Monday 22 June 2020

मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र

काम देण्यायोग्य इंजिनीअर्स उपलब्ध नाहीत ही व्यवसायिकांची व्यथा आणि चांगले पगाराचे जॉब्ज उपलब्ध नाहीत ही युवक/युवतींची व्यथा. आणि हे असं घडण्यामागे समाजाचे सर्व कोन कारणीभूत.

ज्या क्षेत्रात तार्किकतेने काम करण्याची अपेक्षा असते अन ते करण्यात कुठल्याही शाखेचा इंजिनीअर चालतो हे लक्षात आल्यावर भोवऱ्यासारखे तमाम स्ट्रीमच्या इंजिनीअर्स ला आपल्याकडे ओढून घेतलेल्या पण त्याबरोबरच कमी वयात आर्थिक स्थैर्य देणारी आय टी इंडस्ट्री, अचानक इंजिनीअर्सची गरज तयार झाल्यावर शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षींनी जन्माला घातलेले इंजिनियरिंग कॉलेजेस, पण त्या कॉलेजेस मध्ये शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे की नाही याची माहिती न घेता केवळ "पॅकेज" या आकर्षणापोटी घाऊक भावात ऍडमिशन घेणारा आपला समाज, आणि कॉलेजेस वर चांगल्या क्वालिटी एज्युकेशन देण्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी आणि अनास्था असणारं शासन या सगळ्या गोष्टीमुळे नोकरीक्षम इंजिनियर्स ची वानवा या देशात तयार झाली त्यात नवल ते काय? आणि या जोडीला मूल्यांचं अधिष्ठान आपल्या जगण्याला असायला हवं या भावनेचा अभाव याने एकूणात रसातळाला गेलेल्या इकोसिस्टमचा गळा अजून घोटला.

हे वाचताना एक लक्षात असू द्या की  मी व्यथा मांडतो आहे एसएसएमई  च्या अनुषंगाने जिथे आमच्या वाटेला फक्त तिसऱ्या किंवा चौथ्या श्रेणीच्या कॉलेजेस ची मुलं येतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी संवाद साधणे आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची चळवळ सुरू होणं गरजेचं आहे. असा एक छोटा प्रयत्न औरंगाबादचे अभ्यासू पत्रकार श्री दत्ता जोशी करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी मला सहभागी करून घेतलं. या संदर्भातील मतं त्यांच्या समवेत मांडली. या पोस्टद्वारे मी आवाहन करतो की मी तर एक छोटा उद्योजक आहे पण जोशींनी अनेक दिग्गज उद्योगपतींना या विषयावर बोलण्यास उद्युक्त केलं आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि उद्योग जगताच्या एक एम्प्लॉयेबल युथ म्हणून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्या.

फक्त आणि फक्त मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र घडवू शकतो. 

No comments:

Post a Comment