Friday 28 October 2016

बाळबोध प्रश्न

म्हणजे एक बाळबोध प्रश्न आहे बघा.

आता समजा पानशेत मध्ये X कोटी लिटर पाणी जमा होतं अन वरसगाव मध्ये Y कोटी लिटर. दोन्ही धरणाची एकत्रित क्षमता X+Y कोटी लिटर्स.

आता याच्या समजा काही टक्के पाणी शेतीला लागणार. समजा a टक्के.

म्हणजे (X+Y)-a(X+Y)/100 इतकं लिटर्स पाणी लोकांना वर्षभरासाठी वापरायला उपलब्ध आहे.

आता वर्ल्ड स्टॅंडर्ड प्रमाणे माणशी १२५ लिटर दिवसाला लागतं. आपण पुण्यासाठी ते १५० लिटर पकडू.

म्हणजे पुण्याची लोकसंख्या

 (X+Y)-a(X+Y)/100
__________________

365X150

इतकीच असणं अपेक्षित आहे.

आता पुण्याची लोकसंख्या आपण P समजू. एका घरात चार माणसे

म्हणजे एकूण घरांची H संख्या P/4 इतकी पुरे आहे.

एका घरात आता कमीत कमी एक चारचाकी (F) आणि एक दुचाकी आहे. (D).

एका वेळेस समजा २०% चारचाकी आणि ३०% दुचाकी रस्त्यावर असतात. म्हणजे 0.2×H आणि 0.3x H.

मग इतकी वाहने रस्त्यावर एका वेळेस आली तर किती स्क्वे किमी चे रस्ते लागतील.

म्हणजे असे काही calculations होतात की आपलं वाटेल तशी शहराची वाढ होत जाते? हा माझा बाळबोध प्रश्न आहे.

आणि हो, शाळेत जे गणित शिकवतात त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही असं काही नसतं.

काय म्हणता? 😊😊

(गणिताच्या शिक्षक मंडळींनी समीकरणं बरोबर आहेत का हे चेक करू नये. भावना महत्वाची. आणि तरुण मित्रांनी ही भावना कोण असा प्रश्न विचारू नये)

No comments:

Post a Comment