Saturday, 15 January 2022

सकाळ लेख क्र ३

 पहिल्या लेखात उल्लेख केला होता की उद्योजक आणि व्यावसायिक हे बऱ्याचदा समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात. त्या दोघात काय फरक आहे ते जाणून घेऊ. 

मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असू शकते.  उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर एकमेकांना पूरक शब्द आहेत. 

काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये. 

तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. असे अनेक उद्योग आपल्याला दिसतील की ते येण्यापूर्वी त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करता येतील हे जगाला माहीतच नव्हतं. ओला किंवा उबर सारखी टॅक्सी सर्व्हिस, ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखं ऑनलाईन स्टोअर, एअर बी एन बी किंवा ओयो सारखी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, बुक माय शो सारखी ऑनलाईन बुकिंग ची सर्व्हिस, एअर डेक्कन ने चालू केलेली नो फ्रिल एअरलाईन्स ही आजकालच्या जगातील काही उदाहरणे. 

उद्योजकाने आणलेली कल्पना ही नाविन्यपूर्ण असते आणि त्यामुळे त्याला स्पर्धा कमी असते. व्यवसायिक मात्र प्रचलित कल्पनेवर व्यवसाय चालू करतो. ते करत असणारे अनेक उद्योग अस्तित्वात असतात. त्यामुळे त्याला स्पर्धा जास्त असते. त्यातही काही हरकत नाही, पण जो पर्यंत तुम्ही व्यवसाय करण्याच्या धोरणामध्ये काही "हटके" करत नाही तोपर्यंत उत्पादन किंवा सेवेच्या किमतीत स्पर्धा होत राहते.  

साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाची आर्थिक गणितं मांडत वाटचाल करतो. तर उद्योजक मात्र अमूर्त अशा मूळ सिद्धांताचा पाठपुरावा करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो.

व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल. 

कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक आकडेमोडी मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक संख्यात्मक विश्लेषणाबरोबर अंतर्मनाचा पण आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते.

व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.

उद्योजक व्यवसायाकडे त्रयस्थ भूमिकेतून बघू शकतो. तो स्वतःला व्यवसायापेक्षा मोठा समजत नाही. 

वरच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उकल केली तर असं सांगता येईल की व्यवसाय म्हणजे धोका घेणे, जो उद्योजकाचा स्थायीभाव आहे,  हे जितकं खरं आहे तितकंच त्या रिस्कला तोंड देता येईल असा बॅक अप प्लॅन बनवणे हेही महत्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं दोन्ही बाजूंचे चांगले गुण उचलून व्यवसायाभिमुख दूरदृष्टी ठेवणं ही कसरत असते खरं, पण ती जर जमली तर समाजाने, राष्ट्राने आणि सरतेशेवटी जगाने दखल घ्यावी असा व्यवसाय उभा राहू शकतो. एव्हाना माझ्या लक्षात आलं आहे की उद्योजक आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्यातल्या उद्योजकतेला जर व्यवसायिकतेचं कोंदण दिलं तर ते नाणं खणखणीत वाजण्याची शक्यता तयार होते.

सकाळ लेख क्र ३

Saturday, 8 January 2022

सकाळ, लेख क्र २

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.
नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो. माझाच अनुभव यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. तर काही मुद्दे:
१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे मग टाटा, एल अँड टी, रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो यासारखे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.
२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. उद्योजकता शिकण्याचं सगळ्यात भारी विद्यापीठ म्हणजे, उद्योजक बनणे.
३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.
४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. निर्णय घेण्याची क्षमता यावर सातत्याने जाणीवपूर्वक काम करत गेलं तर त्या क्षमतेत वाढ होते.
५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.
६. मॅक्डोनाल्ड च्या रे क्रॉक च्या आयुष्यावर आधारित फाउंडर चित्रपटात एक भारी वाक्य आहे. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.
७. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवा. अजून एक गंमत सांगतो. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत.
वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यावसायिक बनण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो
1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination
3. Action
4. Perseverance
5. Dream.


सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.

एक व्यावसायिक म्हणून जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो.     

