Sunday 31 August 2014

Value addition

लिहायचं कारण की, निलेश बंडाळे ने मधे प्रश्न विचारला होता Is Facebook value addition? आणि आठवड्यापूर्वी एका वादळी वाटणार्या मित्राने त्यांना फेसबुकवर मानसिक त्रास झाला असे लिहीले. खरंतर त्यांच्या लेखनशैलीवरून ते स्वत:ला मानसिक वैगेरे त्रास करून घेतील असं अजिबात वाटत नव्हतं. पण आता त्यांनीच लिहीलं म्हणजे खरंच असेल.

मला स्वत:ला २००४ साली professional front वर प्रचंड मानसिक त्रास झाला. इतकं कि मी नैराश्याचा शिकार झालो. छातीत pricking pains व्हायचे. एके दिवशी ऑफिस मध्ये दरदरून घाम फुटला. सरळ जहांगिरला पोहोचलो. सगळ्या टेस्ट झाल्या. बाकी रिपोर्ट नॉर्मल. शिवाजीनगरला एक महेश तुळपूळे नावाचे डाॅक्टर आहेत. त्यांनी माझं सगळं चेकिंग केलं आणि सरतेशेवटी सांगितलं "मित्रा तुझा त्रास मानसिक आहे तु psychatrist ला दाखव" त्यांनी डाॅ वाटवेंचा reference दिला. दोन सिंटींग झाल्यावर डाॅक्टर म्हणाले तु जी दोन कामं करतो आहेस त्यातलं एक सोड आणि या गोळ्या घे. पुढची appointment २० डिसेंबर ला. ही गोष्ट सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याची. मी एक काम सोडलं, अन १५ नोव्हेंबरला वाटवेंना फोन केला "मी मस्त झालो आहे, २० डिसेंबरची भेट cancel"

२०१० ला जाॅईंट वेंचरच्या गोष्टी चालू झाल्या. मनाप्रमाणे घडत होतं, पण एक मनावर अनाहूत टेन्शन होतंच. त्यात सोसायटीचं काम हातात घेतलं, त्याचा प्रचंड मनस्ताप झाला. २०११ च्या मे मधे १५ दिवसाच्या अंतराने दोन छोटे ट्रेक मारले. दोन्ही वेळेस गड़ चढताना छातीत दुखलं. स्ट्रेस टेस्ट झाली पाॅझिटिव्ह आली. डाॅ हरदासांनी १८ जून २०११ ला अँजियोग्राफी केली अन लागोलाग प्लास्टी पण. हो इलाज नव्हता LAD ९५% पेक्षा जास्त ब्लाॅक होती. (१८ जून २००९ ला वडील गेले. बरोबर दोन वर्षानी मला life extension मिळालं). पोस्ट operative चालण्याचा व्यायाम करत असताना रेस कोर्स वर चक्कर आली, म्हंटलं जीवनदान क्षणिक का? परत निदर्शनास आलं त्रास मानसिक. झोपंच यायची नाही. यावेळेस डाॅ ज्योती शेट्टी. परत गोळ्या. हळूहळू टेपर करत सोडल्या.

अजूनही कंपनीत तशीच टेन्शन असतात, भांडणं होतात, कॅश फ्लो चा प्रोब्लेम असतो, कधी बाॅटमलाईन मार खाते. पण मला आता psychiatrist ची गरज नसते. ब्लाॅग लिहीण्यात नाहीतर फेसबुकवर मन रमवतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा कुणी माझ्या intention वर डाउट घेतला की रात्रभर तळमळणारा मी आता काय लिहायचं याचा विचार करत या जगात रममाण होऊ लागलो. आता मला कंपनीच्या प्रोब्लेम्स चा अजिबात ताण येत नाही. कंपनीही व्यवस्थित चालू आहे. खरंतर जरा जास्तंच व्यवस्थित.

या सगळ्यातून एकंच सांगायचं आहे मित्रांनो, या आभासी जगाला घेउन आयुष्यात वादळं निर्माण करू नका. कुठं पोलिस कंम्प्लेंट अन काय काय. इथं प्रेम करायला वेळ नाही, कुठं एकमेकांचा द्वेष करायचा. चर्चा व्हावी पण त्याने मानसिक त्रास, अरारा!! झेपेल तितकंच, नाहीतर ब्लाॅक आहे अनफ्रेंड आहे, deactivation आहे. वापरा की त्याला दिल खोलके.

बघा, विचार करा. एक वेळ physical त्रास परवडला पण मानसिक त्रास नको. स्वानुभव आहे दोस्तांनो! फेसबुकला value addition बनवा, ना की........................

No comments:

Post a Comment