Friday 14 March 2014

Datt

चित्रपटाची संहिता/पटकथा चांगली असेल तर पात्र कुणीही रंगवले असेल तर शक्यतो जमून जाते. आता बघा ना जिंदगी ना बनेगी दोबारा मध्ये कतरिना सुद्धा कसली उच्च दर्जाची अभिनेत्री वाटते. एवढंच कशाला त्या फरहानची spanish girl friend हि आपल्या लक्षात राहते. लगान मधील कचरू आणि पार म्हातारे झालेले ए के हंगल हि विसरू म्हणता विसरत नाही आपण. स्वदेस मधील बल्ब पेटल्यावर आनंद झालेली म्हातारी विसरू शकतो का आपण?. ३ idiot मधील प्रत्येक charectar मनात घर करून राह्ते अगदी मिलीमीटर सकट.

हे असं असताना मुन्नाभाई MBBS  किंवा लगे रहो मुन्नाभाई सारख्या तगड्या संहिता असताना विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांनी लीड actor म्हणून संजय दत्त याची का निवड केली असावी बरे! म्हणजे त्याच्या जागी अगदी कोणीही खपून गेला असता. बरं हि दोघंही जर हुशार आणि सेन्सिबल मंडळी वाटतात. म्हणजे यांना कुणी असं सांगत नाही का कि "अरे हा संजय दत्त चालू माणूस आहे. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या एका मोठया conspiracy चा तो एक भाग आहे. त्याच्या नका तुम्ही नादी लागू" विद्या बालन किंवा ग्रेसी सिंग कशा intelligent बायका वाटतात. त्यांना म्हणावसं नाही वाटत का "हा माणूस असेल तर मी त्याच्या गळ्यात पडणार नाही" मला आठवतंय, लहानपणी मी एका मित्राबरोबर दुकानात गेलो होतो ज्याने काही दिवसांपूर्वी त्याच्याच घरात २-३ रुपयाची चोरी केली होती. मी त्याच्याबरोबर गेलो म्हणून बंबाच्या लाकडाने बदडला होता मला माझ्या आईने. मग हे चोप्रा आणि हिरानी सारखी विचारवंत मंडळीचं  संजय दत्त बाबत विचार करताना यांच्या बुद्धीचं दही होत नाही का? फारच बाळबोध प्रश्न आहेत, पण आज गप्पा मारताना उपस्थित झाले खरे.

No comments:

Post a Comment