स १. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.     

व्य२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच.      

३. ३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.     

यो ४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं.     

कृ ५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही.

६. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.     

  प ६. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवावा लागतो.

यातील काही मुद्द्यावर आपण येणाऱ्या आठवड्यात सविस्तर चर्चा करू.


सकाळ, क्र २

Saturday, 1 January 2022

सकाळ, लेख क्र १

लौकिकार्थाने अर्थार्जन करण्यासाठी आपल्याकडे किंवा किंबहुना जगात दोन समाजमान्य पद्धती आहेत. एक म्हणजे नोकरी करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे व्यवसाय करणे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही प्रकाराबद्दल काही वाद, प्रवाद आहेत, समज, गैरसमज आहेत. नोकरी करणे म्हणजे धोका कमी आणि व्यवसाय करणे म्हणजे धोका पत्करणे हा फरक सार्वत्रिक प्रचलित आहे. त्याचबरोबर नोकरी करणे म्हणजे "निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही" आणि व्यवसाय करणे म्हणजे "निर्णय घेण्याची पूर्णतः: स्वायत्तता आहे" असंही समजलं जातं. अजून एक लोकप्रिय समज म्हणजे नोकरीत अर्थार्जन करण्यावर मर्यादा तर व्यवसायात अफाट श्रीमंती येते. (श्रीमंती आणि संपन्नता यात फरक आहे आणि तो काय आहे, यावर नंतर कधीतरी चर्चा करू यात)

नोकरी आणि व्यवसाय यातील फरक हे थोड्याफार फरकाने कुणासाठी खरे असतीलही तरीही दोन्ही क्षेत्रात काम करताना तुम्हाला व्यवस्थापनाची शिडी वर चढत जायची असेल तर काही व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास होत जाणे ही गरज आहे. व्यवस्थापन पिरॅमिड चे तीन प्रवर्ग आहेत. एक म्हणजे डूअर, म्हणजे जो स्वतःच्या हाताने काम करतो, दुसरा म्हणजे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक ज्याने दुसऱ्याकडून काम करवून घेणे अपेक्षित असतं आणि तिसरा भाग म्हणजे लीडर, नेता ज्याला लोक आदर्श मानतात आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालत, वैयक्तिक आयुष्यात जे इप्सित आहे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. 

या सगळ्या मॅनेजमेंट थिअरी मध्ये काही लोक असंही मानतात की लीडरशिप हा एक अंगभूत गुण असतो. म्हणजे कुणी जन्माला येतानाच तो (किंवा ती) हा गुण घेऊन पृथ्वीवर आला असतो. आणि काही जणांकडे हा गुण नसतोच. माझं स्वतःच याबाबतीत मत वेगळं आहे. माझ्या मते पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्यजीवामध्ये लीडर चे गुण असतात. फक्त सामाजिक इको सिस्टम मुळे त्याच्यातील अंगभूत लीडरशिप गुणांना चालना मिळत नाही. तर काही जण हा चॉईस म्हणून स्वीकारतात. माझ्यामते डूअर आणि मॅनेजर असताना झोकून काम केलं आणि त्याबरोबरच स्वतःतील वैगुण्य ओळखत त्यावर जर दिवसागणिक विचारधारेला नवनवीन आयाम देत राहिलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर लीडर बनण्याची प्रोसेस चालू होऊ शकते आणि ती झाल्यावर काही काळात तो किंवा ती एक यशस्वी नेता, व्यवसायिक म्हणून मान्यता पावतात हे मी अनेक केस स्टडीज मध्ये आजूबाजूला घडताना  पाहतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर "मी आज जर कालच्या पेक्षा कौशल्य पातळीत सुधारलो नसेल तर मला उदयाला काही अवघड प्रश्न पडू शकतील अशी शक्यता आहे" ही विचारधारा अंगी बाणवत, स्वतःमधील व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करत जर वृद्धिधिष्ठित माइंडसेट ठेवला तर व्यावसायिकतेच्या निकषावर आपलं नाणं खणखणीत वाजेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

