जो पर्यंत हे प्रमाण आहे की ८०% लोक हे सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट किंवा मॉडरेट राईट या झोन मध्ये आहेत तो पर्यंत देश हा सलोख्याने नांदेल.
प्रॉब्लेम हा झाला आहे की गेल्या काही वर्षात मॉडरेट राईट विचारसरणीचे लोक हे एक्स्ट्रीम राईट कडे झुकत आहेत. आणि त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम मॉडरेटली लेफ्ट विचारसरणीचे लोक हे मॉडरेट राईट कडे चालले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. जेव्हा सेंटर लाईन च्या आजूबाजूला कमी आणि एक्स्ट्रीम लेफ्ट किंवा राईट मध्ये जग विभागले जाईल तेव्हा मात्र प्रॉब्लेम होणार आहे.
कुठलाही दहशतवादी हल्ला हा धर्म प्रेरित असतो असा एक मतप्रवाह होत चालला आहे. (जसा नुकताच झालेला पहलगाम हल्ला इस्लामप्रेरित आहे असा स्ट्रॉंग मतप्रवाह आहे). आपण सर्व जण हे विसरत चाललो आहोत की धार्मिकतेला खतपाणी हे सरकारच घालत चाललं आहे. आपल्या धर्माबद्दल सर्वाना प्रेम असतं, आणि ते यौग्य आहे. शेवटी धर्मच आपल्याला जगण्याची जीवनप्रणाली शिकवतं. पण धर्माबद्दलच्या प्रेमाला पहिले अभिमानात, नंतर दुराभिमानात, मग गर्वात आणि शेवटी अंदाधुंद अधिकारात रूपांतरित काम पाकिस्तानातील सरकार त्यांच्या धर्माबाबत करत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान करतं आहे. ही धर्मनीती आहे. जी सरकार राबवत आहे. हा धर्म नव्हे. This is Policy of religion and not religion.
या प्रोसेस मध्ये झालं हे आहे की आपण धर्मनितीला विरोध करण्याचं सोडून धर्मालाच विरोध करत चाललो आहोत. आणि या लपेट्यामध्ये भारतीय समाजाचा एक मोठा प्रवर्ग यात ओढला जातो आहे. एक लक्षात घ्यायला हवं की राजनीती ही धर्मनितीला ओव्हरपॉवर करणारी हवी. ना की उलटं. अटलबिहारी वाजपेयींनी कानपिचक्या देताना वापरलेला राजधर्म तेच सांगतो. दहशतवादी हल्ला हा भारताची विकासनीती हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या देशाच्या धर्मनितीने केला आहे हा नॅरेटिव्ह जास्त प्रस्थापित करण्याची गरज आहे. ना की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर. कारण आता भारताच्या विकासनीतीला खीळ जर काही घालू शकणार असेल ते धार्मिक ध्रुवीकरण. आपण तो डाव हाणून पाडण्यात आर्थिक आणि सामाजिक शहाणपण आहे. असं आहे की काश्मीर मध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांनी हिंदूंना मनापासून मदत केल्याचे अनेक दाखले दिसत आहेत. एका धर्माने दुसऱ्या धर्माला विरोधच करायचा असेल तर ते घडलं नसतं.
आता कुणी म्हणेल की त्यांना त्यांची पर्यटन व्यवसायाची काळजी होती म्हणून मदत केली. मग मी पण तेच म्हणतोय की धर्मापेक्षा कर्म हे जास्त माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रभावीपणे उद्युक्त करतं.
धर्म ही प्रणाली आहे, गाईडलाईन्स. तो जर नियम म्हणून थोपवाला की त्याचा अफगाणिस्तान होतो, पाकिस्तान होतो, सीरिया होतो, लिबिया होतो. तो जर प्रणाली म्हणून वापरला तर त्याचा स्वीडन होतो, ऑस्ट्रेलिया होतो, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड होतो. नागरिकत्वाचे नियम घटनेत लिहिलं आहे.
तेव्हा सेंटरलाईन आसपास वावरणाऱ्या माझ्या मित्रांनो, आजही पण बहुसंख्य आहोत. एक्स्ट्रीमिस्ट लोक आजही अल्पसंख्यांक आहेत. तेव्हा सजगतेने जगू यात. मी आता यांच्याकडून मटेरियल घेणार नाही, वेटर म्हणून त्यांच्याकडून सर्व्हिस घेणार नाही, उबर ड्रायव्हर दुसऱ्या धर्माचा असेल तर कॅब करणार नाही ही एक्स्ट्रीम राईट कडे जाणारी विचारसरणी सोडून देऊ, आणि बिहार निवडणुकांच्या आधी हल्ला घडवून आणला किंवा आपण हिंदुत्ववादी नाही असे सांगितल्यावर अतिरेक्यांनी मारलं नसतं या एक्स्ट्रीम लेफ्ट विचारसरणीला तिलांजली देऊ यात.
No comments:
Post a Comment