Thursday 21 December 2017

राम 17

"बरं, परवा अगदी टेचात लिहिलंस, लोकांनी कंपनी सोडून गेल्यावर कसं वागायला पाहिजे ते" राम म्हणाला.

"हो, मग! चुकीचं काय आहे त्यात" मी म्हणालो.

"अच्छा, पण जेव्हा एखादा माणूस तुझी कंपनी सोडून जातोस, तेव्हा तुझी वागणूक त्याच्याबद्दल कशी असते" रामने विचारलं.

"अं... म्हणजे.....अं, तसं बघायला गेलं तर....म्हणजे कसं......" मी शब्द जुळवत होतो.

राम म्हणाला "उत्तर बनवायला त्रास होतोय ना!"

मी सावरत म्हणालो "तसं नाही, म्हणजे मी फारसा कधी विषय काढत नाही त्यांच्याबद्दलचा."

राम म्हणाला "त्यांना कधी फोन करतोस का, की कसे आहात वगैरे"

मी म्हणालो "मी कशाला विचारू? कंपनी सोडली त्यांनी मग माझा काय संबंध त्यांच्याशी"

राम म्हणाला "एका वर्षाच्या आत जे सोडून जातात, त्यांच्याबद्दल ठीक आहे पण जे तीन, पाच वर्षापेक्षा जास्त काळ तुझ्या कंपनीत घालवतात, त्यांनी काही काँट्रिब्युशन केलं असतं, कंपनी वाढवण्यासाठी. त्यांच्याबद्दल तुझ्या मनात इतकी रुक्ष भावना नको. सोडून गेलेल्या लोकांबद्दल चांगली भावना मनात ठेवली की बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो. ती लोकं समोरून आलेच तर कधी चहा वगैरे पित त्यांच्या सध्याच्या जॉब बद्दल चर्चा करण्याची सद्सद्विवेक बुद्धी ठेव."

मी गप्प बसलो.

"दुसऱ्यांबद्दल पोस्ट टाकायला मजा वाटते. आता कसली मिरची लागली ना!" राम म्हणाला.

"कुणालचा नंबर शोध रे" मी आमच्या एच आर ला सांगितलं.

No comments:

Post a Comment