नोकरी की व्यवसाय याबाबत जसं आपल्या मनात सातत्याने द्वंद्व चालू असतं आणि त्याबाबत काही ग्रह आपण करून घेतले आहेत, त्याचप्रमाणे अजून दोन शब्दांचा अर्थ समजून घेण्यात आपण जरा गल्लत करतो आणि ते म्हणजे उद्योजक म्हणजे उद्योजक आणि व्यावसायिक. (Businessman and Entrepreneur). रूढार्थाने उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द आहेत असं वाटतं. पण या दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो हे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल. मी स्वतः उद्योजक या संज्ञेचा पुरस्कार करतो. पण इथं नमूद करू इच्छितो की बिझिनेसमन या संज्ञेला जागून जर कुणी त्यांच्या व्यवसायाची दिशा ठरवणार असेल तर त्यात चूक काहीच नाही आहे. फक्त याबाबतीतला फरक आपण समजून घ्यायला हवा ज्या योगे आपले विचार सुस्पष्ट होतील आणि व्यवसाय करतानाची मार्गदर्शक तत्वे आखण्यात आपल्याला मदत होईल. 

येणाऱ्या काही आठवड्यात या सदरामध्ये याच विषयातील बारकावे आणि कोणती व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करावी याबद्दल माझी काही मतं मांडणार आहे. सदर मतं ही माझ्याच ३२ वर्षाच्या अनुभवावर बेतली आहेत. 

नवीन वर्षाच्या आपल्याला आरोग्यमयी शुभेच्छा. 

सकाळ, लेख क्र १

 

Sunday, 26 December 2021

कसं काय जमतं?

 ललिता जेम्स चा दुसरा प्रश्न मला होता, तू इतका फिरतोस, आपलं घर च्या मिटिंग करतोस, कधी कविता म्हणतो, खेळतोस, वर फेसबुकवर टाईमपास पण करतोस, मग बिझिनेस कधी करतोस? ही एकतर कॅम्लिमेंट होती किंवा अशी शंका असू शकते की, खरंच तुझं बरं चालू आहे की..... 

यावर मी पण विचार केला की हे कसं जमत गेलं. कारण उशिरा येण्याच्या सवयीप्रमाणे इथं सुद्धा आनंदी आनंद होता. समोर येणारं काम करायचं आणि दिवसभर बिझी असल्यासारखं दाखवायचं, ही माझी रेग्युलर प्रॅक्टिस होती. मागच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या एम जी सरांच्या कोर्सनंतर जादू झाली. 

साधारण २०१६ च्या नोव्हेंबर मध्ये आमचा व्हिजन बोर्ड तयार झाला. ज्यामध्ये मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि एकंदरीत व्यवसाय आणि स्वतः याची होडी कशी हाकायची याच्याबद्दल असणारे समज, गैरसमज दूर होऊ लागले. भविष्याबद्दलचं जे धूसर चित्र आहे ते स्पष्ट होऊ लागलं. त्यांनतर जसे वर्ष जाऊ लागले, त्याबद्दलची भूमिका आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट दिसू लागले. हे एकदा झालं की , येणाऱ्या कामांची प्रायोरिटी ठरवणं सोपं होऊ लागलं. अर्थात हे एका रात्रीत झालं नाही तर त्यावर सातत्याने काम करत गेलो. 

सध्या आयुष्यात अगदी स्पेसिफिक गोष्टी करतो आहे. सेटको व्यवसाय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, बाकी बिझिनेस ओनर्स बरोबर डिस्कशन, कॉलेजेस मध्ये जाऊन तरुणाई बरोबर चर्चा,  आपलं घर बरोबर अगदी जुजबी काम, स्वतःची तब्येत, फॅमिली आणि मित्रांबरोबर पार्टी वा गेट टुगेदर या सहा गोष्टीभोवती माझं लाईफ विणलेलं आहे. 

वरील गोष्टीशिवाय दुसरं काहीही करायचं असेल तर मी चेक करतो की वरीलपैकी काही ऍक्टिव्हिटी त्या दिवशी प्लॅन आहे का? नसेल तरच ती गोष्ट करायचं ठरवतो. अन्यथा नाहीच. 

