which are normally beyond the common man's control. Greece debacle, monsoon forecast, RBI's policy on repo rate, China's fluctuation, fuel prices etc. What the heck can you do with all these? Though I have seen common people discussing on these issues as if they control such situations. And they happily dwell upon, either positively or negatively, on the issues to which they are nowhere nearby.

One of the best mythological statements which I always hear, "Market sentiments are good for this company as it is fundamentally strong ". Now what is the meaning of this? Nobody knows. And this statement comes from small scale industrialist. I always feel that "instead of studying other companies for its fundamentals and then parking money in buying their shares and waiting for returns,  it is better to study your own business, understand it and wisely make investment plans there, it will give you much better returns".

Another problem with share market is that people narrate only success stories. Of course, who would like to boast on failures? But I have seen numerous cases who have gone bankrupt, absconding or lost sizable chunk of saving in share market. And this happens across board of different age group, social status. I personally have not come across with any person who claims that he runs household by trading in market. Or one to say that this house is completely built on returns of share market.Those who really make money, never beat the drums. So do not get in to loose talks normally over a cup of tea on success of market.

My parents happily invested in Fixed Deposits and now enjoying their life. Of course, I will not ask the new age people to invest in FDs as they are very low interest paying instrument. Though I feel that there are many other safe avenue like debt funds or balanced mutual funds which offer you tax free returns much more than FD.

Well, I want to say that you should not look at the share market at all, as an investment avenue.If you have time, look at this option. Take out some capital out of your savings and invest in share market with homework. But remember, one should not be overdependent on market.It can take care of additional expenses like family dinners or if you are too successful can take care of a week long family picnic in a year. One can have foreign tour as well depending on investment. But not beyond that.

Finally, it is up to individual how to look at share market. Personally, I have not made heavy profits nor I have incurred losses. By and large my returns are definitely better over others. But it has not come free. I have spent enough time on that. And with no adequate measures to calculate returns, I have stopped investing in share market for past one and half year.


Monday 6 July 2015

असं होईल का

ग्रीसच्या फेडरल बँकेत नुसती लगबग चालू होती. तिथले लिडींग फंड मॅनेजर १०० बिलीयन युरोची व्यवस्था कशी करता येईल याच्या विंवचनेत होते. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड कडूनच आता जी काय आशा होती. बाकी जर्मनी आणि फ्रान्सने तर आता सप्लाय बंद करून टाकला होता. बाकी स्कँडेनेवियन देश तर त्यांना वार्याला उभं राहू देत नव्हतं. आयएमएफ बरोबरच, नव्याने उभ्या राहिलेल्या ब्रिक्स बँक काही लोन देईल का याची चाचपणी ग्रीसचे राष्ट्रप्रमुख करत होते. पण कुठून ही आशेचा किरण दिसत नव्हता.

इकडे चायना राष्ट्रीय बँकेचे चेयरमन कॅश रिझर्व्ह  चेेक करत होते. १.५ ट्रिलीयन डॉलर्सच्या रिझर्व्हचा योग्य विनियोग करा अशा स्पष्ट सूचना चायना प्रिमीयरने त्यांना दिल्या होत्या. पोलिटब्युरोमधल्या आंतरराष्ट्रीय संबंधातल्या तज्ञाने सांगितलं होतं की पाश्चिमात्य जगात चीनला पाय रोवायचे असतील तर तिथे प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. ग्रीस, वक्रदृष्टी पडली होती चीनची. २५० बिलीयनची युरोची संघाची देणी आणि देश चालवण्यासाठीचे १०० बिलीयन युरो टाकले की जगातल्या जुन्या संस्कृतीचा पाईक चीनच्या कवेत येणार होता. परत युरोपियन संघाच्या विविध देशामधे चीनमधल्या धनिकांनी केलेल्या प्रचंड गुंतवणूकीवर बारीक नजर ठेवता येणार होती.

