Thursday 21 December 2017

नमस्कार

माझा एक मित्र चांगल्या कंपनीत पंचवीस वर्षे काम करत होता. त्यानंतर काहीतरी वादावादी झाली आणि त्याने कंपनी सोडली. त्याला उडवलं की त्याने सोडली हे गुलदस्त्यात होतं.

कधीही भेटला की तो त्याच्या जुन्या कंपनीचा विषय छेडायचा. आणि ती कंपनी आता किती प्रोब्लेममध्ये आहे त्याच्या मनघडन कहाण्या सांगायचा. ज्या कंपनीत या पठ्ठ्याने पंचवीस वर्षे घासली तिथे आता याला किती अनप्रोफेशनलिझम आहे त्याचा साक्षात्कार होऊ लागला.

त्याची आधीची कंपनी माझी ग्राहक आहे. एकदा तिथे जायच्या आधी माझा मित्र म्हणाला "जरा माझा विषय काढ रे. काय म्हणतात ते बघू"

मी बोलताना तिथल्या एमडीशी बोलताना संजयचा, माझ्या मित्राचा, उल्लेख केला. त्या एमडीने संजय काय म्हणतो इतकं विचारून पुढे सरकला. संजयची त्याने निंदा तर केलीच नाही, उलट निघताना त्याला नमस्कार सांगितला.

आपण एखादी कंपनी सोडल्यावर तिथे आपल्याबद्दल काही आकस वगैरे नसतो. आपण तिथे नाही म्हणून त्या कंपनीला प्रॉब्लेम आहे वगैरे गोड गैरसमजात कुणी राहू नये.

वैयक्तिक माणसापेक्षा संस्था, ऑर्गनायझेशन ह्या नेहमीच मोठ्या असतात.

No comments:

Post a Comment