या सगळ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य व्यवसायाला. तिथं माझी गरज असेल तर नंतरच्या चारही गोष्टीला मी दुय्यम स्थान देतो. यात तब्येत हा प्रकार पकडला नाही आहे.  तब्येतीच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या कुठल्याच कामाच्या आड येत नाही, अपवाद फक्त सकाळी विमानप्रवास असेल तर. तो असेल तरच माझा व्यायाम होत नाही. 

राहता राहिला सोशल मीडियाच्या पोस्ट कधी लिहितो. लिंक्ड इन च्या पोस्ट मी कंपनी वेळेत टाकू शकतो कारण त्याने शक्यतो कंपनीचा ब्रँड पॉप्युलर व्हावा ही अपेक्षा असते आणि मी लिहितो पण त्या अनुषंगाने. फेसबुक वापरण्याच्या वेळ जनरली सकाळी पाच ते साडेपाच, रात्री आठ ते साडेनऊ यापैकी एक, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तसं, आदरवाईज विमानप्रवास. 

असो. मोठा निबंध झाला. पण अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर तीन गोष्टी:

- व्हिजन बोर्ड तयार करणे (सगळ्यात अवघड काम)

- कामाची प्रायोरिटी ठरवणे (खूप अवघड काम)

- कामाचं डेलिगेशन करणे. माझ्यापेक्षा जी कामं दुसऱ्याला चांगली येतात, ती मी देऊन टाकली नाही. गंमत म्हणजे दुसऱ्यांपेक्षा मला चांगली जमणारी कामं आता एका बोटावर मोजण्याइतकी उरली आहेत. (अवघड काम)

एकदा ही अवघड कामं जमली की आयुष्य सोपं होऊन जातं. 

Thursday, 4 November 2021

दिवाळी 2021

मागच्या नोव्हेंबर पासून पोटात दुखत होतं. बरेच उपाय झाले, चांगले डॉक्टर पण झाले. काही दिवस बरं वाटायचं आणि नंतर परत दुखायचं. शेवटी काल एन्डोस्कोपी केली आणि कारण कळलं. थोडं इन्फेक्शन आहे. पण सगळं कंट्रोल मध्ये आहे. 

काल काहीतरी निदान झाल्यामुळे आणि त्यावर ठोस उपाय कळल्यामुळे आज सकाळी जरा खुशीतच रेसकोर्सला चालायला गेलो. नेहमीपेक्षा वेग जरा जास्तच होता. पोटात अजूनही दुखत असल्यामुळे जॉगिंग न करता वेगात चालायचं हेच ठरवलं होतं. रेसकोर्सचा राउंड पूर्ण झाल्यावर घरी परत येत असताना एक स्त्री माझ्या मागून जॉग करत आली. 

वयाने माझ्यापेक्षा जरा जास्तच असावी. चेहरा घामाने निथळत होता. माझ्याकडे हसत म्हणाली "गुड मॉर्निंग जंटलमन". मी चपापलो. एखाद्या स्त्रीने असं डायरेक्ट ग्रीट केलेलं मला फारसं आठवत नाही. मी पण गुड मॉर्निंग म्हणत त्यांना ग्रीट केलं. अस्खलित इंग्रजीत मला म्हणाल्या "तुझ्यामुळे मी आज इतकं जॉगिंग केलं" माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहत म्हणाल्या "I was trying to beat you entire round of racecourse. Finally, I could beat you now". दोन्ही थम्स अप मी त्यांना काँग्रॅच्युलेशन्स म्हणालो. 

"Have a great day ahead" म्हणत त्या त्यांच्या घराकडे वळल्या. मी यु टू म्हणत पुढे निघालो खरा, आणि वळून त्यांना म्हणालो "wish me luck for rest of the year" आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. ते बघत मी त्यांना म्हणालो   "It was terrible 18 months. Counting every wish to come out of it." आता थम्स अप द्यायची वेळ त्यांची होती. बेस्ट लक माय फ्रेंड म्हणत त्या गेल्या. 