ग्रीसच्या मंत्रीमंडळाची बैठक चालू झाली होती. जगातल्या सर्व देशांनी तसेच ,IMF ने मदत करण्याची असमर्थता दर्शवल्यावर चीनच्या प्रस्तावावर विचार चालू झाला. गोम अशी होती की, इथे मदत वैगेरे प्रकार नव्हता. तर प्रस्ताव होता आउटराईट पर्चेसचा. चीनने ग्रीस देशच विकत घ्यायची तयारी दाखवली आहे. पण मग त्यांच्या पोलादी साम्यवादाला आपण कसं सामोरं जायचं यावर सगळेच चिंतीत होते. पण आर्थिक परिस्थितीच इतकी चिघळली होती की दुसरा काही पर्याय डोळ्यासमोर येत नव्हता. Finally, it was a question of survival.

अथेन्स शहराच्या मुख्य चौकात भव्य शामियाना उभारला होता. ग्रीक लोकसंख्यपैकी पाव लोकं तरी चौकात दाटीवाटीने उभे होते. चीनमधील किमान दहा एक लाख लोकं चौकात आले होते. युरोपमधील सर्व विमानतळांचे हँगर्स चायनीज चार्टर्ड प्लेनने भरून गेले होते. बरोबर १२ च्या ठोक्याला चायनीज प्रिमीयर आणि ग्रीक पंतप्रधान खुर्चीवर विराजमान झाले. आणि पाचच मिनीटात दोघांनी त्या दीडहजार पानी MOU वर दोघांनी सह्या केल्या. स्क्रीनवर ते दिसताच ग्रीक हमसाहमशी रडू लागले. करणार काय, ऐषोआराम आणि निष्काळजी पणामुळे अख्खा देश त्यांना विकावा लागला. ग्रीसचं राष्ट्रगीत वाजू लागलं शेवटचं आणि त्यांचा राष्ट्रध्वज उतरू लागला. ग्रीक लोकांची ओळख पुसुन जाण्याची ती नांदी होती. चीनच्या राष्ट्रगीताबरोबरच त्यांचा राष्ट्रध्वज ग्रीसच्या पार्लमेंटवर डौलाने फडकू लागला. आणि आकाशात अक्षरं चमकू लागली.

Greece, ROC (A China Undertaking)

ग्रीस, चीनचा अंगीकृत व्यवसाय.

Friday 3 July 2015

Railway

आज मेल आला रेल्वे डिपार्टमेंट कडून. सुचना मागवत होते जनतेकडून,  रेल्वेत कशा सुधारणा कराव्यात यासाठी. म्हंटलं, विचार करतील, नाही करतील, जे मनात आहे ते ठोकून तर द्यावं, नाही का?

- I suggest to build up waiting halls outside station. Only passengers are to be allowed on platform. No guests are allowed on platform.

- Allow passengers on platform one hour before arrival of train.

- One side of the station for entry in station and other side for exiting. Construct pedestrian  bridges separately for entry and exit. No two way bridge.

- Start using trolley system for carrying luggage in Railways. Make official system of porters. A passenger has to come to booth and prepay money of porters. Prepaid Porters.

- Start issuing tickets in grocery shops around stations. We do not want long queues for issuing tickets.

- Start building escalators on stations as quickly as possible.

- Start using chemical toilets in the train. Human waste should not be on rail track.

- Create a close loop system of recycling water bottles at the stations. Also install boilers for which fuel can be waste collected from trains. Use this hot water for different applications like canteen etc.

-  Current booking is to be issued with allotted berth or seats. Those who do not have seat nos, know that they have to stand and travel. With real time computer system, this should be possible.

- Systematic management of traffic inside station including parking.

- Increase fare to make it sustainable.

Thursday 2 July 2015

जोखड

मुळात आहे ना, ज्या ज्या गोष्टी भारी म्हणून मिरवतो ना, त्या सगळ्यांचं जोखड फेकून देऊ यात:

- लोकसंख्या, काय कौतुक ती जास्त आहे ते. निम्मे प्रॉब्लेम त्यामुळे आहेत.

- वेगवेगळ्या भाषा: बोला रे. पण ती अस्मिता वैगेरे गुंडाळून ठेवा हो. काय चाटायचं त्या अस्मितेला. आणि प्रेम करा हो भाषेवर अस्मिता कुठली बाळगता.

