Friday 19 May 2017

पतंजली

कालच्या पोस्टचा विनोद सोडून गाडी भलत्याच ट्रॅक वर गेली. पतंजली बद्दल माझं मत सांगतो.

रामदेवबाबा यांच्याबद्दल मला अजिबात सख्य नाही. किंबहुना रागच आहे. कारण नसताना राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेली ढवळाढवळ म्हणजे मला विनाकारण केलेली लुडबुड वाटते. स्त्रीवेष धारण करून त्यांनी केलेलं पलायन हे हास्यास्पद होतं. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली त्यांनी त्यांचे प्रॉडक्टस वापरण्याचं आवाहन हे ही मला आवडत नाही. माझी स्वतः ची कंपनीच मी अमेरिकन कंपनीला विकून बसलोय तर मी काय राष्ट्रभक्तीचं कौतुक सांगणार.

असं असलं तरी त्यांचं बिझिनेस मॉडेल भारी आहे हे मान्य करायला हवं. प्रत्येक एरियाला एक फ्रँचाईजी, हे खायचं काम नाही. युनिलिव्हर ला टक्कर द्यायची म्हणजे गंमत नाही. डाबर आणि निरमा पुरून उरलेत, पण कित्येक देशी ब्रँड्स ला लिव्हर ने गिळंकृत केलं आहे. अन तिथे त्यांच्या नाकावर टिच्चून हा बाबा प्राईम स्लॉट मध्ये टीव्ही वर ऍड करत फिरतो आहे.

आणि याउपर त्यांचं जे काही प्रॉडक्ट घरात येतंय त्याची क्वालिटी अजून तरी स्वीकारार्ह आहे. ती नसली असती तर मी पतंजली चं प्रॉडक्ट कधीही वापरलं नसतं. ती कुणाला स्वीकारार्ह नसण्याची शक्यता असेल.

स्वीकारार्ह क्वालिटी नाही आणि फक्त राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मी जर गोष्टी विकत घेतल्या असत्या तर आज मी टाटांची कार फिरवत असलो असतो.

पतंजली चं काय काय होऊ शकतं?

- ज्याप्रमाणे सुभिक्षा गायब झालं त्या पद्धतीने ह्यांच्या पण पाट्या गुल होऊ शकतात.
- रामदेव बाबा कुठल्या तरी मल्टी नॅशनल ला पतंजली विकून पाच सहा हजार कोटीचे मालक होऊ शकतात.
- पतंजली ही एक सक्सेस स्टोरी बनून, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भरपूर कंपन्या उदयाला येऊ शकतात.





No comments:

Post a Comment