Monday 16 March 2015

प्रश्न

खालील पोस्ट मी खाजगीरीत्या ५-६ जणांना पाठवली. पण कार्यबाहुल्यामुळे कुणी त्याला उत्तर नाही दिलं. फक्त एकाशी फोनवर बोललो. हा फोन फेसबुकच्या फोरम वर टाकतो आहे. हो, आणि कृष्णा उमरीकर म्हणतो तसं हे काही मधमाश्याच्या पोळ्यावर दगड मारायचा प्रयत्न नाही आहे. genuine प्रश्न आहे, genuine comment टाकाव्यात हि विनंती. 

बरेच दिवसापासून हे डोक्यात घर करून आहे. 

खरं तर सगळेच स्वातंत्र्य काळातील नेते हे तुमच्या माझ्यासारखे नॉर्मल लोकं होते. त्यांनी केलेल्या काही चुका अगदी अक्षम्य अशा होत्या. पण त्या चुका ज्यासाठी करत होते तो उद्देश, देशाला स्वातंत्र्य देण्याचा, हा इतका महान होता कि त्यासमोर या चुका झाकोळल्या गेल्या. किंबहुना त्यातल्या काही चुकांचं रीतसर ग्लोरिफिकेशन केलं गेलं. गांधी, सावरकर, आंबेडकर यांच्यावरून तर इथे नेहमीच वाद होतात. या तीन नेत्यांवरून, इथे म्हणजे महारष्ट्रात, जितके वाद होतात तितके दुसर्या कुठल्याही नेत्यावरून होत नसावेत. 

हिटलर चा जो Fascism, ज्याला नंतर Fascist असं संबोधलं जातं आणि साधारण हे विशेषण सावरकरवादी मंडळीना लावलं जातं. याच हिटलर चा पाठपुरावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही केला होता. हिटलर बरोबर ते मुसोलिनी सारख्या हुकुमशहा ला भेटले होते. इतकंच नव्हे तर इंग्रजांना पळवून लावण्यासाठी त्यांनी त्या काळी अत्यंत भ्रष्ट आणि स्त्री लंपट असलेल्या जपान्यांची मदत घेतली होती. त्यांचे हे सगळे प्लान सपशेल फसले होते असं दिसून येतं. 

असं असताना, सावरकरांच्या एकंदरीत शैलीबद्दल जितकं वादळ उठतं, तितकं नेताजींच्या शैली बद्दल उठत नाही असं दिसतं. यामागची कारणं काय असावीत. सावरकरांचा गांधी हत्येतील कथित सहभाग, यामुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळली हे तर नक्कीच. त्यांना न्यायालयाने सोडलं वैगेरे हि गोष्ट वेगळी. पण त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला मोठा  डाग लागला हे त्यांचे समर्थक हि मान्य करतील. या व्यतिरिक्त काय?

दुसरं, महारष्ट्रात सावरकर यांच्यावरून  दोन गट आहेत आणि ते जातनिहाय आहे हे स्पष्ट दिसतं. अशा वेळेस प बंगाल मधेही नेताजींच्या विचार शैलीवरून जात निहाय दोन गट आहेत का? कि सरसकट बंगाल मध्ये नेताजींना मानतात. कि सरसकट विरोध आहे, जी शक्यता कमी आहे. 

असं असण्यामागे काय कारण असावे.? नेताजींनी ज्या चुका केल्या त्याचं glorification केलं गेलं का? नेताजींचा मृत्यू हा गूढ आहेच. कि आजकाल सावरकरवादी त्यांचा मृत्यू हा मानसिक क्लेशातून प्रायोपवेशन ने झाला असं म्हणतात तसाच नेताजींचा मृत्यू सुद्धा glorified आहे का?

आणि एक. नेताजी बद्दल सहानुभूती असण्यासाठी गांधीनी त्यांना दिलेली सापत्न वागणूक कारणीभूत आहे का?

प्रश्न

No comments:

Post a Comment