Monday 7 September 2015

ब्लॉग कॉमेंटांचा

परवा एक गंमत झाली, म्हणजे इतकी की एक सेपरेट पोस्ट तयार व्हावी. तर झालं असं की इग्लंडहून स्टीव्ह आला होता. बोलता बोलता कलामांच्या मृत्युचा विषय निघाला. मी त्याला मी कलामांना इंग्रजीत लिहीलेलं पत्र दाखवलं. वाचल्यावर तो गालातल्या गालात हसत राहिला. अन म्हणाला "असं इंग्रजी आमच्या इथे जुन्या काळात लिहीलं जायचं. वाक्यरचना, शब्द हे आता वापरत नाही. कदाचित माझे वडील असं लिहीत असावेत. मी असं आता लिहू शकत नाही याचं मला वाईट वाटतं."

आता हे तो उपहासाने म्हणाला, माझी टिंगल करत होता की स्तुति हे काही मला कळलं नाही.


दहीहंडी हा एक कालबाह्य उत्सव आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचेल की माहित नाही पण सिनेतारकांना आवाहान करण्याची पोस्ट काही कारणांमुळे राहून गेली. पण मानसी, श्रुति, गिरीजा, अमृता एकच सांगणं या असल्या भिकार स्वरूपाच्या उत्सवात चार पैसे मिळण्यासाठी मोताद होऊ नका. जरा स्व ची चाड ठेवा
कसलं साध्य? खेळ झाला आहे पोरांच्या आयुष्याचा. दहीहंडीचे मनोरे मंडळ आणि ढोलपथक हे करियर ऑप्शन आहेत म्हणे. याच्याइतकी हास्यास्पद गोष्ट नाही
शरद, अरे ग्लॅडिएटर मधे शूर असतात अन पुर्ण पुरूष, स्वत:च्या मर्जीने लढणारे. मागील वर्षी पोस्ट टाकली ती संक्षेपात देतो.

मला दहीहंडी अरबांच्या उंटाच्या खेळासारखी वाटते. लहान पोरं बसवायची अन उंटांना चेकळवायचं. उंट उधळतात. लहान पोरं पडायची, जखमी व्हायची. त्यांना बाजूला काढायचं, नवीन पोरं जुंपायची अन खेळ चालू.

जेव्हा वाचलं तेव्हा वाटायचं अरब मध्ययुगीन काळात वावरतात.

दहीहंडी यापेक्षा वेगळी नाही.


बरं पुसला! मग पुढे काय? काही नाही, हाणामार्या, शिवीगाळ.

या साठीतल्या विद्वानांची बुद्धी नाठी झाली आहे. मला स्वत:ला सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल, विद्वत्तेबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. पण गांधीहत्येतला त्यांचा सहभाग हा कुठल्या सोम्यागोम्याने अधोरेखित केलेला नाही तर शासनाने नेमलेल्या आयोगाने म्हंटला आहे. आणि जर झापडं न लावता गांधीहत्या आणि मी किंवा कोणतेही सावरकर चारित्र्य वाचले तर त्यांचा सहभाग असावा हे माझ्यासारख्या शेंबड्या पोरालाही वाटते. त्यातली संदिग्धता हा वेगळा विषय. पण संभ्रम असूनही सरसकट कलंक पुसा अशी मागणी करणे हे विद्वानांना योग्य कसे वाटते हा म्या पामराला पडलेला प्रश्न आहे.

माझ्या हाती माईक अन माझंच ऐक असली गोष्ट या मंडळींनी टाळावी. इतिहास घडला, संपलं आहे. वर्तमानाचे प्रश्न दाहक आहेत, भविष्य भीषण आहे अशा वेळेस या मंडळींना त्यांच्यापेक्षा हुशार मंडळींनी केलेल्या निवाड्यावर शंका घेण्याची उपरती कशी होते हा मोठा प्रश्न आहे.

ने मजसी ने किंवा जयोस्तुते म्हणताना आजही मी रोमांचित होतो पण त्याच वेळेस गांधीहत्येत सावरकरांना बेनेफिट ऑफ़ डाऊट मिळाला हे विसरतो येत नाही.

मच्छुदा, मी त्यांच्या साहित्यावर प्रेम करतो, देशप्रेमावर आदर करतो. मोरे काय म्हंटले, कपूर आयोग काय म्हणतोय या गोष्टी विसरून जाऊ. तुम्ही स्वत: सावरकरांवरचे चरित्र वाचा, खेरांचं, फडक्यांचं आणि छातीवर हात ठेवून सांगा तुम्हाला काय वाटतं ते! मनात असं ठेवा की गांधींना मारणे बरोबर की चूक. हत्येच्या योग्यायग्यतेवर तुमची भूमिका बदलेल.

माझ्या मते गांधीहत्या ही कधीही समर्थनीय नाही.

No comments:

Post a Comment