जिम ब्रोझ, माझा अमेरिकन मित्र ३१ जानेवारी २०२० ला भारतात होता. तो म्हणाला पण होता त्यावेळी. "करोना बद्दल तुझं काय मत आहे". मी म्हणालो "आमच्या इथं अगोदरच इतके डेडली व्हायरस आहेत, हा करोना आमचं काही करू शकत नाही". पुढच्या अठरा महिन्यात माझ्या त्या स्टेटमेंटच्या धज्जीया उडाल्या. आणि न भूतो न भविष्यती असा उत्मात या चायनीज व्हायरस ने केला. (परवा झूम कॉल मध्ये जिमने माझ्या डायलॉग ची आठवण करून दिली. मी त्याला २४ फेब्रुवारीला ट्रम्प भारतात बागडायला आले होते, त्याची आठवण करून दिली.) 

सुदैवी आहोत की आपण जिवंत आहोत. अनेकांनी त्याला तोंड देताना सॉलिड फायटिंग स्पिरिट दाखवलं आहे. आणि नेव्हर गिव्ह अप अटीट्युड सुद्धा. अनेकांनी या काळात आपल्याला व्यवसायाला नुसता जगवलं नाहीतर रॉक सॉलिड पद्धतीने तोलून धरलं. यातून तरलो आहोच तर आता कुठल्याही प्रश्नाला सामोरे जाण्याची ताकद या अठरा महिन्यांनी दिली. कोणतंही सजग मानव्य या काळात अधिक जबाबदार झालं आहे. अवलोकन केलं तर त्याच्या विजिगिषु वृत्तीची जाणीव त्याला सतत होणार आहे. 

तुम्हाला ही दिवाळी आणि येणारे वर्ष हे सुखाचे, निरामय आरोग्याचे जावो हीच प्रार्थना 

Tuesday, 26 October 2021

टिकली

 करोना मुळे माझा आणि समीरचा बिझिनेस स्लो डाऊन मध्ये आला. एक दिवशी असाच कटिंग चहा पीत असताना, समीर म्हणाला "आजकाल फूड इंडस्ट्रीला बरे दिवस आहेत. माझ्याकडे लाडू बनवणारा एक चांगला रिसोर्स आहे. लाडू बनवायचा व्यवसाय चालू करू यात. तू थोडे पैसे टाक, मी थोडे टाकतो."

मलाही फार काही रिस्क वाटली नाही. समीरच्या रिसोर्स डेव्हलप करायच्या स्किलमध्ये मला काही शंका नव्हती. व्यवसाय चालू झाला आणि हळूहळू चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या. लाडू एकदम चांगल्या चवीचे होते यात काही वादच नव्हता. 

सणवाराचे दिवस चालू झाले आणि ऑर्डर्स वाढल्या. गेल्या दोन महिन्यापासून जवळपास ५०० किलो महिन्याला लाडू ची ऑर्डर करत होतो. समीर सगळं सांभाळत होता. मी नेटवर्किंग करत काही रेफरन्स पाठवत होतो.

कालच्या रविवारी मी आमच्या किचनवर व्यवसाय कसा चालू आहे ते बघावं म्हणून धडकलो. असंच अकौंटस वगैरे बघत असताना एक स्त्री तिथं आली. म्हणाली "आम्हाला काही समाजसेवी संस्थांसाठी वाटायला २५० किलो लाडू लागणार आहेत. तुम्ही बनवून देऊ शकता का?" समीर तिथं जवळच होता. धावत आला आणि बाईंशी चर्चा करू लागला. कधी लाडू लागणार, पॅकिंग कसं हवं, प्रति किलो रेंट किती वगैरे.

पंधरा दिवसाचं काम एकाच दिवसात मिळणार होतं. मीही जरा उत्साहात होतो. 

इतक्यात घात झाला. लक्षात आलं की बाईंनी कपाळावर टिकली लावलीच नाही आहे. मी समीरला म्हणालो "थांब, नो बिंदी नो बिझिनेस". 

