Friday, 25 April 2025

अख्ख जग डाव्या आणि उजव्या विचारसरणीत विभागलं गेलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. फक्त यात अजून सब कॅटेगरी आहेत. एक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट. तसेच मॉडरेट लेफ्ट आणि मॉडरेट राईट. जगातली, त्यातल्या त्यात भारतातील बहुसंख्य जनता ही सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट आणि मॉडेरेट राईट या टॉलरन्स झोन मध्ये बसत होती. आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम राईट या झोनच्या विचारसरणीचे आहेत. 

जो पर्यंत हे प्रमाण आहे की ८०% लोक हे सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट किंवा मॉडरेट राईट या झोन मध्ये आहेत तो पर्यंत देश हा सलोख्याने नांदेल. 

प्रॉब्लेम हा झाला आहे की गेल्या काही वर्षात मॉडरेट राईट विचारसरणीचे लोक हे एक्स्ट्रीम राईट कडे झुकत आहेत. आणि त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम मॉडरेटली लेफ्ट विचारसरणीचे लोक हे मॉडरेट राईट कडे चालले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. जेव्हा सेंटर लाईन च्या आजूबाजूला कमी आणि एक्स्ट्रीम लेफ्ट किंवा राईट मध्ये जग विभागले जाईल तेव्हा मात्र प्रॉब्लेम होणार आहे. 

कुठलाही दहशतवादी हल्ला हा धर्म प्रेरित असतो असा एक मतप्रवाह होत चालला आहे. (जसा नुकताच झालेला पहलगाम हल्ला इस्लामप्रेरित आहे असा स्ट्रॉंग मतप्रवाह आहे). आपण सर्व जण हे विसरत चाललो आहोत की धार्मिकतेला खतपाणी हे सरकारच घालत चाललं आहे. आपल्या धर्माबद्दल सर्वाना प्रेम असतं, आणि ते यौग्य आहे. शेवटी धर्मच आपल्याला जगण्याची जीवनप्रणाली शिकवतं. पण धर्माबद्दलच्या प्रेमाला पहिले अभिमानात, नंतर दुराभिमानात, मग गर्वात आणि शेवटी अंदाधुंद अधिकारात रूपांतरित काम पाकिस्तानातील सरकार त्यांच्या धर्माबाबत करत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान करतं आहे. ही धर्मनीती आहे. जी सरकार राबवत आहे. हा धर्म नव्हे. This is Policy of religion and not religion.

या प्रोसेस मध्ये झालं हे आहे की आपण धर्मनितीला विरोध करण्याचं सोडून धर्मालाच विरोध करत चाललो आहोत. आणि या लपेट्यामध्ये भारतीय समाजाचा एक मोठा प्रवर्ग यात ओढला जातो आहे. एक लक्षात घ्यायला हवं की राजनीती ही धर्मनितीला ओव्हरपॉवर करणारी हवी. ना की उलटं. अटलबिहारी वाजपेयींनी कानपिचक्या देताना वापरलेला राजधर्म तेच सांगतो.  दहशतवादी हल्ला हा भारताची विकासनीती हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या देशाच्या धर्मनितीने केला आहे हा नॅरेटिव्ह जास्त प्रस्थापित करण्याची गरज आहे. ना की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर. कारण आता भारताच्या विकासनीतीला खीळ जर काही घालू शकणार असेल ते धार्मिक ध्रुवीकरण. आपण तो डाव हाणून पाडण्यात आर्थिक आणि सामाजिक शहाणपण आहे. असं आहे की काश्मीर मध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांनी हिंदूंना मनापासून मदत केल्याचे अनेक दाखले दिसत आहेत. एका धर्माने दुसऱ्या धर्माला विरोधच करायचा असेल तर ते घडलं नसतं. 

आता कुणी म्हणेल की त्यांना त्यांची पर्यटन व्यवसायाची काळजी होती म्हणून मदत केली. मग मी पण तेच म्हणतोय की धर्मापेक्षा कर्म हे जास्त माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रभावीपणे उद्युक्त करतं. 

धर्म ही प्रणाली आहे, गाईडलाईन्स. तो जर नियम म्हणून थोपवाला की त्याचा अफगाणिस्तान होतो, पाकिस्तान होतो, सीरिया होतो, लिबिया होतो. तो जर प्रणाली म्हणून वापरला तर त्याचा स्वीडन होतो, ऑस्ट्रेलिया होतो, स्वित्झर्लंड,  न्यूझीलंड होतो. नागरिकत्वाचे नियम घटनेत लिहिलं आहे. 

