Saturday 8 February 2014

काम करू यात

दिल्लीत भावाकडे मलेशिया चे फोटो बघितले. उगाचच असूया वाटली. आयला एवढासा टीचभर देश पण काय प्रगती केली राव त्या देशानी. पण मग नंतर लक्षात आलं की सालं आकारमानानुसार किंवा लोकसंख्येंच्या मानाने भारताच्या पासंगालाही पुरणार नाही अशा असंख्य देशांनी आपण अचंबित व्हावं अशी प्रगती केली आहे. मग ते १०० स्क्वेअर किमी चं सिंगापूर असो, वा थायलंड असो. तैवान, इंडोनेशिया तर  एवढंच कशाला मुंगी एवढं माॅरिशस असो पण तिथलं ही quality of life आपल्या मुंबई पेक्षा बरंच बरं असतं. मी जाऊन आलोय म्हणून सांगतो, थायलंडची लोकं मला अतिशय arrogant वाटली. ज्या चीनचं आज जगभर कौतुक होतंय तिथली लोकं अतिशय आढ्यतेखोर आणि फेकूचंद दिसली. म्हणजे मी गेलेल्या delegation मधल्या customers ची चिन्यांनी बडदास्त ठेवली आणि बारमध्ये business deals फायनल केल्या त्यावरून मनोवृत्ती कळते. चीन मधल्या उद्योगांचा आर्थिक व्यवहार कसा चालतो हा संशोधनाचा विषय असतो.  ज्या जर्मनीला आपण क्वालिटीचा मापदंड समजतो तिथले लोकंही ही बर्यापैकी stubborn आणि rigid असतात. (किंबहुना एखादी गोष्ट या पद्धतीने करायची म्हणजे त्यात तडजोड नाही हे त्यांच्या quality मागचं कारण असू शकतं). चिंगुसपणा म्हणाल तर पश्चिमेकडच्या लोकांमधे हा ठासून भरला असतो. (अमेरिकन अपवाद). या सगळ्या पार्श्वभूमीवर बर्याच क्षेत्रात उजवा असलेला आपला देश हा एवढा मागे का राहिला याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अर्थात चिमुटभर भेटलेल्या लोकांवरून अख्ख्या देशाचा अंदाज लावणं चुकीचंच, हे कळतं मला.




एकदा स्वारगेटच्या चौकात भिक मागण्यासाठी लहान पोरं आली होती. तेव्हा गाडीत अमेरिकन जेफ बसला होता. त्यांच्याकडे बघत जेफ म्हणाला "I have traveled so many countries around the world, but I have not seen such poor people anywhere else. As a society why can't you do something" शब्द त्याच्या तोंडून पडून गेले आणि घरं माझ्या काळजाला पडत होती. (आता please असं नका विचारू विचारू कि जेफ आफ्रिकेत गेला होता का)

राजकीय परिस्थिती बाजूला ठेवली तर मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टीत आपण मागे पडलो आहे. स्वयंशिस्त, स्वच्छतेची कास, ईमानदारी या मुलभूत गुणांची वानवा ठायी ठायी दिसते. इतिहासाचं over glorification हा एक खूपंच मोठा अडसर वाटतो. (कुठेतरी वाचलं होतं इतिहासात रमलेला माणूस आणि चहात बुडवलेलं बिस्कीट सारखंच, लिबलिबीत) म्हणजे थोडक्यात सामाजिक मानसिकतेचं सक्षमीकरण करण्यात आपण कमी पडत आहोत.






आताच सत्या नाडेला बद्दल पोस्ट लिहिल्यावर एका comment ला उत्तर म्हणून खालील comment लिहावी लागली.


This is the problem. We pretend to be would be "huge potential" and so on. I read somewhere that MS is $ 72 Bn company and you know India's contribution, it is merely $ 1 Bn. US is in depression and still their automobile production is 9 Mn in nos and India 3.5 Mn.(communist China is 17 Mn). The machine tool industry (I belong to this) is $7 Bn in US, when it is completely shrunk. (China $ 20 Bn) as against India $ 1 Bn. You put together all excavator production of India and Caterpillar alone stands more than that. It's only China that is termed as potential market (though I hate to write this) and India is still "would be huge potential" market. Believe me बहुत पापड़ बेलने है. I do not think, Indra Nooyi, Vikram Pandit, Satya Nadela, Ajit Keskar,  Sunita Williams are selected for their respective job as they have some connection with India. It is because they have ability to meet requirements of job which they perform diligently and with integrity. Nothing else. No marketing gimmicks, no business development. Absolutely nothing. 

इमान ऐतबारे, अंग झटून काम करावं लागणार आहे, बस बाकी काही नाही. सध्यातरी "उभरती महासत्ता" वैगेरे म्हणणं सोडून देऊ यात.

मला हेही कळतं की, ब्लाॅगवर लिहून किंवा फेसबुकवर लिहून हे काही प्रश्न सुटणार नाहीत, पण या मूलभुत गुणांचा अंगीकार करण्याची गरज असल्याचा संदेश तर आपण एकमेकांना या माध्यमातून देऊच शकतो. कुणी सांगावं, आपल्याला जाणवणार्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या तर, अनेक विचार याला जोडले जातील आणि हळू हळू का होइना परिवर्तनाच्या दिशेने जाऊ अशी भाबडी का असेना अशी आशा ठेवायला काय हरकत आहे.


No comments:

Post a Comment