Friday 23 August 2013

मन २

आयुष्यात बर्याचदा गोष्टी घडून जातात, आपसूकपणे. त्या घडाव्या अशासाठी आपण काही विशेष प्रयत्न पण केला नसतो. पण त्या घडतात हेही खरं. मग त्या आपल्या मनासारख्या असोत वा मनाविरूद्ध.

सगळे फासे व्यवस्थित पडत असतात़ तेव्हा आपल्या जीवनावर आपलंच नियंत्रण आहे, ही भावना प्रबळ होते. पण "नियती" कधी रंग दाखवायला लागली की कशी पळता भुई थोड़ी होते. कधी एकदा या चक्रातून बाहेर पडतो असं होतं.

पण बाहेर पडतो बरं का! म्हणजे या चक्रव्यूहातून आपली सुटका होणार की नाही या विवंचनेत असतानाच असं काही दान पडतं की मार्ग खुला होतो. आणि चाचपडत नाही तर लख्खपणे रस्ता समोर दिसतो. फक्त या चक्रव्यूहात न थकता वाट शोधण्याची आस ठेवली पाहिजे. बर्याचदा आपण अगदी रस्त्याच्या जवळ आलो असतो, अगदी तेव्हाच तो शोधण्याचा नाद सोडून देतो.

सूर्योदयाच्या साक्षीने रोज मर्त्य असे आपण अमर्त्य अशा नियतीशी लढा देण्यासाठी सज्ज होत असतो, मार्ग शोधण्यासाठी...............................याला जीवन एेसे नाव 

No comments:

Post a Comment