सम्या माझ्याकडे बघून ओरडला "आर यु आउट ऑफ युअर माईंड?". मी त्याला टेबलपासून लांब घेऊन गेलो आणि म्हणालो "नियम म्हणजे नियम. ज्यांनी टिकली लावली नाही त्यांच्याकडून काही घेणार नाही अन त्यांना काही विकणार नाही. ठरलं म्हणजे ठरलं". 

समीर मला खाऊ की गिळू नजरेने पाहत म्हणाला "लगा, पंधरा दिवसांची ऑर्डर आहे अन तू ती घेणार नाही म्हणतोस." 

मी माझ्या मतावर ठाम राहिलो. बाईंच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्या म्हणाल्या "विचित्र कारणासाठी तुम्ही घरात आलेली लक्ष्मी परत पाठवताय. ठीक आहे, तुमची मर्जी." आणि त्या धाडकन निघून गेल्या.

समीर माझ्यावर सॉलिड भडकला अन त्यानं माझा हिशोब करून त्या किचन मधून हाकलून दिलं. 

मी समीर ला ब्लॉक करू की नुसतं अन फ्रेंड करू हा विचार करत बसलोय. तेवढ्यात समीरचा मला मेसेज आला "फेसबुकवर आपली मैत्री झाली, आणि तिथल्या हॅश टॅग मुळे तुटली." असो. 


Friday, 15 October 2021

फळणीकर

त्यांची आणि माझी ओळख तशी २०१३-१४ पासून. इंडस्ट्रीच्या लोकांची समाजसेवेची व्याख्या चेक फिलॉन्थरोपी ला येऊन संपते. त्या न्यायान मी त्यांच्या सानिध्यात आलो. त्यांच्या म्हणजे विजय फळणीकर, आपलं घर या संस्थेचे सर्वेसर्वा, ज्यांनी मला समाजासाठी चेक नाही तर टाइम फिलॉन्थरोपी जी जास्त गरज आहे हे ठसवलं. 

मला काही अवलिया म्हणावे असे लोक भेटले आहेत. फळणीकर त्या संज्ञेला पूरपेर जागतात. एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगलेला हा माणूस. त्यांच्या पराजय नव्हे विजय या पुस्तकात त्याबद्दलची माहिती आलीच आहे. त्यांचं खडतर बालपण, मग बेफाट तारुण्य, मुलाच्या मृत्यूपुढे हतबल पिता आणि नंतरची आपलं घर ची वाटचाल. हे सगळं कमाल  आहे. त्यापलीकडे जाऊन फळणीकर मला भावतात ते म्हणजे झपाट्याने कामाचा उरक असणारा माणूस. त्यांच्या शब्दकोषात "नाही" हा शब्दच नाही. आणि मुख्य म्हणजे एकदा काम हातात घेतलं कि ते संपल्याशिवाय हे गृहस्थ जीवाला उसंत म्हणून देत नाही. अक्षरश: अर्जुनाला जसा फक्त डोळा दिसतो त्याप्रमाणे त्यांना फक्त आणि फक्त हातात घेतलेलं काम दिसतं. 

गेल्या काही वर्षात अशा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. ब्रेस्ट कँसर सर्जरीचं युनिट आपलं घर मध्ये चालू करायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. आल्यापासून नेट ४३ दिवसात त्यांनी ते छोटेखानी सुसज्ज ओटी आणि तिथं लागणाऱ्या अद्यावत उपकरणासह त्यांनी उभं केलं. पॅथॉलॉजी लॅब चालू करायचं असं त्यांनी ठरवलं. कुठून ती रेडी टू युज शेड मागवली, सकाळी शेड आली, संध्यकाळी सहा वाजता लॅब सुरु. होस्टेलच्या प्रांगणात अँफी थिएटर सुरु करायचं त्यांच्या मनात आलं. काही नाही, दिवस रात्र त्याचाच ध्यास. बरं ही माझी खाज, म्हणून संस्थेकडून काही किमती इक्विपमेंटचा खर्च न करता तो त्यांनी स्वतः केला, पण सुसज्ज असं छोटं थिएटर उभं केलं. करोना काळात २० ग्रोसरी किट्स बनवू म्हणून मी त्यांना विनंती केली. ती तर त्यांनी पूर्ण केलीच. पण पुढं जवळपास सातशे किट्स गरिबांना वाटली. सांगली पूर, आताचा चिपळूण पूर अशा काही नैसर्गिक आपत्तीनंतर नेहमी पुढे. आतासुद्धा त्यांनी आपलं घर मध्ये २८ बेड चं हॉस्पिटल उभं करण्याचं ठरवलं. ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता देमार काम करत आहेत. परत हे सगळं एकहाती. आपलं घर मध्ये विश्वस्त मंडळ आहे, पण सगळ्यांचे छोटे मोठे उद्योग. त्यामुळे सर्व गाडा काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते एकटे ओढतात. मी तर त्यांना नेहमी म्हणत असतो की ते जर आमच्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये काही व्यवसाय करत असते तर त्यांनी धुव्वाधार काम करत तो व्यवसाय कुठल्या कुठं नेला असता. अर्थात आपलं घर चं स्थान पण वादातीत आहे. 

