Thursday 21 December 2017

राम18

राम आणि मी कार ने चाललो होतो. तासाभराचा प्रवास झाल्यावर राम ने मला विचारलं

"हा ए सी तू सारखा बंद चालू का करतोस?"

मी म्हणालो "त्याने फ्युएल कंझम्पशन चांगलं मिळतं. आणि कारपण खूप गार झाली असते. तिचं टेम्परेचर पण जागेवर येतं" 

राम म्हणाला "येडा आहेस तू. या पद्धतीने फ्युएल कंझम्पशन वाढतं. कारण ए सी बंद करून तू जेव्हा परत चालू करतोस तेव्हा कारला गार करण्यासाठी एसी ला जास्त एनर्जी आणि पॉवर लागते. तेव्हा जे तुला कम्फर्टेबल तापमान आहे ते एकदाच सेट कर. मग भले ते २५-२६° असो वा१८-१९°. आणि तिथे सिस्टम ला सोडून दे. जास्तच गार गरम झालं तर त्या दुसऱ्या नॉब ने तापमान कमी जास्त कर पण एसी बंद चालू नको करु. एकदा तापमान सेट झालं की त्याचा आनंद घे. काहीतरी काड्या करून ती सिस्टम बिघडवू नको."

पुढे जाऊन म्हणाला "आयुष्यही असं जग. बऱ्याच कष्टाने टक्के टोणपे खाऊन जीवन सेट होतं. परिस्थिती त्याला कधी बिघडवेन हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे एकदा स्टेबिलिटी आली की त्या काळाचा आनंद घे. स्वतःहून काड्या करून अनकम्फर्टेबल करू नकोस. कारण परिस्थिती त्या काड्या करतच असते. मग तेव्हा तिच्याशी दोन हात करायला एनर्जी उरत नाही"

हा राम कशाचा संबंध कशाला लावेल याचा काही भरवसा नसतो.

No comments:

Post a Comment