Thursday 21 December 2017

My Life

आपलं मन हे जर आपल्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू असेल तर आपण त्या केंद्रबिंदूपासून लांब एका त्रिज्येच्या कक्षेत भ्रमण करत असतो. एक माणूस म्हणून जेव्हा इव्होल्युशन प्रोसेस योग्य दिशेने घडत राहते तेव्हा ती त्रिज्या हळूहळू कमी होत जाते. आणि आपला प्रवास त्या केंद्रबिंदूच्या दिशेने होत राहतो.

आयुष्यात अशा काही घटना घडतात की आपलं बाह्यरूपावर काम करणारं मन मग त्या केंद्रबिंदूपाशी घुटमळत राहतं. एकवेळ अशी येते की मग त्रिज्या होते शुन्य आणि मग आपलं मन हे बिंदू न राहता ब्रह्मांड होतं.

मनाची ही अवस्था आली की "माझं आयुष्य" हे माझं न राहता तुझं होतं, त्याचं होतं. नव्हे, ते साऱ्या विश्वाचं होतं.

(हलकेच घ्या रे. मी व्यवस्थित आहे. सुचलं म्हणून लिहिलं) 😊😊

No comments:

Post a Comment