- वेगवेगळे धर्म: या प्रकाराने जितकी आपली धुलाई केली आहे ना त्याला तोड नाही. घरात पाळा हो. कशाला पाहिजे आरत्या म्हणायला लाऊडस्पीकर. बोंबटण्याने देवाला कळणार का तुम्ही आहात म्हणून. झालंय कसं निधर्मी राष्ट्र, म्हणजे निधर्मी, कुठल्याही धर्माची कास न ठेवणारे. निशस्त्र, कुठलेही शस्त्र नसलेले, निर्भय, कुणाचेही भय नसलेला तसं निधर्मी. या समाजव्यवस्थेने आणि राजकारणाने निधर्मी शब्दाचा उलटा शब्द समानार्थी म्हणून प्रचलित केला, आणि तो म्हणजे सर्वधर्मसमभाव. सगळ्याच धर्माचं लांगूलचालन करा. तुम्ही मिरवणूका काढा, मग तुम्हीही काढा. तुमच्या धर्माचा महापुरूष, त्यांच्या जयंतीला सुट्ट्या मग तुमच्याही महापुरूषाला सुटट्टया. धर्म अंगीकारून जगायच्या ऐवजी त्याचा गर्व करतो आपण.

इतिहास: उज्वल भविष्याची आस ठेवण्याऐवजी उज्वल भूतकाळावरून पाठ थोपटून घेतो आपण. शून्य आम्ही जगाला दिलं, आमचे बाण म्हणजेच आजचे क्षेपणास्त्र, काही हजार वर्षापुर्वी आमच्याकडे विमानं होती म्हणे, गणपती म्हणजे पहिली प्लास्टिक सर्जरी आणि कौरव म्हणजे स्टेम सेल टेक्नॉलॉजीचा पहिला प्रयोग. हो, सगळं मान्य, पुढं काय? घराण्याचं खापरपणजोबाचं नाव आठवत नाही आपल्याला पण हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टींचा अभिमान मात्र बाळगता येतो. कुणाला येडं बनवतो आपण. आपल्यालाच.

ही डोक्याभोवती आवळलेली आवरणं जोपर्यंत फेकून देत नाही तोपर्यंत काही खरं नाही रे मित्रा.

नागपूर पार्ट २

उन्हाळे अँड बुकसेलर्स किंवा ठाकुर आणि कंपनी, टिळक रोड, महाल नागपूर. नरसिंग टॉकीजच्या जवळ, घाटे दुग्धमंदिरासमोर. शालेय पुस्तकांचे रिटेल आणि होलसेल व्यापारी. नवनीत पुस्तकांचे प्रमुख वितरक. अगदी लख्ख आठवतंय मला सगळं, काल घडल्यासारखं. शाळा उघडण्याच्या महिन्यात, जुन जुलै मधे तोबा गर्दी. काऊंटरवर आणि मागे होलसेलला पण. सीझनमधे मुरारबाजीसारखे लढणारे बंडुभाऊ, तितक्याच शांतपणे पण सुवाच्च अक्षरात बिलं फाडणारे ठाकुर काका, त्यांचा मुलगा विलास, तेव्हापासून आजतागायत भरवशाचा माणूस गजानन, सगळ्यांचा आवडता आणि अधून मधून चक्कर टाकणारा हरीदादा  अशा अत्यंत विश्वासू हातांची गर्दी बाळासाहेबांबरोबर असली तरी कामच इतकं असायचं की दोन चार जणं सहज खपून जायचे सीझनला. हो, सीझन म्हणतात आजही. 

डिप्लोमा फर्स्ट इयर ची परीक्षा झाल्यावर मोठी सुट्टी होती. मामा (साधनाताईचे वडील) बाबांना म्हणाले "चला, या सुट्टीत राजेशला घेऊन जातो नागपूरला" मी पण साधनाताईला भेटायला मिळणार म्हणून खुश झालो. बाळासाहेबांची अन माझी जुजबी ओळख होती. दुकानाच्या वरतीच घर होतं. वाडाच तो, आणि मग तशीच घराची रचना. साधनताईला भेटलो. दोन एक वर्षातच तिच्या भाषेला नागपुरी बाज आला होता. 

