Tuesday 12 August 2014

Choice

मी: अहो, नाही जमणार आता माणूस पाठवायला.

कस्टमर: मंडलिक, खूप problem मध्ये आहे मी. मशीन चालू व्हायला पाहिजे आजच्या आज.

मी: माणूस नाही आहे available आज. असला असता तर नक्की पाठवला असता.

कस्टमर: मित्रा, सगळं सुरळीत असेल, resources available असतील तर गोष्टी जमूनही जातील. पण तुमच्यासारख्या कंपनीचा कस तेव्हा लागतो जेव्हा तुम्ही crisis व्यवस्थित हाताळता. आता मी प्रोब्लेम मध्ये आहे, त्यातून मला कशी मदत करणार ते सांग. आणि लक्षात ठेव आयुष्यात सुद्धा तुम्ही problems ला कसे respond करता, त्याला कसे सामोरे जाता, त्यावेळेस तुम्ही स्वत:ला खर्या अर्थाने prove करता. असं मला वाटतं.

मी: ……….

कस्टमर: मग पाठवतोय ना माणसाला.

मी: Am I left with any choice?

हे असं होतं बघा. या कस्टमर सारखे मित्र आहेत. त्यामुळे चांगलं वागावंच लागतं हो. तसं आपण पण फार चालू माणूस आहे, पण आजूबाजूची लोकं  अन परिस्थिती आपल्याला चांगलं वागायला भाग पाडते हो. आपली इच्छा नसताना. छ्या!

२०५०:

आजच्या ठळक बातम्या (ब्रेकिंग न्यूज नव्हे)

आज अनंतचतुर्दशी ची मिरवणूक ठरल्याप्रमाणे ६ तासात संपली. सुमारे दीडशे वर्षापासून चाललेल्या या उत्सवाने ४० वर्षापूर्वी अगदी खालची पातळी गाठली होती. गेल्या दशकात मात्र यात अमुलाग्र बदल होऊन पुणे शहरात केवळ ५ गणपती बसतात आणि त्यांचीच मिरवणूक निघते. ढोल ताशाच्या निनादात, लेझीम खेळत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या मधून गेलेल्या मिरवणुकीचा आनंद अवर्णनीय होता. नाही म्हणायला गुलाल उधळला गेला, पण कार्पोरेशन ची स्वयंचलित झाडूची गाडी रस्ता लागलीच साफ करत होती. दीड शतकापूर्वी चालू झालेल्या, त्यावेळेस कदाचित संयुक्तिक असलेल्या, या उत्सवाचा फोलपणा लक्षात आल्यामुळे नागरिकांनीच यात बदल घडवून आणला. काही दिवसांपूर्वीच कमिटीची मिटिंग झाली आणि हळूहळू ह्या उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप काढून हा उत्सव वैयक्तिक स्वरुपात साजरा करावा असे ठरते आहे. विसर्जनाचीही प्रथा बंद होऊन त्याच मुर्तीची पुजा प्रत्येक वर्षी केली जाते.

दही हंडी नावाचा घातक उत्सव साजरा करणार्याची प्रथा बंद केल्यानंतर गणेशोत्सवाचे स्वरूप बदलण्याच्या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे.

सण, परंपरा, व्रतवैकल्य या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक होत चालला आहे की या सगळ्या गोष्टी जर आता बंद केल्या नाहीत तर तुम्ही म्हणता तो हिंस्त्रपणा यायला फार वर्ष दूर नाहीत. तुम्ही बघितलं तर या सणांचं स्वरूप तुमच्या लहानपणापासून ते आतापर्यंत कसं बकाल होत चाललंय ते. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, माघी, मार्गशीर्ष याचे वाढवलेले स्तोम आणि त्यात होणारा वेळेचा अन पैशाचा अपव्यय हे आपल्या सगळ्यांना जगाच्या तुलनेत मागे ढकलतंय यात माझ्या मनात शंका नाही.

choice 

No comments:

Post a Comment