आपलं घर म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्य आहे. वाहून घेतलं आहे त्यांनी. कुठलाही रेफरन्स त्यांना द्या, शेवटी ते गाडी बरोबर आपलं घर शी संबंधित एखादया मुद्द्यावर चर्चेची गाडी आणून ठेवतात. एकेक क्षण ते संस्थेसाठी वेचतात. कधी कधी वाईटही वाटतं. कारण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा झालेला भ्रमनिरस पण कळतो. एव्हाना मला एक कळलं की एकवेळ नफा करणारी कंपनी चालवणं सोपं, पण इमानेइतबारे समाजसेवी संस्था चालवणं अवघड. एक दोन वर्षाची पोरं येतात, त्यांचं आयुष्य तुम्ही घडवता आणि काहीजण नंतर संस्थेकडे पाठ फिरवून जातात, ते पुन्हा कधी परत न येण्यासाठी. फार अवघड फिलिंग असतं ते. तसा माणूस शौकिया मिजाजचा. पण संस्थेसाठी त्यांनी स्वतःला अंतर्बाह्य बदललं. स्वतःचे छंद, मौजमजा हे बंद कपाटात कुलूप लावून ठेवले आहेत. फळणीकरांचे अनुभव पाहून माझे आयुष्याबद्दलचे अनेक दृष्टिकोन बदलले. 

पराकोटीची पारदर्शकता, म्हंटलं तर त्यांचा गुण आणि म्हंटलं तर अवगुण. पण गुणावगुणांची बेरीज वजाबाकी केली तर फळणीकर जिंकले आहेत. आज फळणीकरांनी प्रोजेक्ट तयार केला आणि तो पैशासाठी अडला असं सहसा होत नाही. विप्रो मेडिकेअर सारख्या कडक ऑडिट करणाऱ्या चॅरिटेबल संस्थेनी आपलं घर च्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात काही पैशाचा विनियोग करायचा ठरवलं यातच सगळं काय ते आलं. 

गेले पाच एक वर्षे झालीत, फळणीकरांनी मला आपलं घर चं ट्रस्टी म्हणून काम करायची संधी दिली. मी काम म्हणजे काय हो, ते जे काम करतात, तेव्हा त्यांच्या हाताला हात लावून मम् म्हणायचं. नाही म्हणायला, करोना काळात, पुण्यात असल्यामुळे थोडं काम करू शकलो. पण लॉक डाऊन उठल्यावर माझी भ्रमंती चालू झाली त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यात मनोजगतं आपलं घर मध्ये जाऊ नाही शकलो. पण कुणास ठाऊक, याच आयुष्यात फळणीकरांच्या खांद्याला खांदा लावून एखादा तुफानी प्रोजेक्ट आपल्या हातून व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. 

फळणीकर सर, तुमचं काम प्रेरणादायी आहे वगैरे फॉर्मल शब्द वापरत नाही. एकच सांगतो, तुम्ही मला मित्र समजता हे एक माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. 

तर अशा या वादळी आयुष्याचा आज हिरकमहोत्सवी वाढदिवस. त्यांना एकदम दिलसे शुभेच्छा.