तेव्हा सेंटरलाईन आसपास वावरणाऱ्या माझ्या मित्रांनो, आजही पण बहुसंख्य आहोत. एक्स्ट्रीमिस्ट लोक आजही अल्पसंख्यांक आहेत. तेव्हा सजगतेने जगू यात. मी आता यांच्याकडून मटेरियल घेणार नाही, वेटर म्हणून त्यांच्याकडून सर्व्हिस घेणार नाही, उबर ड्रायव्हर दुसऱ्या धर्माचा असेल तर कॅब करणार नाही ही  एक्स्ट्रीम राईट कडे जाणारी विचारसरणी सोडून देऊ, आणि बिहार निवडणुकांच्या आधी हल्ला घडवून आणला किंवा आपण हिंदुत्ववादी नाही असे सांगितल्यावर अतिरेक्यांनी मारलं नसतं या एक्स्ट्रीम लेफ्ट विचारसरणीला तिलांजली देऊ यात. 


Thursday, 10 April 2025

आमचा एक कस्टमर आहे. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो कस्टमर स्पिंडल उत्पादनाचं १००% काम आम्हाला द्यायचा. जवळपास दहा एक वर्ष आम्ही त्याचे सोल सप्लायर होतो. दहा एक वर्षात आम्ही त्याला पाचशे स्पिंडल सप्लाय केले असतील. असेच आमचे अनेक कस्टमर्स आहेत, जिथे आम्ही सॉलिड नाव कमावलं होतं. 

तीन एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या आमच्या ग्राहकाने एका स्पेशल स्पिंडल ची ऑर्डर दिली होती. त्याला बेअरिंग पण वेगळ्याच साईझची लागणार होती. ती बेअरींग सोर्स करण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं पण जगात कुठे ती मिळेना. डिलिव्हरी ची कमिटमेंट देऊन बसलो होतो. आणि ज्या मेकच्या बेअरिंग ची गरज होती ती काही मिळत नव्हती. 

इथे एक गडबड झाली. आमच्या पर्चेस ऑफिसर ने त्याची चीन मध्ये विचारणा केली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडे होती. ज्या उत्पादकाची हवी होती तीच त्याला मिळाली. त्याने सुद्धा फार काही विचार न करता ती ऑर्डर केली. आणि मुख्य म्हणजे त्याने इंजिनीअरिंग डिपार्टमेंट ला विचारलं पण नाही ज्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं. 

आम्ही बेअरिंग इम्पोर्ट केली. स्पिंडल बनवला आणि ग्राहकाला सप्लाय केला. थोडा उशीर झाला होता, आणि त्याने कस्टमर नाराज पण होता. 

स्पिंडल सप्लाय केला खरा पण ज्या मशीन वर लावला त्यावर पंधरा दिवसातच ट्रायल चालू असताना तो फेल झाला. कस्टमर आमच्यावर बेफाम चिडला. फेल्युअर चं रूट कॉज शोधायला गेल्यावर कस्टमर ला माहित झालं की आम्ही चायना वरून बेअरिंग आणून वापरली आहे. ग्राहकाचा पारा मग तर खूपच चढला. त्याने मला चांगलंच सालटवून काढलं. कारण ओरिजिनल मेकची बेअरिंग असली तरी चीन वरून आणली म्हणजे ती डुप्लिकेट असण्याची जास्त शक्यता होती. (नंतर ती डुप्लिकेट होती हे सिद्ध पण झालं)

मी कस्टमरला सांगत होतो की "सर, चुकून झालं आहे आमच्या पर्चेस ऑफिसर कडून. तुमची डिलिव्हरी डिले होत होती, त्यामुळे त्याने चीन मध्ये ऑर्डर केली आणि तुमचा स्पिंडल वेळेत सप्लाय झाला." पण आता स्पिंडल फेल झाला होता. 

मी कस्टमर ला समजवायचा प्रयत्न करत होतो की दहा वर्षे आम्ही प्रॉडक्ट सप्लाय करतो आहे. एकदाही प्रॉब्लेम आला नाही आहे. पण तो काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हता. तो म्हणाला "मी तुम्हाला सप्लायर म्हणून ब्लॅक लिस्ट करतोय. And I will see to it that you will hear this music in the market"

एक मोठं अकौंट आम्ही लूज केलं होतं परत वर बदनामी वेगळी. मी मिटिंग घेतली आणि आमच्या लोकांना सांगितलं

"हे असं आहे. एक चांगला उत्पादक  म्हणून नाव कमवायला आपल्याला दहा वर्षे गेलीत, पण एका चुकीमुळे आपल्याला किती मोठी किंमत चुकवायला लागत आहे."

"पण अजून एक गोष्ट सांगतो की आपला उद्देश कुणाला फसवायचा नव्हता. आपण त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घेतले ते भले चुकले असतील. तरीही सांगतो की आपले मूळ सिद्धांत हे व्यवसायाच्या नैतिकतेला धरून आहेत. ग्राहकाने दिलेली धमकी नैमित्तिक आहे. मला खात्री आहे, प्रामाणिक नीतिमत्तेच्या रस्त्यावर चालत राहिलो तर हा ग्राहक आपल्याकडे परत येईल"

आज तो ग्राहक आमच्या पहिल्या पाच पैकी एक आहे.