Friday 6 February 2015

Make in India

आज भारतासमोर खरं आव्हान आहे ते ९-१०% ने GDP ची वाढ करायची, अन ती कुठपर्यंत? तर लोकसंख्येचा मोठा भाग हा दारिद्र्यरेषेच्या वर येईपर्यंत. नाही म्हणायला आपली घोडदौड चालू आहे पण ४-५ वर्ष, नंतर आनंद आहे. त्यामुळे हि ग्रोथ सतत दोन-तीन  दशकं करणं हेच गरजेचं आहे. आणि ते खरं आव्हान आहे. आणि ते आ वासून समोर तेव्हा आहे जेव्हा जवळपास ७० कोटी लोकांचे  पुढील ३०-४० वर्षात शहरीकरण होणार आहे. हो हो तेच शहरीकरण, नागरीकरण हे अटळ आहे. आणि हे होत आहे ते डेमोग्राफिक transition, जे देशाच्या इतिहासात दुर्मिळ होय. असं म्हणतात कि भारताची तरुण लोकसंख्या हि २०४० पर्यंत अजून तरुणच होणार आहे. त्याचवेळेस पाश्चात्य देशांत वृद्धांची वाढ होणार. आणि हे डेमोग्राफिक transition च सामाजिक बदलला कारणीभूत ठरणार आहे.

यात कळीचा मुद्दा हा कि हे सगळं घडण्यासाठी manufacturing सेक्टर चा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्विस इंडस्ट्रीचा  GDP मध्ये ५५% सहभाग आहे. त्याच वेळेला manufacturing चा मात्र फक्त १६%. आणि हि १६% इंडस्ट्री फक्त १२% employment देते. जो पर्यंत manufacturing इंडस्ट्री २५% पर्यंत जात नाही आणि अजून १० कोटी लोकांना जॉब्स देत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होणार हे फक्त स्वप्नच राहणार आहे. शेती आणि सर्विस इंडस्ट्री हि महत्वाची आहेच, पण manufacturing मध्ये जी supply चेन आहे त्यामुळे तिथे मल्टीफोल्ड ग्रोथ शक्य आहे. त्यामुळे manufacturing सेक्टर ला आता बाह्या सरसावून कामाला लागणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही आजचा कुठलाही प्रगत देश घ्या, हवं तर फक्त आशिया घ्या, पण जपान, कोरिया, चायना ह्या सगळ्यांच्या आजच्या आर्थिक संपन्नतेच कारण manufacturing आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि हे नक्कीच शक्य आहे कारण भारताजवळ उत्पादनक्षम होण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत.

इतकी वर्ष आपण सर्वच गोष्टी आयात करत आहोत अन त्यामुळे आपलं import bill अफाट आहे. इतकं की इथे development च्या गोष्टी केल्या की तिजोरीचा खडखडाट वाजतो. त्यामुळे ८-९ % GDP growth ही wish list नसून गरज आहे. Manufacturing सेक्टर ची वृद्धी करणे, त्या सेक्टरला लागणारं स्किल्ड मनुष्यबळ उभे करणे आणि मग त्यातून एकमेकांना पूरक employment generation करणे आणि ह्या सगळ्या प्रेसेसमधून economic development करणे अशी साखळी आहे. त्यात मग शहरीकरण अपरिहार्य आहे. जगात हे घडत आलं आहे. चीन मला देश म्हणून आवडत नाही पण त्यांच्या तथाकथित सक्सेसचा विचार केला तर असंच घडलं आहे. १९७५ पासून तिथे प्रचंड नागरीकरण झालं आहे अन ते होताना जवळपास ८० कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं आहे.

त्यामुळे हे जे Make in India प्रकरण चालू झालं आहे त्याला across spectrum लोकांनी अंगीकारलं पाहिजे. भारत देश हा जॉब seeker न राहता जॉब creator म्हणून उदयास यावा. Design, innovation आणि सगळ्यात मुख्य म्हणजे frugal engineering, जी भारताची strength आहे, तिच्या मदतीने manufacturing sector ची exponential growth होऊ शकते. आणि मागे एकदा लिहील्याप्रमाणे, ग्लोबल स्टँडर्ड जर अंगिकारले तर competitive manufacturing मुळे आपण आंतरराष्ट्रीय सप्लाय चेनचा नक्कीच भाग होऊ शकतो.

या सगळ्या प्रकारात जर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शहरीकरणाचं, urbanization. पण solid waste management, recycling, मग ते पाण्याचं असो,पेपरचं असो किंवा अजून कुठलं पण त्याचा कल्पकतेने वापर करून शहराचा चेहरा बदलणे अन नवीन जन्माला येणार्या शहरांचं नियोजन करणे यावर देशाची पत अवलंबून आहे.

२२-२८ जानेवारीला Imtex होतं बंगलोरला. देश विदेशातून लाखाच्यावर लोकं आले होते. भरपूर लोकांशी बोललो अन त्याच काळात एक इंग्रजी लेख वाचला याच विषयावर. त्या लेखांचा बराच भाग आहे इथे. मधे पण शहरीकरण/नागरीकरण यावर लिहीलं तेव्हा बरीच टीका झाली होती. पण हे अपरिहार्य आहे.

उर्जा तर इथे ठासून भरली आहे, तिचा योग्य वापर करण्याचा उत्साह exhibition मधे दिसला. आणि जगाच्या नजरेत इथे काही घडणार हा आशावाद ही दिसला.



No comments:

Post a Comment