Thursday 27 August 2015

शिक्कामोर्तब

२००२ ला मी रोलॉन नावाच्या कंपनीचा जॉब सोडला. माझा Manager बोनी म्हणून होता. मला म्हणाला "अरे राजेश, कसं होईल आता. नवीन माणूस कसा मिळेल. आणि मुख्य म्हणजे चांगला पण मिळायला हवा" काय कारण ते माहित नाही, पण माझी अन बोनीची सॉलिड घष्टन होती आणि बोनीशीच नाही तर ऑफिस मधल्या सगळ्यांशी जुळलं होतं व्यवस्थित होतं. मी बोनीला बोललो "चिंता नको करू. एक नाही, चार राजेश मिळतील तुला. आणि मिळवून द्यायची जबाबदारी माझी."  TOI मध्ये छान डिझाईन केलेली ad टाकली. आणि सेन्ट्रल हॉटेल ला इंटरव्ह्यू अरेंज केले. दोन दिवसात कडाकड २० लोकांचे इंटरव्ह्यू झाले आणि पाच एकाहून एक सरस लोकं सिलेक्ट केले अन म्हंटल बोनीला "घे लेका. एक नाही पाच राजेश उभे केलेत. आणि त्याच्या पेक्षाही सरस"

ही गोष्ट तेरा वर्षापूर्वीची.

गेले दोन दिवस इंटरव्ह्यू घेतोय. सेल्स को ऑर्डीनेटर साठी. आज शोर्टलिस्ट केले ९ जण. ६ मुली आणि ३ मुलं. आणि तुम्हाला सांगतो नऊ  नावं लिहायची कागदावर एका खाली एक. अन डोळे झाकून कुठल्याही एका नावावर बोट ठेवायचं आणि सिलेक्ट करा. कामात परफेक्ट असणारच. असे एक नाही ९ हिरे सिलेक्ट केलेत.

लोकं घ्यायची चौथी वेळ. लोकं मिळत नाही अशी जी बोंब मारतात तिच्यात काही अर्थ नाही असं मला तेरा वर्षापूर्वी वाटलं होतं.

आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.

**************************************************************************

किमान पाच कंपन्याचे लोकं आले. ह्या पाचही कंपन्या पुण्यात चालू झाल्या होत्या दोन एक वर्षापूर्वी. दोन अमेरिकन, दोन ब्रिटीश, एक जर्मन. दोन वर्षातच गाशा गुंडाळला. कारणं काय, तर ह्या देशात बिझीनेसला पुरक वातावरण नाही. शासनाचा taxation चा जाच आहे, कस्टमर वेळेत पैसे देत नाही, वारंटी स्कीमचा गैरफायदा घेतात. पुण्यातच ५ उडल्या तर देशात किती गेल्या असतील. परदेशात जाऊन मोठमोठी आश्वासनं देणं ठीक आहे पण ग्राउंड लेवल ला जे सांगितलं त्याची पूर्तता पुढील वर्षभरात केली नाही तर २०१९ ला वांदे होतील हे ध्यानात असू द्यावं. परवा जेफ शी बोलत होतो, अमेरिकेत. म्हणाला "अमेरिकेत तर भारताचा खुप बोलबाला आहे. ब्रिक्स देशापैकी फक्त भारतातंच आलबेल आहे असं अमेरिकेत बोललं जातं. आम्ही खुप ambitious प्लानिंग करतो आहे, भारतासाठी." मी बोललो "तात्या, सावकाशीने घे. तिथल्या भारतीयांच्या बाजारगप्पांवर तू जर काही ठरवत असशील तर चूक करतो आहेस. इथे आमच्याशी बोल. मान्सून अर्धा झाला तर आमची पळता भुई थोडी झाली आहे. श्रद्धा ठेव पण सबुरी ही ठेव".


एकंदरीत काय! तर भरपूर घासायची आहे आपल्याला.

****************************************

तशी गरज नाही, पण यावर्षापासून एक तरी ट्रेनी इंजिनियर घ्यायचा ठरवला आहे. पंखात बळ द्यायला चालू करावं, नाही का?


No comments:

Post a Comment