Friday 14 July 2023

मानसिकतेवर

 Well, I have experienced this quite a few times and learnt it hard way. If for some reasons, you are not going well in relationships, just move on. It helps both the involved. And more importantly, positive way. I am talking this in relation with business relationship, friendly relationship and even family relationship.


I have seen many business partnership which broke on bitter terms but I think what was more important was breaking off. Once it was broken, both the partners have followed their own path and did well. Or even if any of them did not do well, it was because of their own actions.

In fact, the wonderful fact of such moving on is that mostly you cross path again in future on happy note. Time kills the bitterness.

Any relationship which is impeding your development, it is better to sacrifice that relationship, however valuable it is. In terms of business, this can be applicable to working partners, employer-employee, customer-supplier or otherwise. We usually try to pull on such strained relations only to land in unhealthy situation, more so for your personal well being.

Remember, no one is indispensable in this world.

काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मी चुकवली आहे. त्यातली एक गोष्ट आहे, ते म्हणजे काही नाती मला झेपत नसताना निभावण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षे गेली हे समजण्यासाठी की कुठलंही नातं हे स्ट्रेच करण्याची काहीच गरज नसते. तुटण्याआधी त्या नात्यातून बाहेर पडलं तर दोघांसाठी खरंतर तो फायद्याचा सौदा ठरतो. आणि हे कुठल्याही नात्यासाठी खरं आहे. मग ते व्यावसायिक संबंध असो, मैत्रीचं नातं असो किंवा अगदी कौटुंबिक नातं असो. थोडं वाचताना विचित्र किंवा अविश्वसनीय वाटेल पण हे माझं लर्निंग आहे. 

मी अनेक व्यावसायिक पार्टनरशिप या तुटताना बघितल्या आहेत. आणि अगदी वाईट पद्धतीने तुटताना पाहिल्या आहेत. पण आज मी ते आठवतो, तेव्हा हे जाणवतं की यातला सगळ्यात महत्वाचा आणि चांगला किंवा महत्वाचा भाग कुठला असेल तर ती पार्टनरशिप तुटणे. एकदा की हे नातं संपलं की बहुतेकदा दोन्ही पार्टनर्स ने आपले मार्ग वेगवगेळे केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं भलं झालं. आणि अगदीच कुणाचं भलं नाही झालं तर त्याचं उत्तरदायित्व हे दुसऱ्या कुणावर नसून स्वतःवर असतं, हा साक्षात्कार फार भारी असतो. 

गंमत म्हणजे, बऱ्याच केसेस मध्ये हे दोन पार्टनर्स नंतरच्या काळात एकमेकांच्या समोर आले आणि अगदी निवांतपणे एकमेकांना सामोरे गेले. दोघामधील कटुता ही काळ या औषधाने संपवली असते. 

जे नातं तुमच्या मानसिकतेवर आघात करतं, त्या नात्याचा त्याग करावा. तो लवकरात लवकर करावा या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. कौटुंबिक नात्याबाबतीत हे अवघड असेल कदाचित पण लोक व्यावसायिक नातं सुद्धा ताणून धरतात. खरंतर व्यवसायामध्ये वर्किंग पार्टनर्स, कंपनी आणि त्याचे कर्मचारी, ग्राहक आणि सप्लायर या कुठल्याही नात्यामध्ये कटुता येते आहे असं जाणवलं तर ते नातं विसर्जित करावं. ते केलं नाही आणि मनाच्या विरुद्ध त्या नात्याला निभावत राहिलात, तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो. 

कुठल्याही नात्याला पर्याय नसतो हा एक मोठा गैरसमज बाळगून असतो आणि त्याची मोठी किंमत चुकवतो. जितक्या लवकर हे कळेल तितकं तब्येतीला बरं. 

No comments:

Post a Comment