पोहोचल्यावर गप्पांचा भर ओसरल्यावर मी खाली गेलो. "कधी आला बे माड्या तु?" म्हणत बंडुभाऊंनी पहिले मला खिशात टाकलं. आणि मग ताईचा भाऊ असं म्हणत दुकानातल्या सगळ्यांची माझ्याशी ओळख झाली. त्यात काही माझ्या वयाचे होते, सुधाकर सारखे काही सिनीयर होते आणि तीन म्हातारे ही होते, पांडोबा, रामजी काका आणि पांडुकाका. असं विविध वयोगटांच्या लोकांचं संमेलनच होतं ते. 

सकाळपासूनच गर्दी व्हायची दुकानात. इतकी लगबग असायची की मी तिथे स्टूलवर बसल्या जागी अस्वस्थ व्हायचो. आपसूक उठून सातवीच्या पुस्तकाचा सेट, नवनीत गाईड अशा गोष्टी मी गिऱ्हाईकना देऊ लागलो. तीन चार दिवसातच मला या कामात रस वाटू लागला. मी हिरीरीने काउंटर वर उभा राहून गिऱ्हाईक manage करू लागलो.

बाकी पण धमाल असायची. बाळासाहेब आणि साधना ताई मला सख्खा भाऊ असल्यासारखे वागवायचे. तसं त्यावेळेला त्याचं लग्न होऊन खूप वर्षही झाली नव्हती. पण नागपूरच्या वेगवेगळ्या हॉटेल मध्ये प्रत्येक वेळेला मी बरोबर असायचोच. स्कूटर होती. आम्ही तिघेही त्यावर. न्युडोज, नैवेद्यम, मोतिमहल तर कधी वर्धा रोडचा धाबा. लैच ऐश केली. तसं त्यांच्या अन माझ्या वयात सात आठ वर्षाचं अंतर असावं, पण ते मला कधीच जाणवलं नाही. (काही दिवसात सासू होणारी साधना ताई तर माझ्या हून लहान वाटते, दिसण्याने अन वागण्याने ही)

दुकानात पण जलसा असायचा. कधी मूड आला की घाटे चा समोसा, दुध, तर कधी समोरून जाणारे खारे दाणे, ओलं खोबरं. बरोबरीला मोठे आवाज. दिवस कुठला अन रात्र कुठली, कळायचंच नाही. माहोल च असा होता की आठ एक दिवसासाठी गेलेलो, ते महिना भर राहीलो. 

मला नागपूर, ते दुकान, तिथली लोकं हे सगळं इतकं आवडलं की मी मग पुढची चार पाच वर्षं परीक्षा झाली की नागपूरला पळायचो. आणि दीड एक महिना तिथेच राहायचो. पुढे रिटेल काउंटर वरून मी होलसेल मध्ये पण काम करू लागलो. कॉम्प्यूटर वैगेरे नसल्यामुळे बिलांचा सगळा हिशोब गुणाकार आणि बेरीज करून पूर्ण करावा लागायचा. दोन चार वेळा तर असं झालं की रात्रभर जागून सकाळी साडेसहा सातला दुकान बंद केलं आणि परत ९ ला हजर. सगळ्यात गमत म्हणजे "हे काम कर" असं मला कुणीही सांगायचं नाही, पण मीच आपसूक करत जायचो. आणि मी ते करतो ह्याचं पण कुणाला अप्रूप वाटायचं नाही इतका तिथे एकरूप होऊन गेलो होतो.

असे ते मंतरलेले दिवस होते. गुणाकार बेरजा आकडेमोडीत न राहता आयुष्याची किंमत वाढवणारे ते दिवस. ज्यांची ज्यांची मी नावं लिहिली आहेत त्यांना कदाचित माहितही नसेल की माझ्या मनाच्या कोपऱ्यात या नागपूरच्या आठवणी अशा बंदिस्त आहेत. कधीतरी मी त्यावर साठलेली जळमटं साफ करतो आणि अक्षरश: कातर होऊन जातो.

त्यानंतर ही मी नागपूरला अगणित वेळा गेलो. आणि दरवेळेस हे चाळीस वर्षापूर्वी जुळलेले ऋणानुबंध अजूनच दृढ होत गेले.

बाळासाहेब आणि साधनाताई यांची व्यवसायात भरभराट ही झाली, संसारात ही झाली. सौरभ आणि गौरी, आईबापाप्रमाणेच मनमिळाऊ पोरं. सौरभचं तर आता लग्न ही आहे.

त्या सगळ्यांना आभाळभर शुभेच्छा.